Wednesday, 25 June 2025

कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी 862 कोटी 29 लाख रूपयांची तरतूद

 कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी 862 कोटी 29 लाख रूपयांची तरतूद

          कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी 862 कोटी 29 लाख रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

          कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी 30 टीएमसी तर महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाअंतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त 20 टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त विद्युत निर्मिती करणे तसेच धरण पायथ्याची वीजगृहे या कालावधीत रूपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर2x40 मे.वॅट) या योजनेचे नियोजन करण्यात आले. दरम्यान 2023 मध्ये शासनाने सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे उदंचन जलविद्युत प्रकल्पसौर आणि इतर अपारंपारिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आता हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला गेला आहे. या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक 1336 कोटी 88 लाखांपैकी 862 कोटी 29 लाख रूपयांच्या तरतुदीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. उर्वरित खर्चांची तरतूद सिंचन योजनांवर टाकण्यात येणार आहे.

          या प्रकल्पामुळे टेंभुकृष्णा कोयना उपसा सिंचन योजना (ताकारी-म्हैसाळ) या योजनांसाठी 20 टीएमसी पाणी विद्युत निर्मिती करुन सोडले जाणार आहे. प्रकल्पाव्दारे एकूण 277.82 द.ल.युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ

 आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारनिर्वाहशैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ

          अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्यभरात विभागीयजिल्हातालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसत‍िगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यांमध्ये सुमारे दुपटीने वाढ करण्यात आली असून शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

          महागाई निर्देशांकाचा विचार करून या भत्त्यांच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांत कोणतीही वाढ न मिळाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आता सुधारित दरानुसार अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे. नवीन सुधारित दर पुढीलप्रमाणे (सध्याचा भत्ता) :-

निर्वाह भत्ता (दरमहा) : विभागीय स्तरासाठी 1400 रूपये (800)जिल्हा स्तरासाठी 1300 रूपये (600) आणि ग्रामीण/तालुका स्तरासाठी 1000 रूपये (500) इतका भत्ता देण्यात येणार आहे. मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ताही 100 वरून 150 रूपये इतका वाढविण्यात आला आहे.

शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता (वार्षिक) : इयत्ता 8 वी ते 10 वीसाठी 4500 रूपये (3200)11 वी12 वी व पदविका अभ्यासक्रमासाठी 5000 रूपये (4000)पदवी अभ्यासक्रमासाठी 5700 रूपये (4500) तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 8000 रूपये (6000) एवढा भत्ता मंजूर झाला आहे.

आहार भत्ता (दर महिना) : महानगरपालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहासाठी 5000 रूपये (3500) आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांसाठी 4500 रूपये (3000) इतका भत्ता निश्चित करण्यात आला आहे.

          राज्यात 490 वसतिगृह सुरू असून त्यापैकी 284 मुलांची व 206 मुलींची वसतिगृहे आहेत. यामध्ये एकूण 58 हजार 700 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग pl share

 महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती20 हजार 787 कोटींची तरतूद

राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग

          राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (शिघ्रसंचार द्रूतगती मार्ग) प्रकल्पाला गती देण्यासाठी 20 हजार 787 कोटी रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रूतगती मार्ग 802.592 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

          महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धायवतमाळहिंगोलीनांदेडपरभणीबीडलातूरधाराशिवसोलापूरसांगलीकोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना  जोडणार आहे.  पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुरतुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.  तसेच संतांची कर्मभूमि असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामीजोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ व परळी वैजनाथमहाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरयासह कारंजा-लाडअक्कलकोटगाणगापूरनरसोबाची वाडीऔदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.  या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे. 

          या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता हुडकोकडून 12 हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.  या निधीतून सुमारे 7 हजार 500 हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न असूनत्यातून पर्यटनवाहतूक व ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.

गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद

 गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावा गावात

क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. २४ : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात गावागावात क्रीडा सुविधा उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक गावात १० लाख रुपयांपर्यंतचे क्रीडा साहित्य पुरवण्यास क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजुरी दिली. राज्य क्रीडा विकास निधी सनियंत्रण समितीची बैठक क्रीडा मंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

 राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित तसेच विनाअनुदानित प्राथमिकमाध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालये, ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे अशा सर्व शैक्षणिक संस्थास्थानिक स्वराज्य संस्थाविविध विभागांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळाआश्रमशाळावसतीगृहे यांना हे क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. तसेच एकविध खेळाच्या क्रीडा संघटनखासगी क्लबक्रीडा मंडळेयुवक मंडळमहिला मंडळे यांनाही १० लाखापर्यंतचे क्रीडा साहित्य देण्यास मान्यता देण्यात आली.

हातकणंगले व हुपरी तालुका क्रीडा संकुल संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक निधीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर धारावी येथील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलमुंबई शहर या कामामधील त्रुटी ठेकेदार कंपनीने तत्काळ दूर कराव्यात. कोणतेही काम अपूर्ण ठेऊ नये अशा सूचना क्रीडा मंत्री भरणे यांनी यावेळी दिल्या.

