Wednesday, 2 August 2023

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा

 महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा


- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेक


            मुंबई, दि. 1 : महसूल विभागासोबत समाजातील प्रत्येक नागरिकांचा संबंध येतो. त्यांच्या सेवेसाठी विभाग सदैव तत्पर असून हा विभाग प्रशासनाचा कणा असल्याचे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी काढले.


            महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. नागरिकांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 'महसूल सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत या सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार यामिनी जाधव, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.नवले, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            श्री.नार्वेकर म्हणाले की, कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रथम महसूल विभागाकडे जबाबदारी दिली जाते. निवडणुकीची जबाबदारी देखील महसूल विभागामार्फत यशस्वीपणे पार पाडली जाते. एकूणच राज्यातील नागरिकांच्या भविष्य, भवितव्य आणि कल्याणाची मोठी जबाबदारी हा विभाग सांभाळत असून ती चोखपणे पार पाडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


महसूल विभागाने दाखले तत्काळ देण्याचा प्रयत्न करावा


- पालकमंत्री दीपक केसरकर


            ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन नागरिकांपर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी मागणी केलेले दाखले विभागाने लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथे नागरिकांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कोळीवाड्यांच्या सर्वांगीण विकासाद्वारे शहराच्या मूळ परंपरेची ओळख पर्यटकांच्या माध्यमातून जगभर करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांसाठी सर्वसमावेशक सुविधा केंद्र, धार्मिक स्थळांचा परिसर विकास, घरांना छप्पर, म्हाडाच्या घरांना लिफ्ट, कामगार केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा आदींबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असून तेथेच शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


            जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी प्रास्ताविकाद्वारे नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रत्येक कामामध्ये महसूल विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. इंग्रजांच्या काळापासूनची महसूल जमा करणारी ही महत्त्वाची यंत्रणा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.


            महसूल सप्ताहांतर्गत विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनसामान्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.


            दि. 1 ऑगस्ट 2023 हा महसूल दिन असून या दिवशी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आला. त्याचप्रमाणे येणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दि. 2 ऑगस्ट रोजी विविध महाविद्यालयात युवा संवादाचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध दाखल्याबाबत ऑनलाईन प्रक्रियांची माहिती देण्यात येणार आहे, तर मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. दि. 3 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना एनडीआरएफ मास्टर ट्रेनरकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. दि. 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत मुंबई शहरातील भाडेपट्टे धारकाला, भोगवटादार वर्ग-1, सत्ता हस्तांतरणाबाबत शिबिर आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मिळकत पत्रिका व नकाशांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 5 ऑगस्ट रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिबिर आयोजित करून माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील भूदल व नौदल कार्यालयामध्ये शिबिर घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. दि. 6 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील निवृत्त कर्मचारी वर्ग यांचे प्रश्न व सेवा विषयक बाबी निकाली काढण्यात येतील. तर दि. 7 ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा, शुद्धलेखन व टिपणी लेखन याबाबत मार्गदर्शन तसेच ताणतणाव मुक्तीबाबत व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पथनाट्य आणि सांगता समारंभाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


0000

दारू ,गुटखा, तंबाखू,सिगरेटच व्यसन Smoking Habit*

 *दारू ,गुटखा, तंबाखू,सिगरेटच व्यसन Smoking Habit*

*व तंबाखू गुटखा व्यसन सोडवा.*




१)कँल्केरीया फाँस ३×नेट्रम मूर३× चा प्रत्येकी चार चार गोळ्या ग्लासभर पाण्यात टाकून ते पाणी घोट घोट करून दहा दहा मिनिटाच्या अंतराने घ्या पंधरा दिवसांत शिसारी येऊन व्यसन बंद होईल.

२)कँफर६गोळी तलफ आली की जिभेखाली ठेवा काही दिवसात तंबाखू गुटखा सुटेल.

३)कँलाडियम२००चार चार गोळ्या स.दु.सं सिगरेट,

४)सल्फर२००पोटेन्सी चे पाच पाच थेंब पाण्यात टाकून पाजेल तरीही दारू,तंबाखूची ,गुटख्याची इच्छा होणार नाही.

वरील औषधे होमिओपॅथी च्या दूकानात मिळतील.


