Friday, 29 November 2024

काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद

 काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद

 

मुंबई, दि. २९ : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत : वतन को जानोकार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले.

काश्मीर हा भारतातील सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विविध प्रदेशांना भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग असून पुढे देखील राहील असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. आपण सर्वांनी एक देश म्हणून एकत्र राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.  

यावेळी श्रीनगरअनंतनागकुपवाडाबारामुल्लाबडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक- युवतींनी राज्यपालांशी संवाद साधला. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरेजिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते. या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

0000

 

Group of 125 Kashmiri Youths meet Maharashtra Governor

 

Mumbai A group of 125 youths from the six districts of Kashmir, currently on a visit to Mumbai called on Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan. The youths comprising 30 girl students are visiting Maharashtra under the 'Watan Ko Jaano' programme organised by the Nehru Yuva Kendra Sanghatan as part of the Kashmir Youth Exchange Programme.

 State Director of Nehru Yuva Kendra Sanghatan Prakash Manure, District Youth officer Nishant Rautela and others were presen

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत

 गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील

 मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत

-         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. 29 : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेतआवश्यकता वाटल्यास जखमींना खागी रुग्णालयात दाखल करावेअशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेतअशी सूचनाही त्यांनी दिली.

            अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

0000

*संत ज्ञानेश्वर महाराज* *संजीवन समाधी सोहळा*

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


                *अलंकापूरीतून*

           *सार्थ योगी जीवनाची*


      ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

           *संत ज्ञानेश्वर महाराज* 

        *संजीवन समाधी सोहळा*

      ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

        

🚩⚜🚩🔆🙏🔆🚩⚜🚩            


    *बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल !!*

    *श्री ज्ञानदेव तुकाराम !!*

    *पंढरीनाथ महाराज कि जय !!* 

    *श्री ज्ञानेश्वर महाराज कि जय !!*

    *श्री तुकाराम महाराज कि जय !!*

        *हा प्रत्येक मंदिरात होणारा जयघोष असो वा पंढरपूर.. देहू.. आळंदी वारीत "ज्ञानोबा माऊली तुकाराम" चा जयघोष म्हणजे जगात सर्वाधिक वेळा झालेला.. होणारा जयघोष. हा जयघोष  करा असे कुणी कुणाला आजवर सांगितले नाही. पण उत्फुर्तपणे होत आहे.*

        *हा आहे ज्ञानेश्वर माऊलींचा जनमानसावरचा पगडा. ज्ञानेश्वरानंतरच्या सर्वच संतांनी ही भक्ती चळवळ घरोघरी पोहोचवली. भारतीय संस्कृती संस्काराचे फायदे प्रत्येक घराला प्राप्त होत आहेत.*    

        *जगातील सर्वच विव्देषाचे कारण माऊलींना ज्ञात होते. माऊली हरिपाठात म्हणतात..* 

    *कोणाचें हें घर हा देह कोणाचा ।*

    *आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥*

        *सामान्य जनाला जात.. वर्ण.. देहयष्टी.. घर.. संपत्ती.. पद.. प्रतिष्ठा सर्वच गोष्टीचा अभिमान.. अहंकार असतो. या सर्वाचा भोग घेतो तो  त्याचा देह. हा देह टिकविण्यासाठी सतत धडपड सुरू असते. पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे.. त्याचा मालक कोण हे मात्र त्याला ठाऊक नसते.*

        *पण योगी जनांचे तसे नसते. त्यांना जीवन उद्दिष्ट ठाऊक असते आणि पूर्णत्वाची कल्पनाही असते. याविषयी गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाने विचारलेल्या सात प्रश्नांच्या उत्तरात विस्तृत विवेचन केलेले आहे.*

        *ज्ञानेश्वर माऊली हे योगी. जे योगी असतात ते जन्मभर भगवंताचे नामस्मरण करतात. त्यांनी इंद्रियविजय प्राप्त केलेला असतो. योगी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून कोसो दूर असतात. त्यांच्यावर मायेचाही प्रभाव पडत नाही. सुख असो वा दुःख ते स्थितप्रज्ञ असतात. त्याकडे समबुद्धीनेच बघून ते अविचल असतात.*

        *योगीजनांना अंतकालाची जाणीव होते. त्यांच्या डोक्यात अंतःकाली भगवंताशिवाय कोणतेच विषय नसल्याने काही  इच्छापुर्तीसाठी ते पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत. अंतकाळी त्यांच्या देहाला यातनाही होत नाहीत. मायेला दूर सारुन ते आनंदाने परमधामात येतात. पण संजीवन समाधी रुपातील त्यांची स्पंदने.. उर्जा चैतन्यदायी ठरते.*

        *तुळशीच्या.. फुलांच्या आसनावर पद्मासन घालून योगी आनंदाने गुरुंना वंदन करुन ॐ कार स्मरण करतात, तेव्हा या प्रिय भक्ताला आदि.. अनंत अर्थातच कधीही नष्ट न होणाऱ्या अक्षरधामात.. परमधामात सन्मानाने नेण्यासाठी प्रत्यक्ष श्रीकृष्ण अवतरतात. जन्मानंतर परमेश्वराने सोपविलेले विहित कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे समाधान या योगींना लाभलेले असते.* 

        *ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात हेच दृश्य होते. उपस्थित संतजनांना याची कल्पना होती. पण तरीही उपस्थित कुणालाही भावनावेग आवरणे शक्य नव्हते. नामदेव, जनाबाई सह अनेक संतांनी याचे वर्णन केलेय. ज्ञानदेवांनी त्यांचे गुरु आणि बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव असो वा लहानशी मुक्ताई यांचीही माया दूर सारली. माऊलींनी त्यांना त्रास देणाऱ्यांविषयीही अवाक्षर काढले नाही. याउलट त्यांनाही कल्याणाचा मार्ग दाखवला. समतेची वाट दाखवली.*

        *ज्ञानेश्वरी.. चांगदेव पासष्टी.. हरिपाठ.. अमृतानुभव हे माऊलीचे ज्ञानामृत भक्ताना सदैव संजीवनी देत आहे. माऊलींची आत्मरुप चैतन्य उर्जा.. स्पंदने मात्र भागवत भक्तांना आजही जाणवतात.*

        *संजीवन समाधीच्या ७२८ वर्षानंतरही दरवर्षी लाखो भक्त माऊलींचे हे नित्य अनुभवतात. भौतिक जगात सुख.. समाधान.. मनःशांती.. आनंद प्रत्ययास येणारी ही देवाची आळंदी. इथेच नाही तर गावोगाव या माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्य भक्त हरिनाम संकीर्तनात दंग आहेत.*

        *या ज्ञानियाच्या राजाने  भक्तीतून विवेकी होत सत्य ज्ञान प्राप्तीचा मार्ग प्रदान केला. हा भागवत धर्म प्रसाराचा वारसा पूढे अनेक संतांनी त्याच निष्ठेने चालवला. समाजात एकोपा.. शांती आणि प्रत्येक कुटुंबात सौख्य प्रदान झाले. याचे दर्शन दरवर्षी पंढरी वारीत लाखो हरिभक्तांच्या रुपाने घडते. सदगुरु गुरु निवृत्तीनाथांनी माऊलींच्या मनात रोवलेल्या मोगऱ्यांच्या फुलांचा सुगंध या शिष्याने जगभर पसरवला. माऊली विश्वविख्यात आहेत.*

        *सत्य ज्ञानाचा.. विवेकाचा शाश्वत सुखाचा भक्ती मार्ग दाखवणे हे माऊलींचे या देशावर अनंत उपकार आहेत. अमृत रसमय खजीना प्रदान करणाऱ्या.. जगातील प्रत्येक जिवासाठी पसायदान मागणाऱ्या जगत माऊलींच्या चरणावर वंदन करुया.*        

    

🌹🛕🌸🔆🙏🔆🌸🛕🌹


  *समाधी घेऊन जाई ज्ञानदेव*

  *सोहळा अपूर्व जाहला गे माये*


  *निवृत्तीनाथांनी चालविले हाती*

  *पाहुन ती मूर्ती धन्य वाटे*

  *आपण निर्गुण मागे परी दान*

  *विश्वाचे कल्याण-निरूपण*


  *सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ*

  *मायेचे हे बळ राया बोले*

  *ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट*

  *फुटली पहाट ब्रम्हज्ञान*


  *नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो*

  *वैकुंठासी जातो ज्ञानराया*

  *सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ*

  *सज्जनाचे बळ समाधान*


  *गुरू देई शिष्या समाधी आपण*

  *देवा ऐसे मन का बा केले ?*

  *पद्माचे आसन घालविले जाण*

  *ओंकार ते पूर्ण पंचप्राण*


  *पैलतिरी हाक आली आज कानी*

  *करूनी निर्वाणी बोलविले*

  *ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला*

  *कैवल्यचि झाला भक्तजन*


🌷🍃🌸🛕🌺🛕🌸🍃🌷


  *गीत : अशोकजी परांजपे*  ✍️

  *संगीत : कमलाकर भागवत*

  *स्वर : सुमन कल्याणपूर*


  🎼🎶🎼🎶🎼  🎧


   *‼️जय जय रामकृष्ण हरी ‼️*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२९.११.२०२४-*


🌻🥀🌷🌿🌺🌿🌷🥀🌻

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेवूया.....*

 *भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका मधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेवूया.....*


*अगदी सहज सोप्या भाषेत, तसेच संविधान प्रास्ताविक किती महत्त्वाची आहे हे समजून घेवून प्रसार करु या.*


🔅 *आम्ही*-

*स्वातंत्र्यापुर्वी आपण एकत्र नव्हतो. विखुरलेले होतो. संविधानाने "मी" ला "आम्ही" केले.*


🔅 *भारताचे लोक* -

*विविध वतने, राजांची स्वतंत्र राज्ये, वेगवेगळे व आपापले भूभागाचे लोक एकमेकांना एकाच देशाचे समजत नसत. यांना संविधानाने एका देशाचे /भारताचे नागरिक/लोक म्हंटले.*


🔅 *सार्वभौम*-

 *आपण आपल्या देशात आपल्याला योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत.*


🔅 *समाजवादी* -

*आमच्या देशात गरिब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी असणार नाही. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असेल. संपत्तीचे काही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.*


🔅 *धर्मनिरपेक्ष* -

*विविध धर्माचे लोक असणारा देश चालवताना मात्र शासनातील व्यक्तींना काम करताना कोणताही धर्म असता कामा नये. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जाणार नाही. धर्म हा व्यक्तिपुरता असावा. तो रस्त्यावर आणु नये.*


🔅 *लोकशाही गणराज्य* - *लोकांकडून / मतदानाद्वारे निवडलेला प्रतिनिधी या राष्ट्राचे काम पाहील. लोकांच्या मतालाच प्रचंड किंमत असेल. लोक ठरवतील त्यांचीच टीम लोकांचे भले करणारे काम करण्यासाठी निवडली जाईल.*


🔅 *घडवण्याचा* - 

*वरीलप्रमाणे असणारा असा देश निर्माण करण्याचा*


🔅 *सामाजिक न्याय* -

*व्यक्तींमध्ये जात धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच असेल. अस्पृश्यतेसारखी, बिहिष्कृत करण्यासारखी परिस्थिती निर्माण न होऊ देणारा.*


🔅 *आर्थिक न्याय* -

*कोणाही एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन, मुल्ये दिले जाईल. देशातील प्रत्येकाला कोणत्याही भेदभावाशिवाय आपल्या आवडीप्रमाणे उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क असेल.*


