Sunday, 10 July 2022

महापूजा





 

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

 

 'बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी  

           कोरोनासह सर्व अडचणी दूर कर'- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

 

बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले

या वारकरी  दांपत्याला महापूजेचा मान

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण

 

 

           सोलापूर /पंढरपूर दि. 10 :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची  परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे  सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठे ही कमी पडणार नसल्याची ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.   समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यसमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठल चरणी घातले.

            आषाढी एकादशी निमित्त श्री.शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी  मानाचे वारकरी मु.पो.  रुईता.गेवराईजि.बीड  येथील मुरली भगवान नवले (52) आणि सौ.जिजाबाई मुरली नवले (47) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची  महापूजा  केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात  ते बोलत होते.

            यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीयमंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्यलोकप्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वर्षी 10 लाखांपेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने  चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरीवारकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणार

 

             राज्यात कृषीउद्योगशिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील, असे त्यांनी सांगितले.

            राज्यात या वर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल.  शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने महापूजा

            राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे.  आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण

 

          आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन  महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधवउपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड  उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे व मान्यवरांच्या हस्ते 'रिंगणया वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील या प्रसंगी करण्यात आले.

 

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

            पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी अभियानामध्ये नागरिकांचा  सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडीपुरस्कार  देण्यात येतो.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह)द्वितीय क्रमांक - वै.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडीमु.पो.शेरातालुका रेणापूरजिल्हा लातूर  (75 हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (50 हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. या वेळी 'ग्रीन बिल्डिंगपुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

            प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री.औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केलेतर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.

              यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदेबंडू जाधवआमदार सर्वश्री दीपक केसरकरतानाजी सावंतदादा भुसेसंजय राठोडशहाजीबापू पाटीलसमाधान आवताडेसचिन कल्याणशेट्टीभरतशेठ गोगावलेरविंद्र फाटकराणा जगजीतसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारेजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरपोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेअपर जिल्हाधिकारी संजीव जाधवमंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते

                                                                 0000                                                           

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत

'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी'चा समारोप

 

प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरणाचे रक्षणाचा संकल्प करूया

                                                            -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            पंढरपूरदि. 10 :  आषाढी वारीच्या निमित्ताने  प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारीउपक्रमाचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता शिंदेखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार प्रा.तानाजी सावंतमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारेजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरपोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेएकदा वापर करुन फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे 1 जुलै 2022 पासून एकदा वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

            ज्ञानोबा-तुकोबांसारख्या  संतांनी पर्यावरणाचा संदेश आपल्या अभंग आणि भारूडामधून दिलेला आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेअसे संत तुकाराम महाराज म्हणताततर 'नगरेची रचावी जलाशय निर्मावी महा वने लावावी नानाविधअसे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आपल्याला पर्यावरण जनजागृतीची ऐतिहासिक परंपरा आहे. संतांचा हा संदेश लक्षात घेऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करावा.

            महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरण बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाण्यातील महाराष्ट्र कला संस्कृती मंच या सेवाभावी सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्याने गेली बारा वर्षे राज्यातील जनतेला पर्यावरण जागृतीचा संदेश या वारीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारीहा स्तुत्य उपक्रम आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

             यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे व  सौ.लता शिंदे यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम, 'ज्ञानोबा- माऊली तुकारामगजर करत कलावंतासोबत पाऊली खेलती 

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य

                                                            -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            पंढरपूरदि.10 : इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबईठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जातेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन  प्रसंगी ते बोलत होते.

            यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदेजिल्हाधिकारी मिलींद शंभरकरउपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठपोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेलोकनाथ स्वामी महाराजश्रीकृष्ण चैतन्य स्वामीसुंदर चैतन्य स्वामीश्री.प्रल्हाद दासभक्तीप्रेम स्वामीकृष्णकांत दास आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेविश्व बंधुत्व, ऐक्यएकतासहिष्णूताशांती निर्माण करण्यासाठी भुवैकुंठ  माध्यम ठरेल. इस्कॉनच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या अन्नछत्र व्यवस्थेचा भाविक मोठ्या प्रमाणत लाभ घेतात. 15 एकर जागेत भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धतीबाल संस्कार वर्गअन्नछत्रगोशाळा संवर्धनसंशोधनभक्त निवास,असे विविध उपक्रम होणार आहे.  मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेलअसे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून सेवक म्हणून काम करणार आहे.  राज्याला सुजलाम् सुफलाम् करुन विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहूअशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मंदीर परिसरातील प्रभुपाद घाटाची पाहणी केली.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

            मुंबईदि. 10 : त्यागसमर्पणासाठी ओळखला जाणारा सण बकरी ईद’ अर्थ 'ईद-उल-अजहानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

            'बकरी ईदकडून प्रेरणा घेऊन समाजातील बंधुताएकमेकांप्रति आदरएकतेची भावना वाढीस लागावीहीच अपेक्षा.  त्यागसमर्पणातूनच सशक्त अशा समाजाची उभारणी होतेत्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करूयाहीच मनोकामना आणि याच शुभेच्छा! असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

000


 

आषाढी एकादशी के औचित्य पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों की गई 

श्री विठ्ठल-रुक्मिणी की सपत्नीक महापूजा

 

'बा विठ्ठला समाज के सभी वर्ग के लोगों के जीवन में सुख व समृद्धि के लिए कोरोना समेत सभी समस्याओं को दूर करो'- मुख्यमंत्री ने विठ्ठल के चरणों में की प्रार्थना

 

बीड जिले के श्री. मुरली भगवान नवले और श्रीमती जिजाबाई मुरली नवले 

इस वारकरी दंपति को मिला महापूजा का सम्मान

 

मुख्यमंत्री के हाथों श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार का वितरण

 

            सोलापुर/पंढरपुर, दि. 10 : आषाढी एकादशी वारी की सैकड़ों साल की परंपरा रही है। अनेक वर्षों से अनुशासनबद्ध रूप से लोग पंढरपुर की ओर निकलते है। इसलिए एक सकारात्मक माहौल यहाँ पर तैयार होता है। इस वारी में लाखों भाविक शामिल होते है। वारी में शामिल होनेवाले सभी वारकरी भाविकों को सेवा -सुविधा उपलब्ध कराने में राज्य सरकार कहीं पर कम नहीं पड़ेगा, यह ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस अवसर पर दी। समाज के सभी वर्गों के लोगों के जीवन में सुख व समृद्धि आए, राज्य के कोरोना समेत सभी समस्याएँ दूर हो, यह प्रार्थना विठ्ठल के चरणों में उन्होंने की। 

           आषाढी एकादशी के औचित्य पर श्री. शिंदे और उनकी पत्नी  श्रीमती लता शिंदे ने महापुजा का सम्मान इस साल जिन्हें मिला उस वारकरी दंपति  मु. पो.  रुई, त.गेवराई, जि. बीड के मुरली भगवान नवले (52) और श्रीमती जिजाबाई मुरली नवले (47) के साथ विठ्ठल-रुक्मिणी की महापूजा की। महापुजा के बाद विठ्ठल मंदिर समिति की ओर से आयोजीत .

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi