Wednesday, 29 September 2021

 मेंढरांना त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल. (Free)


मेंढर लैच खुश झाली, आसमंतात बँबँबँबँ शिवाय दुसरा आवाज

ऐकायला मिळेना.


इतक्यात एका कोकराने आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल  .... ??


आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!


राजकीय नेते सभेत कर्जमाफी, फ्री गहू, तांदूळ, साखर, मोबाइल फोन, साईकल, लेपटॉप,  वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का हातात ? 


ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून  आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????

🤔


जाऊ दे.... 

माणसाचाही नाईलाज आहे. ....

 

माणूस माकडा पासून बनला आहे .... 


मेंढ्यां पासून नाही

🙏🏻

 [9/29, 7:04 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:-992                                                        दिनांक:- 29 सप्टेंबर 2021


*नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली जे.एन.पी.टी.- सिडको परिसराची पाहणी*


*बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्नाबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला दिले आदेश*


अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे निर्देश दिले.

       नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज बुधवार, दि.29 सप्टेंबर 2021 रोजी शिवस्मारक, जे.एन.पी.टी., उरण येथील दास्तान फाटा, द्रोणागिरी सीएफएस येथील पार्किंगच्या जागेची पाहणी केली.  त्यावेळी त्यांनी संबंधित विभागाला ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत आवश्यक ते निर्देश दिले. 

       यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिडको, जेएनपीटी आणि वाहतूक पोलीस यांच्या मदतीने नियोजन करणे आवश्यक आहे. याकरिता टप्य्याटप्प्याने वाहने सोडण्यात येणार असून सीएफएस आणि तालुक्याबाहेर जाणाऱ्या वाहनांना कलर कोड स्टिकर देण्यात येतील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास भेडसावत आहे. मात्र वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी समन्वय पथक तयार करण्यात आले आहे.  त्याचबरोबर जेएनपीटी आणि दास्तान येथील पार्किंगच्या जागेमध्ये वाहनांची नियोजनबध्द पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल.

      यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, विश्वस्त जे.एन.पी.टी. श्री.दिनेश पाटील, श्री.नरेश रहाळकर, श्री.संतोष ठाकूर, श्री.महादेव घरत, श्री.सदानंदराव भोसले, श्री.बी.एन.डाकी, श्री.गणेश शिंदे, श्री.विनोद म्हात्रे, प्रदीप ठाकूर, के.एम. घरत, अमित भगत, संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, श्री.नितेश पाटील,  श्री.हितेश पाटील, रमेश म्हात्रे, सौ. ममता पाटील, सौ.ज्योती म्हात्रे, सौ.भावना म्हात्रे, सुजाता गायकवाड, तसेच तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, सिडकोचे अधिकारी, जे.एन.पी.टी. चे अधिकारी, पोलीस अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


000000

[9/29, 7:04 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:-991                                                                      दिनांक:- 29 सप्टेंबर 2021


*रायगड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*


अलिबाग,जि.रायगड,दि. 29 (जिमाका):- शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय, ता. माणगाव, जि.रायगड या विद्यालयात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

        यावर्षी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समितीद्वारा प्राप्त झाली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती https://cbseitms.nic.in/registrationClass6/registrationClass6 व http://www.navodaya.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

       प्रवेश अर्ज निःशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालकांनी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊन इंटरनेटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. हा अर्ज भरत असताना पालकांची सही विद्यार्थ्यांची सही, फोटो आवश्यक आहे.

    सहावीसाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षेस बसणारा विद्यार्थी सलग तिसरी व चौथी पास असावा. पाचवीत संपूर्ण वर्ष रायगड जिल्हयात शिकणारा असावा. त्याचा जन्म 1 मे 2009 ते 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस पकडून) पर्यंतच असावा. 

      ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक 30 नोव्हेंबर 2021 असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत.

      ही परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. 

       अधिक माहितीसाठी (संतोष चिंचकर 9881351601) (कैलाश वाघ 9527256185) व (अण्णासाहेब पाटील 9960582046) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्री. किरण इंगळे यांनी केले आहे.

00000000

[9/29, 7:05 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:- 989                                                              दिनांक:- 29 सप्टेंबर 2021


*राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींबाबत जनजागृतीपर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न*


अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):- राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती लागवड साहित्य निर्मिती (औषधी वनस्पती रोपवाटिका), औषधी वनस्पती लागवड काढणोत्तोर व्यवस्थापन प्रक्रिया व मूल्यवर्धन इ. घटकांसाठी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि अशा शेतकऱ्यांना या घटकांचा लाभ घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हावे, यासाठी एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक आत्मा श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत आयोजित केली होती. 

या कार्यशाळेच्या माध्यमातून औषधी वनस्पती लागवड साहित्याची निर्मिती कशी करावी, औषधी वनस्पतींचे फायदे व कोणत्या वातावरणात या वनस्पती लागवड केल्यानंतर आपणास त्यापासून भरघोस उत्पन्न मिळू शकते,याबाबतचे मार्गदर्शन डॉ. दिगंबर मोकाट, प्रमुख शास्त्रज्ञ, विभागीय औषधी वनस्पती प्रोत्साहन केंद्र, पुणे विदयापीठ, पुणे यांनी केले आणि इतर काही महत्वाच्या मुद्यांवर प्रशिक्षणही दिले. तसेच औषधी वनस्पतींची लागवड, काढणी पश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत मिळणाऱ्या सबसिडी योजनेबाबत श्री.ए.आर. सासिवेकर, अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ पुणे यांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती या कार्यशाळेत दिली. त्याचप्रमाणे औषधी वनस्पती लागवड केल्यानंतर पणन (Marketing) सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील व शेतकऱ्याच्या यासंदर्भातील अडचणी याबाबत श्री. प्रशांत नायर, दातार अँड सन्स, पनवेल यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. 

      राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींच्या लागवडीकरीता अनुकूल वैविध्यपूर्ण हवामान, मानवी आरोग्याकरिता औषधी वनस्पतीचे महत्त्व, वाजवी उत्पन्न देणाऱ्या औषधी वनस्पतींची नगदी पिके, औषधी वनस्पती क्षेत्रात स्वयंरोजगार निर्मिती इत्यादी बाबींच्या अनुषंगाने औषधी वनस्पती क्षेत्र विकासास भरपूर वाव आहे. तथापि याचा विचार करता जिल्हयातील औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्याचे नियोजन राष्ट्रीय आयुष अभियान औषधी वनस्पती योजनेंतर्गत करण्यात येत आहे. 

    या कार्यक्रमास 50 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सन 2021-22 करिता रायगड जिल्ह्यात 45.90 हेक्टर लागवड क्षेत्राचे नियोजन केले असून त्याकरिता 694.80 लाख इतका निधी प्रस्तावित केला आहे,अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे.

0000000

 Only God can paint the sky like this!

This is Marine Drive, South Mumbai, on 25 September evening.

👇👇👇👇👇

 


Tuesday, 28 September 2021

 जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपीदोषविरहीत करण्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन

 

          मुंबईदि. 27 :- वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहजसोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रीगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परीषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रीगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीगटात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीयाहरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौतालाआंध्रप्रदेशचे अर्थमंत्री  बुग्गना राजेंद्रनाथआसामचे अर्थमंत्री अजंटा निओगछत्तीसगडचे व्यापार करमंत्री टी. एस. सिंगदेवओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुजारीतामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पलानीवेल थैगाराजन यांचा समावेश आहे. हा मंत्रीगट सध्याचीजीएसटी भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणेकरदात्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करणेकरवसुलीतील गैरप्रकार थांबवणे,  माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन करप्रणाली सक्षमदोषविरहीत बनवणेकेंद्र व राज्यांच्या करयंत्रणेमध्ये समन्वयासाठी यंत्रणा प्रस्थापित करणे आदी विषयांसंदर्भात वेळोवेळी शिफारशी करणार आहे. मंत्रीगटाने केलेल्या व जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या शिफारशींच्या कालबद्ध अंमलबजावणीवरही हाच मंत्रीगट लक्ष ठेवणार आहे. 17 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी  परिषदेच्या 45 व्या बैठकीनंतर हा मंत्रीगट स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आला आहे.

