*आधिक मासाविषयी*
*या वर्षी १८ जुलै ते १६ आॕगस्ट असा श्रावण महिना हा "अधिकमास" आला आहे.*
__________________
*अधिकमास म्हणजे काय? व त्याला एवढे महत्व कां?*
*सण हे चंद्रावर अवलंबून आहेत.आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत.आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे. या गणितावरुन येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे "अधिक मास" व कमी झालेला जो महिना असतो त्याला "क्षयमास" असे म्हटले जाते.*
*सूर्य एका राशीमधे असताना. जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिकमास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा*
*निजमास असतो.*
*ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास .*
*या आधिक मासात ३३ या संख्येला विशेष महत्व (प्राधान्य) आहे.*
*अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा संबंध काय?*
*तर एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात.*
*आणि एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात.*
*म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान आहे.*
*आता प्रत्येक वर्षात ११ तिथी जर कमी झाल्या. तर ११ या संख्येप्रमाणे तिन वर्षात ३३ तिथी कमी* *होतात.*
*आणि ३३ तिथी ज्या कमी होतात. त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो. आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच*
*अधिक महिना (अधिकमास, धोंडामास) म्हणतात.*
*दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त*
*३४ महिने अंतर असते.*
*आता अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत ?*
*तर अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतू देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.*
*अधिकमासाला पुरुषोत्तममास असे का म्हणतात ?*
*याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना,अथवा मलमास असेही म्हटले जाते.*
*या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाहीत. फक्त नैमित्तिक कार्येच होतात. याचे या अधिकमासाला खूप वाईट वाटले. म्हणून एकदा हताश, निराश,दु:खी*
*झालेला अधिकमास हा श्रीविष्णूंकडे गेला*
*व आपली निराशा* *सांगितली*
*श्रीविष्णूने अधिकमासाला श्रीकृष्णाकडे पाठवले.*
*श्रीकृष्णाने मात्र अधिकमासाचे स्वागत करुन त्याचे "पुरुषोत्तम मास"*
*असे नांव ठेवले. आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील. व त्या मुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल.*
*म्हणून याला अधिकमास अथवा ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नांव प्राप्त झाले.*
*अधिकमासात ‘ विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसेच अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ. उदा.*
*(अनारसे, बत्तासे, मेसूर)*
*वेदकालातही*
*"न पूयते विशीयंति" इति -अपूप ‘ असे वर्णन आहे.*
*गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ (अपूप) म्हणजे "अनरसा"*
*अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा. व ३३ अनरसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे.*
*विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरुप मानून माता,पिता त्यांना नमस्कार करतात. त्यामुळे जावई हा विष्णूसमानच असतो.*
*म्हणून विष्णूरुपी जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे.*
*किती महिने अधिक येतात?*
*सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात.*
*चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे ९ महिने अधिक येतात.*
*मार्गशीर्ष व पौष हे २ महिने क्षयमास होतात.*
*राहिला उर्वरीत माघ महिना. हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.*
*आता क्षयमास म्हणजे काय?*
*(कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो. तो क्षयमास असतो.*
*आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात.)*
__________________
*संदर्भ– श्री दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक.*
No comments:
Post a Comment