Sunday, 8 August 2021

 गटार ( Gutter) नव्हे , गताहार    !   ...….                                 आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते।

 आपल्या कडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो। या दिवसाला गताहारी(जो आहार गेला आहे तो)अमावस्या म्हणतात।

आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत। Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे। आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय।

आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा। आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे। आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाहीं। आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करू या।

गटार(Gutter) नव्हे, गताहार

गत=मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते

आहार= भोजन

गत+आहार=गताहार

जसे:-

शाक+आहारी=शाकाहारी

तसे:-

गत+आहारी=गताहारी

गत+आहारी+अमावस्या=गताहारी अमावस्या


या दिवशी दीप पुजन करतात


                येत्या रविवारी ८ऑगस्ट २०२१  रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे  जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र  कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते.  जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म,आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे अशी आपलीच बदनामी टाळण्याची मी  गेली कित्येक वर्षे मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करीत आहे. हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. 


                     हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.


**** आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया---


१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.


२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली  तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा  साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.  त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. 


३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.


४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते  हवेतील वाढलेल्या  जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. 


५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना  आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक  घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो. 


 अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे  आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.


 


*** या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच--


१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही  मिळत नाहीत. 


२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या  जातात. 


३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.                                              


४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या  जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात. 


५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.  


म्हणून विनंती करतो  " श्रावण जरूर पाळा, गटारीची कुप्रसिद्धी टाळा "!


( कृपया हे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या  संस्कृतीची अकारण होणारी कुचेष्टा थांबविण्यास हातभार लावावा, ही विनंती )

 *🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा...........१🌸*


                      *🙏आज मला संत मुक्तबाईंची, खरे पाहता त्यांच्या त्या 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' ह्या अभंगाची खूपच  आठवण येत होती. त्यांचा दादा, म्हणजे आमचे श्रीज्ञानेश्वर जेव्हा रागावून दार बंद करून बसले, तेव्हा त्यांनी त्यांना समजवण्यासाठी उत्स्फूर्तपणे एका पाठोपाठ एक असे बारा अभंग रचून म्हंटले, जे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्यापैकी पहिल्या अभंगाचे आज रसग्रहण करूया. पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे आपल्या ज्ञानदादाच्या मनावर बिंबवले. ताटीच्या अभंगात ज्ञानोबांच्या ह्या मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्ताईने जी संतत्वाची लक्षणे आपल्या दादाला सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.*


*-- १ --*

*संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥*

*तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥*

*थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥*

*रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥*

*ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥*


         *मुक्ताबाई म्हणतात की संतांना जगाची बोलणी सहन करावीच लागतात. ज्याला संत बनायचे आहे, त्यांना जगाचे कटू बोल हे सहन करावेच लागतात, कारण संतांची विचारधारा आणि सामान्य जनांची विचारक्षमता ह्यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते. जगाच्या पाठीवर असा एकही संत झाला नसेल की ज्याला तत्कालीन समाजाने छळला नसेल. मग ते एकनाथ महाराज असोत वा तुकोबा. संतांचे महत्व समाजाला नेहमीच त्यांच्या पश्चात का जाणवते हे एक न सुटणारे कोडेच आहे. कदाचित ती त्यांची परमेश्वराने घेतलेली परीक्षा असावी.....जे ते सहजी पार करतात.*


         *हे बोलणे सहन करायचे तर त्यासाठी अहंकार त्यजावा लागतो आणि अहंकार त्यागल्याशिवाय थोरपण कसे येईल? संतांचे जीवन हे अज्ञ जनांच्या उद्धारासाठीच असते ना? अज्ञानी समाजाकडून अजून कसली वेगळी अपेक्षा ठेवावी? पण म्हणून त्या समाजाला सोडून, त्यांच्या वागणुकीने रुसून जर संत समाजापासून दूर निघून गेला, तर त्या समाजाचा उद्धार कसा होईल? अजाण समाजाचे हे पोरपण जाणून अभिमान गळून पडताच हृदयात भूतदया जागृत होते आणि आपोआप थोरपण येते....त्यासाठी अजून वेगळे असे काही करावे नाही लागत.*