वैद्य.गजानन



*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_*(

सहकारातून देशात मोठी क्रांती घडेल


 सहकारातून देशात मोठी क्रांती घडेल


खासदार डॉ. अनिल बोंडेंकडून प्रधानमंत्री, सहकार मंत्र्यांचे अभिनंदन


बहु-राज्य सहकारी सोसायटी विधेयकावर राज्यसभेत समर्थनपर भाष्य


 


केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (ता.१) राज्यसभेत बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक मांडले. या विधेयकावर खासदार तथा प्रतोद डॉ.अनिल बोंडे यांनी ११ मिनिट २० सेकंद आपले विचार मांडत त्यांनी या विधेयकाच्या माध्यमातून देशभरात सहकारात क्रांती घडेल. एका कुटुंबापर्यंतमर्यादित असलेलं हे क्षेत्र आता समृद्धी आनेल. गोरगरीब नागरिकांचा त्यातून उद्धार होईल आणि ग्रामीण क्षेत्राला मजबुती प्रदान करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना यात असल्याचे त्यांनी सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.


   संसदेचे अधिवेशन नवी दिल्ली येथे सुरू आहे. अतिशय महत्त्वाचे असणारे बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक आज राज्यसभेत सहकार मंत्री अमित शहा यांनी मांडले. या विधयकावर राज्यसभेतील प्रतोद खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सर्वाधिक ११ मिनिट २० सेकंद विचार व्यक्त केले. राज्यसभेत बोलताना ते म्हणाले, सहकार हा भारताचा आत्मा आहे. ग्रामीण नागरिकांच्या उन्नतीसाठी सहकाराला बळकटी देणे महत्त्वाचे असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात सारख्या महत्त्वाच्या असलेल्या सहकाराच्या भूमीतील अमित शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी देत स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. सहकाराच्या माध्यमातून शेतीला चालना देणे, पुरेशा प्रमाणात पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, ग्रामीण क्षेत्रातील गरीब शेतकरी, पशुपालक, मजूर, मत्स्यपालक इत्यादींचा विचार करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीचा नारा देत अमृत काळात सहकाराला बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या सर्व बाबी कृतीत उतरवण्यासाठी व त्याची देशभरात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमित शहा प्रयत्न करत आहेत. बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक त्याच प्रयत्नाचा एक भाग असल्याचे डॉ.बोंडे म्हणाले. आदिवासी, अनुसूचित जाती, महिला इत्यादी घटक आता सहकाराच्या कक्षेत येणार आहेत. त्यांच्या विकासासाठी सहकारात सुधारणा करणे आवश्यक होते. सहकारी संस्थांची दुरावस्था झालेली होती. महाराष्ट्रात दीड लक्ष सहकारी संस्था आहेत. केंद्र सरकारच्या स्तरावर सहकार मंत्रालय नव्हते. मात्र प्रधानमंत्री यांनी सहकार मंत्रालय स्थापन केल्याने देशातील शेवटचा घटक विकासाच्या प्रवाहात आला. अनेक सहकारी संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जात नव्हती. गोरगरीब, शेतकरी, महिला, अनुसूचित जाती इत्यादींच्या प्रतिनिधित्वाला त्यातून डावलण्यात येत होते. मात्र या विधेयकामध्ये या संपूर्ण बाबींचा विचार करण्यात आला आहे. संस्थेतील भागीदार असलेल्या व्यक्तींवर अन्याय होणार नाही, याचाही विचार करण्यात आला आहे .त्यांना न्याय मागण्याची एक कार्यप्रणाली ठरवून देण्यात आली आहे. या विधेयकामध्ये पाच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सहकाराच्या क्षेत्रात संपूर्ण पारदर्शकता येईल. निवडणूक बोर्डमध्ये महिलांसाठी दोन जागा तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधित्वकरिता एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. लहान सहकारी संस्था डबघाईस येत असतील तर त्याला आर्थिक पाठबळ देऊन मजबुती देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशाही उपायोजना नव्या विधेयकामध्ये आहेत. एकंदरतच वंचित घटकांना न्याय देण्याची तरतूद यामध्ये समाविष्ट असल्याने एका कुटुंबातपूर्त मर्यादित असलेले सहकार क्षेत्र आता लोकाभिमुख होत आहेत. सहकार स्वाहाकाराकडून आता समृद्धीकडे जात आहे. गोरगरीब नागरिकांचा उद्धार होईल. ग्रामीण क्षेत्रातून त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असल्याने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी स्वागत आणि अभिनंदन सुद्धा केले.


