Wednesday, 29 May 2019

जनजागर



४.  आयकर भरा व विकासाचा लाभ घ्या.
     करदात्याकडून प्राप्त झालेल्या करांच्या रकमेतून प्राथमिक ते उच्च शिक्षण, उत्तम आरोग्यासाठी हॉस्पिटल्स, मोफत औषधे स्वच्छता मोहिम, अन्न व निवारा, पायाभूत सुविधा, देशाची सुरक्षितता, विदयुत, जल पुरवठा, इ साठी वित्तीय पुरवठा, अदिवासी, अनुसुचित जाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्ग, महिलांसाठी वसतीगृह, क्रीडा संकुल कर्ज, अनुदान, शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
     अशा विविध सामाजिक कल्याणाकरीता आपलाही हातभार असणे अत्यावश्यक आहे किंबहुना आपली ही सामाजिक कर्तव्ये आहेत. आयकर हे आपले आर्थिक नुकसान नसून सामाजिक सोई सुविधांना आपण हातभार लावतो ही जाणीव ठेवावी व ह्या सोईसुविधांचा आपण हिस्सा आहोत ही जाणीव ठेवावी व वेळीच आयकर भरा.

५.   रोख व्यवहार टाळा. डिजीटल पेमेन्टस पध्दत स्विकारा
     भारताच्या मजबूत आर्थिक करणासाठी व व्यवहार सुरक्षीत राहण्यासाठी रोख व्यवहार टाळा. डिजीटल व्यवहार स्विकारा. डिजीटल व्यवहारांमुळे पारदर्शकता आणि सुलभता निर्माण झाली आहे व हे सकारात्मक लक्षणआहे. यामुळे मजबूत आथिक करणामुळे देशाचा विकास झाल्याने पयायाने करोडो भारतीयांना फायदा झाला आहे.

६.   घनकचरा व्यवस्थापन.
     घनकचरा व्यवस्थापनासाठी भंगार संकलकाची ग्रामपचांयत,नगरपरिषदेने नियुक्ती करुन,उदयोगसमुहाने परिसरातील, गावातील, शहरातील प्लॅस्टीक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लोखंड, रद्दीपेपर, काच, संकलनाची जबाबदारी दयावी. ज्यामुळे उत्पन्न तर मिळेल घनकचरा व्यवस्थापन यशस्वीपणे साध्य होईल..

७.   भ्रष्टाचार मुक्त भारत -
    लाच देणे व घेणे हा गुन्हा असला तरी अनेकवेळा वेळेचे बंधन वा अनेक कारणांमुळे लाच देणे मानसिकता नसली तरी आगतिकतेमुळे व्यक्ती लाच देणेस तयार होते. ज्यामुळे भ्रष्टाचार नावाचा अजगर वाढत जातो व सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीला येते. एकीकडे अधिकाधीक श्रीमंत व दुसरीकडे अधिकाधिक गरीबी यामुळे आर्थिक् सामाजिक विषमता वाढत जाते व त्यांचे दुष्परिणाम आर्थिक सामाजिक व्यवस्थेवर होतो.

    ह्यासाठी मी लाच देणार नाही हे वचन ठेवा. लाच मागणार्‍यांची तक्रार जिल्हा लाचलुचपत कार्यालयाकडे करा. अेसीबी टोलफ्री क्रमांक - १०६४, 
व्हॉटसअॅप - ९९३०७७९९००
                                               (उर्वरित उद्याच्या भागात) 


मी आहे ना

मी आहे ना 
Every thing is  fine

     आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते?याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही..
     जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी..  आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे... रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो,पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं... . It's mutual relation... मन जुळलं की आपलेपणाचे नात होते... जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत... आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे " मी आहे ना " एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात.. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... 

पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो...

नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण……

नाते - सबंध

नाते - सबंध 
     तहान नसताना पाण्याची बाटली गच्च भरलेली असेल तर तिची किंमत वाटत नाही . पण तहानेने घसा सणकून कोरडा पडला की बाटलीच्या तळाशी शिल्लक असलेले घोटभर पाणी सुद्धा अमृत समान मोलाचं वाटतं . तसेच नाती  जवळ असली की त्यांची किंमत कळत नाही . परंतु ती दूर गेल्यावर मात्र त्यांची खरी किंमत कळते . म्हणून नाती अनमोल आहेत ती जपा ......
       नात्यात मोकळीक असावी . देखरेख नसावी . नात्यात मर्यादा असावी बांधिलकी नसावी . नात्यात परिचय असावा संशय नसावा . आयुष्यात कोण कधी उपयोगी पडेल ते सांगता येत नसतं . म्हणून जोडलेली नाती टिकवायला शिका .ego आणि attitude दाखवून ती तुटतील असे वागू नका .......
         जीवापाड जपलेली नाती तुटण्याचं खरं कारण म्हणजे गैरसमज ....

