Thursday, 11 May 2023

आरोग्यासाठी वरदान :- लिंबू*

 *आरोग्यासाठी वरदान :- लिंबू* 


लिंबू हे आपल्या रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. तसेच लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. 


लिंबू पाण्यासोबत सेवन करणेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. दिवसाची सुरुवात लिंबूपाणी घेऊन करावी. यामुळे त्वचा खुलून दिसते, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अनेक इतर समस्यांपासून सुटका होते. लिंबात अनेक औषधी गुणधर्म असल्याने लिंबाचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. अनेक आजारात घरच्या घरी लिंबाचे उपाय केले जातात. लिंबू हे त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक अँटी सेप्टीक औषध आहे.


दात दुखत असल्यास त्या ठिकाणी लिंबू घासणे किंवा लिंबाचा रस लावणे, असे केल्याने दातांचे दुखणे थांबण्यास मदत होईल आणि दातांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होईल. तसेच लिंबाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.


हृदयरोग्यांसाठी लिंबूपाणी रामबाण औषध आहे. यामध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब, मळमळ आणि भीती तसेच मानसिक तणावही दूर होतो. तसेच गळ्याचा संसर्ग दूर करण्यासाठी लिंबू गुणकारी आहे. गळ्याशी संबंधित समस्या किंवा टॉन्सिल्सची समस्या असल्यास लिंबामुळे खूप फायदा होतो.


जर तुम्हाला ब्रद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर सकाळी उठून लिंबू पाणी पिणे, असे केल्याने ब्रद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल आणि पचनक्रिया देखील सुधारेल. आयुर्वेदामध्ये लिंबाचे अनेक फायदे आहेत.


शरीरात आयर्नची कमतरता असल्यास एनीमियाची समस्या उद्भवते आणि लिंबू एनीमियाची समस्या दूर होण्यास मदत करते. लिंबू हे आजराच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवते.


लिंबाचे सेवन केल्याने किंवा लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेण्यास मदत होते, कारण लिंबू मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



लसुण..... Garlic..*

 *लसुण..... Garlic..*


.... लसुण उत्तम जंतूनाशक आहे. मोठमोठ्या डाँ. नि ज्या असाध्य रोगांपुढे हात टेकले, असे रोग लसणाच्या पाकळ्यांनि बरे होतात. अगदि प्राचिन आयुर्वेदापासून ते आधुनिक वैद्यकशास्राचा पाया घालणारे हिपाँक्रेटस

... यांच्यापर्यंत सर्वांनिच लसणाचि मुक्तकंठाने स्तुति केलि आहे..

.. लसणात..,, अलिका सल्फाईड,, नावाचे अतिशय प्रभावि तेल असते. यामूळेच क्षयरोग, टी. बि, वाढलेला रक्तदाब, पोलिओ, ह्रदयरोग, खोकला, दमा, संधिवात, सर्दि, पोटांचे असाध्य रोग, बरे होतात.. डाँ रोडुले यांनि तर घटसर्पासारखे विकार लसूणाचा उपयोग करून बरे केले आहे.. युरोप मद्ये प्लेगसारखे भयंकर रोग बरे करण्यासाठि लसूणाचा उपयोग शेकडो वर्षापासून केला आहे.


..... लसुण म्हणजे गरिबांचि.. कस्तुरिच.. आहे. सर्व प्रकारच्या वातविकारानवर रामबाण आहे, पण डोळ्याचे तेज वाढवतो, केसांनाहि हितकर आहे.

.... लसणाविषयि.. वाग्भटांनि असे म्हटले आहे कि, 

... जो माणुस थंडिच्या दिवसात अम्रुततुल्य असा लसूण विधिपूर्वक उपयोगात आणेल तो तेजस्वि, निरोगि, धष्टपुष्ट, व बलवान होउन १०० वर्षे जगेल.. ते पुढे असेहि म्हणतात...^* विद्यते वार्यौ न द्रव्यं लशुनात्परमा ^*... म्हणजे वायुरोगावर लसूणासारखे दुसरे प्रभावि औषध नाहि...


... लसुणाला. संस्क्रुतमद्ये...,,रसोन,, असे म्हणतात.. रसोन म्हणजे केवळ एकाच रसाचि उणिव..!!!

.... लसुणात मधुर, आम्ल, खारट, कडवट, व तिखट या सहा रसांपैकि पाच रस परिपूर्ण असतात.. फक्त आम्लरसाचिच उणिव असते..

