Friday, 1 November 2024

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त

 मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी

सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च  निवडणूक निरीक्षक नियुक्त

 

मुंबईदि. ०१ :  मा.भारत निवडणूक आयोगामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी सर्वसाधारणपोलीस आणि खर्च  निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच सर्वसाधारणदोन खर्च आणि एक पोलिस निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.धारावी व सायन कोळीवाडा या मतदार संघासाठी  सत्यप्रकाश टी. एल. (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१६९६४०२ आणि ई-मेल आयडी dharavisionkoliwadagenobserver@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. वडाळा व  माहिम या मतदार संघासाठी हिमांशू गुप्ता (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ८९२८७९३६०१ आणि ई-मेल आयडी wadalamahim genobserver@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. वरळी व शिवडी या मतदार संघासाठी समीर वर्मा (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१३८१८३२ आणि ई-मेल आयडी worlishivadigenobserver@gmail.com हा आहे. नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. भायखळा व मलबार हिल या मतदार संघासाठी अंजना एम.(भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ९१३७३७२५४३ आणि ई-मेल आयडी bycullamalabarhill genobserver@gmail.com  हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. मुंबादेवी व कुलाबा या मतदार संघासाठी शिल्पा शिंदे (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ९१३७३७८१८३ आणि ई-मेल आयडी mumbadevicolaba genobserver@gmail.com हा आहे. यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ असणार वाजेपर्यंत आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक पोनुगुंतला रामजी (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण एलवीन गेस्ट हाऊसहेन्री रोडअपोलो बंदरमुंबई असून संपर्क क्रमांक  ८५९१७४३२६८ आणि ई-मेल आयडी observerpolicemumbaicity@gmail.com हा आहे. नागरिकांनी भेटण्याची वेळ दुपारी १२ ते  १ वाजेपर्यंत असणार आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील धारावीसायन कोळीवाडा,वडाळामाहिमवरळी या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता (भा.राजस्व सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ९३२४४००२१६ आणि ई-मेल आयडी exp178to182@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. शिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रित (भा.राजस्व सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई असून संपर्क क्रमांक ९३२४४७४०७३ आणि ई-मेल आयडी  exp183to187 @gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांवर केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) प्रत्यक्ष उपस्थित राहून  पाहणी करतील. केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभागकायदा– सुव्यवस्था याबाबत  हे निरीक्षक आयोगाला अहवाल सादर करतील. केंद्रीय खर्च निरीक्षक उमेदवारांच्या खर्चाची तपासणीबाबत कामकाज पाहणार आहेत.

0000

*एकनाथांचे सहस्त्रभोजन*

 *एकनाथांचे सहस्त्रभोजन*


पैठणमध्ये एक वृद्ध स्त्री रहात होती. नवरा हयात असताना त्या स्त्रीने सहस्त्रभोजनाचा संकल्प सोडला होता. परंतु काही कारणाने तो पूर्ण होऊ शकला नाही. तिच्या मनाला मोठी रुखरुख लागून राहिली होती. ती दररोज नाथांचे वाड्यात प्रवचन ऐकावयाला येत असे. एक दिवस प्रवचनात नाथ बोलून गेले की एका विद्वान पंडीतास जेऊ घातले तर सहस्त्रभोजनाचे पुण्य लाभते. ते वाक्य तिच्या लक्षात राहिले आणि तिला तिच्या संकल्पाची आठवण झाली. एके दिवशी नाथांचे प्रवचन संपल्यावर ती वृद्ध स्त्री नाथांच्या जवळ येऊन त्यांना नमस्कार करून म्हणाली, "आपण माझे घरी भोजनास यावे अशी विनंती करायला मी आले आहे, महाराज मी सहस्त्र भोजनाचा संकल्प केला होता, पण यजमान नाहीत त्यामुळे तो आता काही पूर्ण होईल असे मला वाटत नाही.' नाथ म्हणाले आपण शुद्ध मनाने निर्हेतुकपणे संकल्प सोडला असेल तर त्याची काळजी श्रीहरिला! मी येईन बरे! आपल्या मदतीसाठी मी माझ्या मुलास, हरिपंडीतास पाठवून देतो. त्या वृद्ध स्त्रीने नाथांना आमंत्रण दिले कारण नाथ विद्वान होते, पंडीत होते, ब्रह्मवेत्ते होते. नाथांनी भोजनाचे आमंत्रण स्वीकारले आणि रात्री स्वतःच्या मुलास, हरिपंडीतास सांगितले की त्या बाई वृद्ध आहेत, तेंव्हा तूच त्यांच्या घरी जाऊन स्वयंपाकाची सिद्धता कर. हरिपंडीत काशीस जाऊन शिकून पंडीत होऊन परतला होता. पण काही कारणांनी तो वडीलांवर नाराज होता. त्यातले एक कारण म्हणजे नाथ वाड्यात जे प्रवचन करीत असत ते प्राकृत भाषेत करीत असत कारण बहुजनास तीच भाषा समजते. प्राकृत भाषेत प्रवचन करायला हरिपंडीताचा विरोध होता. दुसरे कारण म्हणजे नाथ कोणताही भेदाभेद मानत नव्हते. हा ब्राह्मण, हा हरिजन, तो अस्पृश्य असं मानत नव्हते. हरीजनांच्या, अस्पृश्यांच्या घरी भोजनास जात होते. नाथांचे एकच सांगणे होते, आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. हा उच्च तो हीन हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही. हरिपंडीतास हे मान्य नाही, हे नाथ जाणून होते. म्हणून त्यांनी हरिपंडीताचा अभिमान दूर करण्याचे ठरविले. दुसरे दिवशी पहाटेस लवकर उठून हरिपंडीत त्या वृद्ध स्त्रीच्या घरी स्वयंपाक करण्यास गेला. मध्यान्हसमयी स्वयंपाकाची सिद्धता झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून नाथांना बोलावण्यास घरी गेला. त्याचेबरोबर नाथ त्या वृद्ध स्त्रीच्या घरी आले. त्या स्त्रीने नाथांना बसावयास पाट मांडला. हरिपंडिताने पत्रावळ मांडली. त्या वृद्ध स्त्रीने आग्रह करून नाथांना जेवावयास वाढले. जेवण झाल्यावर नाथांनी हरिपंडितास सांगितले की, आता पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेव. हरिपंडिताने नाथांची पत्रावळ बाहेर नेऊन ठेवली आणि  परत घरात आला आणि पाहिले तर नाथ जेवले तिथे पुन्हा दुसरी पत्रावळ दिसली. जवळ जाऊन पाहिले तर नुकतेच कोणीतरी जेऊन गेले आहे. हरिपंडितास आश्चर्य वाटले. आताच तर आपण पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेवली होती.  हरिपंडिताने ती दुसरीही पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेवली आणि घरात आला तर तिसरी पत्रावळ दिसली. ती ही बाहेर नेऊन ठवली तर चौथी पत्रावळ हजर. हरिपंडीताने अशा हजार पत्रावळी उचलून बाहेर ठेवल्या. नाथ विस्मयचकित होऊन पहात राहिले. त्या वृद्ध स्त्रीस ही आश्चर्य वाटले. जेवायला तर नाथ महाराज एकटेच बसले होते. पण भोजन घेऊन गेलेल्यांच्या पत्रावळी एक हजार कशा झाल्या? त्या वृद्ध स्त्रीस सहस्त्र भोजन घातल्याचा आनंद झाला. हरिपंडीतास वडीलांचा अधिकार कळून आला. क्षणात नतमस्तक होउन त्याने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, "तात, मी चुकलो. आपला अधिकार खूप मोठा आहे हे आज समजले. काशीस जाऊन कोणी मोठा होत नसतो." नाथांनी खाली वाकून मुलाला पोटाशी धरले. हरीपंडीताचा गर्वहरण झाला. वृथा अभिमान दूर झाला. नाथांच्या डोळ्यात पाणी आले. गहिवरून नाथ म्हणाले, "श्रीहरी, आपण सहस्त्र वेळा येऊन भोजन घेतलेत आणि मज पामरास एकदाही दर्शन दिले नाहीत, माझेकडून काही प्रमाद घडला का?" 


द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी | पाणी वाहे कावडीने |

श्रीखंड्या चंदन उगाळुनी | वस्त्र गंगातीरी धुतसे |

पांडुरंग हरी | वासुदेव हरी ||

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या 2062 तक्रारी प्राप्त; यापैकी 2059 निकाली 234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या 2062 तक्रारी प्राप्त;

यापैकी 2059 निकाली

 

234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

            मुंबईदि. 1 : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 15  ऑक्टोबर ते  1 नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2062 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2059 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 

 

            सजग नागरिकांना  आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 234 कोटी 49 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

 

 

0

माझ्या निवृत्त मित्रांनो🥰

 *माझ्या निवृत्त मित्रांनो🥰*

आपण सारे आता वयाच्या एका सुंदर वळणावर पोहोचलो आहोत, आपण आता अधिकच आकर्षक दिसू लागलो आहोत. आपण लहान असताना आपल्यापाशी जे जे काही हवं असं आपल्याला वाटायचं ते ते सगळं काही आज आपल्यापाशी आहे

आपण आता शाळेत जात नाही किंवा कामालाही जात नाही आपल्याला आता दरमहा एक ठराविक रक्कम निवृत्ती भत्ता म्हणून मिळायला लागलेली आहे.

घरून बाहेर पडल्यानंतर आपल्याला एका ठराविक वेळेतच घरी परतायची अट आता असत नाही. आपल्यापैकी काही जणांपाशी अजूनही वाहन चालवण्याचा परवाना असेलच आणि त्यांच्यापाशी स्वतःची चार चाकी किंवा स्कूटर तरी असतेच.


म्हणजे आपलं आयुष्य आता सुंदर झालेलं आहे!


आता आपण विश्वास बसणार नाही इतके चुणचुणीत आलो आहोत. आता आपली बुद्धी काहीशी मंद झाल्या सारखी वाटते कारण आपल्या डोक्यात भरपूर माहिती साठवल्या गेली आहे. 

आपल्या डोक्यात आजवरच्या बऱ्याच गोष्टी साठवल्या गेल्या असतात त्यामुळे आपल्या कानाच्या आतील बाजूस दबाव येत असतो. या दबावामुळे आता आपल्याला कधी कधी ऐकण्याचा त्रास होऊ लागतो. हे म्हणजे संगणकातल्या हार्ड डिस्क सारखं असतं. संगणकातली हार्ड डिस्कवर जेव्हा बऱ्याच फाइल्स त्यात जमा होतात तेव्हा तिचा वेग मंदावतो तसंच आहे हे. 


आपली बुद्धी मंद झालेली नसते परंतु आपल्या मेंदूत प्रचंड माहिती संकलित झालेली असते. आपल्या वयाच्या काही लोकांना असा अनुभव येतो की कधीकधी आपण आपल्या खोलीमध्ये नुसत्याच येरझाऱ्या मारत राहतो आणि आपण काहीतरी शोधत असतो परंतु ते कुठे ठेवलेलं आहे ते आपल्याला आठवत नाही.


याचा स्मृति गमावण्याशी कुठलाही संबंध नाही!

आपण अधिक काळासाठी कार्यरत राहावं या हेतून निसर्गानंच ती व्यवस्था केलेली असते.


साठ वर्षावरील प्रत्येकासाठी:


कुठलं अन्न आहारात असावं:

१. फळे आणि हिरव्या भाज्या.

२. समुद्री खाद्य. विशेषत्वाने मासे,

३. काजू

४. अंडी 

५. बदाम  

६. शुद्ध ऑलिव्ह तेल

७. चिकन 

8. आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे स्वास्थ्यवर्धक अन्न.


पुढील तीन गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करायचा:

१. वय 

२. भूतकाळ

३. संताप


चार महत्त्वपूर्ण गोष्टी:

१. परिवार

२. मित्र

३. सकारात्मक विचार

४. वर्तमानात जगणे


करायलाच हव्या अशा गोष्टी:

१. भरपूर हसा.

२. खेळा पण झेपेल इतकच.

३. मित्रांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. (फक्त लहान मुले किंवा नातवंडे यांच्या सोबतच नव्हे).

४. कुठलाही कार्यक्रम चुकवू नका.


सहा अत्यावश्यक गोष्टी:

१. खूप तहान लागेपर्यंत वाट पाहू नका. वरचेवर पाणी पीत रहावे. 

२. पहाटे मुळीच धडपडत उठू नका, पुरेशी झोप घ्या.

३. थकवा येईपर्यंत काम करू नका.

४. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेत चला. आजारी पडेपर्यंत थांबू नका. 

५. देवावर विश्वास असू द्या. चमत्कार घडतात बरं.

६. नेहमी सकारात्मक रहा आणि आशावादी असा.

    

"आपल्या जवळच्या सर्व मित्रांना हा संदेश जरूर अग्रेषित करा. त्यांना वाईट वाटणार नाही परंतु त्यांना एवढं कळू द्या की ते सुद्धा किती खास आहेत ते"👌👌🙏🙏

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध

 महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध

 

मुंबईदि. ३१ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७ हजार ९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा

 निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला

 निवडणूक कामकाजाचा आढावा

 

मुंबईदि.३१ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६५- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

२०१९ च्या विधानसभा व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिकाधिक मतदान होणे हे भारत निवडणूक आयोगाचे उद्दीष्ट आहे. जनजागृतीद्वारे मतदानाचा टक्का वाढवणे यासाठी विविध संस्थाप्रसिद्ध व्यक्तीस्थानिक कलाकार आणि यू-ट्यूबर्सच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्याबाबत श्री. बाली यांनी सूचना दिल्या.

या बैठकीत १६५- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी सादरीकरण केले. बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता स्वामीसहाय्यक आयुक्त के/पश्चिम विभागाचे श्री. चक्रपाणी आल्लेसहाय्यक पोलिस आयुक्त मुगूटराव आणि कल्पना गाडेकर यांच्यासह अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी पूजा सुखटणकरअजय भोंडवे व इतर निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हा निवडणूक उत्सव मतदानाचा टक्का वाढवून साजरा करूयातअसा आशावाद केंद्रीय निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी व्यक्त केला. तसेचत्यांनी श्री. ना. दा. ठा. महिला विद्यापीठजुहू संकुल येथील १६५- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रुमला भेट देऊन विविध कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली आणि मार्गदर्शन केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा


मुंबई, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी आज मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) सत्यप्रकाश टी. एल.हिमांशू गुप्तासमीर वर्माअंजना एम.शिल्पा शिंदेकेंद्रीय निवडणूक पोलिस निरीक्षक पोनुगुंतला रामजी आणि केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी विधानसभा कामकाजासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक कामकाजासंबंधी माहिती जाणून घेतली.

बैठकीत मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित निवडणुकीच्या कामकाजविषयक केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विधानसभा मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी जोशीमुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवपोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरीमुंबई दक्षिण विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुखआणि मध्य मुंबईचे अपर पोलिस आयुक्त अनिल पारसकरसमन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजनसमन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजूसिंग पवारप्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादमउपजिल्हा निवडणूक अधिकारी शामसुंदर सुरवसे समन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानीसमन्वय अधिकारी (तक्रार व्यवस्थापन-निवारण व मतदार हेल्पलाईन ) राजू थोटेसमन्वय अधिकारी (स्वीप) विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती जोशी यांनी मतदान केंद्रांवर सुरळीत आणि वेळेत मतदान होण्यासाठी केलेल्या पूर्व नियोजनाबद्दलप्रत्येक विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्याचेफ्लाईंग स्कॉडस्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमने केलेल्या कामाबाबत माहिती दिली. मतदार यादीत नावनोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले की, "भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व समन्वय अधिकारी कार्यवाही करत आहेत. मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यात स्वीप अभियानांतर्गत मतदार जनजागृतीवर भर दिला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्प पत्र आणि फ्लॅश मॉब यासारख्या विविध माध्यमांतून प्रभावीपणे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. एसएसटीएफएसटी पथके कार्यान्वित केली आहेत. सी-व्हिजिलवर ॲपवर आलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. सर्व विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत."

पोलिस प्रशासनाने मुंबई शहर जिल्ह्यात मतदान निष्पक्षशांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य समन्वय असल्याची माहिती दिली.

यावेळी नोडल अधिकारी (स्वीप) यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक खर्च समितीप्रसारमाध्यम कक्षआचारसंहिता कक्षभरारी पथकपरिवहन व्यवस्थापनपोस्टल बॅलेट तसेच इतर नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक पूर्वतयारीसंदर्भात सादरीकरण केले.

००००

Featured post

Lakshvedhi