Sunday, 5 June 2022


 

Aushya he

 🌹🐣


आयुष्य….आयुष्य….म्हणजे काय? विधात्याने दिलेली सुंदर भेट की भेटवस्तूंचा नजराणा….? काय असते हे आयुष्य. आपण तर खूप उत्सुक असतो , खासकरून आपल्या भविष्यातील आयुष्याबद्दल.पुढे काय होईल? कसे होईल? , याकडेच आपले लक्ष लागलेले असते. मग हळूहळू ह्या बद्दलचे विचार वाढू लागतात.आणि जणू विचारांचे काहूरच मनात, डोक्यात वाहू लागते.पण खरेच इतका विचार,सतत भविष्यबद्दलचा विचार करणे योग्य आहे का ? आपण भविष्याचे नियोजन करणे गरजेचे असते.पण याच भविष्याबद्दल ‘अतिविचार’ करून काय उपयोग? म्हणूनच आता ,आयुष्याबद्दल अति विचार करणे सोडून द्या, जरा आयुष्यालाच तुम्हाला आश्चर्यचकित करू द्या.


आयुष्यात विविध प्रकारच्या गोष्टी असतात. अनेक प्रसंग येतात-जातात.वेगवेगळी माणसे ह्या प्रवासात भेटतात. अनेक समस्या येतात-जातात. यश-अपयश चालूच असते.गरिबी-श्रीमंती याचे देखील चक्र चालूच असते. एकूण काय, तर कोणतीच परिस्थिती आयुष्यात कायम नसते.पण आपल्या बाबतीत अनेकदा असे होते की , आपण एकाच गोष्टीवर फार विचार करीत असतो आणि पुन्हा पुन्हा तीच ती गोष्ट उगाळत बसत असतो.कधी कधी तर एखाद्या गोष्टीविषयी अंतिम निर्णय घेऊन देखील अनेकजण पुन्हा त्याच गोष्टीविषयी विचार करू लागतात आणि वर्तमान हरवून बसतात.अगदी विद्यार्थी ते वृद्ध मंडळी असे सर्वच जण कधी ना कधी असे अतिविचार करतात.


काही विद्यार्थी शाळा-कॉलेजात असताना परिक्षेविषयी, अभ्यासविषयी अति विचार करतात.मला चांगले गुण मिळतील ना? पुढे नवीन कॉलेजात ऍडमिशन मिळेल ना? माझा सर्व अभ्यास वेळेत पूर्ण होईल ना? दिलेला प्रोजेक्ट चुकीचा तर होणार नाही ना ? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी दशेत भेडसावतात आणि भविष्याची चिंता करायला भाग पाडतात.


काही नोकरदार व्यक्ती किंवा व्यावसायिक व्यक्ती देखील स्पर्धेला प्रचंड घाबरतात.माझा व्यवसाय टिकेल की नाही? माझा हा प्रोजेक्ट योग्यरीत्या पूर्ण होऊन यशस्वी होईल ना? मला प्रमोशन मिळेल ना? बॉस माझ्यावर नेहमी खुश राहतील ना? स्पर्धकांमधे मी टिकेल ना ? माझी नोकरी टिकेल ना ? मी यशस्वी होईल ना? असे विविध प्रश्न त्यांना सतत पडलेले असतात.आणि मग ते , वर्तमानात राहून योग्य नियोजन करण्याऐवजी भविष्याच्याच चिंतेत आपला अमूल्य वेळ वाया घालवतात.


नात्यांमध्ये, घरामध्ये देखील विविध कारणांमुळे भविष्याची अती चिंता केली जाते.माझे लग्न होईल ना ? विश्वासू जोडीदार मिळेल ना? माझ्या आईचे/वडिलांचे आजारपण संपेल ना? ते लवकर बरे होतील ना? माझा नवरा/माझी बायको माझ्याबरोबर सुखी आहे ना? मी तिच्या/त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत आहे ना ? मी माझे मत सर्वांपुढे मांडू शकेल ना? घरातील मंडळी काय म्हणतील? माझ्यावर रागावणार तर नाहीत ना? असे बरेच प्रश्न मनात येत असतात आणि मग मन सैरवैर धावत असते. आणि स्वास्थ्य हरवते.


अशा अनेक गोष्टी आपल्यापैकी अनेकजण अनुभवत असतील. प्रत्येकाला वाटते ,माझेच दुःख खूप मोठे आहे.त्यामुळे कोणी मला समजूच शकणार नाही.पण दुःख तर प्रत्येकाला असते. फक्त कोण त्या दुःखाला, समस्येला कसा सामोरा जातो हे फार महत्वाचे असते.जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत हा सुख-दुःखाचा खेळ सुरूच राहणार आहे.एक समस्या संपली की दुसरी तयार असणारच आहे.मग इथे आपण नेहमीच आपला वर्तमान भविष्याच्या चिंतेत वायाच घालवणार का?


आयुष्य हे एक खूप मोठे ‘सरप्राईज’ आहे.कित्येकदा आपण काही गोष्टी ठरवितो, पण नेहमीच आपल्या मनासारखे होत नाही.पण त्याचवेळी दुसरीकडे असे काहीतरी घडत असते जेणेकरून पुन्हा आपण त्या गोष्टीसाठी तयार राहू, त्या साठी प्रयत्न करू.म्हणूनच जेव्हा आपल्या मनासारखे घडताना दिसत नाही , तेव्हा आहे त्या परिस्थतीला स्वीकारता आले पाहिजे.आणि त्यातून बाहेर पडून ,कधी कधी थोडा ‘ब्रेक’ घेऊन पुढे वाटचाल करता आली पाहिजे. हेच तर जीवन आहे.


जेव्हा आपल्याबाबत काहीतरी नकारात्मक घडते तेव्हा दुसरीकडे कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीची सकारात्मक सुरवात होत असते. मान्य आहे, आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होतो जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत.पण आपण फक्त ‘प्रयत्न’ करू शकतो.बाकी सर्व त्या ‘निसर्गाच्या’, ‘विधात्याच्या’ हातात असते.म्हणूनच प्रत्येक गोष्टीसाठी विधात्याचे आभार मानता आले पाहिजे.


आता आपल्याला काही गोष्टी नको नकोश्या वाटतात.कधी कधी खूप नैराश्य येते.रडू येते, रागही येतो.खूप काही बोलावेसे वाटते पण बोलू शकत नाही.या परिस्थतीत खूप मनाला वेदना होत असतात.मानसिक स्वास्थ्य बिघडू लागते. कुठेतरी शांतता भंग पावत असते. पण यामुळे आपण सतत भविष्याच्याच विचार करत बसायचा का ? तर अजिबात नाही.जेव्हा जेव्हा अशी मनस्थिती होते तेव्हा तेव्हा खूप शांत राहणे गरजेचे असते. खूप संयम दाखवावा लागतो.आणि मुख्य म्हणजे अशी परिस्थती असूनही आनंदी राहणे गरजेचे असते. याने काय होते? तर पुन्हा उभे राहण्याची जिद्द निर्माण होते.माणूस कणखर बनतो.समजूतदार बनतो. आणि मग हळूहळू अगदी जादू व्हावी तसे काहीतरी छान, चांगले घडू लागते.

 जिवाभावाचे जवळ चार मित्र होते,

तोंडात आपलुकीचे दोन शब्द होते ,

हातात चहाचा कप होता ,

चेहऱ्यावर प्रेमाचा भाव होता ,

मिळून संवाद रंगायचा ,

गमतीचा विषय निघायचा ,

हास्याचा कल्लोळ उडायचा , 

राबलेल मन विसावा घ्यायचं , 

चांदण्या मोजत निजायच ,

असं ते ऐक गावं होत , 

जिथं मन शांत होत ,

आज दिखाव्याचे प्ननास मित्र असतात ,

 तोंडात स्वार्थाचे साठ शब्द असतात ,

हातात मोबाईल फोन असतो ,

चेहऱ्यावर टेन्शनचा भाव असतो ,

तशी चॅटिंग होत असते ,

विनोदावर ईमोजी हसत असते , 

टेन्शन नि डोकं दुकत असत ,

आरामासाठी मन शांत नसत ,

काही म्हणा जुना काळ छान होता , 

ज्याकाळी माझ घर , माझा गावं होता.