         *त्या भूतदयेने त्यांची दृष्टी इतकी विशाल झालेली असते की त्यांना आपल्या ब्रह्मस्वरूपाची पूर्ण जाणीव होते आणि हेच ब्रह्म जर साऱ्या चराचराला व्यापून राहिले आहे, तर मी कुणाहूनही आणि कुणीही माझ्याहून वेगळा नाहीच ही सर्वश्रेष्ठ अनुभूती होते.....म्हणून तर तीर्थक्षेत्री जाऊन आणलेले गंगाजल आमचे एकनाथ महाराज तहानलेल्या गाढवाच्या मुखी रिते करू शकतात. मुक्ताबाई म्हणतात की ब्रह्मस्वरूपात जर सर्वत्र मीच आहे, तर आपण कुणावर आणि कसे रागवावे?*


        *ह्या भावंडांच्या आयुष्यातील ही घटना ही एक ईश्वरी लीला आहे. ज्ञानस्वरूप ज्ञानेश्वर महाराज काय हे सर्व जाणत नव्हते? पण असे काही नाट्यपूर्ण घडल्याशिवाय आम्हा सामान्य जनांसाठी ज्ञानगंगा प्रवाहित कशी होईल? म्हणून हे त्या ईश्वराने घडविलेले एक नाटक आहे. वेळप्रसंगी आपल्याहून लहान असलेलाही जर आपल्याला काही योग्य असे समजावीत असेल, तर आमच्यासारखा सामान्य माणूस म्हणेल की, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिले आहेत, मला नको शिकवूस...... पण आमची माऊली असे नाही म्हणत. खरा थोर कसा असतो हे आम्हाला समजविण्यासाठी हे सगळे नाट्य आहे. हे जर निवृत्तीनाथांनी सांगितले असते तर.....तर वेळप्रसंगी योग्य असल्यास लहानाचेही ऐकावे ही शिकवणूक आम्हाला नसती मिळाली ना?*


           *अभंगाच्या अखेरीस ही धाकटी बहीण आपल्या दादाला सांगते की, 'ऐशी समदृष्टी करा। ताटी उघड ज्ञानेश्वरा।।' ही ओळ साधीसुधी नाही, ती 'ताटी उघडा दादा' असे नाही म्हणत. का? कारण हा संवाद आता बहीण-भावाचा उरलेला नाही. आता एक ज्ञानी आत्मा अधिकारवाणीने एक तुल्यबळ अशा, पण क्रुद्ध झालेल्या आत्म्याला पुनःजागृत करीत आहे....समत्वबुद्धि धारण करण्यास सांगत आहे....क्रोधविकाराने अल्पकाळासाठी का होईना, पण बंद झालेले बुद्धीचे कवाड उघडण्याचे आदेश दिला जात आहेत असे जाणवते. हे जे ज्ञानियांच्या बाबतीत घडू शकते, ते माझ्यासारख्या सामान्यांच्या बाबतीत घडले तर नवल ते काय?.. पण तेव्हा मुक्ताईचा हाच आदेश माझ्यासाठी असणार............ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरि🕉️*

 बरेच लोक मुंबई येथे वैद्यकीय उपचारासाठी जातात.  ही उपयुक्त माहिती आहे.  कृपया ते जतन करा:


  * डीमार्ट * * डी मार्ट चे प्रमोटर  राधाकिशन दमानी यांनी * गोपाळ हवेली * येथे * ए * मेट्रो सिनेमा क्वीन्स रोड मुंबई जवळ एक सुविधा बांधली असून मुंबईत उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांसाठी rooms 53 खोल्या आहेत.  काल त्याचे उद्घाटन झाले.  हे खूप छान केले गेले आहे.  हितचिंतकांच्या अशा कोणत्याही वास्तविक गरजेचा उल्लेख केला जाऊ शकतो.