0000

विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

  विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा

– उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

 

मुंबई, दि. २४ :- विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक पदव्या न देता  रोजगाराभिमुख व व्यावसायिक प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी भागात शिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत विद्यापीठाच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीत विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणूगोपालरेड्डीउपसचिव प्रताप लुबाळ,डॉ. प्रशांत बोकारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सादर करण्यात आलेल्या डीपीआरमध्ये प्रादेशिक गरजांनुसार अभ्यासक्रमांची आखणीनवीन इमारतींचा आराखडासंशोधन केंद्रेडिजिटल शिक्षण सुविधा यांचा समावेश करावा आणि स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना मदत करणारे संशोधन करावे. आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनमानात परिवर्तन घडवण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखणेगडचिरोली जिल्ह्यातील तसेच विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेतो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा, यासाठी प्रयत्न, संधीच्या अभावामुळे पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ आपल्या गावात’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचू शकत नसल्यास शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये शैक्षणिक जाणीव निर्माण करणेशिक्षणाचा प्रचार-प्रसार करणे, या उपक्रमांतर्गत गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील अर्धवट शिक्षण सोडलेलेशाळाबाह्य व इतर अडचणीमुळे शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारीत शिक्षण देणे हा गोंडवाना विद्यापीठाचा मानस असल्याची माहिती देण्यात आली.

0000

पंढरपूर आषाढी वारीतील अन्न व पेयपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सजग व सज्ज,pl share

 पंढरपूर आषाढी वारीतील अन्न व पेयपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी

अन्न व औषध प्रशासन विभाग सजग व सज्ज

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबईदि. २४ :- पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करत असतात. वारी मार्गावर आणि पंढरपूर व परिसरात वारकऱ्यांना वाटप होणारे अन्न व पेयपदार्थ आरोग्यदृष्ट्या सुरक्षितस्वच्छ व गुणवत्तापूर्ण राहावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन सजग व सज्ज झाला असून अन्न व पाण्याच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने  प्रभावी योजना आखल्या आहेतअशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेआषाढी वारी मार्गावर सेवाभावी संस्थास्वयंसेवक आणि दानशूर मंडळी मोठ्या प्रमाणावर मोफत अन्न व पाण्याचे वाटप करतात. मात्रखुले अन्नतात्पुरत्या ठिकाणी तयार होणारे पदार्थवातावरणीय बदल व स्वच्छतेचा अभाव यामुळे अन्न विषबाधा किंवा इतर अन्नजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

आषाढी वारी मार्गावरील तसेच पंढरपूर व आजूबाजूच्या परिसरातील उपहारगृहेमिठाई उत्पादक व अन्न विक्री आस्थापनांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. पालख्यामुक्कामस्थळवाटप केंद्रमंडप व भंडारा स्थळांवर भेटी देऊन अन्न सुरक्षा व स्वच्छता मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे की नाहीयाची पडताळणी करण्यात येत आहे.

अन्न वाटप करणाऱ्या संस्थांकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) नोंदणी अथवा परवाना आहे की नाही याची खात्री करून घेणे व नोंदणी नसल्यास तातडीने तात्पुरती नोंदणी मिळविण्यासाठी सहकार्य करणे. अन्न तयार करणाऱ्या ठिकाणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या (FSSAI) Schedule ४ अंतर्गत असलेल्या स्वच्छते संदर्भातील तरतुदींचे पालन होत आहे की नाहीयाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अन्न वाटप करणारे स्वयंसेवकसंस्थाभंडारा आयोजक यांना लघु प्रशिक्षण दिले जात आहे. स्वच्छ अन्न सुरक्षित वारी या घोषवाक्याखाली माहितीपत्रकेपोस्टर्सबॅनर आदी माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे सांगून श्री. झिरवाळ म्हणालेवारी मार्गावर अन्न सुरक्षा जनजागृती व अन्न तपासणीसाठी ‘Food Safety on Wheels’ वाहनांचा प्रभावी वापर केला जात आहे. दूषित अन्न किंवा पाणी टाळावे याबाबत वारकऱ्यांमध्येही जागरूकता निर्माण केली जात आहे. सडलेलेघाणीत तयार झालेले अन्न आढळल्यास त्वरित नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्नजन्य आजार आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून कार्यवाही केली जाईल व जिल्हास्तरीय यंत्रणांशी सतत समन्वय ठेवण्यात येईल.

आषाढी वारी स्वच्छसुरक्षित व आरोग्यपूर्ण होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत उचललेले हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेलअसा विश्वासही अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी व्यक्त केला.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन ,pl share

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या

विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. २४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता बीजभांडवल योजनाथेट कर्ज योजना व अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

  मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील वय १८ वर्षापेक्षा जास्त असलेल्या आणि वय ५० पेक्षा कमी असलेल्या अर्जदारांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता बँकेकडून मंजूर होणाऱ्या अनुदान योजनेंतर्गत उपनगर ५० व शहर ५० चे उद्दिष्ट (५० हजार रुपये पर्यंतचे)बीजभांडवल योजनेअंतर्गत उपनगर ५० व शहर ५० चे उद्दिष्ट (५०,००१ ते ७.०० लाख रुपये पर्यंत) व थेट कर्ज योजनेतंर्गत उपनगर ५० व शहर ५० उद्दिष्ट (१ लाख पर्यंतचे)मुंबई शहर-उपनगर जिल्हा करिता प्राप्त आहे.

इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेविकास महामंडळ (मर्या)जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगरगृहनिर्माणभवनकलानगरतळमजलारुम नं. ३३बांद्रा (पू)मुंबई - ४०० ०५१ या पत्त्यावर किंवा ०२२-३५४२४३९५ या दूरध्वनीवर संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi