Thursday, 3 October 2024

जगता आले पाहिजे

 


हवामान खात्यात नोकरी

 


जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला

 जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला।।


१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.


त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे.

हे झंडू भटजी देखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बाप से बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.


जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्टजी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले,त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भट्टजींना बहाल केली.


येथेच १८६४ साली झंडू भट्टजींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली


आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला.

झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दुरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.


या भट्ट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.


झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोट मधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येईल हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं.


पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.

एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला ,


झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी


हे प्रभाशंकर पट्टानी म्हणजे भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचं देखील आडनाव भट्ट होतं. पण सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले पण ते जमलं नाही.


राजकोटला परत आल्यावर मास्तरकी सुरू केली.

झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं पण सासर कडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.


प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली.


हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता.


त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.


ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली. तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.

त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्या वरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला पंतप्रधान बनवलं.


प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते.


अगदी महात्मा गांधीजींचे ते खास मित्र होते.


अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं तेव्हा पट्टानी यांनी गांधीजींचे तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे असं सांगून कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच असहकार आंदोलन मागे घेतले.


ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.

पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वोतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.


अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखी पासून अंगदुःखी पर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.


पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.

झंडू भटजींनी रस शाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली, या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिलो नाही पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.


दबंग मधली मलायका अरोरा देखील झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा संबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.


डॉक्टरच्या आधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा झंडू बाम १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.

अनेकदा दुसऱ्यांच आयुष्य किंवा जगणं बघून आपण आपल्या आयुष्याच मोजमाप

 अनेकदा दुसऱ्यांच आयुष्य किंवा जगणं बघून आपण आपल्या आयुष्याच मोजमाप करायला लागतो. जगण्याचे निकष दुसऱ्यांच्या आनंदावर ठरवायला लागतो. दुसऱ्याला मिळणारा प्रत्येक आनंद बघून आपण स्वतःच्या दुःखाची मोजदाद करायला लागतो, आणि इथूनच तुमची तुमच्या आयुष्यावरची पकड सुटायला सुरवात होते.

सतत तुलनात्मक जगताना कोणताच आनंद निखळ, निर्मळ राहात नाही, अपूर्णतेच असमाधान टोचत बोचत राहातं. 

खर तर अपूर्ण असणही समाधानी असत कारण पूर्णतेला वाव असतो पण आपण फक्त फोकस अपूर्णत्त्वावरच करतो, पूर्ण झालेल्या गोष्टी नजरेआड होतात.

ह्या असमाधानाला बेसिकली सतत इतरांशी तुलना ही जबाबदार असते.

खर तर आपल्या आयुष्याची पकड आपल्याच हातात असली पाहीजे, त्यासाठी स्वतःच्या क्षमतांचा,मर्यादांचा विचार हवा. 

एकदा का मर्यादा आणि क्षमतांचा विचार आपण करू शकलो की आयुष्याकडून नक्की काय हवय ह्याची समज येते आणि मग फोकस होऊन जगता येतं.

स्वतःचे गोल ठरवता येतात आणि त्या प्रमाणे तिथे पोचायचा कालावधीही स्वतःचा क्षमतेनुसार ठरवता येतो. ह्यामध्ये फक्त स्वतःवर फोकस राहिल्याने पुढे जाणं सोप आणि समाधानी होतं.

समाधानी दिसणारं,आनंदी दिसणारं प्रत्येक आयुष्य तसच असत असं नाही, प्रत्येकाला आपली अशी एक लढाई असतेच, आणि जो तो आपल्या परीने ती लढाई पार पाडतच असतो. त्यामुळे बाहेरून दुसऱ्याचा अंदाज लावण्यापेक्षा स्वतःच्या जगण्याचं प्लांनिंग करावं हे उत्तम.

आपल्या आनंदाची गुरूकिल्ली आपल्याच मनात. बस इतकच........ जगण्याचे निकष दुसऱ्यांच्या आनंदावर ठरवायला लागतो.  दुसऱ्याला मिळणारा प्रत्येक  आनंद बघून आपण स्वतःच्या दुःखाची मोजदाद करायला लागतो, आणि इथूनच तुमची  तुमच्या  आयुष्यावरची पकड  सुटायला सुरवात होते.

सतत तुलनात्मक   जगताना कोणताच आनंद  निखळ, निर्मळ राहात नाही, अपूर्णतेच असमाधान टोचत बोचत राहातं. 

खर तर अपूर्ण असणही समाधानी असत कारण पूर्णतेला वाव असतो पण आपण फक्त  फोकस अपूर्णत्त्वावरच करतो, पूर्ण झालेल्या गोष्टी नजरेआड होतात.

ह्या असमाधानाला बेसिकली सतत इतरांशी तुलना  ही जबाबदार असते.

खर तर आपल्या आयुष्याची पकड आपल्याच हातात असली पाहीजे, त्यासाठी स्वतःच्या क्षमतांचा,मर्यादांचा विचार हवा. 

एकदा का मर्यादा आणि क्षमतांचा विचार आपण करू शकलो की आयुष्याकडून नक्की काय हवय ह्याची समज येते आणि मग फोकस होऊन जगता येतं.

स्वतःचे गोल ठरवता येतात आणि त्या प्रमाणे तिथे पोचायचा कालावधीही स्वतःचा क्षमतेनुसार ठरवता येतो. ह्यामध्ये फक्त  स्वतःवर फोकस राहिल्याने  पुढे जाणं सोप आणि समाधानी होतं.

समाधानी दिसणारं,आनंदी दिसणारं प्रत्येक  आयुष्य तसच असत असं नाही, प्रत्येकाला आपली अशी एक लढाई असतेच, आणि जो तो आपल्या परीने ती लढाई  पार पाडतच  असतो.  त्यामुळे बाहेरून दुसऱ्याचा अंदाज  लावण्यापेक्षा स्वतःच्या जगण्याचं प्लांनिंग करावं हे उत्तम.

आपल्या आनंदाची गुरूकिल्ली आपल्याच मनात. बस इतकच.......x

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणुक औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा ) एमआयडीसी मध्ये 750 कोटी गुंतवणूक, 15 हजार रोजगार उपलब्ध

  

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचा

मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार

वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणुक औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ

वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा )

एमआयडीसी मध्ये 750 कोटी गुंतवणूक15 हजार रोजगार उपलब्ध होणार

-:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई. दि.2 : वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास 25 हजार कोटींची उलाढाल आहे.  या कराराच्या माध्यमातून  वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा)एमआयडीसी मध्ये 750 कोटी गुंतवणूक करून जवळपास 15 हजार रोजगार उपलब्ध होणारअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान मेघदूत येथे वस्त्रोद्योग गुंतवणूकिसाठी राज्यशासनाचा मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळेसचिव विरेंद्र सिंग तसेच मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनीचे अशिश मोहपात्रायोगेश  मंदानीराजेश चावडेविक्रम सिंगअनुराग सोनी व एल.एल.सोनी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यातील नवीन उद्योगांना मिळणार बळकटी

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी करण्यात आलेल्या करारामुळे वस्त्रनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा मालस्वस्त वीजदळणवळणाच्या सोयी -सुविधा व अल्प दरात उपलब्ध औद्योगिक भूखंड यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित वर्धा जिल्ह्यात नवीन उद्योगांना बळकटी मिळून रोजगार निर्माण होणार आहे.

महिला कारागिरांना रोजगार उपलब्ध होणार

या प्रकल्पामुळे  वर्धा जिल्ह्यातील आजुबाजूच्या परिसरातील महिला कारागिरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून हब ॲण्ड स्पोक मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच कच्चा माल आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे व त्याचा वापर उद्योगात होईलत्याचबरोबर या उद्योगामुळे येथील भागातील आर्थिक उन्नती देखील मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येईल.

0000

Wednesday, 2 October 2024

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख -:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






 उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षधर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली,

रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन

धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे  स्कॅनिंग आणि  डिजिटायजेशन

धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख

-:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 2 : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेतहे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीतअसे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षधर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली,  रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन या कक्षाच्या उदघाटनासोबतच धर्मादाय रुग्ण योजनेच्या अंमलबजावणीकरीता ऑनलाईन प्रणालीरुग्णाकरिता 24 तास हेल्पलाईन सुविधाधर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे  स्कॅनिंग आणि  डिजिटायजेशन या उपक्रमाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील सस्मिता इमारतीत झालेत्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव उदय शुक्ल धर्मादाय आयुक्त अमोघ कलोतीराज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहानेउपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणालेराज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा मोफत व सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष समन्वयाने काम करीत आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे  स्कॅनिंग आणि  डिजिटायजेशन या उपक्रमामुळे सुनावणी अधिक सुकर होण्यास मदत होणार असून वेग आणि पारदर्शकता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय मदत कक्षाची अंमलबजावणी