🔅 *राजनैतिक न्याय* -

*लोकशाही प्रक्रियेत महिला, पुरुष व अन्यलिंगीय व्यक्तींना व प्रत्येक घटकास निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवता येईल व त्याला त्याचे मत देण्याचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार असणारा.*


🔅 *विचार स्वातंत्र्य -*

*देशाच्या नागरिकास स्वतंत्रपणे विचार करण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यावर कोणाचाही अंकुश असणार नाही.*


🔅 *अभिव्यक्ती स्वातंत्र्य -*

*प्रत्येकास आपला विचार मांडण्याची मुभा असेल. विचार मांडताना व्यक्तिद्वेषी विचार नसतील तर त्यावर कोणाचेही बंधन नसेल. लिहिणे, बोलणे, सादर करणे याचे स्वातंत्र्य असेल.*


🔅 *विश्वास स्वातंत्र्य -* 

*प्रत्येकास आपण मानत असलेल्या मूल्यानुसार विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यावर कोणाचे बंधन नसेल.*


🔅 *श्रध्दा व उपासना स्वातंत्र्य -*

*प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्मावर श्रध्दा ठेऊ शकतो व व त्यानुसार उपासना करू शकते. धर्मांतर करणे, धर्म स्वीकारणे वा नाकारण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीस असणार आहे.*


🔅 *दर्जाची समानता-*

*प्रत्येकास समान वागणूक दिली जाईल याची खात्री. त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था. कोणासही आपला दर्जा उंचावण्याचा अधिकार असेल. आर्थिक सामाजिक व इतर प्रकारचा दर्जा उंचावताना त्या व्यक्तीस कोणीही आडकाठी करणार नाही.* 


🔅 *संधीची समानता-*

*प्रत्येक नागरिकास समान संधी व समान काम मिळेल याचे नियोजन असेल. कोणत्याही कारणाने कोणास संधीच उपलब्ध होणार नाही अशी स्थिती राहणार नाही. लोकांना आपली प्रगती साधता येईल.*


🔅 *व्यक्तीची प्रतिष्ठा* -

*नागरिकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल. कोणाच्याही प्रतिष्ठेस ठेच लागणार नाही याची आपण काळजी घेऊ.*


🔅 *राष्ट्राची एकता* - 

*राज्य, भाषा, वेश तसेच राज्यांचे सीमावाद सामंज्यसाने निकाली काढून देशांतर्गत फूट निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.*


🔅 *राष्ट्राची एकात्मता* -

*विविधतेने नटलेले राष्ट्र एकात्म रहायला हवे. आम्ही एकमेकांमध्ये इतके मिसळून जावे की एकापेक्षा दुसरा वेगळा आहे असे चित्रही न दिसावे. असे आश्वासन मिळावे.*


🔅 *बंधुता* - 

*देशातील नागरिकांनी एकमेकांशी वागताना बंधुत्व भावनेने वागावे. जगावे. प्रत्येक व्यक्ती आपलाच आहे ही भावना निर्माण व्हावी.*


🔅 *प्रवर्धित करण्याचा* - 

*वरील सारे भारतात निर्माण करण्याचा. . .*


🔅 *संकल्पपुर्वक निर्धार*-

*मनामध्ये पक्का विचार करुन, ठेवून, मनात नक्की करुन. .*


*आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान.  .*


🔅 *अंगीकृत* -

*भारतीय संविधान "स्वीकारून"*


🔅 *अधिनियमित* -

*या बाबतचा नियम, कायदा बनवुन स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.*


*📓 आशा आहे, संविधान प्रास्ताविकाचे महत्व लक्षात आले असेल तर आता सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करु या..!*

Thursday, 28 November 2024

*"वानोळा"* *घरी चाललाच आहेस तर जातांना *वानोळा* घेऊन जा.... रिकाम्या हाताने जाऊ नये....!!* वरिल वाक्य ऐकले आणि *वानोळा* शब्द मनात फिरत राहिला.... *नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं....* तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर..., किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना.. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो *भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली दाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी....* आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला.... मग घरी येऊन जोवर तो *वानोळा* पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची... तो *वानोळा* केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं... वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची, तरी शेजार पाजारी *वानोळा* जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा.. सगळ्यात विशेष म्हणजे *"कैरीचं लोणचं."* मसाला तोच..., कैऱ्या त्याच...., पद्धतही तीच..., तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध ही वेगळा आणि चवही वेगळी... थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या *वानोळ्या* च्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची... एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची..., आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं..., हे वास्तव आहे. अशावेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत... जोवर *वानोळा* होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला, 'वानोळ्या'ची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली.... मग 'वानोळ्या'ची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली.... जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला.. सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या.. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवं आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो.. *माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमधेच सापडते,* तिच्या गाठोड्यात *वानोळा* देणारी *माय देखील पडद्याआड जाऊ पाहते,* तरी अजूनही *तुमच्या माझ्या सारख्यांची *आई* निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच *"वानोळा"* असतो. *देत राहणाच्या संस्काराचा....,* *वाटून खाण्याच्या वृत्तीचा....,* *लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा....,* *दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो.... '* *वानोळा*. आज असाच शब्दरूपी *वानोळा* पाठवत आहे, पोहचला की आस्वाद घ्या आणि गोड माना... पण तो अस्सल *वानोळा* खरंच कुठेतरी हरवला हे निश्चित...!!

 *"वानोळा"*


*घरी चाललाच आहेस तर जातांना *वानोळा* घेऊन जा.... रिकाम्या हाताने जाऊ नये....!!*


वरिल वाक्य ऐकले आणि

 *वानोळा* शब्द मनात फिरत राहिला....

*नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं....*

तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर..., किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना..


तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो *भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली दाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी....*

आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला.... 


 मग घरी येऊन जोवर तो *वानोळा* पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची...

 तो *वानोळा* केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं...


वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. 

पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची, तरी शेजार पाजारी *वानोळा* जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा..


सगळ्यात विशेष म्हणजे *"कैरीचं लोणचं."* मसाला तोच..., 

कैऱ्या त्याच...., 

पद्धतही तीच..., 

तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध ही वेगळा आणि चवही वेगळी... 


थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या *वानोळ्या* च्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची...


एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची..., 

आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं..., 

हे वास्तव आहे.

अशावेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत...


जोवर *वानोळा* होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला, 'वानोळ्या'ची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली....


मग 'वानोळ्या'ची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली....

जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला.. 


     सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या.. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवं आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो..


*माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमधेच सापडते,*

तिच्या  गाठोड्यात *वानोळा* देणारी *माय देखील पडद्याआड जाऊ पाहते,*

तरी अजूनही *तुमच्या माझ्या सारख्यांची *आई* निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच *"वानोळा"* असतो.

*देत राहणाच्या संस्काराचा....,*

*वाटून खाण्याच्या वृत्तीचा....,* 

*लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा....,*

*दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो.... '*

*वानोळा*.


     आज असाच शब्दरूपी *वानोळा* पाठवत आहे, पोहचला की आस्वाद घ्या आणि गोड माना... पण तो अस्सल *वानोळा* खरंच कुठेतरी हरवला हे निश्चित...!!

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

 

मुंबई. दि. २८ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'महापरिनिर्वाणदिना’निमित्त 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञशिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञतत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली आणि देशाला एक सर्वंकष असे संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकारअसेही संबोधले जाते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवरही मुलाखत प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Du chski चालविणारा आणि पाठीमागे बसणारा दोघानाही हेल्मेट सक्तीचे

 


Featured post

Lakshvedhi