*महाराष्ट्रात खाद्य संस्कृतीची आजची अवस्था*
♦️ *तांदूळ भाकरी १५ रुपयांची महाग* वाटते, आणि त्याच *तांदळाचा डोसा ५० ते १५० रुपये* असून सुध्दा महाग ही भाकरी वाटते.
♦️ *बटाटावडा २० रुपये* झाला की महागाईत वाढ झाली असे वाटते पण त्याच बटाट्याचा मॅकडोनाल्ड चा *बर्गर ९९ रुपये* असला तरी महागाई वाढलेली वाटत नाही.
♦️पारंपरिक व अत्यंत मेहेनतीची *पुरणपोळी २५-३० रुपये झाली तर* ग्राहकाची लूट चालू आहे असं वाटतं आणि त्याच *चण्याच्या पिठाचा ५० रुपये १०० ग्रॅम ढोकळा* हा योग्य दराचा वाटतो.
♦️ *भाजणी चकली, शंकरपाळी, विविध लाडू, थोडक्यात दिवाळीचे फराळ एक हजार रुपयात अख्खी दिवाळी आनंदात* आणि नाती जोडण्यात घालवू शकतो पण *दीड हजारात चौघांना पुरणार पिझ्झा,* कॅडबरी, केक हा आज सणांची शान आहे असं लोकांना वाटतं.
*थालीपीठ, आंबोळी, सोलकडी, उकडीचे मोदक, अळूवडी* असे अनेक पदार्थ आहेत जे आज बाजारात मराठी ग्राहकच पाठ फिरवत आहेत म्हणून दुर्मिळ होत चाललेत.
*म्हणूनच कधीही,कुठेही महाराष्ट्रीयन पदार्थांची आग्रहाने खरेदी करा!*
चला परंपरा जपू या, महाराष्ट्रीयन पदार्थ वाचवू या, महाराष्ट्र वाढवू या...!
No comments:
Post a Comment