Monday, 1 April 2024

संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर ; धन दैवतांची पूजा करण्याचे आवाहन

 संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर ; धन दैवतांची पूजा करण्याचे आवाहन



पालघर / मुंबई. (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रातील दुसरे प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात निर्माण करण्यात आले असून भाविकांसाठी दर्शनसाठी खुले करण्यात आले आहे असे मंदिराचे अध्यक्ष विनोद सिंह यांनी सांगितले आहे.

यावेळी सिंह म्हणाले की, फक्त दिवाळी सणातील धनत्रयोदशी किंवा धनतेरस च्या दिवशी आपण धनलक्ष्मी ची पूजा करत असतो. आणि वर्षभर अधूनमधून आपल्या काही आर्थिक अडचणी जाणवली तर आपण धनलक्ष्मीची पूजा करत असतो. तसेच, आपण सर्वजण वर्षभर काबाडकष्ट करत असतो तरी देखील आपल्याकडे हवी अशी धनप्राप्ती होत नाही. धनप्राप्ती व्हावी म्हणून आपण धनलक्ष्मीची पूजा दररोज सकाळी करत असतो. परंतु एका बाजूला आपण धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण, धनकुबेर यांना देखील प्रसन्न करण्याचे तितकेच महत्त्वाचे असून त्यांची आवश्यकता आहे. याची माहिती आम्हाला काही वेद, पुराण आदी ग्रंथांमधून आमचे मित्र एस. मुलाणी यांच्या वाचनातून मिळाल्यानंतर आम्ही धनकुबेर यांचे मंदिर स्थापन करण्याचा मानस केला. त्यानंतरच आम्ही भगवान श्री धन कुबेर यांचे मंदिर बनवून त्यांची प्राणप्रिष्ठा नुकतीच केली आहे. आम्ही तमाम जनतेला आव्हान करू इच्छितो की, प्रभु श्री धनकुबेर यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडाखडकोना मनोर जवळ श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात येऊन आपण प्रभू श्री धनकुबेर यांची पूजा करून आपली मागणी प्रभू श्री धनकुबेर यांच्याकडे करावी जेणेकरून आपणास आशीर्वाद लाभेल असे आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह म्हणाले. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रभू श्री धनकुबेर यांचे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सुरेश नागेश्वर उर्फ नागसाधू देव इंद्र महाराज यांनी बनविले आहे. अशी माहिती सिंह यांनी दिली.

याप्रसंगी श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंह, पारसनाथ देवनारायण सिंह, संतोष रुद्यनारायण सिंह, दैनिक परशुराम समाचार दिलीप सिंह, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी, हेमांशु संजय सिंह, अभिषेक संजय सिंह, सुमित विनोद सिंह, आशिष माताप्रसाद सिंह, स्नेहा सिंह, यांच्या सह मंदिरातील पुजारी उपस्थित होते.

*मोती साबणाचा जन्म*

 🌷

*मोती साबणाचा जन्म🪔निमित्ताने_


तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन..

म्हणजे *बेसनपीठ + दुध* याच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या.


अंगणात, विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला *नारळाची शेंडी* वापरत होते.

🫢


*साबण* म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते. वास्तविक १८७९ च्या काळात उत्तरेत 'मिरत' च्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण त्याचा तो प्रसिध्द झाला नाही..


अंघोळीची अशी तऱ्हा होती.  कपड्यांच्या साबणाचाही तर काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, *सनलाईट सोप* नावाचा. त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स..


हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही. लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन.


या लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला, वनस्पती तुप. आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.


आता साबणातही 'टाटा' उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता. 

*टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते.* टाटांना आव्हान द्यायचे असेल तर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही हि कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत..

*१० रुपयांना १०० वड्या..* 


नावही ठरलं..*५०१..बार*


या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची ती झाली ब्रिटिश. टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं.लिव्हरची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची आणि त्या साबणाच नाव होतं ५००. ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले. मग आपल्या साबणाचे नाव ५०१.

कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होत, *त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी.*


बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला. त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली. त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता. टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती. टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली.टाटा या स्पर्धेत तरले. या कंपनीने पुढे अंघोळीसाठी *हमाम...* तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो. त्या *मोती साबणाची निर्मिती केली.* 


इतिहास विषय ना आवडीचा असला..

*तरी देशाभिमान महत्वाचा..* म्हणून 

🪷🙏🏻🪷

खांदेरी किल्ला अपघात


 

हत्तींशी बोलणारा माणूस - श्री आनंद शिंदे. यांच्याशी संवादातून हत्तींविषयीचे अनोखे विश्व उलगडले.

 हत्तींशी बोलणारा माणूस - 

श्री आनंद शिंदे. यांच्याशी संवादातून हत्तींविषयीचे अनोखे विश्व उलगडले.

त्यांच्या कडून मिळालेली माहिती :

*हत्ती त्याच्या वयाच्या पंधराव्या दिवसापासून पुढे भेटलेल्या माणसांची आयुष्यभर स्मृती ठेवतात.

 *सात किलोमीटर पर्यंत त्यांना त्यांचे सहकारी किंवा खाद्य कोणत्या दिशेस आहे हे कळते. नर हत्तीने जोराने जमिनीवर पाय आपटल्यास किंवा विशिष्ट आवाज काढल्यास सात किलोमीटर पर्यंतच्या त्याच्या सहकारी हत्तींना मेसेज जातो.

 *कितीही मोठ्या कालावधी नंतरही ते एकदा भेटलेल्या व्यक्तीस पुन्हा लगेच ओळखतात.

 *हत्तींना संख्या मोजता येतात.

 *एका कळपात 20 पेक्षा जास्त हत्तींना राहता येत नाही. असा त्यांचा नियम आहे. *कळपाच्या प्रमुखाकडून बारा वर्षांवरील हत्तींना वेगळा कळप करण्यास भाग पाडले जाते. अक्षरशः हकलले जाते. याचे कारण कौटुंबिक नात्यांमध्ये शरीर संबंध येऊ नयेत. 

*त्यांच्या कळपात आई, बहीण, मावशी, आत्त्या, काकी, मामी अशी सर्व नाती ओळखली आणि सांभाळली जातात. 

 *हत्ती त्याच्याशी जवळीक असणाऱ्या व्यक्तींची खोड काढतात, छेड काढतात, रुसतात, हसतात, रडतात, खेळतात, समजूत काढतात, काळजी घेतात. 

*तब्येत ठीक नसलेल्या हत्तीस गोंजारतात. त्याला आजार विसरवायचा प्रयत्न करतात.

 *लहान पिलास इतर हत्ती सोंडेने पाणी घेऊन आंघोळ कशी करायची ते शिकवतात.

 *हत्तींना स्वतःचा व इतरांचा मान, अपमान, सन्मान, कळतो.

 *चार तासांपेक्षा जास्त वेळ ते पिलांना किंवा इतर हत्तींना झोपू देत नाहीत. कारण त्यांच्या वजनाने त्यांची हृदय क्रिया बंद पडण्याचा धोका असतो. याचे ज्ञान त्यांना आहे.

 *सोंडेने, कानाने, पायाने, डोक्याने ते त्यांच्या विविध भावना प्रकट करतात.

 *लहान पिल्ले त्यांची देखभाल करणाऱ्या माहुतास वडिलांप्रमाणे मानतात. वडील - मुलगी या नात्याप्रमाणे बिलगतात. 

*त्यांना सोडून जाताना किंवा निरोप घेताना ते अत्यंत दुःखी व अस्वस्थ होतात. पिलांच्या विरहाने अनेक दिवस अन्न त्याग करतात.

 *हत्तींच्या सोबत नेहमी वावरणाऱ्या माणसास जवळपास असलेला वाघही काही इजा अथवा हल्ला करीत नाही.

 *लॉरेन नावाच्या हत्तीप्रेमीची कहाणी अद्भुत आहे. तो एकदा परदेशी गेला असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. इकडे हत्तींना जाणीवेने हे कळून आले. त्याचा मृतदेह घरी आणल्यावर त्याच्या अंत्य दर्शनासाठी व त्याच्या पत्नीचे सांत्वनासाठी हत्तींचा कळप 120 किलोमीटर अंतर चालून त्याच्या घरी आला होता. *इतकेच नव्हे तर त्यानंतर बरोबर 365 दिवसांनी लॉरेनच्या प्रथम स्मृतीदिना दिवशी त्याला श्रद्धांजली वाहण्यास पुन्हा तो हत्तींचा कळप त्याच्या घरी उपस्थित झाला होता.

🐘🙏🙏🙏🐘

आपण मोबाईल नंबर बदलतो, त्यामुळे आपले काय नुकसान होते. वाचा आणि दुसऱ्यांना पण पाठवा..*

 *आपण नंबर बदलतो, त्यामुळे आपले काय नुकसान होते. वाचा आणि दुसऱ्यांना पण पाठवा..*


नुकतेच एका महिलेचे तिच्या बँक खात्यातून ८,१६,०००/- रुपये गायब करण्यात आले. 


 *हे नक्की घडले कसे  ?*

 

१. या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक केला होता. तो नंबर तिने 4 वर्षे वापरला नाही.  


२. पण तिच्या KYC मधून ते हटवण्यासाठी बँकेला कळवले नाही.


३. आता, ती वापरात नसलेल्या मोबाईल सिम नंबर मोबाईल कंपनीने बंद केला आणि दुसऱ्या व्यक्तीला दिला.


४. मोबाइल कंपनी पॉलिसीनुसार, जर कोणताही नंबर तुम्ही ६ महिन्यांपर्यंत वापरला नाही तर तो दुसऱ्याला देवु शकतात.


५. आता बँकेचा नियमित येणारा एसएमएस ज्याला नवीन नंबर मिळाला होता त्याला यायला लागले. त्याने काय केले ? तर त्याने एका लिंकद्वारे बँकेच्या साइटवर प्रवेश केला. आणि *फरगेट पासवर्ड* असे लिहिले. आता बँकेकडून आलेल्या लिंकचा OTP  सत्यतेसाठी त्याच्या ताब्यात असलेल्या नंबरवर गेला, त्याने औपचारिकता पूर्ण केली आणि इंटरनेट बँकिंगद्वारे आनंदाने सर्व पैसे काढले.

  

त्यामुळे, बँक खात्याशीस काय पण आपण वापरत नसलेला किंवा बंद केलेला आपला जुना नंबर आपण कोठेही लिंक केलेला असेल तर, बँकिंग नियमानुसार बँकेत जाऊन तो नंबर डीलिंक करावा लागेल.


कृपया वरील बाबी लक्षात घेता. आपला सहा महिने वापर न केलेला मोबाइल नंबर दुसऱ्याला रिअलॉट केला जाऊ शकतो. 


*ही वस्तुस्थिती आपल्यापैकी अनेकांसाठी नवीन माहिती असू शकते. खुप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्की विचार करा आणि पुढे पाठवा....*

आरोग्यावर बोलू, dr लहाने यांचे आरोग्यावर मार्गदर्शन

 


राज्यपालांच्या हस्ते रत्न आभूषण निर्यात पुरस्कार प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते रत्न आभूषण निर्यात पुरस्कार प्रदान

हिरे व्यावसायिक रसेल मेहता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबईत रत्न आभूषण उद्योगाचा एकात्मिक वार्षिक महोत्सव व्हावा - राज्यपाल रमेश बैस

 

            मुंबई, दि. 31 : देशाच्या निर्यातीत मोठे योगदान असणारा रत्न आभूषण उद्योग दुबई आणि जयपूर येथे रत्न आभूषण प्रदर्शनाचे आयोजन करीत असतो. त्याच धर्तीवर मुंबई येथे रत्न आभूषण उद्योगाने एकीकृत मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करावा व त्यामध्ये रत्न व आभूषणाशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमफॅशन परेडफूड फेस्टिवल व फिल्म फेस्टिवलचा देखील समावेश करावाअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  

