Sunday, 19 January 2025

प्रधानमंत्री स्वामित्व योजनेतून ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणास चालना

 प्रधानमंत्री स्वामित्व योजनेतून ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणास चालना

                                                                        - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या पथदर्शी प्रकल्पात महाराष्ट्राचा समावेश होतापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “सबका साथसबका विकाससबका विश्वास” असा दृष्टिकोन आहेग्रामीण भागाचा विकास हा देशाच्या प्रगतीचा आधार आहेही जाणीव ठेवूनच स्वामित्व योजना आखण्यात आली आहेराज्यातील  सुमारे 60 लाख हून अधिक कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होईल.  ही योजना केवळ  शासकीय उपक्रमापुरती मर्यादित नसूनती ग्रामीण भारताच्या सामाजिकआर्थिक आणि प्रशासकीय प्रणालीत आमूलाग्र बदल घडविणारी  आहेग्रामीण भागातील जमिनीच्या मालकीबाबतची अनिश्चितता आणि वाद कमी होणार आहेतअनेकांना जमिनींचा कायदेशीर हक्क सिद्ध करणे कठीण जातेयामुळे केवळ न्यायालयीन प्रकरणे वाढतातअनेकदा विकास प्रक्रियादेखील थांबतेया समस्येचे स्वामित्व योजनेमुळे निराकरण होईलया योजनेद्वारे गावांतील जमिनींची मोजणी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मालकीच्या जमिनीचे कायदेशीर प्रमाणपत्र दिले जाते.  हे प्रमाणपत्र केवळ मालकीचा पुरावा नसूनत्यामागे आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी ठरेलअसे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

 

            स्वामित्व योजनेंतर्गत राज्यपाल श्री.राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील विनोद आत्माराम पिंपळेमाया विकास पिंपळेसदानंद वामन पिंपळेदिलीप यशवंत सपाटेप्रकाश शांताराम रावतेअलिबाग जिल्ह्यातील रोहण कृष्णा पाटेशैलेश यशवंत ठाकूरमिलिंद पांडुरंग पडतेप्रभाकर शांताराम नाईकअंकुश सिताराम धाके आणि ठाणे जिल्ह्यातील विष्णू चुरू आंबेकरयमुनाबाई रामचंद्र पाटीलमधुकर तुकाराम पाटील आणि चेतन गजानन पाटील यांना सनद वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi