*मसाज आवश्यक आहे का ?*
आपले शरीर अनेक स्नायूंनी बनलेले आहे. ते स्नायू मोकळे करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते. जरी आपण ग्रामीण भागातले असलो तर सहसा आपल्या शरीराची हालचाल तर होतेच म्हणून आपल्याला वाटेल की आम्हाला व्यायामाची काय गरज, पण व्यायाम हा आवश्यक असतोच. त्याच बरोबर मालिश ही सुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळापासून आपण पाहत आलोय की लहान मुलांची तेलाने मालिश केली जाते, आणि असे केल्या केल्या लहान मूल अगदी शांत झोपी जाते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मुलांची मालिश केल्यास त्यांची शारीरिक वाढ ही अतिशय लवकर होते. आज आपण पाहू प्राचीन काळापासून चालत आलेले मालिश म्हणजेच स्पर्श चिकित्सा पद्धत. या पद्धतीने मोठे मोठे आजार सुद्धा दूर होतात. अर्धांगवायू सारखे आजर तर ऍलोपॅथिक औषधाने बरे होतच नाहीत त्यांना मसाज व निसर्गोपचार आणि थोडी मेहनत पूर्णपणे आजार दूर करू शकते.
संवाहन श्रमहरं व्रस्यं निद्रा सुख प्रदम् । मांसा सृक्त्यक् प्रसन्नत्वम् कुर्याहातकफाप्रहमू ।।
म्हणजेच, शरीराची मालिश करणे श्रमनाशक, धातूंना पुष्ट करणारे, झोप आणि सुखकारक तसेच श्वासोच्छ्वास, त्वचा आणि रक्त शुद्ध करणारी आणि वात, पित्त, कफ नाशक आहे.
*मसाज चे फायदे :*
१. तणाव दूर करण्यास मदत करते.
२. मस्क्युलर, जॉईन्ट चे दुखणे दूर करते.
३. ब्लडप्रेशर व्यवस्थित ठेवतो.
४. शरीराच्या आतील दुखणे नाहीसे होते.
५. इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते.
६. कमरेत होणारे दुखणे नियंत्रित करते.
७. यामुळे आपल्याला झोप देखील चांगली लागते.
*या व्यक्तींनी मसाज टाळावा*
१) ज्या व्यक्तीला त्वचेचे आजार आहेत.
२) सूज किंवा जखम झालेल्या भागावर मसाज करू नये.
३) गर्भावस्थेत स्त्रियांनी मसाज करू नये.
४ ) हृदयविकार असेल तर मसाज करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
*तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच मालिश करावी.*
डॉ. प्रमोद ढेरे,
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
No comments:
Post a Comment