Friday, 31 May 2024

विधिमंडळ कामकाजाबाबत मंत्रालयात तीन जूनला कार्यशाळा

  वृत्त क्र. 417

विधिमंडळ कामकाजाबाबत

मंत्रालयात तीन जूनला कार्यशाळा

 

            मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘माध्यम साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दि. ३ जून २०२४ रोजी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात करण्यात आले आहे.

            या कार्यशाळेत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधिमंडळ सचिवालयाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे, विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना या विषयावर प्रधान सचिव श्री.भोळे, द्वितीय सत्रात विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, चर्चा आणि विशेषाधिकार या विषयावर निवृत्त प्रधान सचिव श्री.कळसे तर तृतीय सत्रात विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज व दस्तऐवज या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे मार्गदर्शन करतील.

            विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचे वार्तांकन करताना माध्यम प्रतिनिधींना ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा उपयोग अधिवेशन कामकाजाचे वार्तांकनासाठी करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे.

रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी

 रेल्वेच्या जम्बो ब्लॉक’ कालावधीत

सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी

 

            मुंबईदि. 31 : मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

             ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहेअसे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन




 

        मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी उपसचिव रोशनी कदम - पाटील, अश्विनी यमगर, चंद्रशेखर तरंगे, अवर सचिव अशोक नायकवडे, नारायण माने, भरत बिडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

मलेशियाचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार असल्याची माहिती मलेशिया राज्याशी व्यापार, पर्यटन, विज्ञान तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्याबद्दल उत्सुक

 मलेशियाचे पंतप्रधान भारत भेटीवर येणार असल्याची माहिती

मलेशिया राज्याशी व्यापारपर्यटनविज्ञान तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्याबद्दल उत्सुक



- दातो मुजफ्फर शाह मुस्तफा

            मुंबई, दि. 31 : मलेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ व सहकार्याचे असून येत्या तीन वर्षात उभय देशांमधील व्यापार २० अब्ज डॉलर वरुन २५ अब्ज  डॉलर इतका वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आगामी काळात मलेशिया भारताशी पर्यटनविज्ञान व तंत्रज्ञानक्रीडा व पाम लागवड या क्षेत्रात सहकार्य वाढविणार असून या दृष्टीने महाराष्ट्र हे राज्य मलेशियाकरिता सर्वात महत्वाचे असेल असे प्रतिपादन मलेशियाचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त दातो मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी येथे केले.

            मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी गुंतवणूकव्यापार व पर्यटन विषयक मलेशियाच्या शिष्टमंडळासह गुरुवारी (दि. ३०) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

            मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम लवकरच भारतभेटीवर येण्याची शक्यता असून आपल्या दौऱ्यात ते मुंबईला देखील भेट देण्याची शक्यता असल्याचे मुस्तफा यांनी सांगितले.  मलेशियाला सेमीकंडक्टर निर्मितीचा ५० वर्षांचा अनुभव असून मलेशिया - भारत डिजिटल सहकार्य परिषदेच्या माध्यमातून डिजिटल अर्थव्यवस्था तसेच सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात मलेशिया भारत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

            मलेशिया भारतीयांना आगामी वर्षभर आगमनानंतर विजा देत असून भारताने देखील मलेशियातून येणाऱ्या नागरिकांना आल्याबरोबर विजा उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            भारतातून मलेशियाला गेल्यावर्षी ७ लाख पर्यटक आले असून यंदा त्याहून अधिक पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या दृष्टीने मलेशियन मुंबईदिल्ली व चेन्नई येथे पर्यटन कार्यालये उघडली असल्याचे त्यांनी सांगितले. मलेशिया वेडिंग डेस्टिनेशनगोल्फ या दृष्टीने भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाम तेलाबाबत गैरसमज दूर करणार

            मलेशिया भारताला ३० लक्ष टन पामोलिन तेल निर्यात करीत आहे. पामोलिन हे खाद्य तेल असले तरीही या तेलाबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत असे सांगून ते दूर करून पाम तेल आरोग्यासाठी चांगले आहे हे पटवून देण्यासाठी मलेशिया प्रयत्न करीत असल्याचे उच्चायुक्त मुस्तफा यांनी सांगितले.