.... लसणाच्या कांद्यात एक कणिचा देखिल लसुण मिळतो. तो जास्त गुणकारि असतो..


##लकवा.. लसणाच्या एका पाकळिपासून सुरवात करावी. दररोज एक एक पाकळि वाढवा. अखेर चौदाव्या दिवशि चौदाव्या दिवशि चौदा लसूणाच्या पाकळ्या खा.

.... नंतर त्याच प्रकारे एक एक पाकळि कमि करत जा.

... पुढच्या चौदा दिवसात एक ऊक पाकळी कमि करत एक पाकळिपर्यंत यावे. आणि हा ऊपचार बंद करा.

.... २८ दिवसांच्या या उपचाराने प्रामुख्याने लकव्यात फरक पडतो..

.... ##दुसरा उपाय हा कि, लसुणाच्या तीन पाकळ्या घेउन रोज रात्री त्या भिजत घालाव्या. सकाळि उठल्यावर त्या वाटाव्यात. व भिजत घातलेल्या पाण्यात कालवून ते पाणि गाळून, प्यावे. किंवा चार लसूण व सोळा वावडिंग दुधपाण्यात उकळवा.. पाणि आटल्यावर

  ते गाळून घ्या. व ते दूध प्या..


..##महत्वाचितिन.. ##खनिजे.. कँलशिअम, पोटँशिअम, व फाँस्फरस.. ही तिनहि खनिजे लसूणात मोठ्या प्रमाणात आढळतात.. याशिवाय, आयोडिन, गंधक, लोह, व क्लोरीन हे अल्प प्रमाणात का होईना असते.. याशिवाय . बी-१ सी, व रोबोफ्लेविन हि जीवनसत्वे असतात... २ ते ३% तेल द्रव्य, ११:८.. टक्के खनिज क्षार, २०:०० % कार्बोहायड्रेट. ४:४ % प्रैटिन मिळतात.

.... सर्वसाधारणपणे अशक्त लोकांना लसुण अश्वगंधाच्या

 चूर्णासोबत खावा.. स्वरेंद्रियावर दुष्परिणाम झालेल्यांनि ज्येष्ठमधासोबत खावा.

... ज्यांच्या पोटात गोळा उठतो त्यांनि तिळाच्या तेलासोबत खावा. अंगावर पांढरे कोड उठले असता, खैराच्या सालिसोबत, क्षयरोग्यांनी दूधासोबत,

.. मूळव्याध असणार्यानी इंद्रजवा च्या सालिच्या चूर्णासोबत, पोटात क्रुमि असणार्यानी वावडिंगाच्या

  चूर्णासोबत, व खोकला व श्वास विकार असणार्यांनि, त्रिफळा चुर्णासोबत लसूणाचे सेवन करावे..


... तेव्हा लसूण.. हा अतिशय.. प्रभावि नैसर्गिक..

 अँटिबायोटिक. औषध आहे.. आपण कायमच याचे सेवन केले पाहीजे...##^##^^##


... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

 जपानच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

जपान सरकारतर्फे भेटीचे निमंत्रणl.

            मुंबई, दि. ११ : जपानचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासूकाटा यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी डॉ. यासूकाटा यांनी जपान केंद्र सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले.


            यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, जपानचे कॉन्सुल मोरी रायको, कनेको टोशीहिरो, जपान कॉन्सुलेट जनरलचे राजकीय सल्लागार विवेक कुलकर्णी उपस्थित होते.


            यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि डॉ. यासूकाटा यांच्यामध्ये भारत-जपान संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि संबंध अधिक दृढ होण्याविषयी चर्चा झाली.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील विविध पायाभूत सुविधेच्या कामात जपानचे मोठे योगदान आहे. जपानच्या तंत्रज्ञानाचा ठिकठिकाणी वापर होत असून या माध्यमातून जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत. जपानची जनता आणि सरकारचा आम्ही नेहमीच आदर करीत आलो आहोत.


            डॉ. यासूकाटा यांनी यावेळी जपान केंद्र सरकारच्या वतीने श्री. फडणवीस यांना जपान भेटीचे निमंत्रण दिले, मार्च २०२४ अखेर कधीही सात दिवसांचा दौरा केला जाऊ शकेल. या काळात विविध जपानी कंपन्यांना भेटी देता येणार आहेत. याचदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण, भारतीय समुदायांशी भेटी घेण्याचे नियोजन आहे. २०१२ मध्ये गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही जपान भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. सध्या भारतातून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना जपान दौऱ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती डॉ. यासूकाटा यांनी दिली.


००००

राज्यातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार प्रदान

 राज्यातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार प्रदान.

            नवी दिल्ली, 10 : महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण व जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या दोन बंदरांनी वर्ष 2022-23 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले.


            येथील इंडिया इंटरनेशनल केंद्रामध्ये केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ‘हरित सागर’ ग्रीन पोर्ट मार्गदर्शक तत्त्वाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्काराने देशभरातील 12 बंदरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, विभागाचे सचिव सुधांश पंत, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा व अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            या कार्यक्रमात देशभरातील प्रमुख बंदरांना आर्थ‍िक वर्ष 2022-23 या कालावधीत निवडक विविध परिचालन मापदंडांच्या (ऑपरेशनल पॅरामीटर्स) आणि त्यांच्या अपवादात्मक कामगिरीबद्दल तसेच सर्वाधिक वाढीव सुधारणा नोंदविलेल्या बंदरांना सन्मानित करण्यात आले. वर्ष 2022-23 मधील त्यांच्या एकूण कामगिरीच्या आधारावर त्यांना क्रमवारी देण्यात आली. प्रमुख बंदरांमध्ये निष्पक्ष आणि निरोगी स्पर्धा निर्माण करणे आणि येत्या वर्षात त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्याची कल्पना या पुरस्कारा मागची आहे. यामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या दोन बंदरांनीही उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले.


            मुंबई बंदर प्राधिकरणाने वर्ष 2022-23 च्या एकूण कार्यप्रदर्शनात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी हा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल यांच्या हस्ते स्वीकारला. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला वर्ष 2022-23 च्या टर्न-अराउंड-टाइम (नॉन-कंटेनर पोर्ट) मध्ये परफॉर्मन्स शील्ड मिळाली. तसेच वर्ष 2022-23 च्या एकूण वार्षिक कामगिरीनूसार 6 क्रमांक प्राप्त झाला. यासाठी ट्राफी प्रदान करून आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी, आणि उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यावतीने नितीन बोरवणकर, मुख्य व्यवस्थापक एमईसीएचएल इलेक्ट्रीकल इंजीनियर एण्ड सीईओ एसईझेड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका,

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका,

शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

 

            लातूरदि. 10 (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाघडीपत्रिका आणि मनरेगा योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळावरील कक्षात करण्यात आले.

            लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजनमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलवन मंत्री सुधीर मुनगंटीवारबंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यावेळी उपस्थित होते.

            राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाची माहिती देणारी भित्तीपत्रिकाघडीपत्रिका लातूर जिल्हा परिषदेने तयार केली असून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. तसेच मनरेगा योजनेवर आधारित रवींद्र इंगोले लिखित माझा गाव माझी जबाबदारीमी समृद्ध तर गाव समृद्ध’ या माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

*****

औसा येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श लोकप्रतिनिधींनी घ्यावा

 औसा येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श लोकप्रतिनिधींनी घ्यावा.




- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


• आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 25 जोडप्यांचा सामुदायिक विवाह


• आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून आयोजन


            लातूर, दि. 10, (जिमाका) : आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून एक आदर्श विवाह सोहळा आज औसा येथे होत आहे. आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 25 जोडप्यांचा विवाह अत्यंत भव्यदिव्य करून आदर्श निर्माण केला आहे. इतर लोकप्रतिनिधींनी आ. पवार यांचा आदर्श घेतल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विवाह सोहळे दिमाखात होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आमदार अभिमन्यू पवार आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे कौतुक करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.


            आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशनने औसा येथील उटगे मैदानावर आयोजित केलेल्या औसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, कष्टकरी व आर्थिक दुर्बल कुटुंबातील 25 जोडप्यांच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. आ. अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अ‍ॅड. परिक्षीत व डॉ. उदय मोहिते पाटील यांची कन्या डॉ. चैताली यांचा विवाह याच सामुदायिक विवाह सोहळ्यात पार पडला.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खनिकर्म व बंदरे विभागाचे मंत्री दादा भुसे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री, लोकसभा सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य, गहिनीनाथ महाराज औसेकर यावेळी उपस्थित होते.


            आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न दिमाखात व्हावे, हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, कष्टकरी कुटुंबातील 25 जोडप्यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा घडवून आणून हे स्वप्न साकार केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.


            आपल्या मुलाला जे कपडे तेच कपडे सामुदायिक विवाह सोहळ्यातील 25 वरांना, यासह सर्व गोष्टी सारख्या करून आमदार अभिमन्यू पवार यांनी अत्यंत चांगला पायंडा पाडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपले कुटुंब समजून आ. पवार यांनी 25 मुलींचे कन्यादान केले. आहेर केले, संसार उपयोगी वस्तू दिल्या. आपल्या आनंदात इतरांचा आनंद बघणारे आ. पवार म्हणूनच वेगळे आहेत. हा लग्नसोहळा अत्यंत सुनियोजित, दिमाखदार होत असून हा या 25 कुटुंबांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा क्षण असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.


            विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावेळी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्ह्याच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. आमदार अभिमन्यू पवार यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामागील संकल्पना सांगताना, हा सर्व विवाह सोहळा घडवून आणण्यात कार्यकर्ते, स्नेही यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.


****

*


गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!*

 *गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!* 


                   उन्हाळा आला की ‘अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. थोडक्यात काय, तर थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद!

                  गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या प्रेमात जसा गोडवा असतो, तसाच गोडवा गुलाब पाकळ्यांपासून बनलेल्या गुलकंदातही असतो.


 *१. थंडावा मिळण्यासाठी उत्तम पर्याय* 

                     शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी गुलकंदात असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाणं कधीही चांगलंच ठरतं. कमी करण्याची क्षमता असणारे गुलकंद, थकवा, अंगदुखी, खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरते. याशिवाय अतिउष्णतेमुळे स्ट्रोकचा धोका संभवतो. अशावेळी गुलकंद सुद्धा कांद्याइतकंच गुणकारी ठरतं. चवीला उत्तम असल्याने, कांद्याचा पर्याय म्हणून गुलकंदाचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.


 *२. बद्धकोष्ठतेवर गुणकारी* 

                      हालचाल कमी झालेल्या हल्लीच्या जीवनात बद्धकोष्ठ हा सामान्य आजार होऊ लागला आहे. त्यातच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे, ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडणे सुद्धा बंद झालंय. अशावेळी, गुलकंद खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोटातून बाहेर पडत असलेलं मल, फार घट्ट राहू नये यासाठी गुलकंद उपयोगी आहे. मल योग्य प्रमाणात नरम होण्यास आणि मलविसर्जन चांगल्यारितीने होण्यास गुलकंदाचे सेवन उपयोगी ठरते.


 *३. अल्सरवर गुणकारी* 

                    शरीरातील अति उष्णतेचा परिणाम म्हणून तोंडाचा अल्सर होणं, हा त्रास सुद्धा अनेकांना होतो. उष्णतेवर रामबाण उपाय ठरणारा गुलकंद तोंडाच्या असल्सवर सुद्धा गुणकारी ठरतो. तसेच गुलकंद आम्लपित्त नियंत्रणासाठी सुद्धा उपयुक्त आहे. दोन जेवणांच्या मधल्या वेळात अर्धा चमचा गुलकंदाचे सेवन आम्ल्पित्ताचे नियंत्रण करते असा उल्लेख आयुर्वेदातही केला आढळतो.


 *४. मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी करते* 

                   मासिक पाळीदरम्यानचा रक्तस्राव कमी करण्यासाठी गुलकंद खाणे फायदेशीर आहे. स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या स्नायूंवरीला तणाव कमी करण्यास गुलकंद मदत करते, हे वैद्यकीय शास्त्रानुसार सिद्ध करण्यात आले आहे.


 *५ . जळजळ कमी होणे* 

                   अति उष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ नियंत्रणात आणण्यासाठी गुलकंदाचे सेवन मदत करते. म्हणजेच त्वचा तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी गुलकंद खाणे उत्तम!


 *६. शांत झोप लागण्यासाठी* 

                    चांगली झोप लागायला हवी असेल, तर रात्रीच्या वेळी गुलकंद घातलेलं दूध पिणं कधीही चांगलं. दूध आणि गुलकंद हे दोन्ही पदार्थ उष्णतेवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळेच दिवसभराचा थकवा, ताणतणाव दूर ठेवण्यासाठी हे पेय उपयोगी आहे. मनाला आणि शरीराला मिळालेल्या या शांततेमुळे, रात्री उत्तम झोप लागणं शक्य होतं.


 *Nutritionist & Dietitian* 

 *Naturopathist* 

 *Dr. Amit Bhorkar* 



 🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

Featured post

Lakshvedhi