 

    ✍ 🟨🔶🔸🟡

हास्य तरंग

 


खेळ खेळ भारत

 🧎‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏀 *खेळू द्या मुलांना, तो त्यांचा अधिकार आहे !* रवि,५ जून, ११ वाजता

(Physical exercise -short and long term benefits)

🔴 *'डॉक्टर...., एक विचारू?'* या बालरोग तज्ञ संघटना (महाराष्ट्र राज्य शाखा) यांच्या *शिक्षक पालक प्रशिक्षण अभियान* या खास कार्यक्रमात दर रवि स.११ ते १२ 

🔴 For live parenting programme and interaction, visit ....

http://www.tinyurl.com/MAHAIAP4PARENTS

🔴 दर रविवारी सकाळी ११ वा. आपल्याला हा महत्वाचा कार्यक्रम चुकवायचा नसेल, reminder पाहिजे असेल तर *MAHAIAP YouTube* चॅनेलचे सदस्य व्हा (subscribe करा, Like करा)!

तसेच MAHAIAP Facebook account ला सुद्धा जॉईन व्हा.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

 *खेळू द्या मुलांना, तो त्यांचा अधिकार आहे !* रवि,५ जून, ११ वाजता

🔴 *वक्ते, मार्गदर्शक व संवादक*

▪️प्रा. लक्ष्मण चलमले, 

     रिलायन्स फौंडेशन स्कुल, लोधिवली. पनवेल.

     (मुलांची शारिरीक साक्षरता व फिट इंडिया, हिट इंडिया चळवळीचे कार्यकर्ते.)

▪️प्रा. श्रीमती अनुराधा दांडेकर,

     M.Sc. B. Ed.,

     शरीरशास्त्र तज्ञ. लोधीवली.

▪️श्री. रमेश खाेत. 

      B.P.Ed.; M.P. Ed.

     व्हॉली बॉल कोच, महाड . रायगड

▪️डॉ शुभदा खिरवडकर,

      बालरोग तज्ञा , नागपूर

▪️डॉ अभिनय दरवडे, 

     बालरोग तज्ञ, धुळे.


▪️For many such videos on parenting in past, visit

https://tinyurl.com/mahaiaplive

▪️Every Sunday at 11 AM for live parenting programme and interaction, visit ....

http://www.tinyurl.com/MAHAIAP4PARENTS


🔴 *कृपया हा मेसेज आणि लिंक (दर रविवारी) आपल्या संपर्कातील पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था यांना फॉरवर्ड करावी. लिंक प्रत्येकवेळेस सारखीच आहे, सेव्ह करावी.🙏🏻*


🔴 *संयोजक, निमंत्रक व प्रकल्प समिती सदस्य* 

डॉ. हेमंत गंगोलिया, अध्यक्ष

डॉ. अमोल पवार, सचिव, 

बालरोग तज्ञ संघटना (महाराष्ट्र राज्य शाखा)

डॉ. समीर दलवाई, मार्गदर्शक, मुंबई

डॉ. शेखर दाभाडकर, महाड

डॉ. जयंत पांढरीकर, अमरावती

डॉ. सुचित तांबोळी, अहमदनगर

डॉ. सतीश अग्रवाल, अमरावती

डॉ.सदाचार उजळंबकर, नाशिक

डॉ. शुभदा खिरवडकर, नागपूर

डॉ. अभिनय दरवडे, धुळे

डॉ. संदीप कवडे, पुणे

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

आनंदाचे डोही आनंद तरंग


 *एका भारतीय संगीतकाराने इतिहास घडवणाऱ्या या पक्षांच्या गाण्याची खरी गोष्ट नक्कीच वाचा.*

*आज जगात व्हायरल झालेले हे ७२ पक्ष्यांचे गाणं ऐका. आणि आनंद घ्या निसर्ग संगीताचा.....*


*सोनेरी गाणं - 1*


*ऋषीतुल्य जेष्ठ साहित्यिक गो.नी.दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित माचीवरला बुधा* या चित्रपटाच्या वेळी *जेष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ* यांना स्वतःलाही माहीत नव्हत की या चित्रपटातलं एक *संस्मरणीय , विश्वविक्रमी गीत संगीतबद्ध होण्यासाठी त्यांची वाट पहातयं.* याचं कारण असं की तब्बल ४० संगीतकारांनी नाकारलेलं गाणं आता प्रत्यक्षात कधी येणारच नाही अशी हळहळ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वाटायला लागलेली असतानाच *हे गाणं धनंजयजींच्या वाट्याला आलं आणि गाण्याचं अक्षरशः सोनं झालं.*


झालं असं की , या चित्रपटाचे *दिग्दर्शक - विजय दत्त आणि पटकथा , संवाद लेखक - प्रताप गंगावणे* एकदा बोलत होते. आपल्या चित्रपटात वेगळं काय बरं करता येईल असा विचार सुरू असतानाच अचानक , या चित्रपटात *केवळ पक्षांचेच आवाज वापरून एक गाणं करायचं ही कल्पना प्रतापजींना सुचली.* कोणतंही वाद्य नको , कोणताही आवाज नको , फक्त पक्षांचेच आवाज असतील असं गाणं हवं असं ठरलं. पण हे गाण करायला कुणीही पुढे येईना. सिनेइंडस्ट्रीतील लहानमोठे तब्बल चाळीस संगीतकार गाठले पण कुणीही हे आव्हान पेलण्याची तयारी दाखवली नाही. कुणी म्हणे, आम्ही तोंडाने आवाज काढू , कोणी म्हणे वाद्यावर आवाज काढू पण वाद्याशिवाय , आवाजाशिवाय , केवऴ पक्षांच्याच आवाजत गाणं करायचं ही कल्पनाच पचणारी नव्हती. आणि दुसरीकडे , केवळ नैसर्गिक आवाजांनी बद्ध असलेलं गाणंच हवं असा जणू दिग्दर्शकांनी ( विजयदत्तजींनी ) हट्टच धरला होता. अशावेळी कसं कोण जाणे , प्रतापजींना एकदम धनंजयजींचच नाव सुचलं आणि लगोलग त्यांना निरोप धाडला गेला. मुंबईला दादरला शिवाजी पार्कजवळ भेट झाली.


पक्षी आणि निसर्गातले वेगवेगळे आवाज घेऊन गाणं बनवायचंय तुम्ही बनवू शकाल का .. असा प्रश्न समोरून येताच , धनंजयजींनी क्षणार्धात हे आव्हान घेतलं.. धनंजयजींचा आत्मविश्वास बघून खूश होऊन तत्क्षणी दिग्दर्शकांनी आपल्या खिशातले पाच हजार रूपये काढून बक्षीस म्हणून धनंजयजींच्या हातावर ठेवले आणि कामाचा श्रीगणेशा झाला.


मग सुरू झाला धनंजयजींचा प्रवास , अगदी झपाटल्यागत.. आव्हान घ्यायचं आणि ते पेलूनच यशस्वी व्हायचं हा स्वभाव असलेल्या धनंजयजींनी *दिग्दर्शक विजयदत्तजींना* सोबत घेऊन दोन तीनदा जंगलाची सैर केली. केवळ पक्षांचेच आवाज ऐकायचे , आणि निसर्गातल्या अन्य आवाजांचा सतत कानोसा घेत जायचं , पक्ष्यांच्या गुजगोष्टींना ताल लयीत मांडायचे कसे हाच विचार ... त्यासाठी जंगलं जंगलं पायाखाली तुडवली. लोणावळा , अर्नाळा , त्र्यंबकेश्वर , सातारा  सगळीकडली जंगलं पालथी घालता घालताच तिथले आवाज , ऐकू येतील ते ते निसर्गातले पक्ष्यांचे आवाज ते ध्वनिमुद्रीत करावे अशी कल्पना सुचली आणि आपले मोठे बंधू ध्वनीमुद्रक *गोरखनाथ धुमाळ* यांना घेऊन जंगला जंगलात फिरून आवाजांचं ध्वनीमुद्रण केलं. तब्बल 