            जगाची लोकसंख्या वाढत असताना पाम तेलांमुळेच लोकसंख्येची खाद्य तेलाची गरज पुरी होऊ शकते असे त्यांनी सांगितले. एक हेक्टर क्षेत्रफळातून तीस वर्षे ८ टन पाम तेलाची निर्मिती होत असल्यामुळे पाम लागवड शेतकऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारताने नवीन परराष्ट्र व्यापार नीती जाहीर केली असून मलेशियाने भारताशी पारंपरिक क्षेत्रांशिवाय डिजिटल अर्थव्यवस्थाअक्षय ऊर्जासेमीकंडक्टर निर्मिती व स्टार्टअप क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. भारत जगाचे औषध निर्मिती स्थळ म्हणून उदयास आले असून उभय देशांनी जेनेरिक औषध निर्मितीवॅक्सीन विकास व आरोग्य कर्मचाऱ्यांची गतिशीलता या क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे असे राज्यपालांनी सांगितले.

            बैठकीला मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी यूसोफ तसेच गुंतवणूकपर्यटन व व्यापार विषयक कार्यालयांचे भारतातील प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

Malaysian High Commissioner calls on Maharashtra Governor

               Mumbai, 31st May : The newly appointed high commissioner of Malaysia to India Muzafar Shah Mustafa accompanied by a investment, trade and tourism delegation called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Thursday (30 May).

               The High Commissioner spoke of enhancing relations with India in the areas of Digital Economy, Tourism, Science and Technology and Palm plantation. He informed that the Prime Minister of Malaysia is likely to visit India during which he will also be visiting Mumbai. Consul General of Malaysia Ahmad Zuwairi Yusoff was also present.             

-----------------

* 🙏🏽 😊 *"जांको राखे साईयां मार सके ना* *कोई चाहे सारा जग क्युंँ ना बैरी होय"*🙏🏽

 *जय जिनेन्द्र* 🙏🏽 😊


*"जांको राखे साईयां मार सके ना*


 *कोई चाहे सारा जग क्युंँ ना बैरी होय"*🙏🏽


दासबोध विष्यी

 🌼🌼॥ श्री॥🌼🌼


सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाहीत. पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागते. अशा पाण्यामुळे कफ वाढू शकतो. गडावर येण्यापूर्वी समर्थांना कफाची व्यथा होतीच. वैद्याने जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला. सज्जनगडापासून सर्वात जवळचे जिवंत पाण्याचे स्थान म्हणजे उरमोडी नदी. गडाच्या पायथ्याला असलेल्या परळी गावापासून ही नदी अडीच कि.मी.अंतरावर आहे. समर्थां साठी रोज दोन हंडे पाणी आणण्याची जबाबदारी कल्याणस्वामींनी स्विकारली. गुरु सेवेची उत्तम संधी मिळाल्याने त्यांना आनंद झाला. दोन भले मोठे हंडे घेऊन कल्याण उरमोडी नदीवर जाऊ लागले व येताना भरलेल्या हंड्याची कावड करुन रोज पाणी आणू लागले. एक दिवस समर्थ गडाच्या तटावर उभे राहून किल्याचे निरीक्षण करीत सता कल्याणस्वामींना पाणी आणतांना त्यांनी पाहीले. कल्याणाच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. भुकेने व उन्हाने चेहरा काळवंडलेला होता. कल्याणाची काहींतरी न्याहरीची व्यवस्था केली तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करुन समर्थ कोठीवाल्याकडे गेले व त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी दोन शेर हरभऱ्याची डाळ, अर्धा शेर गुळ व पावशेर साजूक तूप देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कल्याणाला बोलावून घेतले व प्रकृती उत्तम रहाण्यासाठी दिलेला शिधा न्याहारीसाठी वापरण्यास सांगितले. दुसऱ्या दिवसापासून कल्याणस्वामींना रोज शिधा सुरु झाला. त्या मुळे बाकीच्या शिष्यांच्या पोटात दुखू लागले. माणसाने स्वतः जास्त खाल्ले तर त्याचे पोट दुखतेच,पण दुसऱ्याला भरपूर खायला मिळालेले पाहून त्याचे पोट दुखू शकते. कल्याणांना जास्तीचा शिधा मंजूर झाला म्हणून सारे जण त्यांना डाळगप्पू असे म्हणू लागले. खरंतर त्यांच्या तोंडावर बोलायची कोणाचीच ताकद नव्हती.