  पत्ता:

  गोपाळ हवेली

  50, क्वीन रोड (सिनेमा लेन)

  मेट्रो सिनेमा जवळ

  मुंबई 400 020

  संपर्काची माहिती:

  व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन.  मोबाईल

  91 88799 86893

  ई-मेल:

  fd@gpalmansion.com

  gm@gpalmansion.com

  दूरध्वनी क्रमांक: 022 22055001/02

  www.gpalmansion.com

  दर आहेत

  खूप वाजवी

  न्याहारी 30

  लंच प्लेट 75

  डिनर प्लेट 75

  800 खोल्या

  स्वयंपाकघर आणि जेवणाचे खूप प्रशस्त.

  कृपया व्यापकपणे सामायिक करा.  तुम्ही सगळे कसे आहात

  मुंबईत आप्त नातेवाईक असल्यास पी.एल.  ही माहिती प्रत्येकासह सामायिक करा.  * आम्ही रुग्णांना आणि नातेवाईकांना विनामूल्य टिफिन प्रदान करतो.  * क्षेत्र - दक्षिण मुंबई

  हॉस्पिटल्स: - जसलोक, सैफी, बॉम्बे, नायर, जेजे, मुंबई सेंट्रल जवळ आणि व्हीटी ....

  संपर्काची माहिती: -

  आपण आम्हाला व्हॉट्सअ‍ॅप देखील करू शकता

  * कल्पेश लोढा 9967236006 *

  * मनोज पटवारी 9820645070 *

  * अमृत जैन 9029373751 *

  कमीतकमी अशा लोकांसह पुढे जा जे अग्रेषित करुन इतरांना मदत करू शकतील.

  * आर.के.  घरगुती वैद्यकीय उपकरणे चॅरिटेबल ट्रस्टने सुरू केली आहेत.

  * * व्हीलचेअर *

  * * सक्शन मशीन *

  * * वॉटरबेड *

  * * एअरबेड *

  * * केर कर *

  वापरण्यास विनामूल्य (परताव्यायोग्य ठेवीसह)

  संपर्क व्यक्ती: -

  * संजय शाह 9322516628 *

  * चिंतन पांड्या: - 7666311942 *

  * जोडा: -17-डी, निसारगा उपट.  आयडीबीआय बँक जवळ, महावीर नगर, कांदिवली पश्चिम मुंबई 67 67 *

  * साई वल्यात्री साक्षरता पॉलीक्लिनिक *

  "कंबर दरबार" शांतीलाल मोदी रोड, भुराभाई हॉल समोर, कांदिवली (प.), मुंबई.

  * टी: 02265811644 *

  * 0222865 9615 *

  * www.kambardarbar.org *

  * दिवसाची वेळ *

  1. * सामान्य ओपीडी * ₹ 1 / - केवळ औषधांसह

  दररोज सकाळी _11-30 आणि संध्याकाळी 4-30_

  २. * एक्स-रे * ₹ 100 / -

  दररोज _9 ते 5-00 वाजता_

  3. * ईसीजी * ₹ 70.00

  दररोज _ * * * 9.00 ते सकाळी 11.00 * _

  *.  * पॅथॉलॉजी * अत्यधिक अनुदानित दर.  केवळ सीबीसी ₹ 20 / -.

  दररोज _8.30 ते 12.00_

  *. * नेत्र तपासणी * २० / -

  दररोज _3.30.30_

  सकाळी _ सकाळी 9 वाजता: बुध, शुक्र, शनि ._

  मोतीबिंदू शस्त्रक्रिया: सर्वोत्कृष्ट भारतीय लेन्ससह विनामूल्य.

  लेझर (फाको) शस्त्रक्रिया:

  5,3०० / - यू.एस.  फोल्डेबल लेन्स आयात करीत आहे

  / 10,000 / - यूकेने फोल्डेबल herफेरिक लेन्स आयात केले.  (बाहेरील दर 40,000 / - आहे

  *. * स्त्रीरोगशास्त्र / आयव्हीएफ / हिस्टेरोस्कोपी *

  _ट्यू / थुर / शुक्र.  1 p.m.