Monday, 27 May 2019

जनजागर


जनजागर

१.   नैसर्गिक रंगाची उधळण पर्यावरण पुरक सण समारंभ साजरे करा.
      गोविंदा, रंगपंचमी, लग्नसमारंभ वा इतर प्रासंगिक कार्यक्रमात केमिकल्स चे रंग एकमेकांना लावून आनंदोत्सव साजरा करतात. परंतू हेच रंग डोळयांना, शरिराला हानी पोहोचवतात व प्रसंगी विद्रुपतेचा ही सामना करावा लागतो ज्यामध्ये बालक, युवक युवतींचा जास्त समावेश असतो. ह्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करा व ज्यामुळे त्वचेची हानी होणार नाही व त्वचा सतेज सुंदर दिसेल हयाकडे लक्ष देऊन आयूर्वेदीक व पर्यावरणपुरक सणसमारंभ साजरे करा. 
१)   हळद, चंदन- हळदीचे पाणी व पावडर एकत्र करा, आंबेहळद वापरल्यास अतिउत्तम
२)   मेहंदी-कात टाकून पेष्ट बनवा लाल रंग तयार करा तसेच गाजर,बिट, टोमॅटो, पलाश फुलांचाही वापर करु शकता. प्राजक्ताची, जास्वंदाच्या फुलांचाही वापर करता येईल.
     ३)   पालक, कोथींबीर, पुदिनाची पेष्ट बनवून हिरवा रंग तयार करा
     ४)   आवळा पावडर लोखंडी भांडयात टाकून काळा रंग तयार करा.
     ५)   दुध दही चा वापर करावा.
     ६)   चॉकलेट मेल्ट करुन दुधाचा वापर करुन चॉकलेटी रंग तयार करा.

२.   नागरिकांकरिता सिटीझन पोर्टल मोबाईल अॅप्लीकेशन
     महाराष्ट्र पोलीस दलामार्फत सिटीजन पोर्टल अॅप्लीकेशन सुरु करण्यांत आले असून खबर पाहणे, हरविलेल्या व्यक्ती, अटक आरोपी, अनोळखी मृतदेह अशी माहिती उपलब्ध होते. त्याचप्रमाणे तक्रार नोंदवून सदयस्थिती,कार्यक्रम विनंती, निवेदन, संप विनंती, मिरवणूक विनंती, उत्सव परवानगी असे अर्ज ऑनलाईन करु शकता. ह्यासाठी गुगल प्ले स्टोअर सिटीजन पोर्टल सिलेक्ट करुन अॅप डाऊनलोड करुन आपली वैयक्तिक महिती भरुन युजर आयडी तयार करुन सुविधांचा लाभ घेऊ शकता.

३.   सायबर क्राईम जन जागृती
संगणक, स्मार्ट फोन सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरांच्या माध्यमातून सायबर गुन्हे टाळण्यासाठी दक्षता.
      १.   संपूर्ण खात्री पटल्याशिवाय फ्रेड रिक्वेस्ट स्विकारु नका.
      २.   संगणक, लॅपटॉप वरील डेटा सुरक्षित राहण्यासाठी अॅन्टीवायरस वापर  
करा. वेळोवळी पासवर्ड बदला.
     ३.    अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंक्स उघडू नका, त्या डिलीट करा.
     ४.    सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करा. वेळावेळी साईटस अॅप्लीकेशन लॉग
आऊट करा.
५.   बॅेकेचे खाते, एटीएम, डेबिट, क्रेडीट, पॅन कार्ड, आधारकार्डची अनोळखी मोबाईल दुरध्वनी धारकांना माहिती देऊ नका. व्हॉटसअॅप, फेसबुक, टिवटर, इन्टाग्राम इ. माध्यमाव्दारे लोकेशन शेअर करणे टाळा.
६.   लॉटरी, बक्षिस, ईमेल, कॉल, एसएमएस आल्यास भूलथापांना बळी पडू नका. दुर्लक्ष करा.
७.  धार्मिक भावना भडकविणारे संदेश व्हिडीया, छायाचित्रे किंवा अश्लील साहित्य पोष्ट करु नका.
८.   फॉरवर्ड शेअर करणे टाळा. तसेच नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये असे गुन्हे असल्यास संपर्क साधा.



व्यक्तिमत्व

                               सुंदर विचार 
✍ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं...

पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं...

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा

 कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.

प्रेम


हॅपी उन्हाळा

पतिदेव बेडरूम मे बैठा laptop पर काम रहे थे।



पास ही बेड पर



 आराम से लेटी हुए पत्नी मोबाइल में बिजी थी  



अचानक पति के मोबाइल पर  व्हाटसअप मैसज की रिंग टोन बजी । 


जो कि फ्रीज़ के ऊपर चार्जिगं पर लगा था।

पति झपट कर मोबाइल के पास पहुंचा और चेक किया तो उस पर पत्नी का मैसेज आया था।


येताना फ्रीझ मधून पाण्याची बाटली घेऊन या....

तुमची लाडकी बायको.


हॅपी उन्हाळा

Featured post

Lakshvedhi