[30/07, 20:46] Baby: *या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे)
1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.
2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.
3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.
4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे)
5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा.
6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.
7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.
8. कर्जांचे व्याज फेडणे.
9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव.
10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा.
11. पार्टी दारु कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, वस्तू घेतली-द्या पार्टी, 2-5शे रुपये पगार वाढला-द्या पार्टी,)
*🙏अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत... आहेत त्यांचा अंत..... नाही... !*✍
*लिमिटेड होतं तेच बरं होतं* ...
पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा.....
टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर *छान गप्पा मारायची*.... 😊😃😁
दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. *प्रवासाचा आनंद मिळायचा* .... 😄
गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे *स्थूलतेचे प्रमाण कमी होते*.....😉
शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक *जडण घडण नीट व्ह्यायची*... 💪👍
बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून *कुटुंबासाठी वेळ द्यायची*...... 👏💞
अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले *आयुष्य खूप सुखी होते*......
........... पण आता सगळंच *अनलिमिटेड* झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच *लिमिटेड* झालंय !!😧😩
बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?
बेटा काळ खूप बदलला बघ...
तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.
तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.
तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.
तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.
तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी *गोड* लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.
तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.
मुळात काय की,
*तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं*
आता
बरंच काही मिळत असूनही *आनंदी जीवन कसे जगावे* यांवरील *सेमिनर्स' अटेंड* करावे लागतात.
(कुणी लिहिलंय माहित नाही, पण तथ्य आहे)
[30/07, 20:49] Baby: 'देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी '... हे गाणं सगळ्यांनाच परिचित असेल. आपल्यापैकी किती जण यावर विश्वास ठेवतात? मी तर या ओळींशी पूर्णपणे सहमत आहे.
मी लहानपणी परीक्षेला जाताना अगदी मनोभावे देवाला हात जोडून प्रार्थना करून जायचे. पण त्यानंतर आई पप्पाना नमस्कार करायला कधीच विसरायचे नाही. तेव्हापासूनच आई वडिलांना मी देवाच्या जागी मानत आलेय. माझे आई आणि पप्पा हे मला या आयुष्यात भेटलेले पहिले 'देव'. बाहेरच्या जगाशी ओळख झाल्यावर तर पावलोपावली नाही म्हणता येणार पण जिथे जिथे मला नितांत गरज होती तेव्हा तेव्हा हा देवबाप्पा कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने मला भेटायचा आणि चुटकी सरशी माझ्या अडचणी सोडवून जायचा.
कधी कधी अशक्य गोष्टीदेखील आपल्या नकळत शक्य होऊन जातात. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपली जिद्द, परिश्रम आणि अथक प्रयत्न हे तर आवश्यक असतातच परंतु त्यापलीकडे जाऊन आशीर्वाद किंवा सकारात्मक ऊर्जा देखील गरजेची असते. आणि हे सगळं सगळं ज्याला मिळतं त्याला आपण नशीबवान म्हणतो.
भर मुसळधार पावसात जेव्हा रिक्षा मिळत नसते, प्रत्येक रिक्षावाला नकार देत असतो, अशातच अचानक एक रिक्षावाला कुठून तरी येतो आणि चक्क आपल्याला इच्छित स्थळी पोचवतो त्याला मी देव समजते. अतिशय कठीण गेलेला एखाद्या परीक्षेचा पेपर, ज्यात केटी किंवा नापास होण्याची शक्यता असते अशा विषयात पास करणारा परीक्षक मला देव वाटतो.
कुठेतरी वेळेवर पोचायचं असते, घाई घाई मध्ये रस्त्यातून चालत असताना अचानक चप्पल तुटते, अशा वेळी अचानक थोडया अंतरावर दिसणारा मोची मला देवासमान वाटतो. करियर च्या एखाद्या वळणावर नोकरीची नितांत गरज असताना, हातात एकही ऑफर नसताना, डोक्यावर EMI नावाचे भूत बसलेले असताना समोर interview घेणारा परीक्षक आणि त्यानंतरच्या HR राऊंड चे परीक्षक देखील मला देवासमान भासतात. अशा कठीण परीक्षेच्या वेळी आपल्या मदतीला धावून आलेल्या व्यक्तीस आपण अगदी सहजपणे बोलून जातो, 'अगदी देवासारखा माझ्या मदतीला धावून आलास'. कधी कधी ही कृतज्ञता व्यक्त करणे सुद्धा राहून जाते. कितीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, जातात. काहींशी जुजबी ओळख होते, तर काही लोकांशी जिवाभावाची मैत्री होते. प्रत्येका बरोबर आपले काही ना काही ऋणानुबंध असतातच. अगदी आपले सख्खे भाऊ बहीण, जोडीदार, मुलं, इतर अनेक नातेवाईक तसेच मित्रमैत्रिणी या प्रत्येकाचा आपल्या आयुष्यावर ठसा उमटलेला असतो. या सर्वांच्या रूपाने देव आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो.
थोडक्यात काय तर देव मानला तर सगळीकडे आहे. अगदी कुठे नाही दिसला तरी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा, आपल्याला तो नक्कीच दिसेल.
--- कविता संकेत नाईक.