१९००० कि.मी. चा प्रवास करत , सहा महिने , रात्री बेरात्री, उन्हा पावसाची पर्वा न करता , पक्ष्यांचे आवाज गोळा करता करता सुमारे २० ते २५ जीबीचा डाटा गोळा झाला. एवढ्या प्रचंड माहितीतून नेमकी माहिती हेरायची , नेमके आवाज हेरायचे , त्यांचाच उपयोग करून गाणं बनवायचं... सोपी गोष्ट नव्हतीच मुळी , अजिबातच ... पण ते हरले नाहीत.. पुढला आठवडाभर या आवाजांचाच ध्यास घेतल्यागत दिवसरात्र तेच ते आवाज ऐकत राहिले. पक्ष्यांच्या आवाजासह मनातलं संगीत शोधत राहिले.

दोन आठवडे लोटले...  अन् एका जादूई क्षणी बुलबुल , सुतार , खंड्या , कावळा , चिमणी , करकोचे , बदक , कोकीळ अशा तब्बल ७२ पक्षांच्या आवाजासह मनातलं गाणं प्रत्यक्षात आलं.

जगाच्या पाठीवरलं पहिलं असं गाणं, ज्यात कोणतंही वाद्य नाही , कोणतेही मानवनिर्मित आवाज नाहीत , कोणाही व्यक्तीचा आवाज नाही ... आहेत ते केवळ नैसर्गिक आवाज , पक्षांचे आवाज.. आणि या गाण्याचे जन्मदाते , माझ्या नाशिकचे , थोर , जेष्ठ संगीतकार - 

पं. धनंजयजी धुमाळ ( सर )


  - मोहिनी घारापुरे - देशमुख 

पत्रकार, नागपूर

संकलन : शरद मगदूम

*अबकड कल्चरल ग्रुप, सांगली*

🪀 *94226 22626*

 भांड्यांची कल्ही डोक्याला!


हे वाचा.

*कलही केलेली भांडी🍵*

डायबिटिस वर लेख

*कथिलाचे पाणी*

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकारक आहे.

ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते.ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.

’ हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती.तेव्हा स्टेनलेस स्टील, aluminum, कोटिंग केलेली भांडी नव्हती.

पितळ्याच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती.त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.

म्हणून मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागलो. चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना संडासला साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.

Ø हे पाणी माझेकडे येणाऱ्या एका मुलीला दिले. तिलापण तसाच अनुभव आला आणि तिच्या पिंपल्स कमी झाल्या.

Ø एका बाईंचे पोट बेंबीखाली मोठे झाले होते.पोट कडक झाल्याने त्यांना खाली वाकता येत नव्हते. मी त्यांना कल्हईच्या भांड्यात पाणी उकळून पिण्यास सांगितले. एक महिन्यांनी त्या भेटल्यावर मला म्हणाल्या, “मला संडासला साफ होते आहेच आणि पोट ही मऊ झाले आहे त्यामुळे मी आता पुढे वाकू शकते.” या बाईंची तीन मोठी ऑपरेशन्स झाली आहेत.

Ø माझ्या पत्नीला डायबेटीस आहे. हे पाणी प्यायला सुरवात केल्यापासून पत्नीच्या शौचात फरक पडलाच परंतु पूर्वी चार जिने चढताना तिसरा जिना चढल्यावर थांबत असे, आता न थांबता जिना चढते. मधुमेह चेक केल्यावर १०० ने कमी झाला.

(म्हणजे आमच्या पूर्वजांना हे पूर्वी पासूनच माहीत होते. त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा कमवला नाही, म्हणून काय ते अडाणी होते का?)

अरविंद जोशी BSc.

९४२१९४८८९४

Featured post

Lakshvedhi