 गरजू व्यक्तींना मदत केल्याबद्दल राज्यपालांकडून सिंधी समाजाचा गौरव

·        सिंधी हेरिटेज फाउंडेशनच्या वतीने युवकांना स्वयंरोजगार कीट'चे वाटप

 

            मुंबई, दि. 27 : सिंधी समाजातील अनेक लोक स्वातंत्र्यानंतर स्थलांतर करून भारतात आले.  सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थिती असून देखील या समाजातील लोकांनी बुद्धीमत्ता व परिश्रमांच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली. संत झूलेलाल यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कोरोना काळात सिंधी समाजाने सर्व समाजातील गरजू व्यक्तींना केलेली मदत कौतुकास्पद आहेअसे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

            सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्‍या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व्यक्तींना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारतकीट देण्याच्या उपक्रमाचा आरंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. २७) राजभवन येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी आमदार संजय केळकरआमदार गणपत गायकवाडसिंधी हेरीटेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नारायण बबलानीआंतरराष्ट्रीय अध्यक्ष मुकेश बजाजमहिला अध्यक्षा दिव्या बजाज आदी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

            कोरोना संकटाप्रमाणे अतिवृष्टीभूस्खलनचक्रीवादळ यांसारखी संकटे अधून मधून येत असतात. अश्यावेळी केवळ सरकारकडून मदतीची अपेक्षा न करता समाजातील दानशूर लोकांनी परोपकाराचे काम केले पाहिजे असे सांगून सर्व समाजाने एकत्रितपणे काम केल्यास कोरोनासारख्या कोणत्याही संकटाचा समर्थपणे सामना करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

            कोरोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था सावरत असून देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने अग्रेसर होत आहे असे सांगून ७२० बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार कीट देण्याच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या निर्णयाचे राज्यपालांनी कौतुक केले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते आमदार संजय केळकरआमदार कुमार आयलानीआमदारगणपत गायकवाडडॉ.गुरुमुख जगवाणीथंडाराम तोलानीरमेश बजाजदयाल हरजानीअनिला सुंदरकाजल चंदिरामाणीअजीत मन्यालडॉ.मनीष मिराणीमुरली अदनानीराजू खेतवानीदिनेश तहलियानीजीतू जगवानीप्रेम भारतीय व उल्हासनगरच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

0000

 

Corona Warriors Felicitated

Governor presents Atmanirbhar Bharat Kits to unemployed youths

 

            Governor Bhagat Singh Koshyari presented Atmanirbhar Bharat 'Self Employment' Kits to youths at a function organized by the Sindhi Heritage Foundation at Raj Bhavan, Mumbai on Monday (27th Sept).

            The Governor also felicitated Corona Warriors on the occasion. MLA Sanjay Kelkar, Founder President of the Sindhi Heritage Foundation Narayan Bablani, International President Mukesh Bajaj and Divya Bajaj were present.

            The Governor felicitated Sanjay Kelkar, MLA, Kumar Ailani, MLA, Ganpat Gaikwad, MLA, Thadaram Tolani, Dr. Gurumukh Jagwani, Ramesh Bajaj, Dayal Harjani, Anila Sunder, Kajal Chandiramani, Dr. Ajeet Manyal, Dr. Manish Mirani, Murli Adnani, Raju Khetwani, Dinesh Tahliyani, Jeetu Jagwani, Prem Bhartiya and members of the Ulhasnagar team of Sindhi Heritage Foundation on the occasion.

0000

 पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

          मुंबईदि. 27 :- कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजेइतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे असे सांगतानामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल असे जाहीर केले. राज्यातील पर्यटनाचे वैभव जपाजोपासावाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित कराअसे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी सांगितले.

            महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेपर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंहएमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोजपर्यटन संचालक मिलींद बोरीकर आदी उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री कु. अदिती तटकरे कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होत्या.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेकोविडचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. तथापि या कालावधीत विभागाने कोविडनंतर पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठीचे धोरण आणि नियोजन केले. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. या निमित्ताने आजवर दुर्लक्षित असलेल्या विभागाचे महत्व अधोरेखित झाले आहे. आपण आपले वैभव जगासमोर आणत आहोत. नवीन पर्यटन स्थळेही विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या सुरू असलेल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जगासमोर येईलअसा विश्वास व्यक्त करून सरकार कायम चांगल्या योजनांच्या पाठिशी राहीलअसेही त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'सर्वांगीण विकासासाठी पर्यटनहे घोषवाक्य सर्वार्थाने सार्थ ठरवणारी वाटचाल सुरू असल्याबद्दल पर्यटन विभागाचे कौतुक केले. श्री.पवार म्हणाले, राज्यात गड किल्लेकिनारपट्टीसाहसी पर्यटनधार्मिक स्थळेशैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत असलेल्या चिपी विमानतळाचा कोकणातील पर्यटनाला निश्चितच फायदा होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटकांनी आधी महाराष्ट्र फिरावात्यानंतर इतरत्र जावेअसे आवाहनही त्यांनी केले. पर्यटन विभागाला गरजेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईलअसे त्यांनी सांगितले.

            महसूलमंत्री श्री.थोरात यांनी पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देताना राज्यात पर्यटन विकासाच्या सर्व बाजूंचा विचार होत असल्याबद्दल विभागाचे कौतुक केले. इतर देशांपेक्षा आपल्याकडे खूप काही आहेहे जगाला दाखवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणापासून विदर्भापर्यंत असलेली विविधता जगासमोर आणताना स्थानिकांना विविध मार्गांनी रोजगाराच्या संधी निर्माण करून द्याव्यातअसे आवाहन त्यांनी केले.

            पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोविड नंतर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या ८० वरून १० वर आणली१५ ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होती त्याऐवजी आता केवळ नऊ स्व-प्रमाणपत्र आवश्यक केले. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. चिपी विमानतळापाठोपाठ कोकणात जागतिक दर्जाचे हॉटेल व्यावसायिक येण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्य आहेते जपत पुढील काही वर्षात 'महा'राष्ट्र खऱ्या अर्थाने जगाला दाखवून देऊअसा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

            पर्यटन राज्यमंत्री कु.अदिती तटकरे यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे शुभेच्छा देताना सध्या विभागामार्फत आखलेल्या योजना आणि धोरणांचा भविष्यात पर्यटन विकासाला निश्चित लाभ होईलअसा विश्वास व्यक्त केला. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पर्यटन अधिकारी उपलब्ध असावेतअसेही त्यांनी नमूद केले.

            पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी विभागाच्या विविध प्रकल्पांची माहिती देऊन विभागाच्या वाटचालीचा आढावा घेतला. महाराष्ट्र ही विविध संधींची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारतातच नव्हे तर जगभरात पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिकआर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा विकास होत आहे. यासंदर्भात जागृती निर्माण करत पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेतर्फे (UNWTO) ‘पर्यटनातून सर्वांगीण विकास’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे.

            आजच्या कार्यक्रमादरम्यान मुंबई उच्च न्यायालय व मुंबई विद्यापीठाच्या इमारतींची ऐतिहासिक वारसा सफर या उपक्रमाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यानुसारआता शनिवारी व रविवारी मुंबई उच्च न्यायालय तर सार्वजनिक सुट्या व सर्व रविवारी मुंबई विद्यापीठाच्या वास्तूत पर्यटकांना प्रवेश खुला केला जाणार आहे. ही संपूर्ण सहल टूर गाईड असोसिएशन प्रमाणित मार्गदर्शकांच्या सहकार्याने पार पडेल. 

संकेतस्थळ व ॲपचे उद्घाटन

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनाच्या सुधारित संकेतस्थळाचे व महाराष्ट्र टुरिझम या मोबाईल ॲपचेसुद्धा उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळाच्या सुधारित आवृत्तीत मराठी भाषेसह एकूण ९ विविध भाषांमध्ये पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील तब्बल ३५० पर्यटनस्थळांची थीम नुसार वर्गीकृत करून माहिती देण्यात आली आहे.

            यावेळी पर्यटन संचालनालयाच्या कोकण पर्यटन विभागाच्या बेलापूरनवी मुंबई येथील नव्या कार्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील सहा विभागातील आकर्षक रंगछटांनी रंगवलेल्या सहा पर्यटन भिंतींचेही अनावरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात प्रत्येक प्रदेशातील पर्यटक आकर्षणेऐतिहासिक वारसास्थळेख्यात व्यक्तीकला आणि संस्कृतींचा मेळ घालणाऱ्या सुंदर कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते IITF (Incredible India Tourism Facilitator) अभ्यासक्रमांतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना तसेच फोटोग्राफी स्पर्धेतील व महाराष्ट्राचा मास्टरशेफ स्पर्धेतील विजेत्यांपैकी प्रत्येकी दोन विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर पर्यटन संचालनालयाचे सह संचालक डॉ. धनंजय सावळकर व पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी मागील काळात आखलेल्या नवनवीन योजना व त्यांच्या अंमलबजावणीसाठी तसेच पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध विकासकार्यांसाठी केलेल्या कामाचे विशेष कौतुक करत त्यांचाही सत्कार करण्यात आला.

            प्रारंभी पर्यटन संचालनालयाद्वारे ऑगस्ट महिन्यात जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त समाज माध्यमाद्वारे  आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र थ्रू माय लेन्स'  या फोटोग्राफी स्पर्धेतील स्पर्धकांच्या विजेत्या फोटो  प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले.

            पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी प्रास्ताविकाद्वारे पर्यटन संचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर सह संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आभार मानले.

 ठाण्यात अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागा होणार निश्चित

·       ठाण्यातील वाहतूक कोंडीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल

·       पोलीसमनपा अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक

·       पालकमंत्री बुधवारी करणार पाहणी

·       नवी मुंबईखारेगावशहापूरदापचारी येथे होणार पार्किंग लॉट

          ठाणेदि. 27 :  ठाणे शहरातील मुख्य महामार्ग व घोडबंदर रस्त्यावर सोमवारी पुन्हा झालेल्या वाहतूक कोंडीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली आणि अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे आदेश दिले. श्री. शिंदे बुधवारी स्वतः नवी मुंबईखारेगावशहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहणी करणार आहेत.

            ठाणे शहरात गेल्या काही दिवसात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डेशहरात चालू असलेली विकासकामे यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवे पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणे मार्गे पुढे जात होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूककोंडी होऊन त्यात नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत होते. त्यातच सोमवारी मध्यरात्री टँकर उलटल्यामुळे पुन्हा एकदा घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ठाणे पोलिसवाहतूक पोलिसग्रामीण पोलिसठाणे महापालिका आदी यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीस ठाणे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमानेठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विनय राठोडमीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागरठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रोडवर गायमुख येथे तेल वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे सोमवारी वाहतूक कोंडी झाल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

            रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत अवजड वाहने शहराच्या बाहेर पार्किंग लॉट तयार करून तिथे अडवून टप्प्या-टप्प्याने पुढे सोडण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसारबुधवारी या जागांची पालकमंत्री श्री. शिंदे पाहणी करणार आहेत. 

            जेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील पार्किंग लॉटमध्ये थांबवण्यात येणार आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने थांबवण्यासाठी खर्डी-सोनाळे-दापोडे येथेअहमदाबाद येथून मुंबईत येणारी वाहने दापचारी येथे तर ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोल नाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अवजड वाहने रोखून वाहतूक विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या  टप्याटप्याने ही वाहने शहरात सोडण्यात येतीलजेणेकरून वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होईल. पालकमंत्री शिंदे हे स्वतः या नियोजित पार्किंग लॉटच्या जागांची पहाणी करणार असून त्यानंतर या पार्किंगच्या जागावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

            ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हे नियोजन असेल. त्यामुळे ठाणे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

००००

 मुंबई ते हैद्राबादपुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

·       जालनानांदेडनाशिकला मोठा फायदा

 

          मुंबई, दि. 27 : मुंबई नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला  गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

          मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात कीप्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेडमार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल.

          याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिकलाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई नाशिक- औरंगाबाद हे एकमेकाना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैद्राबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणे देखील हाय स्पीड ने जोडले जाणार आहेत. याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित  केला आहे. त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकांना जोडली जाऊन उद्योग व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल.   

Monday, 27 September 2021

Market funda

 *🌼 🌼 नवरात्र व मार्केटिंग फंडे 🌼🌼*


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन अाज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतोय.


काल प्रसिध्द हिंदुत्ववादी लेखक तसेच भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉ.सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांति ज्योतिषरत्न डॉ. गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे.


परवा पासुन चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व एक विचारणा केली की "गुरुजी, नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात  आणि देवीची व नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत. हे सत्य आहे का?"


काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले - गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते दागीने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिलय का? असे विचारले.


गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि "लक्ष्मी प्राप्त" होईल अशाही चर्चा होताहेत. यात सत्यता आहे का? गुरुजी धर्मशास्त्रात हे दिलय का? असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतोय.  


मुंबई येथील सौ. सावंत नावाच्या महिलेने सांगीतले कि त्यांच्या ऑफीस मध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या व त्याला अनुसरुन मँचींग बांगड्या कानातले वगैरे अलंकार घालावेत असं ठरतेय.  "मी गरीब आहे. शिपाई पदावर काम करते. नवरा सतत आजारी असतो. मी एवढा खर्च करु शकत नाही तेव्हा मी काय करु ? देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर?"  हा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलोच व मनाशी ठाम ठरवले की यावर एक लेख द्यावाच.


चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथ,  जवऴपास साठ स्मृतिग्रंथ यांत कोठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परीधान करा  अस दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परीधान करा. सकच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम असे दिले आहे. जे तुमच्या जवऴ अलंकार असतील ते घाला. त्यांत मँचींग हवंच अस नाही.


मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरुन हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केलाय व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बिभत्सपणा आलाय. 


प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. उदा.महाराष्ट्रात "घटस्थापना " ही प्रधान असते . त्याच सोबत अखंड नंदादिप, त्रिकाऴ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी पूजन, कुमारीका पूजन व भोजन व माऴा बांधणे इत्यादी पध्दतीने नवरात्र होते. ललीता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होम हवन, सरस्वती आवाहन पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र व गोवा प्रांतात असतात.

कर्नाटकात दसरा मोठा असतो. 

कच्छ - सौराष्ट्र - गुजराथ प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करुन रात्री जागरण, गरबा तसेच होम हवन वगैरे पध्दतीने हा उत्सव करतात.

प.बंगाल मध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.


इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात - सरमिसळ करतात व नवीनच पध्दत निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो व त्यात देवीची उपासना हा सर्वात महत्त्वाचा व मुख्य भागच नसतो.


प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट असते - परंपरा असतात, त्या जपल्याच  पाहिजे. अन्यथा काही वर्षांनी आपली मुले व नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा दांडिया खेऴणे एवढाच घेतील. मातृशक्तीचा उत्सव हा त्यांना कऴणारच नाही. मी हिंदू आहे म्हणजे माझे आचार, विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा मला  एकदा विसर पडला की गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा काहीच फरक पडणार नाही. माझे धर्मांतर करणे अगदी सहज सोपे व सुलभ होणार. नेमकी हिच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे. यात काहीहि झाले तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.


एखाद्या गरीब भगिनीला हे "हाय फाय" नवरात्र जमणार नाही. ती देवी पूजन करणार नाही. म्हणजे हऴुहऴु ती नास्तिक होईल. यांच धर्मांतर करण अगदीच सोपे. 

श्रीमंती, धर्मशिक्षणाचा अभाव व मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या "डिजे व गरबा दांडियाला"  नवरात्र समजतील कारण यांनाही नवरात्र म्हणजे देवी उपासना हे माहितीच नाहीय. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल.

थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल व याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदू समाजच कारणीभूत आहे.


काही वर्षांपूर्वी "डे "संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा  "गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या " आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे "डे "च खूऴ डोक्यात शिरलय. चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना गणपती, गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगाव लागते पण हे "डे " मात्र ते पक्के लक्षात ठेवतात.

गोकुळाष्टमी ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच "डिजे व मद्यमय "झाली आहे. किमान आईचा उत्सव असा होता कामा नये असे वाटतेय.


चंड मुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारुन त्यांचा उत्पात शमन करुन जगदंबेने जी  विश्रांती घेतली त्याचा काऴ हा नवरात्र आहे. या युध्दाचा शिण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युध्द करतच नाही - केवऴ नाचतो) 

या काळात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही रुपांतील देवीची सेवा करणे. आपल्या परंपरेनुसार नंदादिप, माऴ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडुन सरस्वतीची उपासना ही विद्या व बुध्दि करता करुन घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रू संहार सामर्थ्यप्राप्ती करता महाकालीची उपासना करावी.


मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिऴवुन उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणार्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे या करता देवीचे माहात्म्य व पराक्रम वाचावेत तसेच ऐकावेत. आज काऴाची ही गरज आहे. हिरॉईनसारखे नाचण्यापेक्षा महाकाली सारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरच्या चिन्नमा, जिजाबाईं सारखा पराक्रम दाखवण्याची ही वेऴ आहे व आज गरज त्याचीच आहे. नाचणारे खूप झालेत पण पराक्रमी मात्र कमी होताहेत.

या दांडिया व गरब्याच्या काऴात "संतति नियमनाच्या साधनांची" विक्री दुप्पट होतेय व नंतर शालेय व कॉलेज तरुणींचॆ गर्भपात प्रमाणही वाढतेय. या बाबत काही सेवाभावी संस्थानी सर्व्हे करुन अहवाल सादर केलेत.


लव्ह जिहाद याच काऴात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुला मुलींना या धोक्यांची जाणीव करुन देणे हे कर्तव्य आपले आहे.


तेव्हा या मार्केटिंग व इव्हेंट फंड्यांना बऴी न पडता सात्विकपणे आनंदाने आपल्या परिस्थितीनुरुप जगदंबेची सेवा करा व देवीची कृपा प्राप्त करावी हि विनंती.

वरील माहितीत काही चुकीचे असेल तर क्षमस्व!


वेदभूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले 9404170656


(वरील लेख लेखकाच्या नावागावा सहित अन्य समुहावर देउ शकता याने तात्विक समाधान लाभेल व चौर्यकर्म पातक लागणार नाहि)

##Cp

 *अतिशय गहन अर्थ आहे....!*


*" चिटी  चावल  ले  चली,*

*बीच  में  मिल  गई  दाल।*

*कहे  कबीर  दो  ना  मिले,*

*इक ले , इक डाल॥"* 👌🏻


अर्थात : 


"मुंगी "तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.


तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'


तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.


माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात. 


साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'


विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.


ती बघून, 'घेशील किती दोन करांनी'  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात. 


पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)


आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.


भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. *नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.*


देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर *एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं,* यासाठी आहेत. *नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.*


म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे "समतोल" तर टिकून राहतोच, माणसाचं "समाधान आणि आनंद"ही त्यामुळे टिकावू बनतो. 


*कबीरांच्या या दोह्यात असा मोठा "अर्थ "दडला आहे.*


*चला तर मग आनंदी जगुया....*

*🌷🌷श्री स्वामी समर्थ🌷🌷*

 कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन

           -कृषी मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. 26:- कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी  क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईलअसे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

किन्हई येथे श्री. भुसे यांच्या हस्ते पिक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश शिंदेप्रा. नितीन बानुगडे-पाटीलजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, राहूल बर्गे तसेच शेतकरी उपस्थित होते.

             श्री. भुसे म्हणालेसेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरणासाठी कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन कृषी विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे असून शेतकरी गटमहिला बचत गट यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मदत केली जाईल. शेतकरी महिलांसाठी कृषी विभागाच्या 30 टक्के योजना आहेत त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
            कोरोना संसर्गामुळे देशासह राज्यात निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था संभाळण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या अनेक योजना असून त्यांचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे-जे शक्य आहे ते शासनाकडून केले जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.

            आमदार श्री. शिंदे म्हणालेसातारा जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसायाकडेही वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन त्यात मस्त्य शेती करावी.
            यावेळी श्री.बानुगडे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

  000


 

 

 *अहंकार आणि*

    *गैरसमज , या दोन गोष्टी*

        *माणसाला त्याचा मिञ*

    *आणि आप्तेष्टापासून दूर*

              *करतात*

    *गैरसमज त्याला सत्य ऐकू*

    *देत नाही आणि अहंकार*

    *त्याला सत्य पाहू देत*

             *नाही !!!*


      🌹 *सुप्रभात*🌹

Daughter's day


 

Daughters day

 


Daughter's day


 

Daughter's day

Sunday, 26 September 2021

Daughter's day

 


Daughter's day


 

Daughter's day



 

Daughter's day



 

Daughter's day

 


Happy daughter's day



 

Happy daughter's day



 

Tourism


 

Election? selection

 नेहरूंचे लोकशाहीवरील अजब प्रेम. प्रसाद क्षीरसागर यांची पोस्ट


*नेहरूंच्या काळातील व नेहरूंच्या आदेशाने घडलेली पहिली बुथ कॕप्चरिंगची कथा*


देशातील पहिली लोकसभा निवडणूक....लोकसभा मतदारसंघ रामपूर, उत्तरप्रदेश (आत्ता आजम खान व जयाप्रदा उभे आहेत तो मतदारसंघ..) *काँग्रेसकडून मौलाना अब्दुल कलाम आझाद उभे होते.*

*त्यांच्याविरोधात हिंदू महासभेचे विशनचंद सेठ उभे होते.* जवाहरलाल नेहरूंनी रामपूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण जोर लावला होता...कारण मौलानांचे व नेहरूंचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते..

मात्र, मतमोजणी झाल्यावर मौलाना अबूल कलाम आझाद साधारण ८००० मतांनी पडल्याचे  लाउडस्पीकरवरून जाहीर झाले. 

हिंदू महासभेच्या विशनचंद सेठ व त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला...जल्लोश सुरू होता...मिरवणूक निघाली..

इकडे रामपूर कलेक्टरकडून मौलान आझाद पडल्याची बातमी लखनौला व तिथून दिल्लीला पोचली. 

बातमी ऐकताच नेहरूंचे पित्त खवळले...

दिल्लीहून जवाहरलाल नेहरूंचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रींना (गोविंद वल्लभ पंत) फोन आला...जवाहरलाल म्हणाले,

"गोविंदजी आपको आज रात तक समय है...कुछ भी करीये..मौलाना जितने चाहिये..वर्ना इस्तेफा तैयार रखे..."

गोविंद पंतांचे धाबेच दणाणले...त्यांनी रामपूर कलेक्टरला फोन केला...काहीही करा...मौलाना विजयी झाले पाहिजेत...कलेक्टर म्हणाले..निकाल जाहीर केलाय..आता कसा बदलू...? ते तुमचे तुम्ही पाहा...मला संध्याकाळच्या आत मौलाना विजयी झाल्याचा फोन तुमच्याकडून आला पाहिजे...नाहीतर.....


कलेक्टरसाहेबांनी आपल्या अधिकाऱ्याला शंभूनाथ टंडनला बोलावले व असतील तिथून विशनचंद सेठला इकडे घेऊन या असा आदेश दिला...

शंभुनाथ टंडन रामपूर कलेक्टर अॉफिसमधे सुचना विभाग पाहात होते...टंडन विशनचंद सेठ यांच्या विजय मिरवणूकीत गेले...व कलेक्टर साहेबांचा निरोप सांगितला...विशनचंद सेठ कलेक्टर अॉफिसमधे आले...कलेक्टरसाहेब म्हणाले," फेरमोजणीचा अर्ज आला आहे...तेव्हा परत एकदा मोजणी केल्यानंतर फायनल निकाल जाहीर होईल. विशनचंदांना आश्चर्य वाटले...तुम्हीच तर मोजणी केलीय...तुम्हीच निकाल जाहीर केला...आता म्हणता फेरमोजणी करायची...कसं शक्य आहे...? माझे कार्यकर्ते तिकडं माझ्या विजयाच्या मिरवणूकीत आहेत....बुथ प्रतिनिधीला बोलावून आणणे शक्य नाही...

कलेक्टरसाहेब म्हणाले...ते काही मला सांगू नका...आधीचा निकाल रद्द करतोय...व फेरमोजणीचा आदेश देतोय...


त्याकाळी मतदान कसं व्हायचे ते समजून घ्यावे...

सगळ्या उमेदवारांचा समान बॕलेट पेपर असायचा..बॕलेट पेपरवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर शिक्का मारायची पद्धती नव्हती....तर प्रत्येक उमेदवाराची वेगवेगळी मतपेटी असायची...म्हणजे मला काँग्रेसला मत द्यायचे आहे तर मी बॕलेट पेपर घेऊन फक्त काँग्रेसच्या मतपेटीत टाकायचे....झाले मतदान..


तर, आता कलेक्टरसाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या (शंभुनाथ टंडन व इतर) मदतीने काय केले....तर हिंदू महासभेच्या व काँग्रेसच्या मतपेट्या उघडल्या त्यातील बॕलेट पेपर एकत्रित सतरंजीवर टाकले....बिशनचंद यांनी आक्षेप घेतला....तेव्हा अत्यंत नम्रपणे विनवणीच्या स्वरात कलेक्टरसाहेब म्हणाले...दिल्लीवरून आदेश आहे....तुम्हाला हरावच लागेल.....आमचा नाइलाज आहे...आमच्या नोकरीचा प्रश्न आहे....जास्तीतजास्त बॕलेट पेपर काँग्रेसच्या मतपेट्यात भरले...व मतपेट्या परत सील केल्या...हे सगळे कृत्य बिशनचंद सेठ यांच्या समोरच केले गेले...बिशनचंद सेठ हतबल होते...


संध्याकाळी फेरमतदानानंतर काँग्रेस उमेदवार मौलाना अबूल कलाम आझाद २००० मतांनी जिंकल्याचे जाहीर केले.....!


देशातील पहिली बुथ कॕप्चरींग कथा समाप्त.




- प्रसाद राजन् क्षीरसागर


*संदर्भ- स्व. विशनचंद सेठ यांच्या स्मृती प्रित्यर्थ १८ नोव्हेंबर २००५ साली अटलजींच्या हस्ते प्रकाशीत* 

*'हिंदुत्व के पुरोधा' ग्रंथातील शंभुनाथ टंडन यांचा लेख...लेखाचे नाव,*

*"जब भईये विशन सेठ ने मौलाना आजाद को धूल चटाई थी, भारत के इतिहास की एक अनजान घटना")*


*म्हणजे हा लेखही कोणी लिहिला आहे तर तो शंभूनाथ टंडन यांनी म्हणजे या प्रकरणाचे साक्षीदार असलेल्या सरकारी अधिकार्‍याने.*

Featured post

Lakshvedhi