सहकारातून देशात मोठी क्रांती घडेल
खासदार डॉ. अनिल बोंडेंकडून प्रधानमंत्री, सहकार मंत्र्यांचे अभिनंदन
बहु-राज्य सहकारी सोसायटी विधेयकावर राज्यसभेत समर्थनपर भाष्य
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (ता.१) राज्यसभेत बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक मांडले. या विधेयकावर खासदार तथा प्रतोद डॉ.अनिल बोंडे यांनी ११ मिनिट २० सेकंद आपले विचार मांडत त्यांनी या विधेयकाच्या माध्यमातून देशभरात सहकारात क्रांती घडेल. एका कुटुंबापर्यंतमर्यादित असलेलं हे क्षेत्र आता समृद्धी आनेल. गोरगरीब नागरिकांचा त्यातून उद्धार होईल आणि ग्रामीण क्षेत्राला मजबुती प्रदान करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना यात असल्याचे त्यांनी सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.
संसदेचे अधिवेशन नवी दिल्ली येथे सुरू आहे. अतिशय महत्त्वाचे असणारे बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक आज राज्यसभेत सहकार मंत्री अमित शहा यांनी मांडले. या विधयकावर राज्यसभेतील प्रतोद खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सर्वाधिक ११ मिनिट २० सेकंद विचार व्यक्त केले. राज्यसभेत बोलताना ते म्हणाले, सहकार हा भारताचा आत्मा आहे. ग्रामीण नागरिकांच्या उन्नतीसाठी सहकाराला बळकटी देणे महत्त्वाचे असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात सारख्या महत्त्वाच्या असलेल्या सहकाराच्या भूमीतील अमित शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी देत स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. सहकाराच्या माध्यमातून शेतीला चालना देणे, पुरेशा प्रमाणात पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, ग्रामीण क्षेत्रातील गरीब शेतकरी, पशुपालक, मजूर, मत्स्यपालक इत्यादींचा विचार करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीचा नारा देत अमृत काळात सहकाराला बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या सर्व बाबी कृतीत उतरवण्यासाठी व त्याची देशभरात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमित शहा प्रयत्न करत आहेत. बहुराज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक त्याच प्रयत्नाचा एक भाग असल्याचे डॉ.बोंडे म्हणाले. आदिवासी, अनुसूचित जाती, महिला इत्यादी घटक आता सहकाराच्या कक्षेत येणार आहेत. त्यांच्या विकासासाठी सहकारात सुधारणा करणे आवश्यक होते. सहकारी संस्थांची दुरावस्था झालेली होती. महाराष्ट्रात दीड लक्ष सहकारी संस्था आहेत. केंद्र सरकारच्या स्तरावर सहकार मंत्रालय नव्हते. मात्र प्रधानमंत्री यांनी सहकार मंत्रालय स्थापन केल्याने देशातील शेवटचा घटक विकासाच्या प्रवाहात आला. अनेक सहकारी संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जात नव्हती. गोरगरीब, शेतकरी, महिला, अनुसूचित जाती इत्यादींच्या प्रतिनिधित्वाला त्यातून डावलण्यात येत होते. मात्र या विधेयकामध्ये या संपूर्ण बाबींचा विचार करण्यात आला आहे. संस्थेतील भागीदार असलेल्या व्यक्तींवर अन्याय होणार नाही, याचाही विचार करण्यात आला आहे .त्यांना न्याय मागण्याची एक कार्यप्रणाली ठरवून देण्यात आली आहे. या विधेयकामध्ये पाच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सहकाराच्या क्षेत्रात संपूर्ण पारदर्शकता येईल. निवडणूक बोर्डमध्ये महिलांसाठी दोन जागा तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधित्वकरिता एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. लहान सहकारी संस्था डबघाईस येत असतील तर त्याला आर्थिक पाठबळ देऊन मजबुती देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशाही उपायोजना नव्या विधेयकामध्ये आहेत. एकंदरतच वंचित घटकांना न्याय देण्याची तरतूद यामध्ये समाविष्ट असल्याने एका कुटुंबातपूर्त मर्यादित असलेले सहकार क्षेत्र आता लोकाभिमुख होत आहेत. सहकार स्वाहाकाराकडून आता समृद्धीकडे जात आहे. गोरगरीब नागरिकांचा उद्धार होईल. ग्रामीण क्षेत्रातून त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असल्याने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी स्वागत आणि अभिनंदन सुद्धा केले.
0000
प्रेसनोट, हिंदी
1 अगस्त, 2023
सहकारिता से देश में एक बड़ी क्रांति आयेगी
सांसद डॉ. अनिल बोंडे की ओर से प्रधानमंत्री, सहकारिता मंत्री को बधाई
राज्यसभा में बहु-राज्य सहकारी सोसायटी विधेयक के समर्थन में रखे विचार
केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह ने मंगलवार (1) को राज्यसभा में बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक पेश किया। सांसद और प्रतोद डॉ. अनिल बोंडे ने इस बिल पर 11 मिनट 20 सेकेंड तक अपने विचार रखे. एक परिवार तक सीमित रहने वाला यह क्षेत्र अब समृद्ध होगा। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और सहकारिता मंत्री अमित शाह को बधाई देते हुए कहा कि इससे गरीब नागरिकों को राहत मिलेगी और इसमें ग्रामीण क्षेत्रों को मजबूत करने के लिए आवश्यक उपाय शामिल हैं।
नई दिल्ली में संसद का सत्र चल रहा है. सहकारिता मंत्री अमित शाह ने आज राज्यसभा में बेहद महत्वपूर्ण बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक पेश किया। राज्यसभा में प्रतोद सांसद डॉ. अनिल बोंडे ने इस बिल पर सबसे ज्यादा 11 मिनट 20 सेकंड तक विचार व्यक्त किए. राज्यसभा में बोलते हुए उन्होंने कहा, सहकार भारत की आत्मा है. चूंकि ग्रामीण नागरिकों के उत्थान के लिए सहकार को मजबूत करना महत्वपूर्ण है, इसलिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुजरात जैसी सहकार की महत्वपूर्ण भूमि में काम कर चुके अमित शाह को इस विभाग की जिम्मेदारी देते हुए एक अलग मंत्रालय का गठन किया है। सहकारिता के माध्यम से कृषि को बढ़ावा देना, पानी की पर्याप्त सुविधा उपलब्ध कराना, ग्रामीण क्षेत्रों में गरीब किसानों, पशुपालकों, मजदूरों, मछली पालकों आदि के बारे में सोचते हुए, सहकार से स्मृद्धि का नारा देकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमृत काल में सहकारिता को मजबूत करने की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाया है। अमित शाह इन सभी पहलुओं को पूरे देश में प्रभावी ढंग से लागू करने की कोशिश कर रहे हैं। डॉ. बोंडे ने कहा कि बहु-राज्य सहकारी सोसायटी (संशोधन) विधेयक उसी प्रयास का एक हिस्सा है।
----
सभी घटकों का प्रतिनिधित्व रहेंगा
आदिवासी, अनुसूचित जाति, महिलाएं आदि अब सहकार के दायरे में आएंगे। उनके विकास के लिए सहकार में सुधार करना आवश्यक था। सहकारी संस्थाए बुरी स्थिति में थीं। महाराष्ट्र में डेढ़ लाख सहकारी संस्थाए हैं. केन्द्र सरकार के स्तर पर कोई सहकारिता मंत्रालय नहीं था। लेकिन प्रधानमंत्री द्वारा सहकारिता मंत्रालय की स्थापना के साथ ही देश में विकास की धारा प्रवाहित हो गई। कई सहकारी संस्थाओ में चुनाव प्रक्रिया नहीं होती थी। गरीबों, किसानों, महिलाओं, अनुसूचित जाति आदि का प्रतिनिधित्व इससे बाहर रखा गया। लेकिन इस बिल में इन सभी बातों पर विचार किया गया है. सभी घटकोका अब इसमें प्रतिनिधित्व होगा ऐसा भी डॉ.अनिल बोंडे ने उल्लेख किया.
---
स्वाहाकार संमाप्त होगा; पारदर्शिता, जनोन्मुख होगा काम
इस बात पर भी विचार किया गया है कि जो व्यक्ति संस्था में भागीदार हैं, उनके साथ कोई अन्याय नहीं होगा. इस बिल में पांच बेहद अहम बातें शामिल की गई हैं. इससे सहकारी क्षेत्र में पूरी पारदर्शिता आएगी। चुनाव बोर्ड में दो सीटें महिलाओं के लिए और एक सीट अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के प्रतिनिधित्व के लिए आरक्षित की गई है। अगर छोटी सहकारी संस्था संकट में हैं तो सरकार उन्हें आर्थिक मदद देकर मजबूत करने की कोशिश करेगी, विधेयक में ऐसे उपाय भी हैं. जो सहकारी समितियाँ एक परिवार तक सीमित थीं, वे अब जनोन्मुख हो रही हैं क्योंकि उनमें समग्र वंचित वर्गों के लिए न्याय का प्रावधान शामिल है। सहकारिता आत्मनिर्भरता से समृद्धि की ओर बढ़ रही है। गरीब नागरिको को न्याय मिलेगा. सांसद डॉ. अनिल बोंडे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और सहकारिता मंत्री अमित शाह का स्वागत और अभिनंदन किया, क्योंकि ग्रामीण क्षेत्रों में इस विधेयक का व्यापक स्वागत हो रहा है।
No comments:
Post a Comment