Monday, 4 November 2024

चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार

 चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार

मुंबईदि. 4 : चेंबूर विधानसभा मतदारसंघात मतदारांना प्रलोभन म्हणून साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.

३ नोव्हेंबर २०२४ रोजीचेंबूर विधानसभा मतदारसंघातील मनपा वार्ड क्र. १५३घाटला येथील शिवशक्ती रहिवाशी संघाजवळील कर्नाटक शाळेच्या परिसरात निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी मतदारांना भुलवण्याच्या उद्देशाने साड्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली.

संबंधित विधानसभा मतदारसंघातील भरारी पथकाने तात्काळ पाहणी केली. प्राप्त व्हिडिओच्या आधारे भरारी पथकाने गोवंडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसारगोवंडी पोलिस ठाण्यात भगवान बोडके आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली आहे.


वासुदेव बळवंत फडके

 *वासुदेव बळवंत फडके.*


*आज ०४  नोव्हेंबर क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके यांचा जन्मदिन*


हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.


रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.


येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.


*क्रांतीचा पाया*


आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.


१८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.


*सशस्त्र क्रांती*


इ.स. १८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. २५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावांवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ही वेळ नाही असे सांगून त्यांना निराश केले.


फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली.


शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.


या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्‍री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.


*धरपकड, खटला व मृत्यू.*


जुलै २३, इ.स. १८७९ रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.


तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा फेब्रुवारी १७, इ.स. १८८३ रोजी मृत्यू झाला.


*शैक्षणिक कार्य*


वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी 'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये इ.स. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.


स्त्रोत: विकिपीडिया.

पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मंगळवारी रात्री 8.00 वाजता

समाज माध्यमावर रात्री 8.00 वाजता मुलाखतीचे प्रसारण

 

मुंबईदि. 4 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024’ आणि समाज माध्यमांची भूमिका’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांनी लोकशाहीला बाधा निर्माण होणार नाही यासाठी जबाबदारीने हे माध्यम हाताळण्याबाबत या कार्यक्रमात सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी माहिती दिली आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात श्री.शिंत्रे यांची मुलाखत मंगळवार दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 रात्री वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरील पुढील लिंकवर ऐकता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत  निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि समाज माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांवरून नियमांचे उल्लंघन होणार नाही, फेसबुकइन्स्टाग्रामएक्स इत्यादी माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्टतथ्यहीन माहिती पसरणेनिवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत कोणती नियमावली जाहिर करण्यात आली आहेयाबाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शिंत्रे यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

००००

 

 

 

राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

 राज्यात ९.७ कोटी मतदार;  

पुण्यात सर्वाधिकपाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

 

मुंबईदि. ४ : विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरीनंदुरबारगोंदियाभंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे.

पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार

पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार आहेत. ठाण्यात ७२ लाख २९ हजार ३३९नाशिक जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ आणि नागपुरात ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार आहेत.

पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक

रत्नागिरीनंदुरबारगोंदियाभंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ३९ हजार ६९७ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७६ आणि महिला मतदार ६ लाख ९३ हजार ५१० आहेत. नंदुरबारमध्ये एकूण मतदार १३ लाख २१ हजार ६४२ असून यामध्ये १३ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ५४ हजार ४१२ आणि महिला मतदार ६ लाख ६७ हजार २१७ आहेत.

गोंदिया जिल्ह्यात एकूण मतदार ११ लाख २५ हजार १०० असून यामध्ये १० तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ५३ हजार ६८५ आणि महिला मतदार ५ लाख ७१ हजार ४०५ आहेत. भंडारा येथे एकूण मतदार १० लाख १६ हजार ८७० असून यामध्ये ४ तृतीयपंथींची नोंद आहेपुरुष मतदार ५ लाख ६ हजार ९७४ आणि महिला मतदार ५ लाख ९ हजार ८९२ आहेत. सिंधुदुर्गात एकूण मतदार ६ लाख ७८ हजार ९२८ असून यामध्ये ३ तृतीयपंथींची नोंद आहे. पुरुष मतदार ३ लाख ३६ हजार ९९१ आणि महिला मतदार ३ लाख ४१ हजार ९३४ आहेत.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंद आहे ज्यामध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला आणि ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

अहमदनगरसोलापूरजळगावकोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. सोलापूरमध्ये ३८ लाख ४८ हजार ८६९, अहमदनगरमध्ये ३७ लाख ८३ हजार ९८७जळगावमध्ये ३६ लाख ७८ हजार ११२कोल्हापूरमध्ये ३३ लाख ५ हजार ९८ आणि औरंगाबादमध्ये ३२ लाख २ हजार ७५१ मतदार आहेत.

बुलढाणाअमरावतीयवतमाळनांदेडरायगडमुंबई शहरबीडसातारासांगली आणि पालघर या १० जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

0000


आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली 253 कोटींची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली

253 कोटींची मालमत्ता जप्त

 

            मुंबईदि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी  15 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2469 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2452 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 

            नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

0000

गर्जा जयजयकार क्रांतीचा

 🇮🇳⚜️🇮🇳🔆🌅🔆🇮🇳⚜️🇮🇳


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

            

            ⚜️⚜️🇮🇳⚜️⚜️

          *आद्य क्रांतीकारकाच्या*

                  *जन्मदिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

       

🌹🇮🇳🌹🔆🇮🇳🔆🌹🇮🇳🌹

     

        *"दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांसाठी दिल्या. हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये ?"*  

        *.... वासुदेव बळवंत फडके*

        *वासुदेव बळवंत फडके या नावाची इंग्रजांना एवढी दहशत होती की त्यांना थेट येमेनच्या एडन येथे तुरुंगात धाडले होते. भारतातील हे सशस्त्र क्रांतीचे आद्य क्रांतीकारक. यांचा आज जन्मदिन.*

        *वासुदेव फडकेंचा जन्म  शिरढोण, जिल्हा रायगड (१८४५-१८८३). कर्नाळा किल्लेदाराचे हे नातू. घोडसवारी.. शस्त्रविद्या यात तरबेज. ते नोकरीसाठी पुण्यात आले. तिथे न्या. रानडे आणि लहुजी वस्ताद यांच्या राष्ट्रवादी विचारांनी खूपच प्रभावित झाले.*

        *सन १८७०. देशात प्रचंड दुष्काळ पडलेला. गोरगरीब आणि गुरेढोरे यांचे दुष्काळात जीव जात होते. पण जुलमी ब्रिटिश सरकारने मदत करणे सोडून शेतसारा वाढवून या दुष्काळात निर्दयपणे वसूली सुरु केली. हे बघून वासुदेव व्यथित झाले. आज आमचे हिन्दुस्थानचे सरकार असते तर असा अन्याय झाला नसता.*

        *मग याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वासुदेव गावोगाव सभातून इंग्रजी सत्तेविरुद्ध जागृती करु लागले. ते इंग्रजी लष्करी खात्यात असल्याने इंग्रजांची प्रवृत्ती ठाऊक होती. त्यांना मरणासन्न आईला भेटण्यासाठीही इंग्रजांनी रजा दिली नाही तेव्हा त्यांनी तडक नोकरी सोडली.*

        *देशातील दुष्काळात.. साथीच्या रोगात सरकारच्या निर्दयतेने हजारो मृत्यू झाले होते. त्याचा प्रतिशोध त्यांनी  घ्यायचे ठरवले. १८५७ चे स्वातंत्र्य समर संपले होते.  तेव्हा सरकार विरुद्ध लढायला सशस्त्र क्रांती हाच पर्याय होता. लोकशाही मार्ग  नव्हताच. मग वासुदेवांनीही हाच पर्याय निवडला.*