"आता हा डाळगप्पूच पहा !" केवळ ढोर मेहनत आहे. भरमसाठ खायच आणि गुरासारख राबायचं, कधी जप करणे नाही, दासबोध वाचन नाही, अशा दिनचर्येने त्याच कधीही सार्थक होणार नाही. "ही शिष्यांची चर्चा समर्थांच्या कानावर गेली. एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले *"तुमच्या पैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत.?"*सगळे शिष्य एकाच वेळी गलका करुन आपली पारायणसंख्या सांगू लागले. यात एकावन्न पासून अकराशे पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंतचा सर्वांचा समावेश त्यात होता.

*"ऐसा सद्गुरु पूर्णपणी"*पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही, तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल ?" सारे शिष्य गडबडले. अगदी अकराशे पारायणे झालेल्यासुध्दा लज्जायमान होऊन गप्प बसला. तेवढ्यात समर्थांनी कल्याणास हाक मारली व तीच ओवी विचारली तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले *"स्वामीजी, ऐसा सद्गुरु  पूर्णपणी ! तुटे भेदाची कडसणी ! देहाविण लोटांगणे ! तया सद्गुरुसी !!" ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे."* कल्याण चुकला असेल म्हणून शिष्यांनी दासबोध काढून पाहीला संपूर्ण बरोबर होती. समर्थांनी विचारले "कल्याणा,तुझी किती हजार पारायणे झाली." हात जोडून कल्याण म्हणाले *"स्वामीजी, आपल्या कृपेने एकच पारायण मनापासून घडले."*  स्वामी म्हणाले *"बरं ते जाऊ दे अलिकडे डाळगप्पू नावाचा कुणी साधक आला आहे काय ? हा डाळगप्पू कोण ?"* कल्याण म्हणाले *"स्वामीजी , जीव, शीव, माया, ब्रह्म, सुख-दुःख ही दोन दळं जो गप्प करुन टाकतो सदैव अद्वैत बोधात राहतो तो डाळगप्पू होय.* मात्र ही व्यक्ति माझ्या पाहण्यात आली नाही." 

कल्याणस्वामींच्या या उत्तराने सारे शिष्य खजील झाले. आपली चूक त्यांच्या लक्षांत आली, नंतर समर्थांनी अगदी खरमरीत शब्दांत सर्वांची हजेरी घेतली व सर्व शिष्यांना सांगितले "उगीच नुसती पारायणे करु नका. दासबोध हे तंत्र आहे त्याचा मंत्र बनवू नका. शांतपणे वाचून अर्थ समजून घ्या. दासबोध जगायला शिका. कोणाची निंदा नालस्ती द्वेष करु नका."


*🍁 श्री 🍁*

Thursday, 30 May 2024

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी

 उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी


- जिल्हाधिकारी संजय यादव


            मुंबई, दि.30 : उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनासाठी दि.31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची "व्हीआयपी दर्शन"सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले असून पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.


            चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांसाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरुंनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल.


            तसेच जेष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे.


     उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

  

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध

 होईपर्यंत आचारसंहिता कायम

 

            मुंबई, दि. ३० : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

            आचार संहिता कालावधीत एखाद्या अत्यंत तातडीच्या प्रकरणी आचार संहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहेअशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या दि.२८.२.२०२४ च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आचार संहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत अशा एकूण ५९ प्रस्तावांवर भारत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. तरी आचार संहिता कालावधीत आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले जाईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी.

