राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ø नागपूर बसस्थानकापासून उपक्रमास प्रारंभ होणार
Ø महाराष्ट्रात फाटकमुक्त रेल्वेमार्ग संकल्पना राबविणार
Ø विदर्भातील 12 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात
Ø केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
नागपूर दि. 15: महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात शंभर रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास हा फाटकमुक्त होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील व त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. विदर्भातील रेल्वे उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमास दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपस्थित होते.
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (महारेल) अजनी येथील पुलासह विदर्भातील नवीन सहा रेल्वे उड्डाणपूलांचे भूमिपूजन व सहा उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे,मोहन मते, आशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महारेलची स्थापना करण्यात आली होती. महारेलच्या माध्यमातून रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे जाळे महाराष्ट्रभर बळकट करण्यात येणार आहे. रेल्वे फाटकावर अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी होऊ नये, सुलभ व विनाअडथळा प्रवास व्हावा यासाठी महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक सुलभ करणारे शंभर उड्डाणपूल येत्या वर्षभरात उभारले जाणार असून आगामी पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अजनी येथील 1927 मधील ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाचे आयुष्य संपले असल्याने येथे जड वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे येथे नवीन पुलाची आवश्यकता होती. या पुलाचे आज भूमिपूजन झाले असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पुढील 14 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. अजनी येथे सहा पदरी पूल उभारणार असून सध्याचा पूल काही दिवस तसाच राहील. त्याच्या बाजूला तीन पदरी पुलाचे काम पूर्ण झाल्यावर जुना पूल तोडून तेथे उर्वरित तीन पदरी मार्गाचे काम सुरू करण्यात येईल. या पुलाची लांबी 220 मी. व रुंदी 38 मी. राहणार असून त्याचा अंदाजित खर्च 332 कोटी आहे. या पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असेही ते म्हणाले.
महारेलमार्फत राज्यात विकासकामे करण्यासाठी केंद्र शासनाने मागील केवळ एका वर्षात 13 हजार कोटीचा निधी राज्य शासनाला दिला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून अधिकाधिक विकासकामे करण्यात येतील. हा सहभाग पुढे कायम राखत महारेलच्या माध्यमातून राज्यातील बसस्थानके विमानतळाप्रमाणेच सुंदर व सुसज्ज करण्यात यावी व याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सिमेंट रस्ते बांधकामाच्या तिसऱ्या टप्प्यात नागपुरातील जवळजवळ सगळे महत्वाचे रस्ते सिमेंटचे करण्यात येऊन शहराचा चेहरामोहरा बदलेल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यातील रेल्वे फाटक पूर्णपणे बंद करण्यासाठी राज्य शासनाला केंद्रातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, यासाठी राज्यात 1200 कोटींच्या 25 रेल्वे पुलांना आजच मंजूरी देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. यासोबत नागपूर शहरातील विविध विकास कामांसाठी 500 कोटीच्या निधी मंजूरीची घोषणाही त्यांनी केली. यातून नागपूर हे जगातील चांगले पायाभूत सुविधा असलेले ‘मल्टीमॉडल हब’ म्हणून विकसित होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. देशात रेल्वे मार्ग तयार करणाऱ्या केवळ चार एनटीसी (न्यू ट्रॅक कन्स्ट्रक्शन) यंत्र आहेत. यापैकी एका यंत्राद्वारे इतवारी ते नागभिड रेल्वे मार्ग तयार करण्याच्या कामालाही आजपासून सुरूवात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
भूमिपूजन झालेल्या नवीन सहा उड्डाणपूलांचा एकूण अंदाजित खर्च 600 कोटी असून लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलांसाठी एकूण 306 कोटींचा खर्च आला आहे. लोकार्पण करण्यात आलेल्या पुलांमध्ये उमरेड भिवापूर बायपास रोड वरील रेल्वे फाटक क्रमांक 33, भरतवाडा ते कळमेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 290 तसेच 290 बी, कोहली ते कळमेश्वर मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक 288 अे, बोरखेडी आणि सिंदी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 108 तसेच नांदगाव मार्गावरील रेवराल आणि तारसा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 548 येथील रेल्वे पुलांचा समावेश आहे. तसेच भूमिपूजन झालेल्या पुलांमध्ये अजनी रेल्वे स्थानकाजवळील सहा पदरी दुहेरी केबल स्टेड उड्डाणपुलासह यवतमाळ रोडवर मांजरी ते पिंपळकुट्टी रेल्वे फाटक 2-बी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी रोड येथे चांदूरबाजार ते नरखेड मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक 52-अे, अमरावती- बडनेरा रोडवरील रेल्वे फाटक 662/22एन, अमरावती - निंभोरे रोड येथील रेल्वे फाटक एस-2 व वणी ते वरोरा दरम्यान रेल्वे फाटक 6 (3 अेबी-3टी) या नवीन पुलांचा समावेश आहे.
महारेलवेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायस्वाल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन मानसी सोनटक्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार रेल्वेचे महाप्रबंधक जितेंद्र कुमार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
000
Upgradation of Bus Stands in the State will be Done Like Airports
- Chief Minister Eknath Shinde
Nagpur, 15: Chief Minister Eknath Shinde informed today that one hundred railway flyovers will be constructed in the state through MAHARAIL in the coming year and railway travel in the state will be gate-free in the next five years. Along with this, he also announced that through Maharail, bus stations in the state will also be built and upgraded like airports and it will start from Nagpur bus station. The Chief Minister attended the Inauguration and Bhumi Pujan programme of railway flyovers in Vidarbha through television.
Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari and Deputy Chief Minister Devendra Fadnavis laid the foundation stone of six new railway flyovers in Vidarbha including the bridge at Ajani by Maharashtra Railway Infrastructure Development Corporation (MAHARAIL). MP Kripal Tumane, District Council Chairman Mukta Kokdde, MLA Praveen Datke, Krishna Khopde, Vikas Kumbhare, Mohan Mate, Ashish Jaiswal, Raju Parve, Tekchand Savarkar and others were present on the stage.
MAHARAIL was established during the tenure of Shri Fadnavis as Chief Minister. Through Maharail, the network of railway infrastructure will be strengthened across Maharashtra. The Chief Minister explained that in order to reduce accidents at the railway gates, to avoid traffic jams, and to facilitate smooth and hassle-free travel, one hundred flyovers will be constructed in the coming year and the state government has resolved to make the entire Maharashtra railway gate free in the next five years.
Deputy Chief Minister Fadnavis said that the 1927 British-era railway bridge at Ajni had reached the end of its life and heavy traffic was stopped here. This necessitated a new bridge here. The foundation stone of this bridge was laid today and the construction of the first phase will be completed in next 14 months. A six tier bridge will be constructed at Ajani and the existing bridge will remain the same for some days. After the completion of the three-tier bridge on its side, the old bridge will be demolished and the work of the remaining three-tier road will be started there. The length of this bridge will be 220 m. and width 38 m. and its estimated cost is 332 crores. He also said that this bridge will add to the beauty of the city.
The Central Government has provided funds of 13 thousand crores to the state government in the last one year only for development works to be done in the state through Maharail. More and more development works will be done with the participation of Central and State governments. Continuing this participation, through MAHARAIL, the bus stations in the state should be made beautiful and equipped on the line of the airport and this should be started from Nagpur bus station, he made a demand on this occasion. Deputy Chief Minister Fadnavis also said that in the third phase of construction of cement roads, almost all important roads in Nagpur will be constructed of cement and the face of the city will change.
On this occasion Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari announced that 25 railway bridges with the cost of 1200 crores in the state are being approved today to close railway gates on the state completely. Besides this, he also announced sanction of a fund of 500 crores for various development works in Nagpur city. He expressed his hope that this will develop Nagpur as a 'multimodal hub' with good infrastructure in the world. There are only four NTC (New Track Construction) machines in the country that are building railway tracks. He said that the work of constructing the railway line from Itwari to Nagbhid with one of these machines is also beginning from today.
The total estimated cost of the new six flyovers Bhoomipoojan of new six flyovers has been performed and the estimated cost of these flyovers is Rs 600 crore and the total cost of the inaugurated flyovers is Rs 306 crore. Among the bridges that were inaugurated were Railway Gate No. 33 on Umred Bhiwapur Bypass Road, Railway Gate No. 290 and 290B between Bharatwada and Kalameshwar Railway Stations, Railway Gate No. 288A on the Kohli to Kalameshwar route, Railway Gate No. 108 between Borkhedi and Sindi Railway Stations and Railway Gate No. 548 on Nandgaon route between Revral and Tarsa railway stations. Bhoomipoojan has been performed of the six-tier double cable stayed flyover near Ajani railway station, Manjri to Pimpalkutty railway gate 2-B on Yavatmal road, Railway gate No. 52- A from Chandur Bazar to Narkhed route at Arvi Road in Wardha District, Railway Gate No. 662/22 N on Amrawati- Badnera Road, Railway Gate S-2 on Amravati - Nimbore Road and Railway Gate 6 (3AB-3T) between Vani and Varora.
000
राज्य के बसस्थानकों का एयरपोर्ट की तरह अद्ययावतीकरण
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपुर दि. 15: महारेल के जरिये राज्य में आगामी सालभर में सौं रेलवे उड्डाणपूल का निर्माण किया जाएगा और अगले पांच सालों में राज्य के रेलवे की यात्रा यह फाटकमुक्त होगा, यह जानकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज दी. साथ ही महारेल के माध्यम से ही राज्य के बसस्थानकों का एयरपोर्ट की तरह ही निर्माण कार्य कर अद्ययावत किया जाएगा उसकी शुरुआत नागपुर बसस्थानकों से की जाएगी, यह घोषणा भी उन्होंने इस दौरान की. विदर्भ के रेलवे उड्डाणपुल का लोकार्पण एवं भूमिपूजन कार्यक्रम में वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से मुख्यमंत्री उपस्थित थे.
महाराष्ट्र रेलवे इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन की ओर से (महारेल) अजनी के पुलियां समेत विदर्भ के नए छह रेलवे उड्डाणपुलियां का भूमिपूजन व छह उड्डाणपुलियां का लोकार्पण केंद्रीय रस्ते परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों इस कार्यक्रम में सांसद कृपाल तुमाने, जिला परिषद की अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, विधायक प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, आशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर आदि मंच पर उपस्थित थे.
श्री फडणवीस के मुख्यमंत्री पद के कार्यकाल में महारेल की स्थापना की गई थी. महारेल के माध्यम से रेलवे की ढांचागत सुविधाओं का जाल महाराष्ट्रभर मजबूत किया जाएगा। रेलवे फाटक पर दुर्घटना कम हो, यातायात की समस्या न हो, सुलभ व बिना रूकावट यात्रा हो,इसके लिए महाराष्ट्र के रेलवे की यातायात सुलभ करनेवाले सौं उड्डाणपूल आगामी सालभर में निर्माण किया जाएगा और आगामी पांच साल में समूचा महाराष्ट्र रेलवे फाटकमुक्त करने का संकल्प राज्य सरकार ने लिया है, इस बात को भी मुख्यमंत्री ने इस दौरान स्पष्ट किया.
उपमुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि अजनी में बना हुआ 1927 का ब्रिटिशकालीन रेलवे पुल का कार्यकाल ख़त्म हो रहा है इसलिये यहां से भारी वाहनों की यातायात पर रोक लगा दी गई है. उपरोक्त स्थान पर नये पुलियां की आवश्यकता थी. आज इस पुलियां का भूमिपूजन किया गया है और इसके प्रथम चरण का निर्माणकार्य आनेवाले १४ महीने में पुरा किया जाएगा. अजनी में छह लेन का पुलियां बनाया जाएगा और वर्तमान स्थित पुलियां कुछ दिनों के लिए वैसेही रहेगा. उस पुलियां के पास तीन लेन के पुलियां का काम पुरा होने के बाद पुराना पुलियां ध्वस्त किया जाएगा और उसी जगह पर नए तीन लेन का पुलियां बनाया जाएगा. इस पुलियां की कुल लंबाई 220 मीटर और चौड़ाई 38 मीटर होगी. करोड़ है. इस पुलियां से शहर के सौंदर्य में भी वृद्धि होने की बात उन्होंने कही.
उपमुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि महारेल के जरिये राज्य में विकासकामों को करने के लिए केंद्र सरकार ने पिछले सिर्फ एक साल में 13 हजार करोड़ रुपये इतना निधि राज्य सरकार को दिया है. केंद्र व राज्य सरकार के सहभागिता से अधिकाधिक विकासकामों को किया जाएगा. यह सहभागिता आगे भी कायम रखते हुए महारेल के माध्यम से राज्य के बसस्थानकों को भी एयर पोर्ट की तरह ही सुंदर व सुसज्ज किये जाए और शुरुआत नागपुर बसस्थानक से की जाये, यह मांग उन्होंने इस दौरान की. सिमेंट रस्ते के निर्माण कार्य के तीसरे चरण में नागपुर के करीब-करीब सभी महत्वपूर्ण रस्ते सिमेंट के किये जायेंगे और शहर का स्वरूप ही बदलेगा।
राज्य के रेलवे फाटक पूरी तरह से बंद करने के लिए राज्य सरकार को केंद्र की ओर से सर्वतोपरी मदद की जाएगी, इसके लिए राज्य में 1200 करोड़ रुपये 25 रेलवे पुलियां को आज ही मंजूरी दिए जाने की घोषणा भी केंद्रीय रस्ते परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितीन गडकरी ने इस दौरान की. साथ ही नागपुर शहर के विविध विकासकामों के लिए 500 करोड़ रुपये निधि मंजूरी की घोषणा भी उन्होंने इस दौरान की. इसी से नागपुर यह विश्व का अच्छा ढांचागत सुविधायुक्त ‘मल्टीमॉडल हब’ के रूप में विकसित होगा, यह आशावाद भी उन्होंने व्यक्त किया. देश में रेलवे मार्ग तैयार करनेवाले सिर्फ चार एनटीसी (न्यू ट्रॅक कन्स्ट्रक्शन) यंत्र है. इसमें से एक यंत्र के द्वारा इतवारी से नागभिड रेलवे मार्ग तैयार करने के कामों को भी आज से ही शुरुआत किए जाने की बात उन्होंने कही.
भूमिपूजन हुए नए छह उड्डाणपुलियां का कुल अंदाजित खर्च 600 करोड़ रुपये है और लोकार्पण हुए उड्डाणपुलियां के लिए कुल 306 करोड़ रुपए खर्च आया है. लोकार्पण किये गए पुलियां में उमरेड भिवापूर बायपास रोड के रेलवे फाटक क्रमांक 33, भरतवाडा से कळमेश्वर रेलवे स्थानकों के बीच रेलवे फाटक क्रमांक 290 और 290 बी, कोहली से कळमेश्वर मार्ग के रेलवे फाटक क्रमांक 288 अे, बोरखेडी और सिंदी रेलवे स्थानक के बीच रेलवे फाटक क्रमांक 108 और नांदगांव मार्ग के रेवराल और तारसा रेलवे स्थानक के बीच रेल्वे फाटक क्रमांक 548 के रेलवे पुलियाँ का समावेश है. साथ ही भूमिपूजन हुए पुलियां में अजनी रेलवे स्थानक के पास छह पदरी दुहेरी केबल स्टेड उड्डाणपुल समेत यवतमाळ रोड पर मांजरी से पिंपळकुट्टी रेलवे फाटक 2-बी, वर्धा जिले के आर्वी रोड में चांदूरबाजार से नरखेड मार्ग के रेलवे फाटक क्रमांक 52-अे, अमरावती- बडनेरा रोड पर रेलवे फाटक 662/22एन, अमरावती - निंभोरे रोड स्थित रेलवे फाटक एस-2 व वणी से वरोरा के बीच रेलवे फाटक 6 (3 अेबी-3टी) इन नए पुलियां का समावेश है.
000
No comments:
Post a Comment