        *त्यांनी गावोगाव आदिवासी तरुण जमवले. व्यायामशाळा काढल्या. मिळतील ते साथीदार जमवले. संघर्ष करताना लोकांना मदतीचे आवाहन केले. धनाढ्य सावकार हे सरकारशी जुळवून घेणारे. सुशिक्षित चळवळीपासून अलिप्त राहणारे. पुणे मुंबई कुठूनच मदत मिळेना. अखेर दरोडा.. लुट हा मार्ग साथीदारासह निवडला. लोणी येथे लढ्याचे केंद्र केले. शस्त्र जमवली. एकेका गावातील सावकार आणि सरकारी खजिना लुटणे सुरु केले. गनिमी काव्याने क्रांती युद्ध सुरू केले.*

        *वासुदेवांनी आपली सत्ता सात जिल्ह्यात निर्माण केली. अगदी पुणे शहरावरही काही दिवस त्यांचा अंमल होता. अखेर वासुदेव त्यांना पकडून देणाऱ्यास किंवा ठावठिकाणा कळविणाऱ्यास ब्रिटिशांनी ५० हजाराचे बक्षिस ठेवले. तर याला प्रत्युत्तर देत वासुदेवांनीही मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास तसेच बक्षिस जाहिर केले.*

        *आपल्या सैन्यात रोहिले.. अरब यांना भरती करण्यासाठी ते हैद्राबादला गेले. पण बातमी इंग्रजाना कळली. नंतर विजापूरला गेले असता त्याचीही माहिती मिळवून इंग्रजांनी त्यांना पकडून पुण्यात आणले, त्यांचा खटला लढवायला कुणाची हिंमत होत नव्हती. अखेर गणेश जोशी उर्फ सार्वजनिक काकांनी मदत केली. पण फाशी ऐवजी आजीवन जन्मठेप झाली. येमन येथे एडनच्या जेलमध्ये ठेवण्यात आले.*

        *वासुदेव हे बलशाली होते. त्यांनी जेलचे दरवाजे तोडून पळ काढला. पण ते पुन्हा पकडले गेले. यानंतर एकांतवासात काळ्या पाण्याची शिक्षा प्रचंड यातना भोगत अखेर त्यांनी मृत्यूला जवळ केले.* 

        *वासुदेव फडके हे आगळे द्रष्टे क्रांतिकारक. त्यांनी लोकांना दुष्काळात खूप मदत केली. पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी 'ऐक्यवर्धिनी' संस्था सुरू केली. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.*

        *अत्यंत सुशिक्षित.. धार्मिक वृत्तीचे दत्तभक्त.. उपासक होते. त्यांनी 'दत्तमहात्म्य' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूने देशात ब्रिटिश सत्ते विरुद्ध स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला.*

        *अशा या थोर देशभक्त क्रांतीकारक.. भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन.*


🌹🔆🇮🇳🔆🌻🔆🇮🇳🔆🌹

  

