Thursday, 2 September 2021

 न्हावा-शेवा योजना टप्पा 2 जलदगतीने राबवावी

पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. 1 : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पाणी पुरवठ्याच्या विविध नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र असे असले तरी जुन्या योजना प्रभावीपणे सुरु ठेवण्यात याव्यात. न्हावा-शेवा योजना टप्पा 2 जलदगतीने राबविण्यात यावी अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

            रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रस्तावित व प्रगतीपथावरील योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या पाणी पुरवठा केंद्रासंदर्भात आढावा बैठक पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चालू असलेल्या पाणी पुरवठा केंद्राकडून

जास्तीत जास्त लोकांना पाणीपुरवठा होईल असे नियोजन करावे

            श्री. बनसोडे म्हणाले कीनवी मुंबईपनवेल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शहरीकरणात वाढ होत आहे. या भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित होणे आवश्यक असून नवीन पाणी पुरवठा योजना जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. सध्या कार्यान्वित असलेल्या जुन्या पाणी पुरवठा योजना जास्तीत जास्त क्षमतेने सुरु ठेवाव्यात जेणेकरुन नागरिकांना पाणी पुरवठा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

            वाढीव न्हावा - शेवा पाणी पुरवठा योजनामाथेरान सुधार व वाढीव पाणी पुरवठा योजनावाढीव न्हावा-शेवा पाणी पुरवठा योजना टप्पा योजनांबाबतचा आढावा यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी घेतला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलव्यवस्थापन केंद्रे जास्तीत जास्त क्षमतेने चालवून शक्य तितक्या ग्राहकांना पाणी पुरवठा करावा जेणेकरुन नागरिकांनाही सुविधा उपलब्ध व्हावी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या महसुलातही वाढ व्हावी, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

००००

 1971 च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त

स्वर्णिम विजय मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत

·       गेट-वे-ऑफ इंडिया येथे कार्यक्रम

 

            मुंबईदि. 1 : भारताने 1971 मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या स्वर्णिम विजय मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेट-वे-ऑफ इंडिया येथे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. ही मशाल दिल्ली येथून जैसलमेर, द्वारका, वडोदरा असे साडेचार हजार किमीचे अंतर पार करुन मुंबईत दाखल झाली.

            यावेळी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेफ्टनंट जनरल एस.के. प्राशर, एअर व्हॉईस मार्शल एस.आर. सिंग, वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हॉईस ॲडमिरल आर.हरिकुमार यांच्यासह तिन्ही दलांचे अधिकारी उपस्थित होते.

            भारताने पाकिस्तानला 1971च्या युद्धात नमवले होते. या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभर स्वर्णिम विजय वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त स्वर्णिम विजय मशालीची देशभर परिक्रमा सुरु आहे. या स्वर्णिम विजय मशालीचे 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आगमन झाले.

             सन 1971च्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या चक्र पुरस्कारार्थी ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, ॲडमिरल विजयसिंग शेखावत, विंग कमांडर दिनेशचंद्र नायर, नायक धोंडिराम बनसोडे, वीरपत्नी श्रीमती सेलडा डायस यांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भारतीय लष्कराच्या वाद्यवृंद पथकाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

00000

 वरळी किल्ला व परिसराचा विकास पुरातत्व संचालनालय आणि

बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तरित्या करणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासाठी पुढाकार

 

            मुंबईदि. 1 : वरळी किल्ला व परिसर विकास पुरातत्व संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तरित्या करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी  पुढाकार घेतला आहे.

            वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासंदर्भातील बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेपाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडेसांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरातपुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळेसहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले कीवरळी किल्ला व परिसर विकासासाठी पुढील १० वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिका सांस्कृतिक कार्य विभागासोबत काम करणार आहे. वरळी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून हा किल्ला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.

            पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले कीराज्यासह मुंबईतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यात येईल. तसेच या किल्ल्यावर विद्युतीकरण व प्रकाशझोत योजनेचे काम करण्यात येईलअसे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

0000

 पोषण माहमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबच

निरंतर प्रयत्नांद्वारे कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            मुंबईदि. 1 : कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण माहमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा. परंतुकेवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार कराअसे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

            राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यातील शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इद्झेस कुंदनएकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) आयुक्त रुबल अग्रवालराजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानचे संचालक संजीव जाधवआयसीडीएसचे उपायुक्त गोकुळ देवरेसहायक आयुक्त विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा कार्यक्रम अधिकारीबालविकास प्रकल्प अधिकारीअंगणवाडी पर्यवेक्षिकाअंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

            कुपोषण ही एक गंभीर समस्या असून त्यावर आपल्याला मात करायची आहेअसे सांगून महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्यापोषण महिन्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिकासेविकामदतनीस यांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी ज्यामध्ये जिल्हा परिषदपंचायत समित्यांचे पदाधिकारीसरपंचग्रामपंचायत सदस्य आदी लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे. कोविडचे नियम पाळून जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आणि लोकसहभाग वाढवून पोषण माहमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवावा.

            ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्याशून्य ते 6 वर्ष वयोगटातील बालके असलेल्या स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवायचे असून त्यामधील लहान बालकांना स्थलांतराच्या नवीन ठिकाणी पूरक पोषण आहार सुलभतेने मिळेल या बाबीची खात्री करावी लागेल. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी राजमाता जिजाऊ मिशनच्या सहयोगातून तयार केलेले स्थलांतरित लाभार्थ्यांसाठीचे मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल.

            आदिवासी भागामधील कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांमधील पोषक तत्त्वांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच या भाज्यांच्या उत्तम पाककृतींचा समावेश रोजच्या आहारात करणे उपयुक्त ठरेलअसे मत अॅड. ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.

            प्रत्येक अंगणवाडीतील शालेयपूर्व शिक्षण उत्कृष्ट व्हावे हे आपले स्वप्न आहेअसेही त्या म्हणाल्या. कोविड- 19 च्या काळात अंगणवाडी सेविकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केले. अनंत अडचणींवर मात करतदुर्गम भागातकाही ठिकाणी नावेतून जात पोषण आहार पुरवला आहे. आताही अशाच प्रकारे आपल्याला काम करायचे आहे. कोविडचा धोका टाळून हे काम सुरक्षितरित्या करण्यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षकसेविकामदतनीस यांचे  शंभर टक्के कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

            यावेळी प्रधान सचिव श्रीमती कुंदन म्हणाल्यातीव्र कुपोषित बालकांवर लक्ष ठेऊन त्यांच्यापर्यंत आयसीडीएसच्या सेवा पोहचवण्यासाठी आणि कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल. गडचिरोली मध्ये 100 अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येणारा शालेयपूर्व शिक्षणाच्या तितली प्रकल्पातील उपयुक्त बाबींचा आकार’ अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा. पोषण माहमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संख्येबरोबच त्यांची गुणवत्ताही उत्कृष्ट असली पाहिजेअसेही त्या म्हणाल्या.

            श्रीमती अग्रवाल म्हणाल्यापोषण माहमध्ये ॲनिमियामुक्त भारतबाळाचे पहिले 1 हजार दिवसकुपोषण मुक्तीगरोदरपणातील काळजीपोषण-सुपोषण यावर वेबिनारनिबंध स्पर्धा यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. परसबागा अर्थात पोषण वाटिकांची निर्मितीयोगापोषण सामुग्रीचे वाटपसॅम बालकांचा शोध आणि पोषण आहार व इतर मदत उपलब्ध करुन देणेया प्रमुख संकल्पना पोषण माहमध्ये राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्ण महिन्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहेअशी माहिती त्यांनी दिली.

            या कार्यक्रमादरम्यान मायग्रेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटनतितली प्रकल्पाचे उद्घाटनकेंद्र शासनाच्या पोषण ज्ञान पोर्टलवर एक घास मायेचा’ या राज्याच्या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या पाककृतींच्या चित्रफीती अपलोड करण्याचा शुभारंभसंपर्क संस्थेमार्फत ऑनलाईन पाककृती स्पर्धांचे प्रदर्शन आणि उद्घाटन करण्यात आले. माता बाल पोषणाची शिदोरी उपक्रमाची ऑनलाईन चित्रफीतीचे संगणकीय कळ दाबून उद्घाटनकोविड काळात अंगणवाड्यांनी केलेल्या कामाबाबतचा अभ्यास अहवालबाल कल्याण समितीच्या कार्य अभ्यास अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

००००

 म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये

गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

 

            नवी दिल्ली, 1 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती आणि पूजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात झाली आहे. प्रदर्शन व विक्री  १० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

            महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मुर्तींना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेचदिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या २९ वर्षांपासून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात ४० गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो.अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभाग असतो.

            महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांची वर्दळ सुरु झाली आहे. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मास्कसॅनिटायजरचा अनिवार्य  वापर आणि सोशल डिस्टेसिंगचे पालन करून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची खरेदी होत आहे. गणेशमुर्तींच्या उंचीलाही मर्यादा असून येथे प्रदर्शन व विक्रीकरिता असलेल्या मूर्तीची कमाल उंची  फुट आहे. दिल्लीस्थित नंदा एस्कोर्टसह अन्य गणेश मंडळांनी  गणरायाच्या मोठ्या मुर्ती राखीव करून ठेवल्या आहेत.

         ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २३ वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील म-हाटीएम्पोरियमध्ये येतात. एम्पोरियमच्या दालनात यंदा लहान मोठ्या आकाराच्या एकूण 00 गणेशमूर्ती आहेत. या सर्वच मुर्ती इकोफ्रेंडली आहेत. 6 इंच ते ३ फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध असून ५०० रूपयांपासून ते 6 हजार रूपयांपर्यंत त्यांची  किंमत आहे. 

            महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गवरिल म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात १०   सप्टेंबर २०२१ पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहितीकरिता महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

 कोकणच्या धर्तीवर जळगाव  जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

·       मंत्रिमंडळ बैठकीत पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

 

        मुंबई दि. 1  :  जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली. या तिन्ही तालुक्यांमधील १०८ घरांची पूर्णत: तर ६५३ घरांची पूर्णपणे हानी झाली असून ३०६ दुकाने क्षतीग्रस्त झाली आहेत. ४०४ लहान तर ६१४ मोठी गुरे वाहून गेली असून तब्बल १५ हजार १९५ हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळ पीकांचे नुकसान झाल्याबाबत त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत माहिती दिली. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील तिन्ही तालुक्यांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ लावून नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून यानंतर लागलीच मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली आहे अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

             अतिवृष्टीमुळे चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी झाली आहे. याचा फटका पाचोरा आणि भडगाव तालुक्यालाही बसला असला तरी तो तुलनेत कमी आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे. या आपत्तीची माहिती मिळताच पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी तत्काळ चाळीसगाव तालुक्याला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला होता. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले होते. 

        या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री श्री.पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची सविस्तर माहिती दिली. या आपत्तीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ४२पाचोऱ्यातील ४ तर भडगावमधील २ असे एकूण ३८ गावे बाधीत झाली आहेत. या गावांमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

          या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. यामुळे त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी श्री.पाटील यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली असून कोकणच्या धर्तीवर ही मदत आपदग्रस्तांना तातडीने प्रदान करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे अशी माहितीही मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

00000

 चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

- मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 

            मुंबईदि. 1 : चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज मोकासाचेक बरांजसोमनालाबोन्थालाकढोलीकेसुर्ली आणि चिंचोर्डी या गावांमध्ये कोळसा खाणीसाठी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडने जमिनीचे भुसंपादन केले आहे. या गावातील प्रकल्पग्रस्तांसाठी कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये २०१६ मध्ये झालेल्या करारानुसार कार्यवाही करावी तसेच प्रकल्पबाधीत कुटूंबाचे जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण करून फेरअहवाल शासनाकडे सादर करावा, या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

        मंत्रालयातील दालनात कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडच्या चंद्रपूर जिल्हयातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या  विविध समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री.वडेट्टीवार बोलत होते. यावेळी  मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिम गुप्तादूरदृश्यप्रणालीव्दारे नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारेचंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हानेकर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (केपीसीएलचे) व्यवस्थापकीय संचालक व्ही.होनराजस्वागत उपाध्यायविशाल दुधेनितीन चालखुरे उपस्थित होते.

       मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणालेप्रकल्पबाधीत गावातील कुटुंबाचे जिल्हाधिकारी यांनी फेर सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे सादर करावा. प्रकल्पबाधीतांची यादी करताना सर्व पडताळणी केली जावी. केपीसीएलने कामगारांचा २०१५ पासून ते २०२० पर्यंतचा उर्वरीत पगार त्वरीत द्यावा. पुनर्वसन करारातील न्यूनतम वेतन कायदा १९४८ बाबत कामगार आयुक्तांसोबत चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.कुटूंबसंख्या निश्च‍ित झाल्यानंतर त्याची प्रसिध्दी करण्यात यावी. जमिनीचे भुसंपादन पूर्ण झाल्यानंतर कराराप्रमाणे कंपनीने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिले.

                                                            ******

Featured post

Lakshvedhi