0000




प्रेसनोट, हिंदी


 1 अगस्त, 2023


 


सहकारिता से देश में एक बड़ी क्रांति आयेगी


सांसद डॉ. अनिल बोंडे की ओर से प्रधानमंत्री, सहकारिता मंत्री को बधाई


 राज्यसभा में बहु-राज्य सहकारी सोसायटी विधेयक के समर्थन में रखे विचार


 केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह ने मंगलवार (1) को राज्यसभा में बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक पेश किया। सांसद और प्रतोद डॉ. अनिल बोंडे ने इस बिल पर 11 मिनट 20 सेकेंड तक अपने विचार रखे. एक परिवार तक सीमित रहने वाला यह क्षेत्र अब समृद्ध होगा। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और सहकारिता मंत्री अमित शाह को बधाई देते हुए कहा कि इससे गरीब नागरिकों को राहत मिलेगी और इसमें ग्रामीण क्षेत्रों को मजबूत करने के लिए आवश्यक उपाय शामिल हैं।


    नई दिल्ली में संसद का सत्र चल रहा है. सहकारिता मंत्री अमित शाह ने आज राज्यसभा में बेहद महत्वपूर्ण बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक पेश किया। राज्यसभा में प्रतोद सांसद डॉ. अनिल बोंडे ने इस बिल पर सबसे ज्यादा 11 मिनट 20 सेकंड तक विचार व्यक्त किए. राज्यसभा में बोलते हुए उन्होंने कहा, सहकार भारत की आत्मा है. चूंकि ग्रामीण नागरिकों के उत्थान के लिए सहकार को मजबूत करना महत्वपूर्ण है, इसलिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुजरात जैसी सहकार की महत्वपूर्ण भूमि में काम कर चुके अमित शाह को इस विभाग की जिम्मेदारी देते हुए एक अलग मंत्रालय का गठन किया है। सहकारिता के माध्यम से कृषि को बढ़ावा देना, पानी की पर्याप्त सुविधा उपलब्ध कराना, ग्रामीण क्षेत्रों में गरीब किसानों, पशुपालकों, मजदूरों, मछली पालकों आदि के बारे में सोचते हुए, सहकार से स्मृद्धि का नारा देकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमृत काल में सहकारिता को मजबूत करने की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाया है। अमित शाह इन सभी पहलुओं को पूरे देश में प्रभावी ढंग से लागू करने की कोशिश कर रहे हैं। डॉ. बोंडे ने कहा कि बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक उसी प्रयास का एक हिस्सा है।


 ----


 सभी घटकों का प्रतिनिधित्व रहेंगा


 आदिवासी, अनुसूचित जाति, महिलाएं आदि अब सहकार के दायरे में आएंगे। उनके विकास के लिए सहकार में सुधार करना आवश्यक था। सहकारी संस्थाए बुरी स्थिति में थीं। महाराष्ट्र में डेढ़ लाख सहकारी संस्थाए हैं. केन्द्र सरकार के स्तर पर कोई सहकारिता मंत्रालय नहीं था। लेकिन प्रधानमंत्री द्वारा सहकारिता मंत्रालय की स्थापना के साथ ही देश में विकास की धारा प्रवाहित हो गई। कई सहकारी संस्थाओ में चुनाव प्रक्रिया नहीं होती थी। गरीबों, किसानों, महिलाओं, अनुसूचित जाति आदि का प्रतिनिधित्व इससे बाहर रखा गया। लेकिन इस बिल में इन सभी बातों पर विचार किया गया है. सभी घटकोका अब इसमें प्रतिनिधित्व होगा ऐसा भी डॉ.अनिल बोंडे ने उल्लेख किया.


 ---


 स्वाहाकार संमाप्त होगा; पारदर्शिता, जनोन्मुख होगा काम


 इस बात पर भी विचार किया गया है कि जो व्यक्ति संस्था में भागीदार हैं, उनके साथ कोई अन्याय नहीं होगा. इस बिल में पांच बेहद अहम बातें शामिल की गई हैं. इससे सहकारी क्षेत्र में पूरी पारदर्शिता आएगी। चुनाव बोर्ड में दो सीटें महिलाओं के लिए और एक सीट अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के प्रतिनिधित्व के लिए आरक्षित की गई है। अगर छोटी सहकारी संस्था संकट में हैं तो सरकार उन्हें आर्थिक मदद देकर मजबूत करने की कोशिश करेगी, विधेयक में ऐसे उपाय भी हैं. जो सहकारी समितियाँ एक परिवार तक सीमित थीं, वे अब जनोन्मुख हो रही हैं क्योंकि उनमें समग्र वंचित वर्गों के लिए न्याय का प्रावधान शामिल है। सहकारिता आत्मनिर्भरता से समृद्धि की ओर बढ़ रही है। गरीब नागरिको को न्याय मिलेगा. सांसद डॉ. अनिल बोंडे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और सहकारिता मंत्री अमित शाह का स्वागत और अभिनंदन किया, क्योंकि ग्रामीण क्षेत्रों में इस विधेयक का व्यापक स्वागत हो रहा है।

हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे*

 *हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे*

*वजन कमी करण्यासाठी. नाचणी उपयुक्त*




रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी

लहान मुलांसाठी उपयुक्त.

त्वचेसाठी ठरते फायदेशीर

स्तनपानासाठी अधिक उपयुक्त

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणेही गरजेचे आहे. धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यासह अनेक आजारांपासून आपले रक्षण करे. जेव्हा आपण धान्याचे नाव घेतो, तेव्हा नाचणी आणि नाचणीचे सत्व आपण नक्कीच महत्त्वाचे मानतो. नाचणीचे फायदे अनेक आहेत. नाचणीचे शरीरासाठी विविध फायदे होतात. हेच फायदे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी रागी अर्थात नाचणी म्हणजे काय हे जाणणे महत्त्वाचे आहे. रागी अर्थात नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्याही विविध भागात उगवणारे एक धान्य आहे. भारतात कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पादन होते. यामध्ये अनेक पोषक तत्वे आपल्याला आढळतात. फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे रागी अर्थात नाचणीमधून शरीराला मिळतात.


 प्रमोद पाठक.


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/L5vopHeBNMLCK3kdueJtyT

अल्सर... पोटातले व्रणः*

 *अल्सर... पोटातले व्रणः*



 अतिचिंता, खुप मसालेदार जेवण, अतिशोक, जागरण, जेवण वेळेवर न घेणे, चमचमित आहार घेणे. या गोष्टि वारंवार होत राहिल्यास कि मग आधि आम्लपित्त व त्याचि विक्रुत अवस्था म्हणजेच... अल्सर...

 उपायः

१) सकाळि कोकम सरबत घ्या. नाश्यात साळिच्या लाह्या दूधात कालवून खा. नंतर दोन चमचे मध नुसतेच खा. कारण हे अल्सरचे जंतू नष्ट करतात.

२) ज्येष्ठमध चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून सकाळि एक कप भात शिजवून त्यासोबत खावे. अल्सर वेगाने बरा होतो.

३) मेथिचे दाणे भिजवून नंतर उकळवा. व थोडे मध मिसळून खा.

४) शहाळ्याचे पाणि दिवसातून दोनदा घ्या. ओले खोबरे खा.

५) केळ हे एक उत्तम अल्सर लवकर बरे करण्याचे फळ आहे. दोनदा खावे दिवसातून.

६) पानकोबित लँक्टिक अँसिड असते. ज्यामूळे अमिनो अँसिड बनून पोटाला कवच मिळतं व अल्सर होत नाही. थोडि पानकोबि व गाजर याचा रस एकत्रित करून सकाळि घ्यावा. व रात्रि झोपण्याच्या आधि घ्यावा.

७) रोज जेवणानंतर दाडिमावलेह

 दोन चमचे, कामदूधा वटी, प्रवाळ पंचाम्रुत घ्यावे. रोज एक मोठा चमचा भरून गुलकंद खावा.

८) मुख्य म्हणजे आंबट, खारट, विशेषतः चिंच, टोमँटो, अननस टाळा.

 आंबवलेले पदार्थ. इडलि, दोसा, ढोकळा, दहि, खाउ नका.

  यासर्व उपायाने व पथ्याने अल्सरचा त्रास होणार नाही....



*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




Tuesday, 1 August 2023

भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात

 


कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला येथे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन मंगळवारी आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


लोखंडवाला येथील अण्णा भाऊ साठे उद्यानात हे भित्ती शिल्प उभारण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्यभर समाजातील कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकसांसाठी झगडण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हि व्यक्तिमत्वे आमच्यासाठी राजकारणाचे विषय नाहीत. ही व्यक्तिमत्वेच इतकी मोठी आहेत कि त्यांनी समाजाला, देशाला नाही तर उभ्या जगाला मार्गदर्शन करण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले

.


सोपी भाषेत गणित शिकवा मुलाना



सोपी भाषेत गणित 

Featured post

Lakshvedhi