  *गर्जा जयजयकार क्रांतीचा*

  *गर्जा जयजयकार*

  *अन् वज्रांचे छातीवरती*

  *घ्या झेलून प्रहार !*


  *श्वासांनो जा वायूसंगे*

  *ओलांडुनी भिंत*

  *अन् आईला कळवा*

  *अमुच्या हृदयातील खंत*

  *सांगा वेडी तुझी मुले*

  *ही या अंधारात*

  *बद्ध करांनी अखेरचा*

  *तुज करिती प्रणिपात*

  *तुझ्या मुक्तीचे एकच होते*

  *वेड परि अनिवार*

  *तयांना वेड परि अनिवार*

  *गर्जा जयजयकार क्रांतीचा*

  *गर्जा जयजयकार !*


  *कशास आई, भिजविसी डोळे,*

  *उजळ तुझे भाल*

  *रात्रीच्या गर्भात उद्याचा*

  *असे उषःकाल*

  *सरणावरती आज अमुची*

  *पेटता प्रेते*

  *उठतील त्या ज्वालांतून*

  *क्रांतीचे नेते*

  *लोहदंड तव पायांमधले*

  *खळखळा तुटणार*

  *आई, खळखळा तुटणार*

  *गर्जा जयजयकार क्रांतीचा*

  *गर्जा जयजयकार !*


  *आता कर ॐकारा तांडव*

  *गिळावया घास*

  *नाचत गर्जत टाक बळींच्या*

  *गळ्यावरी फास*

  *रक्तमांस लुटण्यास गिधाडे*

  *येऊ देत क्रूर*

  *पहा मोकळे केले आता*

  *त्यासाठी ऊर*

  *शरीरांचा कर या सुखेनैव*

  *या सुखेनैव संहार*

  *मरणा, सुखेनैव संहार*

  *गर्जा जयजयकार क्रांतीचा*

  *गर्जा जयजयकार !*


🌸🇮🇳🌼🇮🇳🌻🇮🇳🌼🇮🇳🌸

  

  *गीत : कुसुमाग्रज*  ✍️

  *संगीत : कानू घोष*

  *स्वर : आकाशवाणी गायकवृंद*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧   

               

            *🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-०४.११.२०२४-*


🌻🇮🇳🌻🔆🇮🇳🔆🌻🇮🇳🌻

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का 💥?*

 *💥दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का 💥?*


*नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते !*


*गावी सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते. सर्वाना प्रश्न विचारून विचारून अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा ? करंज्या अशा कशा दिसतात ? लाडू गोलच का करतात ? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो ? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का ? या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. आज्जीची प्रकर्षांने आठवण येत होती. ती असती तर तिने सांगितलं असतं सगळं. पण या आताच्या नवीन पिढीच्या ‘मम्मी’ ला पण हे माहीत नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचे शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते.*


*असो, तर भीम हा ‘पौरोगव बल्लव’ या नावाने राजा विराटाच्या सेवेत एक वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. ‘पौरोगवो बृवानो अहम बल्लावो नाम नामत:। ..  महाभारत/विराट पर्व/ २/१-१०. भीमाला पाकशास्त्र चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णनदेखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव वनवासात असताना जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले, तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठय़ा आनंदाने भीमाचे कौतुक केले होते. व त्या पदार्थाचे नाव ‘रसाला’ असे ठेवले. तर हे ‘रसाला’ म्हणजेच आताचे श्रीखंड. म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला.*


*आपल्याला आपल्या प्राचीन आहारीय शास्त्राची माहिती करून देणाऱ्या ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजन कुतूहल’, ‘पाकदर्पण’ अशा प्राचीन व सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूद्शास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी ‘पूपलिका’ म्हणजे पुरी, ‘पूपा’ म्हणजे छोटे वडे, ‘ईण्डरिका’ म्हणजे इडली, ‘घारिका’ म्हणजे डोसा, ‘कुंडलिका’ म्हणजे जिलेबी, ‘किलाट’ म्हणजे पनीर, ‘लाप्सिका’ म्हणजे हलवा आणि ‘चणक रोटिका’ म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, ‘हिमाहवा’ म्हणजे बर्फी, ‘पिंडक’ म्हणजे पेढा व ‘लड्डूक’ म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनविण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे-तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची.*


*आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच- पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’ चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. हे उगीचच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.*


*आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.*


*गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते.*


*दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.*


*बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ  होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ  असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.*


*लाडू…*

*उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू. लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. आळीव, खोबरे, तीळ, बडिशोप, बाळंतशोप, डिंक, गोडंबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.*


*करंजी.*

*आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.*


*चकली.*

*वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ  होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.*


*चिवडा.*

*तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू पंचमहाभूत प्रदान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाह्यांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाह्यांना चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाह्यांपासून  बनविलेल्या पोह्यांचा चिवडा केला जातो. लाह्यांमधील  आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू पंचमहाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाह्या असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोह्यांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोह्यांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोह्यांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ  शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोह्यांसारखे  जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोह्यांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोह्यांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.*


*अनारसे.*

*अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला  महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ  लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले की त्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ  शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.*


*अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ  लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पंचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.*


Featured post

Lakshvedhi