  7. * त्वचेचे विभाजन.  * .00 20.00

  सोमवारी दुपारी ..pm० वाजता_

  8. * ऑर्थोपेडिक * 20.00

  मंगळ _3.30.30__

  9. * मधुमेह आणि कार्डिओ * .00 20.00

  बुधवारी दुपारी 8.30 वाजता_

  10. * मुलाचे विभाजन.  * .00 20.00

  शुक्रवारी _5.30 pm_

  11. कान / नाक / घसा * .00 20.00

  बुधवारी / शुक्र 4-30 संध्याकाळ_

  12. * दंत * नाममात्र शुल्क आरसी शुल्क: ₹ 750 / -.

  दररोज _9.00 ते दुपारी 1.00_दिली दुपारी ०.०० वाजता ते सायंकाळी 00.००_

  १.. * डायलिसिस * बीपीएल रूग्णांसाठी विनामूल्य

  दैनिक (फोन: 28067645)

  14. * ग्रीवाचा कर्करोग * (ग्रीवाचा कर्करोग) चाचणी मोफत

  15. * अँटी कॅन्सर इंजेक्शन * 14 ते 24 वर्षांच्या मुलींसाठी.

  16. * ज्येष्ठ नागरिकांसाठी वास्तविक सुनावणी *, प्रत्यक्ष खर्चाच्या 50%.  जन्मतःच पात्र मुलांसाठी विनामूल्य.

  १.. * उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात नोटबुक आणि इतर हार्डवेअर वस्तू.

  18. * * बी.बी.  एमबीबीएस  सी.ए.  सी.एस.  बी.पी.एच.आर.एम.  एम.सी.ए.  आणि एमबीए निवडले.  विद्यार्थ्यांसाठी पात्र उमेदवारांसाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती *.  * भेट *

  www.kambarda bar.org आणि सर्व आवश्यक तारणांसह फॉर्म सबमिट करा.

  कृपया p_zijn zasainani@rediffmail.com ईमेल वर संपर्क साधा

  * कोणत्याही शिफारसी आवश्यक नाहीत.  * कृपया शेअर करा.  ********** प्राप्त केल्यानुसार


*👉🏼 आपल्या ओळखीच्या ग्रुपमध्ये पाठवा कोणाला तरी फायदा होईल 🙏*

 *अलिबागची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि येथील मंदिरांची निर्मिती*


 आजचे अलिबाग पुर्वी रामनाथ भागातच बहुतांशी सिमीत होते.खुद्द सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वास्तव्य रामनाथ येथील वाड्यात होते.ज्या अलिबाग शहराची आपण माहिती करून घेत आहोत तो भाग समुद्राने व्यापलेला होता.काही किनार्‍यावर मोकळी जागा होती तिथे नारळी पोफळीच्या विस्तृत बागा अली नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या मालकीच्या होत्या त्यांनी अलिबागच्या विस्तारासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यावरून अलिबाग हे नाव पडले अशी या नावामागची आख्यायिका सांगितली जाते.पुढे रामनाथहून अलिबागकडे केंद्र  सरकत गेले.खुद्द आंग्रे यांचा वाडा अलिबाग मध्ये आला.आंग्रेकालीन इमारतींची निर्मिती झाली.पेशवेकालीन कागदपत्रातून अलिबाग हा उल्लेख आढळून येतो.काही ठिकाणी श्रीबाग असेही क्वचितच नमूद केलेले आहे.

 या लेखात अलिबाग मधील मंदिरांचा अत्यंत थोडक्यात परिचय करून देत आहे.

    सर्वप्रथम गणेश मंदिरे पाहुया. अलिबागमधे गणेशाची  दोन मंदिरे आहेत. एक ब्राह्मण आळीत आहे.दुसरे कामत आळीत आहे. ब्राह्मण आळीतील मंदिर पुरातन आहे. कामत आळीतील मंदिर खाजगी आहे . या देवळात अतिशय सुंदर देखणी संगमरवरी गणेश मुर्ति आहे.तसेच रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी बनविलेले flouring आतिशय कलात्मक आहे.आता पाहुया अलिबागच्या  जोगळेकर नाक्यावरील शंकराचे मंदिर! हे सर्वात प्राचीन मंदिर आहे.(1721) परदेशी नावाच्या गृहस्थास दृष्टांत झाला आणि ही मुर्ती उंदेरी किल्ल्यातून आणून सध्याच्या मंदिरात तिची विधीवत स्थापना करण्यात आली.या मंदिरासमोर एक मोठी विहीर होती त्या विहीरीत अलिबागकरांच्या अनेक पिढ्यांनी पोहण्याचे धडे घेतले.ती विहीर बुजविण्यात आली आता तिथे छत्रपती शिवाजीमहाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसविला असून तो अलिबागची शान आहे.तेथुन जवळच  सरखेल कान्होजी आंग्रे यांची आणि त्या कुटुंबातील सदस्यांच्या समाध्या आहेत. कान्होजीची समाधी उत्कृष्ट शिल्पकामाचा नमुना आहे.मराठ्यांची सागरी सत्ता प्रस्थापित करणा-या आंग्रे यांच्या समाधीसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो.अलिबागची आन मान शान म्हणजे हे पवित्र स्थान आहे.

