Friday, 31 March 2023

मोड आलेली कडधान्ये व वातरक्तविकार*

 *मोड आलेली कडधान्ये व वातरक्तविकार


अनेक आहार, जिम तज्ञा कडून *मोड आलेले कडधान्य* खाण्याचा सल्ला दिला जातो ,त्यामुळे प्रोटिन्स मिळतात ,

पण आपण एवढे *हेवी वर्क आउट किंवा व्यायाम* करत आहोत का *एवढे प्रोटिन्स* खायला, दुसरे म्हणजे कडधान्याला मोड आणून आपण त्यामधील अम्ल गुण वाढवतो व ते *पित्तवर्धक व रक्त दुष्टी* करणारे बनवतो ,अगोदरच कडधान्य हे *वातूळ* गुणाचे असतात त्यात मोड आणल्यामुळे ते *वातरक्त दुष्टीकर* होतात व *गाऊट* सारखे *सांध्यांचे आजार* निर्माण करतात व *पचायला जड* असल्यामुळे *गॅसेस, पोट साफ ना होणे, पोट गच्च होणे, ऍसिडिटी* निर्माण करणे असे अनेक *पचनाचे आजार* सुद्धा निर्माण करतात ,


*डाळी पचाव्यात यासाठी किती त्याच्यावर संस्कार करावे लागतात बघा*  


डाळ शिजायला सगळ्यात जास्त वेळ लागतो आपण कुकर वापरून तिला लवकर शिजवतो पण त्यामुळे तिच्यावरचा अग्नि संस्कार अर्धवट होतो व तिच्यामुळे शरीरात निर्माण होणारा टिकावू पणा सुद्धा कमी होतो . त्यामुळे *डाळी पातेल्यातच शिजवाव्यात* 


डाळ शिजवताना तिचा *वातूळ* पणा कमी व्हावा म्हणून तिच्यामध्ये *आंबट (चिंच ,आमसूल )* हे टाकलेच जाते . (आंबट म्हणजे टोमॅटो नव्हे, ते पुन्हा *पित्त वर्धक व रक्त दुष्टीकर* आहे ,जिथे जिथे टोमॅटो वापरता तिथे तिथे *आमसूल* वापरावे ) 


आपल्याला हे माहीत नाही कि हे सगळे कश्यासाठी ?? , 

अनेकांना वाटते ते चव येण्यासाठी असेल पण याला शास्त्रीय महत्व आहे, सर्व *डाळी* या *वातूळ ,रुक्ष ( कोरड्या आहेत ), अगदी मूग सुद्धा* त्या डाळी खाल्यामुळे *शरीरातील वात वाढू* नये म्हणून त्यावर *अम्ल संस्कार* केला जातो अम्ल हा रस वातशामक आहे त्यामुळे ती डाळ काहीशी वात शामक होते, त्याच बरोबर डाळ तयार झाल्यावर त्यावर *तूप व लिंबू* टाकले जाते, डाळ कोरडी तर तूप स्निग्ध व पुन्हा लिंबाचा अम्ल संस्कार *वातूळ कमी* होऊन चांगली पचण्यासाठी


डाळींमधील *वात वृद्धीकर गुण कमी करण्यासाठी* शास्त्र कारांनी काय काय योजना केली होती याचे उत्तम उदाहरण म्हणजे *पुरण पोळी* 


आता *पुरण पोळीची* रेसिपी पाहुयात 

◼️प्रथम चांगली पातेल्यात शिजवली जाते *उष्णतेचा संस्कार* डाळीतील वाताचा शीत ( थंड ) गुण कमी करण्यासाठी  

◼️डाळ शिजून झाली कि तिला गुळा बरोबर पाट्यावर वाटतात येथे दोन गोष्टी होतात गुळ हा त्याच्या स्निग्ध (तैलकट ) व उष्ण गुणामुळे वात कमी करतो व दगडावर *घर्षणाने उष्णता निर्माण* होऊन पुन्हा वाताच्या शीत गुणा विरुद्ध उष्ण गुण निर्मिती 

◼️गहू *स्निग्ध* गुणाचा त्याबरोबर लाटताना तैल स्निग्ध व उष्ण गुणाचे 

◼️पोळी तयार झाल्यावर *भाजणे* ,उष्ण गुण वृद्धी 

◼️भाजताना *तैल ( स्निग्ध व उष्ण ) किंवा तुप* ( स्निग्ध ) गुण 

◼️पुरण पोळी तयार झाल्यावर *गुळवणी* ( गुळ गरम पाण्यात उकळून घेणे ) स्निग्ध व उष्ण गूण 

◼️गुळवणी व पोळी एकत्र केल्यावर त्यावर *पुन्हा तुप* स्निग्ध गुणाचे 

◼️त्याबरोबर *कटाची* म्हणजे मसाले अधिक असलेली पाचक व उष्ण मसाले युक्त आमटी व त्यामध्ये अम्ल गुणाचे *आमसूल किंवा चिंच* उष्ण व अम्ल गुणाने परत *वात शमन* 

◼️त्या आमटीवर *लिंबू पिळणे* अम्ल गुण वातशामक 

◼️तैलात तळलेले पदार्थ जसे *कुरडई ,पापडी* ( स्निग्ध गुण कमी पडू नये म्हणून )


*हरबरा डाळ पचवण्यासाठी एवढे संस्कार करावे लागतात* तर तुम्ही मोड आलेले कडधान्य कसे काय खाता ?? ,


ते पचले नाही तर शरीराला फायदा देण्याऐवजी अपायकारकच ठरतील तर चला तर चांगली *डाळ शिजवून घेऊन त्यामध्ये आमसूल तूप लिंबू टाकून* खावूयात प्रोटिन्स वाढण्यासाठी.


भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा

 *भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा, या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव.....*


जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका ताजा अहवालामुळे आपल्या जेवणाची चव कमी होऊ शकते. WHO च्या या अहवालानुसार, जगभरात जवळपास 18 लाख 90 हजार लोक मिठाच्या (Salt) अधिक सेवनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे. या अहवालानुसार, जगातील केवळ 3 टक्के लोकच मीठाचे योग्य प्रमाणात सेवन करत आहेत.


*गरजेपेक्षा अधिक मिठाचे सेवन जीवघेणे...*

या अहवालानुसार, आवश्यकतेपेक्षा अधिक मिठाचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या जगातील प्रति व्यक्ती मिठाचा वापर 10.8 ग्रॅम एवढा आहे. तर WHO ने प्रति व्यक्ती मिठाच्या वापराची कमाल मर्यादा 5 ग्रॅम एवढी निश्चित केली आहे. मात्र, आणखी एक पाऊल पुढे टाकत, 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी हे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षाही कमी करायला हवे आणि लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण आणखी कमी असावे, शी शिफारस WHO ने केली आहे.

 

*हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी केले जाऊ शकतात...*

WHO नुसार, जर मिठाचे प्रमाण कमी करता आले तर जगभरात दर वर्षी हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण बरेच कमी केले जाऊ शकेल. महत्वाचे म्हणजे, मिठाचा वापर कमी केलास, 2025 पर्यंत 22 लाख लोकांचा जीव वाचू शकतो आणि 2030 पर्यंत जवळपास 70 लाख लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. जे सध्या अधिक मिठाच्या सेवनामुळे हृदयरोगी बनत चालले आहेत, असा WHO चा अंदाज आहे. अर्थात सध्या होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण 3 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.


*भारताला मिळाले असे रेटिंग...*

या अहवालात मिठाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील पॉलिसीच्या आधारे स्कोर देण्यात आला आहे. हा स्कोर 1 ते 4 दरम्यान आहे. 1 सबसे म्हणजे सर्वात कमी आणि 4 म्हणजे सर्वाधिक स्कोर आहे. 1 मध्ये असे देश आहे, ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली आहे. 2 स्कोर वर असे देश आहेत ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात पावले तर उचलली पण ती ऐच्छिक आहेत, बंधनकारक नाहीत. याच बरोबर ज्या देशात पॅकेट बंद पदार्थांवर सोडियमचे प्रमाण सांगितले आहे. भारताचा स्कोर दोन आहे. 3 स्कोर अशा देशांचा आहे, ज्या देशांनी आवश्यक नियम बनवून अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 4 स्कोर अशा देशांचा आहे, ज्यांनी मिठाचे प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण दर्शवले, असे किमान दोन अनिवार्य पॉलिसी नियम तयार केले. 


*WHO चा इशारा...*

WHO नुसार, भारतात पाकीट बंद अन्ना वर मिठाचे प्रमाण लिहिलेले असते. मात्र, पाकिटाच्या समोरील बाजूला अधिक मिठाचा इशारा देण्याची प्रॅक्टीस अद्याप सुरू झालेली नाही. मग, पॅकेज्ड फूड मगते चिप्स असोत अथवा कुठलाही पदार्थ, त्यात प्रमाणापेक्षा अधिक मिठ टाकले जाते. मिठ एक एडिक्टिव अर्थात सवय लागणारा पदार्थ आहे. तसेच जे अन्न अधिक चटपटीत असते, त्याची सवय फार लवकर लागते. याच धारणेने बाजारात अधिक चटपटीत मसाल्यांचे चिप्स, नमकीन आणि बिस्किटांची विक्री केली जाते.


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



श्रीरामांचा मृत्यु....*🌹अटल सत्य

 *श्रीरामांचा मृत्यु....*🌹

आपल्यापैकी किती जणांना श्रीरामांच्या मृत्युची किंवा श्रीविष्णूंच्या या रामावताराच्या समाप्तीबद्दल माहित आहे? जरूर वाचा....


प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्षे रामराज्य केले. प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही.सर्व देवचिंतातुर झाले.भगवान विष्णूनां वैकुंठा त परत आणणे आवश्यक होते. सर्व देव यमराजाकडे गेले. त्याच्यावर ही कामगिरी सोपावली. परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत तो पर्यंत मी त्या नगरीत पाऊलही टाकू शकत नाही असे सांगितले. 


शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपावली. त्याने ती मान्य केली. पण त्यालाही हनुमंता ची भीती होतीच. म्हणून त्याने साधूचा वेष घेतला. बरोबर दुर्वास मुनींना घेतले. दोघेही अयोध्येत आले. 


काळ राजवाड्यात आला व त्याने रामरायाला भेटण्याची ईच्छा प्रगट केली. रामरायांची भेट झाली. प्रभूंनी त्याला ओळखले. काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली. रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्याला नेले. लक्ष्मणा ला दारात पहारा देण्यासाठी उभे केले. कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली. आज्ञा मोडणार्याला मृत्युदंड दिला जाईल असे बजावले. लक्ष्मण पहारा देत उभे राहिले.एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपवण्याची विनंती केली. *प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्युअटळ आहे या सत्याची आठवण करून दिली.* 


प्रभूंनी आपली विवषता बोलून दाखवली.. लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे, ते मला अवतार संपवू देणार नाहीत असे सांगितले. लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळाने सांगितले. ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सांगितले. तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली. प्रभूंनी त्यास होकार दिला. 


तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले. त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगीतले. लक्ष्मणा ने नकार दिला.प्रभूंची आज्ञा सांगीतली. पण दुर्वास ऐकेनात. ते अत्यंत क्रोधीष्ट झाले. आपली भेट नाकारणार्या श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणू लागले. लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले. मुनींना आत जावू द्यावे तर बंधू आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्युदंडाला सामोरे जावे लागेल. नाही जावू द्यावे तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील. शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरवले. रामरायांना विचारून येतो असे म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला. 


इकडे दुर्वास गुप्त झाले. लक्ष्मणाला पहाताच रामचंद्रांनी त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली. परंतु दुर्वास आल्यामुळे आज्ञा मोडावी लागली असे लक्ष्मणाने सांगितले. प्रभूंनी त्याला मृत्युदंड घेण्यास सांगीतले. अयोध्येच्या बाहेर तु निघून जा हाच तुला मृत्युदंड असे सांगीतले. समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजला. राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला. शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरुपात म्हणजे पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पहात बसला.


इकडे प्रभू रामचंद्रांचा काळाने निरोप घेतला. प्रभू खोलीच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली. महालाच्या दोन दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती, त्या फटीत ती अंगठी टाकली. हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली. हनुमंत आले. प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचे सांगीतले. हनुमान अंगठी काढू लागले.पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी निघेणा. मग हनुमंताने सुक्ष्मरूप घेतले व त्या फटीत गेले. पण ती फट म्हणजे एक सुरंग होता. त्या फटीतुन हनुमंत थेट पाताळात गेले.

इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणांस सहन होत नाही, म्हणून आपणही आता शरयू मध्ये जातो असे सर्वांना सांगीतले. प्रजाजन रडू लागले शोक करू लागले रस्ता आडवू लागले. प्रभू मात्र कोणाचे ऐकेणात. शेष त्यांची वाट पाहत होता.. प्रभू शरयू तीरावर आले. सर्व प्रजाही बरोबर आली. ज्या मार्गाने लक्ष्मण जी गेले त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले.


इकडे हनुमंत पाताळात पोहोचले. वासूकी ने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो असे हनुमंतांनी सांगीतले.वासूकीने त्यांना अंगठ्यांचा ढीग दाखवला व यातून प्रभूंची अंगठी शोधून घेवून जा असे सांगीतले. परंतु त्या सगळ्या अंगठ्या सारख्याच होत्या. सर्व रामरायांच्याच होत्या. त्यामुळे मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकींनी त्यांना सांगीतली.

आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत, हे ऐकून मारूतीराय मनोवेगाने शरयू तीरावर आले. सर्व प्रजाजन शोक करीत होते.


मारुतीरायांनाही अनावर असा शोक झाला. त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा शरयूतुन शेषावर पहूडलेले भगवान महाविष्णू प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले. आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत, कोणीही शोक करू नका असे सांगीतले. आपले दोन्हीही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राज्यव्यवस्था लावून दिली आहे त्यांच्या आज्ञेत सुखाने रहा असा आशिर्वाद दिला. हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागले. प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवीत्वाची आठवण करून दिली. अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्या वर दिली. सर्वांचा निरोप घेवून प्रभूंनी वैकुंठाला गमन केले.


🙏🏻 जय श्री राम 🙏🏻

आरोग्यदायि... तेल...👇*

 *आरोग्यदायि... तेल...👇*


... लाकडि घाण्यावर काढलेल्या तेलाला इतके महत्व का..? खाद्यतेलाला खुप मोठा इतिहास आहे, चीन, जपान इथे इ.सन पूर्व २००० वर्षापूर्वि खाद्यतेल वापरायला सुरवात झालि, भुईमूग, व सूर्यफूलाच्या बिया 

 भाजून- कुटून त्या उकळत्या पाण्यात टाकून पहील्या वहिल्या तेलाचि निर्मिती झाली.

    त्यानंतर, पाम, नारळ यापासूनहि तेल काढले जाउ लागले. पण जसजसा तेलाचा व्यापार वाढू लागला

 तसतशि केमिकल, घटक, वापरणे, व वेगवेगळ्या प्रकारच्या चरबिंचि भेसळ करून तेलाला 

    कमर्शिअल रूप देण्यास सुरुवात झाली.


## मुद्दाम मग हेल्दि आँईल, कोलेस्ट्रोल फ्रि आँईल, मधूमेहमूक्त आँईल आशि लेबले लावून कंपन्या

 सामान्य माणसाची दिशाभूल करतात. आधुनिक यंत्राव्दारे जेव्हा तेलनिर्मिती प्रक्रिया केलि जाते तेव्हा फाँस्पेरिक अँसिड, काँस्टिक सोडा, हायड्रोजन वापरतात, त्यामूळे तेल स्वच्छ, चमकदार , पारदर्शक दिसतं

 परंतु हिच रसायने आपल्याला घातक ठरू शकतात..

       आणि चिटिंग केले जाते, तेलाच्या रिफायनरी टँकरमद्ये कच्चे तेल आणले जाते, हे सर्व प्रकारच्या खाण्यायोग्य व अयोग्य अशा तेलबियांचे अशुद्ध तेल

 असते, त्यावर प्रक्रिया करून. हवे ते फ्लेवर्स मिसळून

     हवे ते तेल फक्त वेगवेगळ्या नावांची लेबले लावून हे 

 बनावटि तेल सुंदर पँकिंग मद्दे विकल्या जाते.


## यंत्राव्दारे तेल काढण्याची प्रक्रिया खुप वेगवान व 

 उष्णता निर्माण करणारि असते, त्यामुळे तेलाचा नैसर्गिक पोत, रंग, चव, बदलते, उष्णताव रसायने यांच्या एकत्रित परीणामामूळे हे तेल घातक, व अपायकारक ठरते..

           ## 

   # लाकडी घाण्यावरिल तेलाचे आरोग्यदायि फायदेः

  लाकडि घाण्यावर तेल काढतांना अगदि नगण्य उष्णता निर्माण होते त्यामूळे नैसर्गीक तत्वे जपलि जातात.

  त्यामुळे स्वच्छ, व पौष्टिक तेल प्राप्त होते. अश्या तेलाला स्वतःचा सुगंध, व चव, रंग असतो , हे तेल घट्ट असल्याने वापरायला कमिच लागते.

      लाकडि घाणा म्हणजे तेल काढतांना फक्त लाकडाचाच वापर करतात. त्यामुळे अतिशय कमी तपमानात हि प्रक्रिया होते.. त्यामुळेच या तेलाला

..." कोल्ड प्रेस आँईल"" असेहि म्हणतात..


##.. रोग प्रतिकारशक्ति वाढते, ओमेगा फँटि अँसिड व. Mugs, pufa,.. हे शरिरातील, कोलेस्ट्रोल नियंत्रित करतात. घाण्याचे तेल हे मसाज करण्यासाठि वापरतात, हे औषधि आहे, त्यामूळे, सांधेदुखि, संधिवात बरा होतो.

 मालिशमुळे रक्ताभिसरण चांगले होउन कांतिहि तेजस्वि, चमकदार, होते, ह्रुदयरोगाचा धोका बर्याच प्रमाणात कमि होउन आपलि हाडेहि मजबूत होतात.


