🦯 *वय वाढेल तसे माणसाचे*
*ज्ञान, मन, अंतकरण आणि दृष्टिकोन*
व्यापक व्हायला हवा .
🦯 ज्येष्ठता ही श्रेष्ठतेकडे झुकणारी असावी, तरच ती आदरयुक्त आणि उपयुक्त ठरते.
🧟♀️ जी गोष्ट निरुपयोगी ठरते तिचा त्याग करण्याची मानसिकता आपोआप बनत जाते.
_निरुपयोगी वस्तू टाकून देणे , फेकून देणे किंवा दुर्लक्षित करणे, हा व्यवहारातील सुज्ञपणा समजला जातो_.
🤑व्यवहारात 😩भावनेला
स्थान नसते.
आजचा जमाना
हा शुद्ध व्यवहारी आहे ,
_येथे फक्त उपयुक्ततेचा विचार प्रधान आहे, येथे फक्त फायदा तोट्याचा विचार केला जातो_. ज्या व्यवहारात तोटा आहे तो करणे मूर्खपणाचे लक्षण समजले जाते .
👎🏾आजच्या जमान्यात भावनेला
शून्य किंमत आहे .
🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦽🧑🦽
🦯ज्येष्ठता अटळ आहे ,
🦯वय वाढेल तसे ती येणार आहे .
_आपली जेष्ठता ही निरुपयोगी किंवा इतरांना त्रासदायक ठरेल अशी असू नये , याची दक्षता प्रत्येक ज्येष्ठ होणाऱ्या व्यक्तीने घेतली पाहिजे_.
💄💋 *भावना/emoTions*💋💄
💃🏽आपल्यापुरती मर्यादित असावी ,
💃🏽आपली भावना आणि हट्ट इतरांवर लादू नये करण लादलेली कोणतीच गोष्ट कोणालाही , कधीही सुख देणारी नसते , त्यामुळे यांची प्रतिक्रिया 🌚तिरस्काराच्या रूपाने उमटल्याशिवाय राहत नाही .
😩 _ही तिरस्काराची प्रतिक्रिया आपल्या पोटच्या मुलांकडून, सूनांकडून, भावंडांकडून उमटली, तर ती खूप वेदनादायी असते_.
*_भावनेचा अभाव_ असल्यामुळे कोणाकडून फारशी अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाही आणि अशी अपेक्षा ठेवणाऱ्या माणसाच्या वाट्याला _मनःस्ताप , दुःख आणि अवहेलना_ या शिवाय दुसरे काही येत नाही*,
हे वास्तव एकदा मान्य झाले की
मग श्रेष्ठतेची किंमत कळते .
💰या व्यवहारी जगात
❌ज्येष्ठतेला किंमत नाही , तर
✔️ श्रेष्ठतेला किंमत आहे म्हणून
🧑🦽 माणसाने ज्येष्ठ होण्यापेक्षा
✌🏾 श्रेष्ठ होण्यासाठी प्रयत्नशील असावे .
🦯दोन पिढ्यांमधील वैचारिक आणि व्यवहारीक फरक ज्येष्ठ व्यक्तींनी मनाचा मोठेपणा करून स्वीकारला पाहिजे .
🦯आपल्या जीवनातील अनेक सुखांचा उपभोग घेऊन झालेला असतो.
मुलांना जन्म देणे, त्यांचा सांभाळ करणे, त्यांना स्थिर करणे या आपल्या जबाबदाऱ्या असतात ,
🤭त्यांना आपण उपकार समजू नये .
_मुलांना सांभाळणे , वाढविणे हा उपकार समजू लागलो तर परतफेडीची अपेक्षा मनात निर्माण होते आणि अपेक्षाभंग होताच, 😡तापटपणा करणे , रुसणे , फुगणे , 👹सर्वांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून जाईल असा हेकटपणा करणे , याने आपण सर्वांच्या मनातून उतरून जातो_,
हा वृद्धापकाळातील
सर्वात मोठा तोटा असतो .
हा तोटा ज्येष्ठतेत आपल्या वाट्याला येण्यास आपणच काही अंशी जबाबदार ठरतो .
*वय वाढेल तसे वैराग्य येणे*,
*हे श्रेष्ठतेचे लक्षण आहे*.
😡 वयाबरोबर आपला वैताग वाढत असेल तर आपण श्रेष्ठ नाही तर कनिष्ठ बनत आहोत असे निश्चित समजावे .
कनिष्ठ व्यक्तीला मिळणारी वागणूक
ही नेहमी कनिष्ठच असते .
👣 आपण काय असावे ? 👣
हे ज्याच्या त्याच्या हातात असते .
🧑🦽 वय वाढेल तसे वैराग वाढले ,
🧑🦽 कोणताच स्वार्थ उरला नाही ,
🧑🦽 अंतःकरण, दयेने आणि प्रेमाने
भरून गेले ,
🧑🦽ज्ञानाने आत्मज्ञानाची उंची गाठली ,
🧑🦽अनुभवाने परिपक्वतेची सीमा पार केली, तर
_आपली उपयुक्तता ही शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांसाठी आदरयुक्त ठरते_,
✌🏾 हेच खरे ज्येष्ठतेतील श्रेष्ठत्व आहे आणि
🙏🏻 हे नेहमी वंदनीय आणि पूजनीय
आहे , होते आणि राहणार .
😩 यात जे जेष्ठ बसत नाहीत त्यांच्या वाट्याला 🤦🏻♂️अपमान , 👹तिरस्कार आणि 💔अवहेलना निश्चित येणार . मग
ती पोटच्या कडूनही येऊ शकते किंवा
पाठच्या कडूनही येऊ शकते .
कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो I
तुका म्हणे काळ आता करू न शके बळ II
ही खरी |ज्ये|ष्ठ|ता| आहे.
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
No comments:
Post a Comment