    अलिबागचे बालाजी मंदिर म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य शास्त्राचा नमुनाच होय! याची रचना,बांधकाम हेमाडपंती असून मंदिरा बाहेरील आणि आतील  शिल्पकाम डोळ्यांचे पारणे फेडणे.या मंदिराची निर्मीती गोपाळशेठ दलाल यांनी केली. 

    अलिबागचे दुसरे शंकर मंदिर हे अत्यंत महत्वाचे असून ते आंग्रेवाड्याजवळच आहे.आंग्रेचे दिवाण सरदार बिवलकर यांनी ते बांधले त्यावरील कळस हा सोन्याचा आहे असे म्हणतात.तेथील कोरीव काम पाहण्यासारखे आहे.एस टी बस स्थानकाजवळ हे मंदिर आहे.

    मोघे खाणावळी समोर विष्णुमंदिर व पोखरण लक्षवेधी आहे त्याची निर्मीती आंग्रेकालीन आहे.बालाजी नाक्यावरील श्री काळंबादेवी ही अलिबागची ग्रामदेवता असून नवरात्र उत्सवासाठी हे मंदिर भगिनिवर्गाचे श्रद्धास्थान  आहे.

      अलिबागचे मारूती मंदिर हे महत्वाचे आहे.या मंदिराच्या साक्षीने अनेक राजकीय  सामाजिक आणि सांस्कृतिक घटना घडल्या आहेत. अलिबागची हद्द येथपर्यंत होती तिथे स्मशानभूमी होती.येथून पुढे अलिबागचा समुद्र हटविण्यात आला.रेक्लेमेशनचा प्रयोग फार वर्षापूर्वीच झाला होता.या मंदिराची स्थापना सर्मथ रामदास यांच्या शिष्यानी केली अशी मान्यता आहे.येथे आसपास सतीच्या शिळाही सापडल्या आहेत व काही कोरलेली तुळशी वृंदावने आढळून आली आहेत: अशी अनेक इतरही मंदिर आहेत. ब्राह्मण आळीतील राम मंदिराचा समावेश करावा लागेल आता त्याचे नूतनीकरण झाले आहे.तसेच जोगळेकर नाक्याजवळ एक विठ्ठल मंदिर आहे तेही हेमाडपंथी पध्दतीचे आहे. बादजारपेठेतही एक राधाकृष्णाचे  मंदिर आहे एका छोटेखानी मंदिराचा उल्लेख करणे आवश्यक आहे.राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्यालय मारुती नाक्यावर आहे त्याच्या मागच्या बाजुला एक घुमटी आहे त्यात देवतांच्या मुर्ति आहेत.त्यांना  सात आसरा(अप्सरा) म्हणतात.लहान मुलांना पूर्वी  देवी/ कांजण्या/गोवर/डांग्या खोकला असे जीवघेणे आजार होत असत तेव्हा या आसरांना नवस बोलला जाई .त्या काळातील आयाबायांची ती एक श्रध्दा होती. अलिबागच्या वास्तु आणि त्यांचे महत्व पुढील लेखात !

        डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन


*फेसबुक वरून साभार*

 भविष्यातील घडामोडींचा अंदाज आपल्याला निकटच्या अभ्यासावरून  येऊ शकतो, असे सांगून डॉ. रेमंड दुराईस्वामी म्हणाले, अरबी समुद्रातील सारे बाष्पीभवन एकवटून ते घाटमाथ्याच्या दिशेने येईल आणि म्हणूनच कदाचित भविष्यात चेरापुंजी नव्हे तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण असेल. २०१९ साली केलेल्या नोंदीनुसार, कोकणात आंबोली येथे ६४७२ मिमी पाऊस झाला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये सरासरी ४००० मिमी पाऊस त्या वर्षी झाला. तर महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज या गावी तब्बल ७२०० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरची पावसाची नोंद सरासरी ५८२० मिमी अशी आहे. यंदा आतापर्यंत तर केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे.


भूगर्भशास्त्र असे सांगते की, अतितीव्र पावसात डोंगरावरची माती, राडारोडा सारे काही वेगात खाली येते. केवळ मातीच असेल तर ती पाणी शोषते. तिचे वजन वाढते आणि अशा वेळेस मातीचा हा ढिगारा डोंगरउतारावर असेल तर त्याचा गुरुत्वमध्य वजनामुळे खालच्या दिशेला सरकतो आणि डोंगराच्या टोकाच्या भागासह सारे काही खाली कोसळते. अनेक ठिकाणी अलीकडे एकाच दिवसात तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अशा अधिकच्या पावसात

अशा घटना होणे अगदीच साहजिक आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी असेच झाले आहे.  आपल्याकडे खासकरून सह्यद्रीमध्ये डोंगरमाथ्याला बसॉल्ट आहे. त्यामधील भेगादेखील अशा प्रकारच्या दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरतात. शिवाय दक्षिण कोकणात डोंगरमाथ्यावर पठारावर जांभा दगड आहे. त्यात पावसाच्या वेळेस त्यामधील खनिजे निघून जातात व तो सच्छिद्र होत जातो. अशा वेळेस अशा प्रकारच्या घटना खूपच साहजिक असतात. त्यामुळेच डोंगराची भूगर्भशास्त्रीय पाहणी करून नोंदी करणे आणि दरडी कोसळण्याची भीती असलेल्या परिसरात काही होण्यापूर्वीच काळजी घेणे म्हणजे शक्य असेल या घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजना किंवा त्याखाली असलेल्या वस्ती इतरत्र हलविणे असे उपाय करता येतील.


महाबळेश्वरला तर ५९२ मिमी पावसाची नोंद एकाच दिवसात झाली आहे. २४ तासांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरपाऊस होतो, त्या वेळेस आपल्याला धोरणात्मक बदल करावा लागपाऊसणार आहे, हे निश्चित.  एक काळ असा होता की, टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉ. मोहन धारिया यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना अतिशय यशस्वीरीत्या राबविली. त्याचे चांगले फायदेही महाराष्ट्राने अनुभवले. मात्र आता जागतिक वातावरण बदलाला सामोरे जाताना जिथे मोठय़ा प्रमाणावर पावसात वाढ झाली आहे, तिथे तरी वेगळी उपाययोजना करावी लागेल. तिथे पाणी अडवा, पाणी जिरवा चालणार नाही.  त्यासाठी वेगळ्या उपाययोजनेसाठी आपण वेळीच प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. दुराईस्वामी सांगतात.


काही ठिकाणी नद्यांचे पाट खुले ठेवायला हवे. जेजुरीला सर्व पाणी अडवत होतो. कऱ्हा नदीमध्ये ११८ टक्के पाणलोट क्षेत्रात कामे झाली. त्याचा परिणाम असा की,  त्यामुळे मोरगाव आदी क्षेत्रांत क्षारयुक्त पाण्यात वाढ झाली. याला रेसिडेन्स ऑफ टाइम असे म्हणतात. म्हणजेच आपण वापरलेले एक चमचा मीठ ते पुढची तब्बल १७६ वर्षे पाणलोट क्षेत्रात राहते. सगळेच पाणी अडवले तर त्यामुळे पलीकडे क्षारतेत वाढ होते. तापीमध्ये किंवा सांगलीसाताऱ्यात वाढलेली क्षारता हा त्याचाच परिणाम आहे. आता वाढलेल्या पावसामुळे आपल्याला परिस्थिती बदलण्याची संधी आहे. जिथे मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो आहे तिथे सुरुवातीचे पावसाचे पाणी आपण वाहून द्यायला हवे. खासकरून कोल्हापूरसारख्या परिसरात ऑगस्टनंतरचा आणि परतीचा असे दोन्ही पाऊस अनुभवता येतात. अशा ठिकाणी अखेरचा २० टक्के पाऊस कोल्हापूर बंधारा पद्धतीने अडवला जाऊ शकतो. त्याने क्षारता मोठय़ा प्रमाणावर कमी करण्याची संधी या अधिकच्या पावसामुळे मिळणार आहे.


पुणे विद्यापीठातील विद्यार्थी डॉ. बाबाजी मस्कारे यांनी दरडी कोसळ्याची शक्यता असलेल्या पठारावरील प्रदेशांचा अभ्यास त्यांच्या पीएचडीच्या शोधप्रबंधामध्ये केला असून त्यात नकाशासह सारे काही उपलब्ध आहे. त्याचा वापर राज्य शासनास करता येऊ शकतो. रायरेश्वरचे पठार वगळता पाचगणी- महाबळेश्वर, ठोसेघर, कास आणि पाटण यांचा अभ्यास झाला पूर्णपणे करण्यात आला असून दरडी कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणेही शास्त्रीय अभ्यासाने शोधण्यात आली आहेत. कोकणामध्येही अशाचप्रकारचा भूगर्भशास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.


बोर्गेवाडी हे पाटणच्या पठाराजवळचे गाव असून तिथे सातत्याने दरडी कोसळत होत्या. मात्र अशा प्रकारच्या शास्त्रीय अभ्यासानंतर तिथे शासनाने पुनर्वसन केले आहे. अशाच प्रकारे पुनर्वसन भिलारमध्येही पार पडले. त्यामुळे मनुष्य व वित्तहानी टाळता येते हे सिद्ध झाले आहे, असे सागून डॉ. दुराईस्वामी म्हणाले की, एक महत्त्वाचा बदल आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये आणि धोरणनिर्णयामध्ये करावाच लागेल. आपण आजवर ब्रिटिशांची नियोजन पद्धती आदर्श मानली. त्यानुसार गेल्या ५०-१०० वर्षांतील घटनांचा, नोंदीचा अभ्यास करून त्यानुसार प्रकल्पांची बांधकामे केली जातात. यापुढे भविष्यात वातावरणबदलाची शास्त्रीय अभ्यासपूर्ण सर्वेक्षणे लक्षात घेऊन पुढच्या ५० वर्षांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या मॉडेल्सचा अभ्यास करत नियोजन करावे लागेल म्हणजे मग आपला द्रुतगती महामार्गच पाण्याखाली गेला अशा प्रसंगांना सामोरे तर जावे लागणार नाहीच, शिवाय मोठय़ा प्रमाणावर होणारी मनुष्य व वित्तहानीही टाळता येईल.

 [08/08, 10:51] Baby: *अन्नपूर्णा*

---------------- 


*माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान*. 

*एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढय़ात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात*. *भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच रहाते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका*. *त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात*. *मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार करू नका.  मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवीप्रसन्न रहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो. अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रूसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्मयतो खाणे-पिणे करू नये. मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्मया प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत रहाते. स्वतःची अद्यात्मिक शक्तीही वाढते*....

💐💐💐💐💐💐💐💐

[08/08, 11:52] Baby: 🙏 *सर्व हिन्दू बांधवांना विनंती*🙏

    *दीप (दिवे धुण्याची)* अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे ...

    मुळात गटारी असा कोणताही सण आपल्या धर्मात नाहीये ... 

     हे नामकरण कोणी दारुडयाने केले आहे व दारुच्या  व्यापारात ज्यांचे आर्थिक  हितसंबध  गुंतले  आहेत त्यानी त्याला हवा दिली आहे ...

     👍  या सणाला *घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते.* दिवे आपल्या  जीवनातील *अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात,* त्यांच्याविषयी🙏 *कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण*🙏... 

     त्यामुळे ह्या सणाला दीप (दिवे धुण्याची) *दिप अमावस्याच* म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका. *कोणताही धर्म  ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही,* उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात ... *या दिवशी* *घरी तसेच मंदिरात दीपपूजन करावे*...

     वेळीच सावध व्हावे, *उद्या महाराष्ट्रातील नवीन पिढीला  वाटेल की धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो,* सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावी. ...

     तेव्हा *हिंदू बांधवांनी* ह्या सणाविषयी लोकांमध्ये *जागृती* करून ह्या सणाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती ...

 वातावरण बदलातील आव्हानातून सावरण्यासाठी

एकात्म भावनेने सर्वांचे योगदान मोलाचे

                        - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

                      राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

 

           परभणी, दि. 7 :- वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस विविध आव्हाने निर्माण होत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकात्म भावनेने आपले योगदान दिल्याशिवाय पर्याय नसल्याच्या भावना  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.

            वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बांबू प्रकल्पराष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पकृषी अभियांत्रिकीफुड टेक्नॉलॉजीमुलींचे वसतिगृहग्रंथालय आदी विभागाची पाहणी करुन प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयलविद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवणजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळेजिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना,  महापालिका आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते.

            आव्हाने किती जरी आले तरी नव्या पिढीपर्यंत नवनिर्मितीचे संकल्प पोहोचले पाहिजेत. नव्या पिढीला प्रेरणा मिळाल्या पाहिजेत. देशाच्या विकासात त्यांचा अधिकाधिक सहभाग घेवून विकास प्रक्रियेला चालना देणेत्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही खरी विद्यापीठाची जबाबदारी आहे. भारतात पूर्वीपासून उत्तम शेतीमध्यम व्यापार व नौकरीला कनिष्ठ दर्जा दिलेला आहे. भविष्यात कृषी क्षेत्रात व शेतीपूरक कृषी व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी दडल्या असून स्वावलंबनाच्यादृष्टीने कृषी व कृषी पुरक विषयावर दिले जाणारे शिक्षण अधिक मोलाचे आहे. ही जबाबदारी कृषी विद्यापीठाने व या क्षेत्रात अध्यापन करणाऱ्या गुरुजनांनी लक्षात घेवून स्वत:ला सिध्द करण्याचे भावनिक आवाहन ही राज्यपाल कोश्यारी यांनी केले.

            कृषी क्षेत्रासंदर्भात अनेक ठिकाणी अनेक संशोधन चालू असल्याचे दिसून येते. हे संशोधन शेतकऱ्यांच्या जीवनमानाला उंचावणारे असल्याने ते जितक्या लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचेल तितक्या लवकर त्यांची उपयोगिता सिध्द होईल. संशोधनाला मर्यादीत स्वरुपात न ठेवता त्याला अधिक व्यापकता देण्यासाठी विद्यापीठाने पुढे आले पाहिजे. माहितीचे आदान प्रदानातून  शिक्षणाला व्यापकता येते. आपापल्या क्षेत्रात जागतिक पातळीवर जिथे कोठे  संशोधन सुरु असेल त्या-त्या ठिकाणाशी समन्वय साधून वैश्विक ज्ञानाची द्वारे समृध्द केली पाहिजेत अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यापीठाकडून व्यक्त केली.

            आपण भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे विद्यापीठ आता विद्यार्थ्यांतील ताऱ्यांना घडविण्यासमवेतच चंद्राप्रमाणेही प्रकाशमान करेलअशी भावना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त करुन विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल कोश्यारी यांची विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी

            महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या दौऱ्यात विविध प्रकल्पांना भेटी देवून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थींनीशी संवाद साधला. तसेच वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस व सरस्वती पुजनानंतर त्यांनी बांबु संशोधन प्रकल्पास भेट दिली. याचबरोबर राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पकृषी अभियांत्रिकीफुड टेक्नॉलॉजीग्रंथालयमुलींचे वसतिगृह यांची पाहणी करुन कुलगुरुंना आवश्यक त्या सुचना केल्या. याप्रसंगी वसंतराव नाईक उद्यानात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi