स्वतःच अस्तित्व निर्माण करातांना अडचणी खुप येतात...
.
पण एकदा का अस्तित्व निर्माण झालं
तर स्वरुप मात्र पहाण्यासारखं असतं!☺☝
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
*'वन मिनिट प्रिंसिपल'*
*दहा दिवस हा प्रयोग सगळयांनी मिळून करायचा आहे.* एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण मन वळत नाही असं वाटतंय. *अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा.* या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त इतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग.
*1. रोज एका पुस्तकाचं एकच पान.*
*2. रोज एकच सुर्यनमस्कार.*
*3. रोज एक योगासन.*
*4. रोज पाच मिनिट मेडिटेशन.*
*5. रोज दोन स्पेलिंग पाठ करणे.*
*6. रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे.*
असंच.. कितीही ... काहीही..
*या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय.*
*21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा.*
काय आहे वन मिनिट प्रिसिंपल?
*Kaizen*
जपान मध्ये kaizen चा शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. *Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा.*
(Change +Wisdom).
*आयुष्याला आकार देणा-या या जादूच्या तंत्राचा उपयोग करून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो. वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व युक्त्यांपेक्षा अतिशय सोपी युक्ती म्हणजे, *‘वन मिनिट प्रिन्सिपल* ’
Masaaki Imai यांनी 'वन मिनिट प्रिन्सिपल’ चा शोध लावला आणि आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरे गाठणारा देश ठरला आहे. आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य ठेवण्यात कमी पडतो. त्यामुळे अपराधी भाव येतो तो वाढत वाढत आत्मग्लानीचं रूप घेतो, आपण काही करू शकत नाही आपल्यात जिद्द नाही, आपण एखादे काम करण्यास लायक नाही अशी नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते. अशा वेळी एखाद्या जादूसारखी ती टेक्निक काम करते. मला एका मिनिटात वेळेचे नियोजन शिकवा म्हटले तर मी हा नियम शिकवेन. काय आहे सूत्र? *तर सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहाणपणाने करायला हवा, सातत्य आणि सराव यासाठी नियमित योजना असते. आत्मविश्वास देणारा हा नियम म्हणजे 60 सेकंद दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा.* आपल्याला हसू येईल, विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो. काय आहे नियम तर...
**Every day*
*At the same time*
*Just for a minute**
*दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे हे यशाचे सूत्र आपण जाणतो.* पण त्यासाठी एकदम दोन तास, एक तास अशा तासांच्या भाषेत हट्टीपणा करतो आणि मन बंड पुकारते कधीकधी परिस्थितीची साथ नसते. अशा वेळी एक मिनिट फक्त एक मिनिट करायचे आहे हे ठरवताच हसत हसत आपण तयार होतो. मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो. आता कामाला कृतीला सुरुवात करायची. *एक मिनिट काम करायचे आणि अक्षरश: बाजूला ठेवून द्यायचे. दुस-या दिवशी परत तेच. गंजलेल्या चाकाला रोज एकदा फिरवायचे, बंद पडलेल्या गाडीला रोज एकदा फक्त सुरु करायची, रोज एक पान वाचायचे, रोज पाच ओळी लिहायच्या, रोज एक श्लोक वाचायचा, रोज एक काहीही छोटेसे..*
जमेल? सोप्पय हो नक्कीच!
एकदा मोमेंटम गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईल. हा प्रयोग करून तर पहा, अनुभव घ्या. मी तेच करत आहे, वेळेच्या नियोजनावर रोज थोडसं वाचायचं आणि थोडंसं लिहायचं... हाच माझा नियम.
*अतिशय महत्वपुर्ण पोस्ट आहे .. आयुष्य बदलुन जाईल .... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻*
[07/08, 10:00] Baby: . 💞 🍻
. *प्रेम* *दारू*
१) वेड लावते. मुड फ्रेश करते.
२) झोप येत नाही. प्यायल्यानंतर
मस्त झोप येते.
३) एका डेटचा एका क्वार्टरचा
खर्च ₹२०००. खर्च ₹२००.
४) सगळ्यांचे पिऊन सगळ्यांना
ऐकावे लागते. ऐकवायचे असते.
_निर्णय सर्वस्वी आपल्या हातात आहे_
दूध प्यायल्याने ताकद येते...?
मग ५ ग्लास दूध प्या अन्
भिंत हलवण्याचा प्रयत्न करा,
नाही हालत ना
.
.
.
.
.
आता ५ ग्लास दारू प्या,
अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल.
*-शुभेच्छुक-*
*गटारीमित्र मंडळ*
[07/08, 10:00] Baby: मास्तर : ढग काळे का असतात सांग बघू.
गोप्या : दिवसभर उनात बोंबलत फिरत बसल्याव दुसरं काय हुनार?
😁
[07/08, 10:00] Baby: भूगोलाच्या प्राध्यापकाला जुनी मैत्रीण दिसल्यावर तो कसे वर्णन करतो बघा ..... 😀👇
ती आज दिसली बाजारात
अगदी आजही तशीच....
चंद्रासारखी!
फरक इतकाच ..
सोबत २ उपग्रह
आणि
१ बिथरलेला धूमकेतू होता!!
🤣🤣🤣
सामाजिक दायित्व के अंतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक एवं बुनियादी
सुविधाओं के विकास में योगदान दें
उद्योजक, शिक्षाक्षेत्र की संस्थाएं एवं विशेषज्ञों से की मुख्यमंत्री ने अपील
मुंबई, दि. 6 : चांदा से बांदा तक समान शैक्षणिक गुणवत्तापूर्ण विकास के लिए सामाजिक दायित्व के अंतर्गत राज्य के उद्योजक, कंपनियां, शिक्षा क्षेत्र में काम करनेवाली संस्थाएं और शिक्षा क्षेत्र के विशेषज्ञ सहभागी होकर शैक्षणिक एवं बुनियादी सुविधाओं के विकास में योगदान दें, यह आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज यहां पर किया।
शालेय शिक्षा विभाग की ओर से शासकीय शाला भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर मॉडेल स्कुल” उपक्रम के अंतर्गत आदर्श शाला के रूप में विकसित की जा रही है। इसके लिए राजर्षि छत्रपति शाहु महाराज शालेय शिक्षा परिवर्तन निधि के अंतर्गत सामाजिक दायित्व से सहभाग मिलने के लिए विभाग प्रयास कर रहा है। इसी प्रयास के एक भाग के रूप में आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से राज्य के उद्योजक, शिक्षा क्षेत्र में काम करनेवाली संस्थाओं के प्रतिनिधि और इस क्षेत्र के विशेषज्ञों से संवाद साधा, इस दौरान वे बोल रहे थे।
रोटी कपड़ा मकान के साथ शिक्षा भी जरूरी
मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने आगे कहा कि आज रोटी, कपड़ा, मकान इन बुनियादी जरूरतों के साथ अब शिक्षा भी अत्यावश्यक है। जिसे उत्तम शिक्षा मिलती है, वह खुद की क्षमताओं पर रोटी, कपड़ा और मकान भी प्राप्त कर सकता है। इसलिए गुणवत्तापूर्ण शिक्षा मिलना जरूरी है। इसमें शैक्षणिक गुणवत्ता वृद्धि के सभी प्रकार के यानि प्रशिक्षण और साहित्य निर्माण, ग्रंथालये, ई-पाठ्यक्रम का निर्माण, व्हरच्युअल क्लासरुम का निर्माण, शालाओं का संगणकीकरण, प्रशिक्षित विशेषज्ञों का मार्गदर्शन जैसे कार्यक्रम के साथ-साथ बुनियादी सुविधाओं के निर्माण में यह सामाजिक दायित्व से निवेश किया जा सकता है। किसी भी क्षेत्र में वे काम करने की इच्छा रख सकते है और इसका चयन वे पूरी तरह से अपनी पसंद के अनुसार कर सकते है। सरकार के सभी शालाओं से सभी को समान गुणवत्तापूर्ण शिक्षा मिलनी चाहिए, यह अपेक्षा व्यक्त करते हुये उन्होंने इसके लिए सभी सहयोग अपेक्षित होने की बात कहीं।
सभी तक आनंदमय शिक्षा पहुंचाना संभव
मुख्यमंत्री ने छात्रों की बैग का बोझ कम करने के प्रयासों से वर्ष २०१४ में मुंबई महापालिका के स्कूलों में कक्षा ८ वीं से १० तक का पाठ्यक्रम एस.डी. कार्ड के माध्यम से छात्रों को उपलब्ध कराया और इसके लिए उद्योजकों के सामाजिक दायित्व निधि की बड़ी मदद होने की बात भी उन्होंने इस दौरान कहीं।
इस दौरान उन्होंने सैटलाईट का फुटप्रिंट बहुत बड़ा होने की बात कहते हुये इसके द्वारा हम दूर-दराज क्षेत्र में भी सहजता से पहुंच सकते है, यह बात इस दौरान स्पष्ट की। कोरोना के दिनों में इसका महत्व अधिक प्रकर्ष से होने की बात कहते हुये उन्होंने स्कूलों का संगणकीकरण, र्व्हच्युअल क्लासरुम का निर्माण भी इसमें सहभागी हो, साथ ही यह करते समय ॲनिमेशन के माध्यम से हम अधिक आनंददायी एवं सुलभ शिक्षा की व्यवस्था कर सकते है।
“ज्योतसे ज्योत जलाते चलो”
शिक्षा क्षेत्र के गुणवत्तापूर्ण विकास में हम सभी साथ मिलकर काम करेंगे और ज्ञान की ज्योत जलाकर यह ज्ञानगंगा इसी तरह प्रवाहित रखेंगे, यह कहते हुये मुख्यमंत्री ने सहयोग की इस ज्योत को मशाल का रुप देने के लिए एक साथ आकर आने और ज्ञान के प्रकाश से छात्रों का जीवन प्रकाशमय करने की आशा भी इस दौरान व्यक्त की। मुख्यमंत्री ने शिक्षित और सुशिक्षित शब्दों के बीच के फर्क को बताते हुये कहा कि शिक्षा के साथ-साथ संस्कारित होना भी अधिक महत्वपूर्ण है। मुख्यमंत्री ने कहा कि महाराष्ट्र के छात्र विश्वभर में कहीं पर गए तो उनका शैक्षणिक गुणवत्ता के दम पर शानदार स्वागत होना चाहिए, ऐसे महाराष्ट्र के निर्माण के लिए हम सभी एक साथ मिलकर प्रयास करें, इसके लिए सहयोग करें।
सभी के सहयोग से आदर्श शाला – प्रा.वर्षा गायकवाड
राज्य के स्कूलों का स्तर ऊंचा करने के लिए सामाजिक दायित्व निधि के अंतर्गत सभी के सहयोग की आवश्यकता है और आदर्श शाला के निर्माण के लिए सभी ने सहयोग करने की अपील शालेय शिक्षा मंत्री प्रा. वर्षा गायकवाड ने की। इसके लिए उन्होंने पहले चरण में ४७१ शालाओं का चयन किए जाने और हर साल ५०० शालाओं का चयन किए जाने की जानकारी दी और कहा कि इसके लिए एक वेबपोर्टल तैयार किया जा रहा है।
श्रीमती गायकवाड ने कोरोना के दिनों में स्कूल बंद लेकिन शिक्षा शुरू इस अभियान में किए हुये विशेषनीय प्रयासों की जानकारी उपस्थितों को दी। शिक्षा क्षेत्र का निवेश यह जीवनभर के लिए उपयोगी साबित होता है। शिक्षा में निवेश यानि देश के निर्माण में निवेश होता है। जिससे देश का आधारस्तंभ रहें छात्रों के उज्ज्वल भविष्य के लिए सभी ने एक साथ आकर काम करने की आशा इस दौरान व्यक्त की।
0000
Contribute for the development of quality educational and infrastructure facilities under social responsibility
Chief Minister Uddhav Thackeray appeals to entrepreneurs, educational institutions and experts
Mumbai, August 6 :Chief Minister of the state minister Uddhav Thackeray today appealed to the entrepreneurs, corporate world, organizations and experts working in the field of education to participate in the social responsibility for the development of equal quality education at all levels and contribute for the development of educational and infrastructural facilities.
The school education department has started the venture of developing government schools as Dr Babasaheb Ambedkar Model Schools. Efforts are on to fetch funds as a part of social responsibility under the Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shaleya Shikshan Parivartan Nidhi. As a part of this, the chief minister today interacted through video conferencing with the Industrialists, institutions and representatives of educational field and experts from this field. He was speaking on this occasion.
Education along with food, clothing and shelter
Speaking further he said that today along with the basic needs like food, clothing and shelter, education has also become an essential part of life. He said that those who get quality education can get food, clothing and shelter utilizing their own capabilities and hence imparting quality education is the need of the hour.
He further said that in order to enhance the educational quality at all levels, investment through social responsibility will be encouraged in all fields including training and creation of literature, libraries, creation of Curriculum, creating virtual classrooms, computerization of schools, guidance from trained experts and all infrastructural facilities. He said that they can decide on their own to choose the field in which they want to work, as per their interest. He also said that all should get equal quality education from the government schools and for this, co-operation from all is needed.
Taking pleasant education to all is possible
The chief minister further said that for bringing down the weight of school bags, the Mumbai Municipal Corporation started making available the curriculum through SD cards in the year 2014 recalling that the funds under the corporate social responsibility (CSR) by the industrialists had helped a lot in this crusade. Mr Thackeray also said that the footprints of satellites are very vast and we can reach the remote areas with ease. He also said that in the Corona pandemic, the importance of this system was most needed and asked the corporate world to participate in computerization of schools and creation of virtual classrooms. The chief minister said that with the use of animation can make the education more pleasant and easy for the students.
‘Jyot se jyot jalate chalo’
The chief minister further said that in order to enhance the quality of educational field and further develop it, we will work hand- in -hand and burn the candles of knowledge and keep th
सामाजिक दायित्वाअंतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे
मुख्यमंत्र्यांचे उद्योजक, शिक्षणक्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञांना आवाहन
मुंबई, दि. 6 : चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
शालेय शिक्षण विभागातर्फे शासकीय शाळा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॉडेल स्कुल” उपक्रमांतर्गत आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत. यासाठी राजर्षि छत्रपती शाहु महाराज शालेय शिक्षण परिवर्तन निधीअंतर्गत सामाजिक दायित्वातून सहभाग मिळवण्यासाठी विभाग प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, आयुक्त विशाल सोलंकी, एसपीडी राहुल द्विवेदी यांच्यासह रोटरी क्लबचे राजेंद्र अग्रवाल, शांतीलाल मुथा फाउंडेशनचे शांतीलाल मुथा, एम्पथी फाउंडेशनचे सुंदर ओरवाल,एडलवाईज एजुकेशनच्या श्रीमती विद्या शाह, ॲमॅझॉनच्या श्रीमती अनिता कुमार, सिस्कोच्या श्रीमती रोहीनी कामत, बजाज ग्रुपच्या श्रीमती लिना राजन यांच्यासह सुमारे चाळीस संस्थांचे प्रतिनीधी सहभागी झाले होते.
रोटी कपडा मकानाबरोबर शिक्षणही
मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले, आज रोटी कपडा मकान या मुलभूत गरजांबरोबर शिक्षणही अत्यावश्यक झाले आहे. ज्याला उत्तम शिक्षण मिळते तो स्वत:च्या क्षमतांवर रोटी, कपडा आणि मकानही मिळवू शकतो. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे. यामध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या सर्व प्रकारच्या म्हणजे प्रशिक्षण आणि साहित्य निर्मिती,ग्रंथालये, ई-अभ्यासक्रमाची निर्मिती, व्हरच्युअल क्लासरुमची निर्मिती, शाळांचे संगणकीकरण, प्रशिक्षित तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासारख्या कार्यक्रमाबरोबर पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये ही सामाजिक दायित्वातून गुंतवणूक करता येणार आहे. कोणत्या क्षेत्रात ते काम करू इच्छितात याची निवड ते पूर्णपणे आपल्या आवडीनुसार करू शकतात. शासनाच्या सर्व शाळांमधून सर्वांना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ही अपेक्षाही व्यक्त करतांना त्यांनी यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे म्हटले.
सर्वांपर्यंत आनंददायी शिक्षण पोहोचवणे शक्य
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या प्रयत्नातून २०१४ मध्ये मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ८ वी ते १० वीचा अभ्यासक्रम एस.डी. कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याची व यासाठी उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीची मोठी मदत झाल्याची आठवण यावेळी सांगितली. यावेळी त्यांनी सॅटलाईटचा फुटप्रिंट खुप मोठा असून त्याद्वारे आपण दुर्गम भागात देखील सहजतेने पोहोचू शकतो हे स्पष्ट केले. कोरोना काळात याचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवल्याचे सांगतांना त्यांनी शाळांचे संगणकीकरण, र्व्हच्युअल क्लासरुमची निर्मिती यामध्ये सहभागी व्हावे असे म्हटले तसेच असे करतांना ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण अधिक आनंददायी आणि सुलभरित्या शिक्षणाची व्यवस्था करू शकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“ज्योतसे ज्योत जलाते चलो”
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण विकासात आपण सर्वजण हातात हात घालून काम करू आणि ज्ञानाची ज्योत पेटवत ही ज्ञानगंगा अशीच प्रवाहित ठेऊ असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी सहकार्याच्या या ज्योतीला मशालीचे रुप देण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, ज्ञानाच्या प्रकाशातून विद्यार्थ्यांच्या जीवनाची वाट उजळून टाकूया अशी अपेक्षाही व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी शिक्षित आणि सुशिक्षित शब्दांमधील फरक सांगतांना शिक्षणाबरोबर संस्कारित असणे अधिक महत्वाचे असल्याचेही स्पष्ट केले. महाराष्ट्रातील विद्यार्थी जगभरात कुठेही गेले तरी त्यांचे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरोवर जोरदार स्वागत झाले पाहिजे. असा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करू या, त्यासाठी सहकार्य करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सर्वांच्या सहकार्याने आदर्श शाळा - प्रा.वर्षा गायकवाड
राज्यातील शाळांच्या दर्जा उंचाविण्यासाठी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून आदर्श शाळा निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. त्यांनी यासाठी पहिल्या टप्प्यात ४७१ शाळा निवडण्यात आल्या असून दरवर्षी ५०० शाळांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासाठी एक वेबपोर्टल तयार करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या. श्रीमती गायकवाड यांनी कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमात केलेल्या वैविध्यपूर्ण प्रयत्नांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही जीवनभरासाठी उपयुक्त ठरते. शिक्षणातील गुंतवणूक ही देशाच्या उभारणीतील गुंतवणूक असते. त्यामुळे देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
टप्प्या-टप्प्याने सर्व शाळा आदर्श शाळा बनविणार - वंदना कृष्णा
शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी उद्योजकांनी सामाजिक दायित्व अंतर्गत मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करुन राज्यातील सर्व शासकीय शाळांना टप्प्या-टप्प्याने आदर्श शाळा बनविण्याचे नियोजन असल्याचे विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी यावेळी सांगितले. २०२५ पर्यंत राज्यातील ५००० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आयुक्त श्री. सोलंकी यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शालेय शिक्षण परिवर्तन निधीची माहिती सर्वांना दिली. सामाजिक दायित्वाअंतर्गत शाळांच्या गुणवत्तापूर्ण विकासाच्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उद्योजक, संस्था आणि तज्ज्ञांच्या माहितीसाठी विभागाने विविध क्षेत्रांची निश्चिती केली असून त्यामध्ये आवडीच्या क्षेत्राची निश्चिती करून ते सहभागी होऊ शकतात. हे ही त्यांनी स्पष्ट केले तसेच यासाठी समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या उद्योजक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि तज्ज्ञांनी उर्त्स्फुत सहभाग नोंदवत शासनासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. तसेच, ते कोणकोणत्या क्षेत्रात काम करू इच्छितात याविषयीच्या त्यांच्या अपेक्षाही त्यांनी सांगितल्या.
यावेळी स्वदेश फाउंडेशन, स्टरलाईट. जे एस डब्ल्यु, टाटा ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, संपर्क फाउंडेशन,आर पी जी, रोटरीक्लब , एसबीआय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयआयसीआय बॅंक, एम ॲण्ड एम, फोर्ब्स मार्शल, बीपीसीएल, एमपॅथी फाउंडेशन, एडलवाईज, फीक्की आदी चाळीस संस्थांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
0000
अर्चना शंभरकर /वि.सं.अ. / दि. 6/8/2021
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी
तातडीने 6 कोटी निधीस मान्यता
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई, दि. 6 : कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली –कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणी करण्यासाठी तातडीने 6 कोटी रुपये देण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. हा पुल कोसळ्यामुळे कनेडी परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे तातडीने या पुलाची पुनर्बांधणी सुरू करण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी दिले आहेत.
21-22 जुलै 2021 च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात अनेक रस्ते बंद झाले होते. त्यातच कनेडी (सांगवे) -कणकवली दरम्यानच्या नाटळ मल्हारी नदीवरील सुमारे 57 वर्षापूर्वी बांधलेला मल्हार पुलाचा काही भाग कोसळला होता. यामुळे नाटळ, दिगवळे, नरवडे यासह दहा गावांचा संपर्क तुटला. या पुलाची पुनर्बांधणी करण्याची मागणी माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री. श्री. चव्हाण यांनी विभागास दिले होते. त्यानुसार, विभागाने सहा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंत्री महोदयांकडे पाठविला होता.
कनेडी परिसरातील गावांचा कणकवलीशी संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी या पुलाची पुनर्बांधणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून लगेचच मंजूर केला. यामुळे कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे)- कुपवडे-कडावलनारुर-वाडोस-शिवापू
००००
बालगृहातील 209 विद्यार्थ्यांचे 12 वीच्या परीक्षेत यश;
प्रतिकूल परिस्थितीवरही जिद्दीच्या जोरावर मात करता येते
- महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
मुंबई, दि. 6 : राज्यातील बालगृहातील 209 विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता 12 वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर मात करता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या बालकांचे कौतुक केले आहे.
राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना (चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते.
अनाथ, निराधार बालके, एक पालक असलेली, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त / बाधित बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले आणि प्रमाणित केलेले, शाळेत न जाणारे बाल कामगार आदींना बालगृहात ठेवले जाते. या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.
यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असे नाही तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येते हे या निमित्ताने बालगृहांमधील बालकांनी दाखवून दिले आहे. या विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची वृत्ती, हुशारी जोखण्याचे काम महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केले असून त्यांना अभ्यासाला प्रोत्साहित केले आणि या मुलांनी अविरत मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासाला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या 290 पैकी पुण्यातील बालगृहाच्या मुलीने एकूण 90.66 टक्के गुण मिळवत बालगृहातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
राज्यात पुणे विभागांतर्गत पुणे जिल्ह्यातील बालगृहातील सर्वाधिक 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दुसऱ्या क्रमांकावर मुंबई असून येथील 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवले आहेत. 80 ते 90 टक्के गुण मिळवलेले 34 विद्यार्थी आहेत. 70 ते 80 टक्के गुण मिळालेले 86 विद्यार्थी, 60 ते 70 टक्के गुण मिळालेले 69 विद्यार्थी तर 60 टक्क्याहून कमी गुण मिळवत उत्तीर्ण झालेले 18 विद्यार्थी आहेत.
या सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींचे मंत्री ॲड. ठाकूर, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन तसेच आयुक्त राहूल मोरे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी तसेच पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकासासाठी शासनाकडून शक्य ती मदत पुरवण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.
0000