 ## सर्वात शेवटि सामान्य माणूस विचार करतो ते घाण्याचे तेल खिशाला परवडेल का? पण खर तर

 आरोग्याचि किंमत फार मोठि आहे, असे , घातकि, केमिकल युक्त तेल खाण्यापेक्षा, नैसर्गीक, व शुद्ध अश्या तेलाला २ पैसे जास्त लागले तर काय हरकत आहे? 

    आणि तसेहि लाकडी घाण्याच्या तेलाच्या किमति 

 इतर तेलाच्या तूलनेत सामान्य जनतेला परवडेल अशाच आहेत.

         तेव्हा आपल्या उत्तम स्वास्थाकरता केवळ लाकडी घाण्याच्याच तेलाला प्राधान्य देउन, चांगले

 आरोग्यदायि आयुष्य जगा...

   .

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_

राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार

 राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी

दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. 30 : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


               मंत्रालयात पार पडलेल्या सामंजस्य कराराप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. 


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून 'अंगणवाडी दत्तक' धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी,अशासकीय स्वयंसेवी संस्था,ट्रस्ट इ. आणि व्यक्ती,कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. आज दालमिया फांउडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाड्या दुरूस्तीसाठी, भागीरथी फांउडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्तीसाठी, कॉरबेट फाउंडेशन पुणे येथे १६ अंगणवाड्या दुरूस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई उपनगर मधील २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृध्दी,युनायटेड वे दिल्ली पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन, जीवनंदन फाऊंडेशन यांनी पुणे येथील सहा अंगणवाड्या, मुस्कान प्रतिष्ठाणने मुंबई उपनगर येथील सात अंगणवाड्या तसेच क्षमता वृद्धीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत.


पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये सर्वोत्कृष्ठ काम केलेल्या


जिल्हा आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिका-यांचा सत्कार


               पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांची आधार सिडींगमध्ये यशस्वी नोंद घेतलेल्या भंडारा जिल्ह्याचा ९८ टक्के नोंद केल्याबद्दल प्रथम क्रमांक, पालघरमध्ये ९७ टक्के नोंद केल्याबद्दल द्वितीय क्रमांक, हिंगोली जिल्ह्याचा ९६ टक्के नोंद केल्याबद्दल तृतीय क्रमांक आहे.


            तर नागरी प्रकल्पामध्ये तुंगा मोहिली, मुंबईमध्ये ९९ टक्के नोंद असल्याने प्रथम क्रमांक, घाटकोपर १ मुंबई ९८.२ टक्के नोंद असल्याने द्व‍ितीय क्रमांक, तर दापोडी बोपोडी मुंबई ९८ टक्के नोंद असल्याने तृतीय क्रमांक आहे. या जिल्ह्यांना व नागरी बाल विकास प्रकल्पांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


                आयसीडीएस योजनेसोबत प्रशंसनीय काम केल्याबद्दल सीएसआर कंपनी पारले ॲग्रो प्रा.लिमिटेड, यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रा.लिमिटेड यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. पुणे १ नागरी प्रकल्पच्या महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी सीएसआर सहभाग वाढविल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, दालमिया फांउडेशन,भागीरथी फांउडेशन, कॉरबेट फाउंडेशन, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद,आर.एस.एस.जनकल्याण समिती, होप फॉर दि चिल्ड्रेन, युनायटेड वे दिल्ली, रोटरी डिस्ट्रीक्ट,के कॉर्प फांउडेशन, जीवनंदन फाऊंडेशन आणि मुस्कान प्रतिष्ठाण, यार्दी फाउंडेशन यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


                                                              *****

आजपासून राज्यात थॉयरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा शुभारंभ.

 आजपासून राज्यात थॉयरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा शुभारंभ.

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन.

            मुंबई, दि. 30: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामार्फत थॉयरॉईड जनजागृती व उपचार अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन आज करण्यात आले.


            यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, आमदार राजू भोळे, जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आदी उपस्थित होते.


            वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत. राज्यात 30 मार्च 2023 पासून “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार आहे.


            मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व ब-याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.


00000

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

 श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार: मिलिंदा मोरागोडा.

            मुंबई, दि. 30 :आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज येथे दिली.  


            उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी गुरुवारी (दि.30) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 


            भारतातून श्रीलंकेत गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने आपण परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी विचारविनिमय करीत असल्याची माहिती उच्चायुक्तांनी यावेळी दिली.  


            श्रीलंकेत रामायणासंबंधीत किमान 40 ठिकाणे असून पाच शिवमंदिरे देखील आहेत. त्यापैकी त्रिंकोमाली येथील शिवमंदिर हे रावणाने बांधले असल्याची लोकांची मान्यता असल्याचे राजदूतांनी सांगितले. श्रीलंकेत एक बुद्ध मंदिर देखील असून त्याचे नजीक विभीषणाची पूजा केली जाते असेही त्यांनी यावेळी सांगितले. भगवान बुद्धांनी देखील श्रीलंकेला भेट दिली होती अशी आपल्या देशातील लोकांची धारणा असल्याचे उच्चायुक्तांनी सांगितले. बैठकीला श्रीलंकेचे मुंबईतील वाणिज्यदूत वाल्सन वेतोडी हे देखील उपस्थित होते. 

मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .

 मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  .

            मुंबई, दि. 30 : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.


             काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेवून या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, माजी मंत्री राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित,अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासु आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,मुंबादेवी प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रध्दा,आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात. श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन येथील श्री.महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर, तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे. या परिसरात अत्यावश्यक असणा-या सोयी सुविधा लक्षात घेवून त्या ठिकाणी दर्शन रांगा, वाहन तळ आणि आवश्यक असणा-या सुविधांच्या विकासाबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल.                       

Thursday, 30 March 2023

आरोग्यदायि... तेल...👇*

 *आरोग्यदायि... तेल...👇*


... लाकडि घाण्यावर काढलेल्या तेलाला इतके महत्व का..? खाद्यतेलाला खुप मोठा इतिहास आहे, चीन, जपान इथे इ.सन पूर्व २००० वर्षापूर्वि खाद्यतेल वापरायला सुरवात झालि, भुईमूग, व सूर्यफूलाच्या बिया 

 भाजून- कुटून त्या उकळत्या पाण्यात टाकून पहील्या वहिल्या तेलाचि निर्मिती झाली.

    त्यानंतर, पाम, नारळ यापासूनहि तेल काढले जाउ लागले. पण जसजसा तेलाचा व्यापार वाढू लागला

 तसतशि केमिकल, घटक, वापरणे, व वेगवेगळ्या प्रकारच्या चरबिंचि भेसळ करून तेलाला 

    कमर्शिअल रूप देण्यास सुरुवात झाली.


## मुद्दाम मग हेल्दि आँईल, कोलेस्ट्रोल फ्रि आँईल, मधूमेहमूक्त आँईल आशि लेबले लावून कंपन्या

 सामान्य माणसाची दिशाभूल करतात. आधुनिक यंत्राव्दारे जेव्हा तेलनिर्मिती प्रक्रिया केलि जाते तेव्हा फाँस्पेरिक अँसिड, काँस्टिक सोडा, हायड्रोजन वापरतात, त्यामूळे तेल स्वच्छ, चमकदार , पारदर्शक दिसतं

 परंतु हिच रसायने आपल्याला घातक ठरू शकतात..

       आणि चिटिंग केले जाते, तेलाच्या रिफायनरी टँकरमद्ये कच्चे तेल आणले जाते, हे सर्व प्रकारच्या खाण्यायोग्य व अयोग्य अशा तेलबियांचे अशुद्ध तेल

 असते, त्यावर प्रक्रिया करून. हवे ते फ्लेवर्स मिसळून

     हवे ते तेल फक्त वेगवेगळ्या नावांची लेबले लावून हे 

 बनावटि तेल सुंदर पँकिंग मद्दे विकल्या जाते.


## यंत्राव्दारे तेल काढण्याची प्रक्रिया खुप वेगवान व 

 उष्णता निर्माण करणारि असते, त्यामुळे तेलाचा नैसर्गिक पोत, रंग, चव, बदलते, उष्णताव रसायने यांच्या एकत्रित परीणामामूळे हे तेल घातक, व अपायकारक ठरते..

           ## 

   # लाकडी घाण्यावरिल तेलाचे आरोग्यदायि फायदेः

  लाकडि घाण्यावर तेल काढतांना अगदि नगण्य उष्णता निर्माण होते त्यामूळे नैसर्गीक तत्वे जपलि जातात.

  त्यामुळे स्वच्छ, व पौष्टिक तेल प्राप्त होते. अश्या तेलाला स्वतःचा सुगंध, व चव, रंग असतो , हे तेल घट्ट असल्याने वापरायला कमिच लागते.

      लाकडि घाणा म्हणजे तेल काढतांना फक्त लाकडाचाच वापर करतात. त्यामुळे अतिशय कमी तपमानात हि प्रक्रिया होते.. त्यामुळेच या तेलाला

..." कोल्ड प्रेस आँईल"" असेहि म्हणतात..


##.. रोग प्रतिकारशक्ति वाढते, ओमेगा फँटि अँसिड व. Mugs, pufa,.. हे शरिरातील, कोलेस्ट्रोल नियंत्रित करतात. घाण्याचे तेल हे मसाज करण्यासाठि वापरतात, हे औषधि आहे, त्यामूळे, सांधेदुखि, संधिवात बरा होतो.

 मालिशमुळे रक्ताभिसरण चांगले होउन कांतिहि तेजस्वि, चमकदार, होते, ह्रुदयरोगाचा धोका बर्याच प्रमाणात कमि होउन आपलि हाडेहि मजबूत होतात.


 ## सर्वात शेवटि सामान्य माणूस विचार करतो ते घाण्याचे तेल खिशाला परवडेल का? पण खर तर

 आरोग्याचि किंमत फार मोठि आहे, असे , घातकि, केमिकल युक्त तेल खाण्यापेक्षा, नैसर्गीक, व शुद्ध अश्या तेलाला २ पैसे जास्त लागले तर काय हरकत आहे? 

    आणि तसेहि लाकडी घाण्याच्या तेलाच्या किमति 

 इतर तेलाच्या तूलनेत सामान्य जनतेला परवडेल अशाच आहेत.

         तेव्हा आपल्या उत्तम स्वास्थाकरता केवळ लाकडी घाण्याच्याच तेलाला प्राधान्य देउन, चांगले

 आरोग्यदायि आयुष्य जगा...

     


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या कार्यकक्षेत विस्तार

 रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या कार्यकक्षेत विस्तार


            मुंबई दि. 29 : रायगड-अलिबाग येथील कुटुंब न्यायालयाच्या कार्याचा विस्तार पेण-मुरूड तालुक्याच्या क्षेत्रापर्यंत करण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील रहिवाशांची कौंटुबिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यास सहकार्य लाभणार आहे.


            राज्य शासनाने उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून, रायगड-अलिबाग कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक मर्यादा, पेण व मुरूड तालुक्याच्या संपूर्ण क्षेत्रापर्यंत वाढविल्या आहेत. या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा अलिबाग नगरपालिका क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष तसेच तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी तसेच मुरूड तालुक्याच्या संपूर्ण स्थानिक सीमांतर्गत क्षेत्राशी समकक्ष असतील, असे विधी व न्याय विभागाने अधिसूचनेद्वारा कळविले आहे.


००००

जय श्री राम, वनवास ठिकाणे

 *When Bhagwan Shri Ram had left for 14 years of Van-vaas, in that era during his 14 years journey, this video enlightens us about all the places that Lord Shri Ram Bhagwan had visited and whom all the great souls he met on the way. An interesting video describes it all on the map of India, the great Bharat !*


शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचेपणन संचालकांचे आवाहन.

 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचेपणन संचालकांचे आवाहन.

            मुंबई, दि. 29 : सन २०२२ - २०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे.


            राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.


            तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२ -२०२३ चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.


अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे


            विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत,आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत,ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र. आवश्यक आहे.


            सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक ,नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे.

कोणीतरी विचारले मला परवा

 कोणीतरी विचारले मला परवा

तुला राम हवा की कृष्ण हवा


मी म्हणाले किती छान विचारला प्रश्न

सांगते , कधी मला राम पाहिजे कधी कृष्ण


रामराया पोटात घालेल माझी चूक

आणि कृष्ण भागवेल माझी भूक


रात्रीची शांत झोप रामरायच देतो

भूक लागली की कृष्ण च आठवतो,


कशाचीही भिती वाटली की मला आठवतो राम

कष्ट झाले , दुखः झाले की कृष्णाकडे च मिळतो आराम,


रक्षण कर सांगते रामरायाला च

सुखी ठेव सांगते मी श्रीकृष्णाला च


बुध्दीचा विवेक रामाशिवय कोणाकडे मागवा,

व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा,


सहनशक्ती देतो माझा रामराया

कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्याया,


रामाला नेहमी शरण जावे वाटते

कृष्णाशी मात्र बोलावेसे भांडवेसे वाटते, 


रामाला क्षमा मागावी

कृष्णाला भीक मागावी


रामाला स्मरावे

जय श्री कृष्ण बोलावे


अभ्यास करताना प्रार्थना राजं मणी रामाला

पायावर उभे राहताना विनवणी विष्णूला


एकाचे दोन होताना घ्यावे रामाचे आशीर्वाद

संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद


आरोग्य देणारा राम

सौंदर्य देणारा कृष्ण


राज्य देणारा राम

सेना देणारा कृष्ण


बरोबर चूक सांगतो राम

चांगले वाईट सांगणे कृष्णाचे काम


रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम

कृष्णाकडे मागावे मी मित्रांचे प्रेम



दोघांकडे मागावे तरी काय काय

ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,

म्हणत आहेत, अग आम्ही एकच

तु फसलीस की काय.....,


म्हणाले , कोण हवा हा प्रश्न च नाही

मिळू दोघेही नाहीतर कोणीच नाही,


मी रडले आणि म्हणाले 


दोघेही रहा माझ्याबरोबर 

परत नाही विचारणार हा प्रश्न


राम का कृष्ण परत विचारले जरी

फक्त म्हणेन जय जय रामकृष्ण हरी  


ll जय जय रामकृष्ण हरी ll

      🙏🌺🪷🌹🙏


श्रद्धा कारुळकर

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचेनूतनीकरण करून घेण्याचे आवाहन.

 दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचेनूतनीकरण करून घेण्याचे आवाहन.

मुंबई, दि. 29 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.


आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.


भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माय आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.


००


 



सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार

 सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये

“मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार


- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि. 29 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियाने सुरु केली असून राज्यात 30 मार्च 2023 पासून ‘मिशन थायरॉईड अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            ‘मिशन थायरॉईड’ या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व ब-याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.


            थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत थायरॉईड क्लिनिकच्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.


            साधारणपणे प्रत्येकी 1 लाख महिलांमागे अंदाजे 2,000 महिलांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील बऱ्याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदानदेखील होत नाही. अशा सर्व महिला, पुरुष आणि बालकांनादेखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे. अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त महिला आणि पुरुषांना आळस, सुस्तपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुध्दी होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणे अथवा अंधत्वदेखील येऊ शकते.


००००

कुणबी चेम्बर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज ही संस्था नव्हे सुवर्णसंधी !!!*

 *▪️कुणबी चेम्बर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज ही संस्था नव्हे सुवर्णसंधी !!!* 


समस्त कुणबी समाज बांधवांना 

जय कुणबी👏


     *शनिवार दिनांक २५ मार्च २०२३ रोजी गडकरी रंगायतन ठाणे* येथे झालेल्या *कुणबी चेम्बर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्या* व्यावसायिकांच्या *प्रोत्साहन सभेला* हजारपेक्षा जास्त व्यावसायिक उपस्थित होते.

     हा दैदित्यमान व अविस्मरणीय सोहळा कुणबी समाजाला भविष्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीला दिशा देणारा ठरेल यात तिळमात्र शंका नाही .


      *KCCI ची स्थापना का करावीशी वाटली* हा सर्वच कुणबी समाज बांधवांना पडलेला प्रश्न होता त्याचा उलगडा २५ मार्चला झाला परंतु समाजाचा आपण पूर्व इतिहास पाहिला तर कळेल की,

     *१०२ वर्षाचे सामाजिक संघटन व सहकार क्षेत्रात बळकट असलेली सामाजिक संस्था* (कुणबी समाजोन्नती संघ आणि कुणबी बँक) असूनही कुणबी समाज दिशाहीन का आहे?.

     याच दरम्यान १०२ वर्षात समाजाच्या अनेक सामाजिक संघटनांचा उदय झाला परंतु आपापली राजकीय व सामाजिक पोळी भाजून घेण्याकरिता राजकीय पक्षात विखुरला गेलेला समाज बांधव आणि त्यामुळे समाजाला लागलेली राजकीय कीड या सर्वाचा सारासार विचार करून राजकारणविरहित आणि समाजाला आर्थिक बाजूने सक्षम बनविण्यासाठी KCCI चा जन्म झाला. KCCI साठी सर्व सामाजिक संघटना व समाज बांधवांना एकत्रित आणण्याची किमया साधणारे *कुणबी चेबर्स ऑफ कॉमर्सचे संस्थापक सन्मा श्री अशोकजी वालम यांना मानाचा मुजरा👏* 


      *KCCI च्या स्थापनेला ऑक्टोबर २०२२ पासून प्रारंभ झाला* आणि अवघ्या अडीच महिन्याच्या कालावधीतच *नॉट आऊट ११०० सभासद नोंदणीचा विक्रमी पल्लाही गाठला* आणि २५ मार्च २०२३ पर्यंत *हाच टप्पा १५०० पेक्षा जास्त व सर्वात जलद सदस्य नोंदणी* करणारी KCCI ही व्यवसाय क्षेत्रातील एकमेव संस्था ठरली आहे याचा आपणा सर्वांना अभिमानच नाही तर गर्व सुद्धा आहे.

      

     *KCCI ह्या संस्थेची रचना* समाजातील शेवटच्या समाज घटकापर्यंत पोहचुन सामान्यातल्या सामान्य समाज बांधावाला व्यवसायाकडे वळवून त्यांना व्यावसायिक व आर्थिक मार्गदर्शनाबरोबर व्यवसायात सक्षम करून त्यांचे आर्थिक पुनर्वसन करणे हे होय! त्याकरिता KCCI ने काही धेय्य आणि उद्दिष्टे देखील आपल्या समोर ठेवली आहेत ती मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो !


 *▪️ध्येय :-* 

प्राथमिक स्तरावर समाजातील १ लाख आर्थिक सशक्त व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक तयार करणे


▪️ *उद्दिष्टे:-* 

👉व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित करणे

👉व्यवसायाचा प्रारंभ करण्यासाठी व असलेल्या व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी लागणारे आर्थिक भांडवल कसे उभे करता येईल यासाठी पुढाकार व मार्गदर्शन करणे

👉विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची एक वेगळी मोट बांधून KCCI नावाने विविध क्षेत्रात नवीन ब्रँड तयार करणे

👉व्यावसायिक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा याकरिता कृतिशील राहणे

👉ग्राहक व व्यावसायिक यांची योग्य सांगड घालून मालाची विक्री व खरेदी योग्य दरात करणे

👉भविष्यात KCCI चे व्यापारी संकुल उभारणे

👉विविध क्षेत्रातील खेळाडू कलाकार आणि विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळवून देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दर्जा प्राप्त करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन व आर्थिक नियोजन करून देणे 


ही प्रामुख्याने KCCI ची धेय्य आणि उद्दिष्ट्ये असतील 


     याकरिता आपण सर्वांनी KCCI चा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी संस्थेची सभासद नोंदणी अभियान चालू असून त्याला उदंड प्रतिसादही मिळत आहे आपणही ह्या चळवळीत भाग घेण्यासाठी *₹११०० भरून KCCI चे सभासद व्हा आणि समाजाला व्यावसायिकदृष्ट्या आर्थिक बाजूने सशक्त ,सबळ व बळकट करूया !*


सभासद नोंदणी करण्यासाठी *श्री शांताराम जायगडे यांच्या Gpay No 9324071075 वर खात्री करून payment* करा व माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर *8928959657* त्याचा स्क्रीन शॉट पाठवा जेणेकरून तुमचा रेकॉर्ड माझ्याकडे व KCCI कडे राहील व आपल्याला KCCI च्या व्हॉट्सॲप ग्रूपवर सहभागी करता येईल .

 

                👏 *धन्यवाद !!👏* 


 *|| एकमेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत ||* 

 

*|| जय तुकोबा, जय शिवराय||* *|| जय जिजाऊ, जय शिवराय||* 

 *जय कुणबी👏* 

श्री संतोष आत्माराम शिगवण

▪️ *सह-संपर्क प्रमुख मंडणगड तालुका* 

(मुंबई शहर विभाग)

▪️ *स्वयंभू इंटर प्रायजेस (मुंबई)* 

आमच्याकडे सौर उर्जेवर *(सोलर एनर्जी)* चालणारे प्रॉडक्ट व सोलर होम सिस्टीम उपलब्ध आहेत

ऑर्डरसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:-

📱 *8928959657*

पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*

 *पचनसंस्थेसाठी बडिशेप.....*


*१. उत्तम औषध...*

 रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते.


*२. पोटात गॅस...*

 होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते.


*३. अपचनाच्या सर्व तक्रारींत...*

 बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे इ. थोडक्यात, सर्व पचनसंस्थेसाठी उपयोगी आहे. जेवणानंतर एक चमचा बडिशेप रोज दोन वेळा खावी.


*४. मुलांना दात येताना...* जुलाबाचा त्रास होतो, त्यासाठी चुन्याच्या निवळीसह बडीशेप चूर्ण घ्यावे.


 *५. वीर्यवृद्धी करते.*


*६. भूक लागत नसेल...* तर रोज बडिशेप खावी. त्यासाठी शक्य असेल तर एक चमचा बडिशेप चूर्णात दोन चमचे मध टाकून त्याचे चाटण रोज एक वेळा घ्यावे.


*७. स्मरणशक्ती...* सुधारण्यासाठी व बुद्धी तरतरीत ठेवण्यासाठी बडिशेप चूर्ण+ तूप, चाटण द्यावे.


*८. तापामध्ये अंगाची आग होत असेल...*

जिभेला शोष पडत असेल तर बडिशेपेचा काढा खडीसाखर घालून प्यायला द्यावा.


*९. मासिक पाळीचे वेळी...* पोटात दुखत असेल, तर त्यासाठी एक चमचा बडिशेप रोज तीन वेळा चावून खावी. 


*१०. लघवी कमी होत असेल...*

तसेच लघवीला जळजळ किंवा आग होत असेल तर एक चमचा बडिशेपेचा काढा करून प्यावा.


*११. उलट्या होत असल्यास...*

अर्धा चमचा बडिशेप चूर्ण, एक चमचा

मोरावळ्यांत टाकून चाटण करणे.


*१२. कोरडा खोकला...*

 असेल तर, एक चमचा बडिशेप चूर्ण + एक चमचा पत्री खडीसाखर बरोबर घेणे.


*१३. सूज व वेदना...*

असतील तर बडिशेप, सैंधव पूड व ओवा समभाग घेऊन तव्यावर गरम करून त्यांची रुमालात पुरचुंडी करून शेकावे.


*१४. बडीशेप सरबत...*

बडिशेप ४ वा ५ चमचे घेऊन ती एका भांड्यात पाणी भरून त्यात टाकून रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी हे मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात ४ वा ५ चमचे खडीसाखरेचा पाक करून घालावा. म्हणजे चांगले सरबत तयार होते.

उपयोग - या सरबतामुळे भूक वाढते, पचनशक्ती सुधारते, उष्णता कमी होते. शिवाय ते पौष्टिक आहे.


*१५. स्वादिष्ट विरेचन चूर्ण...*

बडिशेप, ज्येष्ठमध व सोनामुखी प्रत्येकी १५० ग्रॅम एकत्र करून त्यांची पूड करावी. त्यात ३०० ग्रॅम खडीसाखर पूड करून मिसळावी म्हणजे हे विरेचन चूर्ण तयार होते. उपयोग - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे.

त्याने पोट साफ होते. तसेच मूळव्याध, तोंड येणे इ. उष्णताविकार व त्वचाविकार बरे होतात.


*१६. बलदायी पेय (Energy Drink )...*

बडिशेप एक चमचा, एका वेलचीचे दाणे व दोन खजुराच्या आठळ्या ( बिया काढाव्यात. ) हे सर्व मिसळून दोन कप पाण्यात रात्री भिजत घालावे. सकाळी मिक्सरमधून काढावे म्हणजे बलदायी पेय तयार होते, ते रोज सकाळी ताकदीसाठी प्यावे.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





Salutes, नौजवान के लिये







 गॅस पे फिफ्टी percent सवलत मांगा ने वालो एक नजर edhar भी.

आरोग्य संदेश -एरंडेल तेल*

 *एरंडेल तेल*


एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृताची उपमा देण्यात आली आहे. एरंडेल तेलाचे आरोग्यविषयक अनेक उपयोग आहेत ते कोणते ते आपण पाहूया.


१. पोट साफ होण्यासाठी


एरंडेल तेल घेतल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. वृद्धांच्या पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही हे रोज घेता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.


२. डोळ्यांच्या विकारांवर


रांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर तक्रारींवर यासाठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा. तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यांची देखील दाट होतात.


३. आमवात आणि सांधेदुखी


युरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. ८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.


४. लहान मुलांसाठी


लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळी करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती द्यावी. हे असे महिन्यातून किमान एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत होती.


५. गर्भवतींसाठी


गर्भवतींनी ‘सिझेरियन’ टाळायचे असेल तर नववा महिना लागताच रोज एक चमचा एरंडेल घ्यावे.( हे घेताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.


६. रक्तदोषात गुणकारी


अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे.


७. उत्तम झोपसाठी  


अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. सतत विचार सुरु राहणे यामुळे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरावावे नक्कीच गुण येतो.

Cp.

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



_*

राम नवमी शुभ कामना

 मंगल भवन अमंगल हरि, द्रवाहु सु दशरथ अजरा बिहारी। राम सिया राम सिया राम जय जय राम। यहां आपको और आपके परिवार को राम नवमी की बहुत-बहुत शुभकामनाएं।🌹🌹


सुप्रभात

 : *शुभ सकाळ*


*आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी जन्माला आलो आहे, म्हणून आपलं आयुष्य मनोसोक्त जगा *Don't close the book when bad things happen in your life, just turn the page and begin a new chapter.*


 *A successful relation doesn’t depend on how good understanding we have?*

*But it depends on how better we avoid ‘Miss-understandings'….......*

 *Good Morning*

: *नई सुबह इतनी सुहानी हो जाए;*

*आपके दुखों की सारी बातें पुरानी हो जाएं;*

   *दे जाए इतनी खुशियां ये दिन आपको;*

    *कि ख़ुशी भी आपकी मुस्कुराहट की दीवानी हो जाएं ।*


🌹सुप्रभात🌹

शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत

 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचेपणन संचालकांचे आवाहन.

            मुंबई, दि. 29 : सन २०२२ - २०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे.


            राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.


            तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२ -२०२३ चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.


अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे


            विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत,आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत,ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र. आवश्यक आहे.


            सदर अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक ,नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत, असे पणन संचालक यांनी कळविले आहे.