            राज्यपाल बैस यांच्या हस्ते तसेच रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 30) रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेतर्फे देण्यात येणारे 50 वे रत्न व आभूषण निर्यात पुरस्कार हॉटेल ट्रायडेंट मुंबई येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            जागतिक व्यापारात भारत अग्रक्रमांकाकडे वाटचाल करीत असताना रत्न आभूषण क्षेत्राने देशातील कारागीरांचे पारंपरिक कौशल्य टिकवून ठेवावे.  पारंपरिक सुवर्ण कारागीर तसेच हिऱ्यांना पैलू पडणाऱ्या कलाकारांचे हित रक्षण करावे व या क्षेत्रातील अखेरच्या व्यक्तीची काळजी घ्यावीअसे राज्यपालांनी सांगितले. 

            राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण रत्न व आभूषण परिषदेला राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांसोबत काम करण्याचे आवाहन करतो असे राज्यपालांनी सांगितले.  या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक प्रशिक्षणार्थी पदे निर्माण करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 

            रत्न व आभूषण क्षेत्राला महिलांकडून नेहमीच आश्रय मिळाला आहे असे नमूद करून आता महिलांना या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे आवाहन राज्यपालांनी केले.

 रत्न आभूषण निर्यात उद्योग 100 अब्ज निर्यातीचे लक्ष गाठेलउद्योगपती मुकेश अंबानी यांना विश्वास

            भारतात फार मोठ्या प्रमाणात सोने सापडत नसले तरी देखील आपल्या उद्योजकांनी कल्पनाशक्ती व उद्यम शीलतेच्या जोरावर रत्न आभूषण उद्योग मोठ्या प्रमाणात वाढवला हे कौतुकास्पद आहे असे सांगून रत्न आभूषण क्षेत्र आगामी काळात 100 अब्ज डॉलर इतके निर्यात उद्दिष्ट गाठेल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केला.

            सर्वसमावेशक व विकसित भारताच्या निर्मितीमध्ये रत्न आभूषण निर्यात क्षेत्र मोठी भूमिका बजावेल असे अंबानी यांनी सांगितले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध हिरे व्यावसायिक व अध्यक्षरोझी ब्लू रसेल मेहता  यांना रत्न आणि आभूषण निर्यात परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            राज्यपालांच्या हस्ते रत्न आणि आभूषण क्षेत्रतील सर्वाधिक उलाढालउत्कृष्ट उद्योग कामगिरीफॅशन आभूषणसामाजिक भान असलेला उद्योग आदी संस्थांना रत्न आभूषण निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला भारत रत्न व आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष विपुल शाहउपाध्यक्ष किरीट भंसाळीपुरस्कार समितीचे निमंत्रक मिलन चोकसीभारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.

000


 

 

 

Governor presents Gem & Jewellery Export Promotion Awards

Diamentaire Russell Mehta honored with Lifetime Achievement Award

 

          The 50th Gem and Jewelry Export Awards instituted by the India Gem & Jewellery Export Promotion Council were presented to various exporters at a glittering ceremony at Hotel Trident Mumbai on Saturday (30 Mar).

 

          Maharashtra Governor Ramesh Bais presented the awards in presence of Reliance Group Chairman Mukesh Ambani.

 

          Diamentaire Russell Mehta, Managing Director of Rosy Blue was presented with the Life Time Achievement Award of the Gems and Jewellery Export Promotion Council. Awards in different categories such as highest turnover, industry performance, fashion jewellery, socially responsible company awards were presented to different companies.

 

          President of the India Gem and Jewellery Export Promotion Council Vipul Shah, Vice President Kirit Bhansali, Award Committee Convener Milan Choksi, Bharat Diamond Bourse President Anup Mehta were prominent among those present.

000


Featured post

Lakshvedhi