            भारत निवडणूक आयोगाने दि.१६.३.२०२४ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचार संहिता लागू केलेली आहे. आदर्श आचार संहितेच्या कालावधीमध्ये "काय करावे" व "काय करु नये" याबाबतच्या तसेच इतर विविध विषयाबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२.१.२०२४ च्या एकूण आठ पत्रान्वये स्वतंत्ररित्या देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या दि.५.३.२०२४ व ७.३.२०२४ च्या पत्रांद्वारे सर्व संबंधित यंत्रणास सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नाशिक व कोकण विभागात विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता

             नाशिक व कोकण विभागातील महाराष्ट्र विधानपरिषदेवरील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सदर रिक्त होणाऱ्या पदांसाठी भारत निवडणूक आयोगाने दि.२४.५.२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत पालन करावयाच्या आदर्श आचार संहितेबाबतच्या सविस्तर सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२६.१२.२०१६ च्या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करण्यात येईलयाची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी,असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती* --------

 *HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती*

----------------------------------------

 *मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*

----------------------------------------

०१) *नीट* आँनलाईन फाॅर्म प्रिंट

०२) *नीटप्रवेश* पत्र

०३) *नीट मार्क* लिस्ट

०४) १० वी चा मार्क मेमो

०५) १० वी सनद

०६) १२ वी मार्क मेमो

०७) नॅशनॅलीटी सर्टीफिकेट

०८) रहिवाशी प्रमाणपत्र

०९) १२ वी टी सी

१०) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस

११) आधार कार्ड

१२) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा

१३) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते

१४) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड

मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे

०१) जातीचे प्रमाणपत्र

०२) जात वैधता प्रमाणपत्र

०३) नाॅन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 

(मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू)

----------------------------------------

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.

----------------------------------------

*इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*

----------------------------------------

०१) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट

०२) *MHT-CET* पत्र

०३) *MHT-CET* मार्कलिस्ट

०४) १० वी चा मार्क मेमो

०५) १० वी सनद

०६) १२ वी मार्क मेमो

०७) नँशनँलीटी सर्टीफिकेट

०८) रहिवाशी प्रमाणपत्र

०९) १२ वी टी सी

१०) आधार कार्ड

११) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा

१२) राष्ट्रीय बँकेतील खाते

१३) फोटो

----------------------------------------

*मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*

----------------------------------------

०१) जातीचे प्रमाणपत्र

०२) जात वैधता प्रमाणपत्र

०३) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र (मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू)


कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे

----------------------------------------

           *वैद्यकीय क्षेत्र* 

----------------------------------------

*शिक्षण - एमबीबीएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEET प्रवेश परीक्षा 

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*

----------------------------------------

*शिक्षण - बीएएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*

----------------------------------------

*शिक्षण - बीएचएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडी*

----------------------------------------

*शिक्षण - बीयूएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*

----------------------------------------

*शिक्षण - बीडीएस*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडीएस*

----------------------------------------

*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET

संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*

----------------------------------------

*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच*

कालावधी - पाच वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET

संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय

पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

----------------------------------------

         *शिक्षण - डिफार्म*

----------------------------------------

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश

संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - बीफार्म*

----------------------------------------

*शिक्षण - बीफार्म*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी

संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा

पुढील उच्च शिक्षण - एमफार्म

----------------------------------------

  *संरक्षण दलांत प्रवेशासाठी*

----------------------------------------

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. 

एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. 

वयोमर्यादा : साडेसोळा ते १९ वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात

----------------------------------------

*अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल*

 ----------------------------------------

*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश 

संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार

पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

*शिक्षण - बीई*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा

पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस

*शिक्षण - बीटेक*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई

संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस

शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी

कालावधी - चार वर्षे

पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी

शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण

कालावधी - दोन वर्षे

पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण

----------------------------------------

    *कॉम्प्युटरमधील कोर्सेस*

----------------------------------------

डीओईएसीसी 'ओ' लेव्हल

कालावधी - एक वर्ष

डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी

कालावधी - दोन वर्षे

सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी

कालावधी - सहा महिने

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन

कालावधी - तीन महिने

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग

कालावधी - दहा महिने

इग्नू युनिव्हर्सिटी

सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग

कालावधी - एक वर्ष

----------------------------------------

         *शिक्षण - बारावी*

 ----------------------------------------

*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन* 

कालावधी - एक वर्ष

वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट

कालावधी - दोन महिने

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स

कालावधी - एक वर्ष 

(फक्त मुलींसाठी)

डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग

कालावधी - दोन वर्षे

गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट

कालावधी - एक वर्ष

प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन

कालावधी - एक वर्ष

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट

कालावधी - एक वर्ष

डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर 

कालावधी - एक वर्ष

----------------------------------------

     *रोजगाराभिमुख कोर्सेस*

 ----------------------------------------

*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता - बारावी (७० टक्के)

संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड

इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी

उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स

इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर

*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग*

कालावधी - चार वर्षे

पात्रता - दहावी आणि बारावी पास

संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर

(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग

फाउंडेशन (एनटीटीएफ) 

सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस

कालावधी - एक वर्ष

फॅशन टेक्‍नॉलॉजी

कालावधी - एक वर्ष

मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस

कालावधी - तीन वर्षे

----------------------------------------

*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*

 ----------------------------------------

*टूरिस्ट गाइड*

कालावधी - सहा महिने

डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस

कालावधी - दीड वर्ष

बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग

कालावधी - तीन महिने

बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन

सिस्टम (एअर टिकेटिंग)

कालावधी - एक महिना 

अप्रेन्टाईसशिप

कालावधी - पाच महिने ते चार वर्षे

*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी*

डिजिटल फोटोग्राफी

कालावधी - एक वर्ष

स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग

कालावधी - एक ते तीन वर्षे

सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी

कालावधी - एक ते तीन वर्षे

----------------------------------------

        *बांधकाम व्यवसाय*

 ----------------------------------------

*शिक्षण - बीआर्च*

कालावधी - पाच वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NATA , JEE

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक

----------------------------------------

        *पारंपरिक कोर्सेस* ----------------------------------------

*शिक्षण - बीएससी*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 

पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी

----------------------------------------

*शिक्षण - बीएससी (Agri)*

कालावधी - ४ वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET

संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय

पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन

----------------------------------------

*शिक्षण - बीए*

कालावधी - तीन वर्षे

संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी

----------------------------------------

*शिक्षण - बीकॉम*

कालावधी - तीन वर्षे

संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी

----------------------------------------

*शिक्षण - बीएसएल*

कालावधी - पाच वर्षे

संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा

पुढील उच्च शिक्षण - एलएलएम 

----------------------------------------

*शिक्षण - डीएड*

कालावधी - दोन वर्षे

प्रवेश - सीईटी आवश्‍यक

संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक

पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड

----------------------------------------

*शिक्षण* - बीबीए, बीसीए, बीबीएम

कालावधी - तीन वर्षे

प्रवेश - सीईटी

संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए


----------------------------------------

*फॉरेन लॅंग्वेज*

(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)

कालावधी :- बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित

----------------------------------------

*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.*

अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.

विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.

उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.


अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.


अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.


इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.


काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.

बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.

×+×+×+×+×+×+×+×+×+×


*काही महत्त्वाची संकेतस्थळे*

०१) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.

(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)

www.dte.org.in


०२) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)

www.dmer.org


०३) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)

www.dvet.gov.in


०४) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ

www.unipune.ac.in


०५) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई 

आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)

www.iitb.ac.in


०६) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण

www.aipmt.nic.in


०७) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)

www.upsc.gov.in

लोकसभा निवडणुका २०२४ च्या मतमोजणीची तयारी' या विषयावर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 लोकसभा निवडणुका २०२४ च्या मतमोजणीची तयारीया विषयावर

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची

'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. ३० : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची मतमोजणीयाविषयी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            लोकसभा २०२४ साठी राज्यात ४८ मतदार संघात निवडणुका झाल्या. यांच्या मतमोजणीची प्रक्रियामतमोजणीच्या दिवशी प्रसार माध्यमांनी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात२०१९ च्या तुलनेत राज्याची मतदानाची वाढलेली टक्केवारीआदर्श आचारसंहिता याबाबत डॉ. किरण कुलकर्णी यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

            'दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ही मुलाखत शनिवार दि. १ जूनसोमवार दि. ३ जून २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

००००

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

 

            मुंबईदि.30 : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवारदिनांक 21 जुलै2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे.

             शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यासअशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 06 जुलै2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै2024 रोजी घेण्यात येणार आहे.

            आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयापेक्षा अधिक ठरल्याने अर्ज सादर  करू शकले नाहीतअशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 मे2024 ते दिनांक 7 जून2024 असा आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील उपरोक्त शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावेअसे आयोगाकडून कळविण्यात येत आहे.

००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये

अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

 

            मुंबईदि. 30 : कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक 10 जून ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक 63 चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींचा निवासभोजन आणि प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन मुंबई शहरजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयमुंबई शहर येथे दिनांक 31 मे 2024 ते  3 जून 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागपुणे यांच्या या संकेतस्थळावर जाऊन त्यामध्ये CDS-36 अभ्यासक्रमासाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.

             सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने  अर्ज सादर केलेला असावा. 

            अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-245132 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीमुंबई शहर यांनी केले आहे.

--

देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान महाराष्ट्र एनसीसीला राज्यपालांचे प्रशस्तीपत्र प्रदान एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतात

 देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान

महाराष्ट्र एनसीसीला राज्यपालांचे प्रशस्तीपत्र प्रदान

एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतात

- राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबईदि. 30 : एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्तीशिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांकरीता एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल. एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतातअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. 

            राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) राजभवन येथे 'राज्यपालांचे प्रशस्तीपत्रसमारंभपूर्वक प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. 

            राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या 'प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यातराज्यपालांच्या हस्ते  महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. 

            आपण स्वतः एनसीसी कॅडेट होतो असे  नमूद करून देशातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व जाणवलेतर देश अतिशय वेगाने प्रगती करेल,  असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

            महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने आजपर्यंत २३ वेळा पंतप्रधानांचे ध्वजनिशान जिंकले. तसेच ८ वेळा महाराष्ट्र संचालनालय उपविजेते ठरले आहेयाबद्दल राज्यपालांनी राज्यातील एनसीसीच्या सर्व अधिकारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

            राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एनसीसी कार्यरत असून एकूण १.१७ लाख कॅडेट्स कार्यरत आहेत. पुढील १० वर्षांत कॅडेट्सची राज्यातील संख्या १.८५ लाख इतकी वाढविली जाणार आहेहे कौतुकास्पद आहे असे राज्यपालांनी सांगितले. 

            एनसीसी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्यपालांनी विद्यार्थ्यांना केले.

            या सोहळ्याला भारतीय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारीशासनाचे अधिकारीविद्यापीठांचे कुलगुरु तसेच विविध महाविद्यालयांमधील एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या चमूने एक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.    

००००

LPG gas स्फोट झाला की काय करावं

 


शिष्यवत्ती चां बनावट सन्देश

 


Gas cylinder अपघात प्रकरणी ग्याव्याची काळजी


 

Viksit Ports' necessary to achieve the goal of 'Viksit Bharat': Maha Governor

 Viksit Ports' necessary to achieve

the goal of 'Viksit Bharat': Maha Governor

 

               Mumbai, 30th May : Stating that the road to 'Viksit Bharat' passes through 'Viksit Ports', Maharashtra Governor Ramesh Bais stressed the importance of developing the ports of India.

                The Governor was speaking on the occasion of the 35th Foundation Day of the Jawaharlal Nehru Port Authority at a programme in Mumbai on Wed (29 May).

                Memoranda of Understanding between JNPA and PSA and between JPNA and CMACGM for the development of Greenfield Port at Wadhwan were signed in presence of the Governor.

                The Governor felicitated the representatives of Public Private Partnership (PPP) and officials of JNPA on the occasion.

               The Governor released the Coffee Table Book and the Special Edition on the 35th Anniversary of JNPA brought out by Bhandarkar Publications.

                A Special Cover and Corporate Customized My Stamp of JNPA was also released on the occasion.

                 Chairman of Mumbai Port Authority Rajiv Jalota, Additional Chief Secretary Sanjay Sethi, Chief Commissioner of Customs Rajesh Pandey, Chief Post Master General Maharashtra Kishan Kumar Sharma, Chairman of JNPA Unmesh Sharad Wagh, General Manager and Secretary Manisha Jadhav and Officers and staff of JNPA and invitees were present.

-

विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे आवश्यक”

 विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे आवश्यक

- राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबई, दि. 30 : भारत हजारो वर्षांपासून एक महान सागरी राष्ट्र आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला 'विकसित राष्ट्रबनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. विकसित भारताचा राजमार्ग विकसित बंदरांमधून जातो. त्यामुळे देशाला विकसित घडविण्यात देशातील बंदरांची भूमिका अत्यंत महत्वाची आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

             जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा ३५ वा स्थापना दिवस राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. २९ मे) मुंबई येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

            गेल्या ३५ वर्षांमध्ये जवाहरलाल नेहरू देशातील अग्रगण्य कंटेनर बंदर म्हणून उदयाला आले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधाप्रगत तांत्रिक क्षमता आणि धोरणात्मक उपक्रम यामुळे ते जागतिक व्यापारासाठी प्रमुख बंदर म्हणून स्थापित झाले आहे. जवाहरलाल नेहरू बंदरामुळे कार्यक्षम मालवाहतूक सुनिश्चित झाली व त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

            सीमाशुल्कातून मिळणाऱ्या एकूण महसुलाच्या सुमारे २५ टक्के रक्कम ही जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून मिळते तर देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त कंटेनर हाताळणी या बंदरातून होते. यावरून देशाच्या औद्योगिक विकासात या बंदराचे योगदान महत्वाचे असल्याचे सिद्ध होते, असे राज्यपालांनी सांगितले.

            जवाहरलाल नेहरू बंदरामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. राज्यातील २८ विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य करण्याचे आवाहन करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            राज्यातील विद्यापीठांमध्ये सागरी व्यापार आणि बंदर संबंधित अभ्यासक्रम आणि कार्यक्रमांची रचना करण्यासाठी प्राधिकरणाने सहकार्य करावे, असेही आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.  

            राज्यपालांच्या उपस्थितीत वाढवण येथील ग्रीनफिल्ड बंदराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) व पीएसए यांच्याततसेच जेपीएनए आणि सीएमएसीजीएम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते सार्वजनिक खाजगी भागीदारीतील (पीपीपी) निवडक प्रतिनिधींचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राधिकरणाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

            राज्यपालांच्या हस्ते जेएनपीएचे विशेष आवरण व कॉर्पोरेट कस्टमाइज्ड माय स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले.

            जेएनपीएच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त तयार केलेल्या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच भांडारकर पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित केलेल्या विशेष आवृत्तीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

            कार्यक्रमाला मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटाअतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीपोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र किशन कुमार शर्मासीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त राजेश पांडेजवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्षउन्मेष शरद वाघसचिव मनीषा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

****

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पत्रकारांकरिता प्राधिकार पत्रे

 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

पत्रकारांकरिता प्राधिकार पत्रे

 

            मुंबईदि. 30 : महाराष्ट्र राज्यातून विधान परिषदेवर निवडून आलेल्या कोकण विभाग व मुंबई या दोन पदवीधर मतदारसंघातील तसेच मुंबई व नाशिक विभाग या दोन शिक्षक मतदारसंघातील सदस्यांची मुदत दिनांक 07 जुलै 2024 रोजी समाप्त होणार आहे. सदर रिक्त होणाऱ्या जागांकरीता भारत निवडणूक आयोगाने दिनांक 8 मे2024 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

            या निवडणूकीचे मतदान बुधवारदिनांक 26 जून2024 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 पर्यंत व मतमोजणी सोमवारदिनांक 1 जुलै2024 रोजी होणार आहे.

            या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी प्राधिकारपत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक प्रतिनिधींच्या नावांच्या शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे पोहचण्याचा अंतिम दिनांक 11 जून2024 आहे. या शिफारसी महासंचालकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयमंत्रालयमुंबई यांनी 10 जून2024 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयमुंबई यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील निवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावेआपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) महासंचालकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयमंत्रालयमुंबई यांच्याकडे 10 जून2024 पर्यंत पाठवावीत. जेणेकरून महासंचालनालयाच्या कार्यालयाकडून सदरची मागणी या कार्यालयाकडे 11 जून2024 पर्यंत प्राप्त होऊ शकेल. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 10 जून2024 नंतर महासंचालकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयास प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाहीअसे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

अत्यधिक महत्वपूर्ण सूचना : नागरिक सुरक्षा महानिदेशालय नागरिकों और निवासियों को निम्नलिखित के प्रति सचेत करता है:*

 अत्यधिक महत्वपूर्ण सूचना : 

नागरिक सुरक्षा महानिदेशालय नागरिकों और निवासियों को निम्नलिखित के प्रति सचेत करता है:*


🛑 आने वाले दिनों में 47 से 55 डिग्री सेल्सियस के बीच बढ़ते तापमान और क्यूम्यलस बादलों की उपस्थिति के कारण अधिकांश क्षेत्रों में दमघोंटू माहौल होने के कारण, यहां कुछ चेतावनियां और सावधानियां दी गई हैं...


🔴 कारों में से इन्हें हटा दिया जाना चाहिए:

1. गैस सामग्री.

2. लाइटर.

3. कार्बोनेटेड पेय पदार्थ।

4. सामान्यतः इत्र और उपकरण बैटरियाँ।

5. कार की खिड़कियाँ थोड़ी खुली (वेंटिलेशन) होनी चाहिए।

6. कार के फ्यूल टैंक को पूरा न भरें.

7. शाम के समय कार में ईंधन भरें।

8. सुबह के समय कार से यात्रा करने से बचें.

9. कार के टायरों को ज़्यादा न भरें, ख़ासकर यात्रा के दौरान।


🔴 बिच्छुओं और सांपों से सावधान रहें क्योंकि वे अपने बिलों से बाहर निकलेंगे और ठंडी जगहों की तलाश में पार्क और घरों में प्रवेश कर सकते हैं।


🔴 खूब पानी और तरल पदार्थ पियें।


🔴सुनिश्चित करें कि गैस सिलेंडर को धूप में न रखें।


🔴 सुनिश्चित करें कि बिजली मीटरों पर अधिक भार न डालें और एयर कंडीशनर का उपयोग केवल घर के व्यस्त क्षेत्रों में करें, विशेषकर अत्यधिक गर्मी के समय में।


🔴 सूरज की रोशनी के सीधे संपर्क में आने से बचें, खासकर सुबह 10 बजे से दोपहर 3 बजे के बीच।


🔵 अंत में: कृपया इस जानकारी को साझा करें क्योंकि अन्य लोग नहीं जानते होंगे और हो सकता है कि वे इसे पहली बार पढ़ रहे हों...


*सादर, 

नागरिक सुरक्षा महानिदेशालय* भारत सरकार 🙏

*श्री सोमनाथ महादेव मंदिर,* *प्रथम ज्योतिर्लिंग - गुजरात (सौराष्ट्र)* दिनांकः 30 मई 2024, वैशाख कृष्ण सप्तमी - गुरुवार *प्रातः श्रृंगार*


 *श्री सोमनाथ महादेव मंदिर,*

*प्रथम ज्योतिर्लिंग - गुजरात (सौराष्ट्र)*

दिनांकः 30 मई 2024, वैशाख कृष्ण सप्तमी - गुरुवार

*प्रातः श्रृंगार*

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

 

मुंबई, दि. २९ : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे-

1.आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.

2. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधनप्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.

3.विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यमदृकश्राव्यसोशल मीडियाप्रकाशनेव्हिडीओ एडिटिंगतंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)

4. सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल

5. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.

6. आंतरवासिता उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्ज कोठे करावा?

          इच्छुकांनी संशोधन अधिकारीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय१७ वा मजलानवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोरमादाम कामा मार्गहुतात्मा राजगुरू चौकमहाराष्ट्र शासनमंत्रालयमुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहितीनमुन्यातील माहितीपदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावीपाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.         

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ ही असेल.

        या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवत आहे.

----------------------------------

 


 

अर्जाचा नमुना

अ.क्र.

तपशिल

माहिती

1.      

नाव

 

 

2.     

पत्ता

 

 

3.     

मोबाईल क्रमांक

 

4.    

ई-मेल आयडी

 

5.     

आधार क्रमांक

 

6.     

सध्या शिकत असल्यास पदवी व महाविद्यालयाचे नाव

 

 

विद्यार्थ्याची स्वाक्षरी -

विद्यार्थ्याचे 

Featured post

Lakshvedhi