००००

Wednesday, 29 March 2023

दिलखुलास' कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त

 दिलखुलासकार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त

अपर मुख्य सचिव अनुपकुमार

           

            मुंबईदि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 31 मार्च 2023 व शनिवार दि. 1 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेचसंयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. अन्नसुरक्षेचे अहारातील महत्व सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून देशभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून मिलेट विपणन आणि मुल्यसाखळी या विषयावर सहकार आणि पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माहिती दिली आहे. त्यांनी केलेले हे मार्गदर्शन आपण दिलखुलास’ कार्यक्रमातून ऐकणार आहोत.

000

मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का*_

 *मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नसलेल्या औषधांचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का*_


*व्यायाम* हे औषध आहे.


*सकाळ/संध्याकाळ चालणे* हे औषध आहे.


*उपवास* हे औषध आहे.


*कुटुंबासोबत जेवण* हे औषध आहे.


*हसणे आणि विनोद* हे देखील औषध आहे.


*गाढ झोप* हे औषध आहे.


*सर्वांशी मिळून वागणे* हे औषध आहे.


*आनंदी राहण्याचा निर्णय* हे औषध आहे.


*मनातील सकारात्मकता* हे औषध आहे.

*सर्वांचे भले* हे औषध आहे.


*इतरांसाठी प्रार्थना* हे औषध आहे.


कधी कधी *मौन* हे औषध असते.


*प्रेम* हे औषध आहे.


*मन:शांती* हे औषध आहे.


_आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे पूर्णपणे मोफत आहेत_


आणि सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळवायचे?


*प्रत्येक चांगला मित्र* हे एक परिपूर्ण *मेडिकल स्टोअर* आहे.


 *🌹 🍁🌹🍁🌹🍁* *🌹🍁🌹*🙏

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

 दहा वर्षे पूर्ण झालेल्या आधार’ कार्डचे

नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 29 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाहीअशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावेअसे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माय आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावाअसेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे

जी 20 परिषदेत जगातील सर्वोत्तम 'माईल्ड' कॉफीचे प्रदर्शन

 जी 20 परिषदेत जगातील सर्वोत्तम 'माईल्डकॉफीचे प्रदर्शन

            मुंबईदि. 29 : सुमारे 8 हजार कोटी रुपये किमतीची कॉफी भारतातून निर्यात होतेअशी माहिती कॉफी बोर्डाचे विपणन उपसंचालक डॉ. बाबू रेड्डी यांनी दिली. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या कॉफी बोर्डच्या माध्यमातून भारतातील उच्च प्रतीची कॉफी प्रदर्शित करण्यात आली आहे.

            भारतात उत्पादन आणि प्रक्रिया होणाऱ्या कॉफीविषयी अधिक माहिती देताना श्री. रेड्डी म्हणाले कीसुमारे १२० देशांमध्ये भारतातील कॉफी निर्यात होते. यात युरोपमध्य पूर्व देशांमध्ये अधिक मागणी आहे. जगभरात तयार होणाऱ्या कॉफी उत्पादकांमध्ये भारताचा सातवा क्रमांक आहे. तरजगभरातून कॉफी निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. सावलीत उगवलेलीहाताने तोडलेली आणि सूर्यप्रकाशात वाळवलेली ही 'माईल्डकॉफी जगभरातील कॉफी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. याबद्दलची अधिक माहिती indiacoffee.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            जी - 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यानभारतीय चहा महामंडळभारतीय कॉफी महामंडळभारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहाकॉफीमसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.

00000

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी-20 परिषदेत प्रदर्शन

 हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मसाल्यांचे जी-20 परिषदेत प्रदर्शन


            मुंबई, दि. 29 : पाच लाख रूपये किलो किमतीचे केसर तसेच सहा हजार रूपये किलो किमतीची वेलची जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या कार्यगटाच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या स्पाइस बोर्डच्या माध्यमातून भारतातील हजारो वर्षांची परंपरा असलेले मसाले प्रदर्शित करण्यात आले आहेत.


            या विषयी माहिती देताना स्पाइस बोर्डाचे विपणन संचालक बसिस्थ नारायण झा यांनी सांगितले की, सुमारे 180 देशांमध्ये निर्यात होणाऱ्या या मसाल्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. 800 प्रकारचे मसाले, त्यांचे अर्क, मिश्रण आदींना जगभरात मागणी आहे. पोषक घटक पदार्थ, आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यात हे पदार्थ वापरले जातात. जगात मसाल्यांच्या व्यवसायाची सुमारे 33 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. यापैकी 47 टक्के एवढा व्यापार एकट्या भारतातून होतो. याबाबतची अधिक माहिती www.indianspices.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


            जी - 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.

पानफुटी..( bryophyllum pinnatum)..*उपचार

 *🌱🌱..पानफुटी..( bryophyllum pinnatum)..*


     . पानफुटि म्हणजेच घायमारि, एअर प्लांट, व कटकटक अशि बहुविध नावाने ओळखलि जाते. मूळचि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातलि आहे,. हिचे पुनरुत्पादन अतिशय सोपि असल्याने हिचा प्रसार जगभर झाला आहे,. कमि पाणि लागत असल्याने ती घरात शोभेकरता म्हणून लावल्या जाते,. पानफुटिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे पान नुसते मातित लावले तर लगेच मूळ धरून रोप तयार होते...


🌱🌱.. पानफूटि हि मुख्यत्वे वापरलि जाते, औषध म्हणून, ते, पित्ताशयात व मूत्राशयात असलेले खडे यांना तोडुन बाहेर काढणे!!!... याचि दोन पाने स्वच्छ धुवून

 सकाळि अनशापोटि गरम पाण्यासोबत चावून खावित, काहि दिवसातच तूटुन खडे बाहेर पडतात..


🌱🌱.. पानफुटिच्या रसात सुंठेचे चूर्ण मिसळून सेवन केल्यास पोटशूळ लगेच बंद होतो,. युरिन चि जळजळ व सर्वच मूत्रविकार याच्या सेवनाने बरे होतात,. स्रियांचा श्वेतप्रदर, व रक्तप्रदर पानफुटिचा काढा करून पिल्यास बरा होतो,.


🌱🌱.. त्वचेवर आलेले फोडं, पूरळ, जखमांचे घाव, भाजलेले, व्रण, यावर पानफुटिच्या पानांना वाटुन ती लुगदि तिथे लावल्यास सर्व त्रास बरे होतात,. पान फुटी हि गुणाने शीतल, असल्याने सर्व पित्तविकार बरे करते,

 पोटातला अल्सर, व तोंडातले छाले, व्रण याच्या रसाच्या सेवनाने बरे होतात,.


🌱🌱. केसात कोंडा झाला असेल, तर याच्या रसाने मालिश करावी, कोंडा निघतो, आणि डोकेदूखी असेल तर ती थांबते, कानात कोणत्याहि प्रकारचा स्राव होत असेल, तर पानफुटिच्या पानाच्या रसाचे काहि थेंब कानात टाकल्यास आराम पडतो,.


🌱🌱 पानफुटिचि पाने रक्तस्तंभक, व जंतूनाशक, आहे, शरिराच्या आतून होणारा कोणताहि रक्तस्राव याच्या सेवनाने बंद होतो, जूलाब, अतिसार, डायरिआ, झाल्यास, याच्या रसाच्या दुप्पट लोणि घेउन प्राशन केल्यास आराम पडतो,.


🌱🌱. संधिवात, उच्च रक्तदाब, व अंगाचा दाह यांसारख्या व्याधिवरिल अनेक पारंपारिक औषधांमद्ये पानफुटि वनस्पति वापरतात,. शरिरावर कुठेहि सूज आल्यास पानफुटिची पाने तव्यावर गरम करून बांधल्यास सूज उतरते,. वमन, उलटी, मळमळ होत असेल, तर, याचि पाने चावुन रस गिळावा, बरे वाटते,.


🌱🌱. पुरुषवर्गात आढळणारा, प्रोस्टेट ग्रंथिंचि वाढ यांवर पानफुटिचे सेवन फायद्याचे ठरते, दिसायला पाणिदार असलेले हे रोपटे आँपरेशन सारखि अवघड क्रियेपासून वाचवून मनुष्यावर उपकारच करते...


 सुनिता सहस्रबुद्धे....


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना; सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू

 शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना; सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू


मुख्य सचिवांनी साधला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद.

            मुंबई, दि. 29 : राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा...कागदपत्रे काय जोडावीत...याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी 'शासकीय योजनांची जत्रा' हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. हा कार्यक्रम अभियानस्तरावर राबवून अद्यापपर्यंत शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना लाभ मिळवून देण्याचे आवाहन मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना केले.


            या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, समाजकल्याणचे सचिव सुमंत भांगे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री वॉर रूमचे अधिकारी उपस्थित होते.


            प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत, हेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेरून शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रूपात आणून जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहेत. यानुसार सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त ३६ विभागामार्फत ७५ शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थींना देण्यात येणार आहे. यामध्ये आणखी योजना वाढविण्यात येणार आहेत. या जत्रेनुसार एप्रिल महिन्यात सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती, शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी. योजनानिहाय लाभार्थी निवड, त्यांचे अर्ज भरून घेणे याबाबतही तयारी करावी. योजनांचा लाभ मे महिन्यामध्ये देण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही श्री. श्रीवास्तव यांनी केल्या.


            लाभार्थींना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे. जत्रेत एकाच योजनेचा लाभ मिळणार नसून यामध्ये त्या कुटुंबाला अन्य योजनांचीही माहिती होणार आहे. यामुळे विविध योजनांचा लाभ एकाच गरीब कुटुंबाला झाल्यास ते कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर यायला हातभार लागणार आहे. यामुळे या जत्रेत प्रत्येक विभागांनी आपल्या विविध योजनांबाबत माहितीही पुस्तक रूपाने प्रसिद्धीस देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


            जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत. सर्व नियोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार असून गावपातळीवरील कर्मचाऱ्यांच्या मार्फत योजनांची माहिती 'हर घर दस्तक'च्या रूपाने देता येणार आहे. यामध्ये सर्व यंत्रणांचा समावेश राहणार आहे. यासोबतच सीएससी सेवा सेंटर, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागांनी त्यांच्या पात्र लाभार्थींना योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.


अंमलबजावणी आणि मार्गदर्शनासाठी असणार जनकल्याण कक्ष


            सर्व कार्यक्रमांची रूपरेषा, अंमलबजावणी, नियंत्रण करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष असणार आहे. विभागीय पातळीवर विभागीय जनकल्याण कक्ष, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावरही जनकल्याण कक्षांची स्थापना करून याद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे.


पात्र लाभार्थीला मुख्यमंत्र्यांचे प्रमाणपत्र


            विविध योजनांसाठी पात्र असणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या लाभार्थींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडून लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विविध योजनांसाठी पात्र लाभार्थींना योजना मंजुरीची पत्रे देण्याचा कार्यक्रम जिल्हावार लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील सर्व विभागांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांशी संपर्क साधून लाभ देण्यासाठी करावयाच्या कार्यवाहींची पूर्तता त्यांच्या स्तरावर करुन घ्यावी. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


            यावेळी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अमोल शिंदे यांनी या उपक्रमाचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री वॉर रूमचे विद्यार्थी, आयआयटीचे विद्यार्थी या उपक्रमाला मदत करणार आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, विभागांचे सचिवांनी यावेळी विविध सूचना केल्या. साताराचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी उपक्रमाबाबत सध्या करीत असलेल्या अंमलबजावणीची माहिती दिली.


००००

Tuesday, 28 March 2023

कृषी विकास आणि प्रगतीचा ध्यास घेणारा ‘महासंकल्प’

 कृषी विकास आणि प्रगतीचा ध्यास घेणारा ‘महासंकल्प


            शेतकरी हा आपल्या राज्याच्या विकासाचा कणा आहे. त्यामुळे त्या बळीराजाचा आर्थिक आधार बळकट करीत त्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प नुकताच राज्य शासनाने सादर केला. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात मदत आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक तंत्रकुशलतेची जोड देण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. शेती, सहकार आणि सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला राज्य शासनाची साथ या माध्यमातून मिळणार आहे.


            राज्य शासनाने अर्थसंकल्प सादर करताना कृषि या महत्वाच्या घटकाला अधिक महत्व देत शेतकऱ्यांप्रती असणारी बांधीलकीच व्यक्त केली आहे. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी यावर अर्थसंकल्पात दिलेला भर स्पष्टपणे दिसून येत आहे. बळीराजाच्या समृद्धीसाठी राज्य शासन सदैव पाठीशी असल्याचा विश्वास या माध्यमातून राज्यातील शेतकरी वर्गाला दिला आहे.


नमो शेतकरी सन्मान निधी योजना


            केंद्र शासन देशातील शेतकरी वर्गासाठी प्रधानमंत्री किसान योजना राबवित आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा करते. राज्य शासनाने याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना लागू करुन योजनेत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळून प्रतिवर्ष त्याच्या खात्यात 12 हजार रुपये जमा होणार आहेत. राज्य शासनाने त्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.


शाश्वत विकासासाठी कटिबद्ध


            शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. नानाजी देशमुख कृषीसंजीवनी योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आणि इतर योजनांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न होत आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने महा कृषीविकास अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. यात पीक, फळपीक या मूलभूत घटकांच्या उत्पादनापासून मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया, तसेच तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट समूहासाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील 5 वर्षासाठी या योजनेला 3 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.


शेततळे योजनेचा विस्तार


            राज्य शासन शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवित आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने उदंड प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांची ही गरज ओळखून या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा विस्तार करून त्यात अन्य काही घटकही आता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात फळबागा, ठिबक सिंचन, शेडनेट, हरितगृहे, आधुनिक पेरणी यंत्रे, कॉटन श्रेडर याचा समावेश आहे. यावर्षी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.


एक रुपयात पीक विमा


            प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांसाठी विमा योजना राबविण्यात येते. ठराविक रक्कम भरुन शेतकरी त्यांचे पीक संरक्षित करतात. यामध्ये राज्य आणि केंद्र शासन त्यांचा हिस्साही जोडते. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना आता त्यांना भरावी लागणारी रक्कमही भरावी लागणार नाही. आधीच्या योजनेत एकूण विमा रकमेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. अर्थसंकल्पात याबाबतचा अभिनव निर्णय जाहीर करण्यात आला. केवळ एक रुपया भरुन शेतकऱ्यांना आता या पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यातील 1.52 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून आता राज्य शासनाचा खऱ्या अर्थाने आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटी येणारा रुपये 3300 कोटीचा विमा हप्ता आता राज्य शासन भरणार आहे.


अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला दोन लाखांची मदत


            राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविते. आता ही योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहे. विमा योजनेच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास यामुळे वाचणार आहे. यासाठी अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यावर्षी 120 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.


नैसर्गिक शेतीला मिळणार प्रोत्साहन


            रासायनिक खतांचा वापर कमी करत नैसर्गिक शेतीकडे आता शेतकरी वळत आहेत. नैसर्गिक शेती काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनही प्रयत्नशील आहे. या आगामी तीन वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी एक हजार कोटींच्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.


महाराष्ट्र श्री अन्न अभियान


            संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यात राज्याने महाराष्ट्र श्री अन्न अभियान सुरू केले आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रात्यक्षिक, यांत्रिकीकरण करणे, प्रक्रिया करणे, मूल्य साखळी विकास याचा समावेश आहे. राज्यात भरडधान्याचा प्रसार करणे, त्याचे महत्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी श्री अन्न अभियान महत्वाचे ठरणार आहे.


शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे प्रशिक्षण


            शेतकऱ्यांना फक्त आधुनिक यंत्रे देऊन शेती कशी करायची हे सांगून उपयोगाचे नाही. तर त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची ही गरज आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या जागेवर सर्व सुविधांनी परिपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी कन्वेंशन केंद्राची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी 227 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे तंत्रकुशलतेची जोड शेतीला देऊन शेती अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न होत आहेत. 


संत्रा प्रक्रिया केंद्र


            संत्री पिकावर प्रक्रिया करण्यासाठी नागपूर, काटोल, कळमेश्वर (जि. नागपूर), मोर्शी (जि. अमरावती) आणि बुलढाणा येथे संत्रा प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. याशिवाय, काजू फळपीक विकास योजना राबविण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. साध्या काजूच्या बोंडापेक्षा प्रक्रिया केलेल्या काजूच्या बोंडाची किंमत सात पटीने अधिक आहे. त्यामुळे काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना साहाय्य करण्यासाठी काजू फळपीक विकास योजना राबविण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षासाठी या योजनेकरिता 1 हजार 325 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.


            शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी पोषक ठरणाऱ्या तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. त्यांच्या प्रभावी माध्यमातून शेती आणि शेतकरी दोन्हीनाही बळ मिळेल, एवढे नक्की!


0000


दीपक चव्हान.         विभागीय संपर्क अधिकारी


 



मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

 मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी

 प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

            मुंबई, दि.२८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्याद्वारा सन २०२१-२२ या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्कारांकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून जिल्हास्तर युवा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.


            जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२२ या वर्षाकरिता प्रत्येकी १ युवक, युवती आणि संस्था असे एकूण ३ पुरस्कार देण्यात येणार आहेत. विहीत नमुन्यात अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग dsomumbaisub.blogspot.com येथे उपलब्ध आहेत.


पुरस्कार पात्रतेचे निकष असे :-


(अ) युवक/युवती पुरस्कार -


(१) पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्काराथींचे वय १३ वर्षे पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षांच्या आत असावे.


(२) अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव्यास असावा.


(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे जोडावेत. (गल्या तीन वर्षांच्या १ जून ते ३१ मे या कालावधीतील कार्याबाबतच्या माहितीसह सादर करावेत.).


(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.


(ब) संस्था युवा पुरस्कार -


(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे. (२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार नोंदणीकृत असावी.


(३) गुणांकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्रे कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे जोडावेत. असावी.


वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. ५ एप्रिल २०२३ पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

मुंबईत जी 20 बैठकीत, व्यापार वित्तपुरवठा सहकार्यावर चर्चा

 मुंबईत जी 20 बैठकीत, व्यापार वित्तपुरवठा सहकार्यावर चर्चा


विकासात व्यापाराची भूमिका अधोरेखित आणि एकात्मिक व्यापारी वित्तपुरवठा करण्याचा केला सर्वांनी पुरस्कार


“सर्व देशांनी, कागदविरहित आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आवश्यक ते कायदे आणण्याचा प्रयत्न करावा ”


            मुंबई, 28 : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 28 मार्च 2023 रोजी मुंबईत वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे जी20 सदस्य देशांमधील ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.


            मुंबईत होत असलेल्या जी-20 व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीच्या (TIWG) पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, इसीजीसी लिमिटेड आणि इंडिया एक्सीम बँकेने संयुक्तपणे परिषदेचे आयोजन केले होते. व्यापार आणि वित्तीय क्षेत्रात रचनात्मक संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सदस्य देशांचे प्रतिनिधी, उद्योग आणि जगभरातील शैक्षणिक तज्ञ या परिषदेत उपस्थित होते.


            केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी आपल्या बीजभाषणात बैठकीच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. व्यापार आणि वित्तीय क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या तसेच संभाव्य उपाय यावर चर्चा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


यावेळी आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सहभाग असलेल्या दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात, जागतिक व्यापाराच्या अस्थिर परिस्थितीत, व्यापार आणि वित्तपुरवठ्यातील आव्हानांची नोंद घेणे आणि तफावत कमी करण्यात, बँका, वित्तीय संस्था, विकासविषयक वित्तीय पुरवठा संस्था आणि निर्यात हमी संस्था, अशा सगळ्या संस्थांची भूमिका यावर चर्चा झाली.


            दुसऱ्या सत्रात, डिजिटलायझेशन आणि फिनटेक अर्थात आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे, व्यापार वित्तपुरवठ्यासाठी सुलभता आणि गती कशी मिळू शकेल, या विषयावर भर देण्यात आला. कर्जपुरवठ्यासंबंधी निर्णय घेण्यास तसेच एमएसएमईसाठी व्यापार संबंधी वित्तपुरवठा वाढवण्यात मदत व्हावी यासाठी सध्याच्या आणि उदयोन्मुख फिनटेक उपायांवर देखील सत्रात चर्चा करण्यात आली.


            परिषदेतील सर्व वक्त्यांच्या सार्वत्रिक संदेशाने सर्वांसाठी समृद्धी सुनिश्चित करण्याकरिता व्यापाराची आवश्यकता अधोरेखित केली आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक व्यापार वित्तीय क्षेत्र हे महत्त्वाचे आहे यावर भर दिला.


            आंतरराष्ट्रीय व्यापाराचे डिजिटलायझेशन हा व्यापार आणि व्यापार वित्तीय खर्चात कपात करण्याच्या दिशेने केलेली प्रभावी उपाययोजना आहे. व्यापाराचे . डिजिटलायझेशन करताना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांमध्ये डिजिटल रुपात व्याख्या, मानके आणि डेटा याबाबत सुसूत्रता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहमती प्रक्रिया आवश्यक असून नंतर ती सर्व देशांदरम्यान सामायिक केली जावी गेली.


जगभरातील पारंपरिक व्यापार वित्तीय तफावत सध्या सुमारे 2 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. ही दरी भरून काढण्यासाठी बहुस्तरीय विकास बँका, निर्यात हमी संस्था (ECAs) इत्यादींचा सहभाग वाढवण्यासाठी अधिक घटकांची गरज आहे.


            या परिसंस्थेतील फिनटेक आणि खाते संकलकांचा विकास, वास्तव वेळेतील आकडेवारीवर आधारित व्यवहार जोखीम मूल्यांकन सक्षम करतो. यामुळे व्यापार वित्तपुरवठा प्रदात्यांद्वारे किफायतशीर मूल्यमापन करणे शक्य होईल.


            कागदविरहित आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सर्व राष्ट्रांनी पुढील काही वर्षांत सक्षम कायदा स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी शिफारस सहभागी सदस्यांनी केली.


०००

G20 Meeting in Mumbai deliberates on Trade Finance Cooperation among G20 Member Countries


G20 Meeting highlights role of Trade in Development of countries and exhorts for Inclusive Trade Finance


“All countries should endeavour to adopt enabling legislation in the next few years to achieve paperless international trade”


 


            Mumbai: 28th : An international conference on cooperation on trade finance among the G20 member countries was organised by the Ministry of Commerce & Industry on March 28, 2023 at Taj Lands’ End, Bandra (West), Mumbai.


            The event was hosted by the Department of Commerce and organised by ECGC Limited and India EXIM Bank on the side lines of the 1st G20 Trade and Investment Working Group (TIWG) Meeting in Mumbai. Delegates from the member countries, industry and academic experts from across the world were present at the conference to engage in constructive dialogue and exchange of ideas in the domain of trade finance.


            Commerce Secretary, Shri Sunil Barthwal, in his key note address, set the agenda for the meeting. He highlighted that it is the right time to discuss the issues facing trade finance and possible solutions.


            Two panel discussions were organised as part of the event comprising of international experts. The first panel discussed the role of banks, financial institutions, development finance institutions, and Export Credit Agencies to identify the gaps and address the challenges in the trade finance arena amidst the uncertain global trade landscape.


            The second panel discussion focused on accelerating digitalisation and fintech solutions for improving access to trade finance.


The session also delved on the current and emerging fintech solutions for making more customized lending decisions and enhancing trade finance supply for MSMEs.


The universal message from all the speakers in the conference highlighted the necessity of trade for ensuring prosperity for all and that inclusive trade finance is key to achieve this target.


      Digitalisation of international trade is possibly an effective solution towards achieving cost reduction in trade and trade finance. The challenges to be addressed in digitalising trade were identified as international cooperation in harmonising definitions, standards and data sharing across the borders digitally.


      While estimates suggest that traditional trade finance gap is currently around USD 2 trillion, bridging the gap needs more players, including multilateral development banks, Export Credit Agencies (ECAs), etc to increase their participation.


Evolution of fintechs and account aggregators in the ecosystem enables transaction risk evaluation based on real time data. This will enable cost effective appraisal by trade finance providers.


      The panellists recommended that all nations should endeavour to adopt enabling legislation in the next few years to achieve paperless international trade.


००००




 



तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*

 *तांदळाच्या.. पाण्याचे.. पेजेचे.. आरोग्यदायि फायदे*



१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकुन प्यायल्यास भूक वाढते.

२)  तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.

३) तांदळाचि पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास

 रक्ताचि कमतरता दूर होते.

४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

५)  तांदळाच्या पेजेत दहि टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

६) केळे व तांदळाचि पेज एकत्र करून प्यायल्याने  जुलाब बंद  होतात, 

७)    तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.

८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास

 डायजेशन सुधारते.

९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते त्यामूळे उर्जा मिळते बाहेर जातांना पिउन जावे दिवसभर ताजेतवाने वाटते.

१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजि पेज घ्यावि, आजारपणात  आलेली कमजोरि दूर होते.

११)  उच्च रक्तदाब कमी होतो ः।  तांदळाचे पाणी  घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमि होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.

१२)  तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास  तजेलदार, मूलायम होतो,   काळे डाग निघून जातात.

१३)  केसांकरता उत्तम  टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमि, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते

 दुतोंडि केसांचि समस्या दूर होते, कारण यात  मुबलक विटामिन, मिनरल असतात.

१४)  तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशि आटोक्यात राहतात.

१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते.  त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

२६) डायरियात  डिहायड्रेशन होते अश्या वेळि तांदळाचि पातळ पेज प्यायला द्यावि. ताकद येते.

१७) सर्दि, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये

 तांदळाचे पाणि प्यायल्यास    प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

कबरबिज्जू हा असा प्राणी आहे,जो आपल्याला स्मशानात घाबरवट्टो

 कबरबिज्जू हा असा प्राणी आहे, जो साध्या जमिनीत आढळत नाही, परंतु तो केवळ स्मशानभूमीत किंवा दफनभूमीत आढळतो, तो दिसत नाही, कारण तो जमिनीच्या आत राहतो, तो मेलेल्यांना खातो, अनेकदा जेव्हा लोक  स्मशानभूमीजवळ जातात... तेथून जात असताना एखादी व्यक्ती ओरडत असल्याचा भास होतो!  हा आवाज फक्त कबरबिज्जूचा आहे, लोक घाबरतात आणि भुताचा आवाज समजतात, तो कबरबिज्जू या व्हिडिओमध्ये पहा आणि त्याचा आवाज ऐका, सर्वकाही समजेल !!


स्मशान मधील भूत, खर काय खोटं काय,


 समशनात जायला घाबरतघाबरतच जायची नाय. आपला दोस्त आहे 

उखाणा

 


मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध

 मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 25 : मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात येतीलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

            याबाबत सदस्य सुनिल राणेप्रकाश अबिटकर,सदा सरवणकरकालिदास कोळंबकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा सदस्यांची एक समिती गठीत करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीचीही छाननी करुन पात्र लोकांची यादी कालमर्यादेत तयार करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या घरांसाठी आवश्यक असणारी जागा निश्चित करुन या कामाला अधिक गती देऊन प्राधान्य देण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

उत्तर प्रदेश नवरात्र सोहळा


 

कला का री

 


Featured post

Lakshvedhi