वैद्यकीय मदत कक्ष स्थापनेमुळे धर्मादाय रुग्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल. धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटांचे कक्षाकडून वाटप होणार असल्याने सर्व गोरगरीब रुग्णांना खात्रीशीर मोफतसवलतीच्या दरातील उपचाराकरिता बेड उपलब्ध होणार आहे. गरीब रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे सुकर होणार आहे. तसेच रूग्णांना शासनाच्या विविध योजना जसेमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनापीएम केअर फंडमुख्यमंत्री सहायता निधी यांचे वैद्यकीय सहायक कक्षामार्फत मिळवून देण्यात येत आहे. वैद्यकीय साहाय्य करणाऱ्या विविध धर्मादाय संस्थेकडून  मदत मिळवून दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

ऑनलाईन प्रणालीमुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता या प्रणाली मार्फत  कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होणार असल्याने खऱ्या गरजू रूग्णांना योजनेचा लाभ मिळणार आहे. धर्मादाय रुग्ण योजनेतील खाटांच्या वितरणात सु-सूत्रीकरण येईल. योजनेचा लाभ घेण्याकरिता या प्रणालीद्वारे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयधर्मादाय रुग्णालयजिल्हाधिकारी कार्यालयराज्यस्तरीय विशेष मदत कक्ष यांच्या मार्फत करता येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता निर्माण होणार. धर्मादाय योजनेतील रिक्त खाटांची रिअल टाईम माहिती रुग्णांना उपलब्ध होईलखऱ्या गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळेल असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

वैद्यकीय मदत कक्षाचे औपचारिक उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  उद्घाटनपूर्वीच कक्षाचे कामकाज सुरू झाले असून गेल्या 10 महिन्यात कक्षामार्फत 323 रुग्णांना गंभीर आजारांसाठी मदत करण्यात आली असून मदतीची रक्कम  12 कोटी 73 लक्ष एवढी असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळास भेट दिल्यावर राज्यातील धर्मादाय रुग्णालयेत्यांच्याकडील राखीव बेडची संख्यायांची माहिती मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईन विषयी माहिती

          नागरीकांना वैद्यकीय आपत्तीच्या काळात धर्मादाय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार मिळावेत याकरीता उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे.

          ही सुविधा 1800 123 2211 या क्रमांकावर उपलब्ध असणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णांना योजनेबाबतची माहितीअर्ज कोठे करावाइत्यादीबाबत माहिती 24 *7 तास उपलब्ध होणार आहे.

          सदर हेल्पलाईन सुविधा 24 तास सुरु असणार आहे.

 

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची विषयी माहिती

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाच्या स्थापनेपासूनची  माहे जानेवारी2024 पासून ते माहे ऑगस्ट 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 323 रुग्णांना या योजनेचा लाभ उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार रुपये 12 कोटी 73 लक्ष रकमेचे उपचार रुग्णांना मोफत / सवलतीच्या दरात सहजतेने उपलब्ध झाले आहेत. सदर मदतीमध्ये ह्दय प्रत्यारोपनकॅन्सरलिव्हर ट्रान्सप्लांटकिडनी ट्रान्सप्लांटबोनमॅरो ट्रान्सप्लांटयासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयेंचा समावेश आहे. या व्यतिरीक्त कक्षाने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धर्मादाय ट्रस्टशासकीय रुग्णालयेमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाप्रधानमंत्री केअर फंडमुख्यमंत्री सहायता निधी यांच्यामध्ये समन्वय साधून 3 ते 4 कोटी रुपयांचे उपचार रुग्णांना उपचार मिळवून दिले आहेत.

राज्यातील हिंगोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये धर्मादाय रुग्णालयांचे जाळे पसरले आहे. राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12000 बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेनएन.एन रिलायन्सबाई जेरबाई वाडीयाडॉ.बालाभाई नानावटी हॉस्पीटलब्रीच कॅण्डी हॉस्पीटलद बॉम्बे हॉस्पीटलदिनानाथ मंगेशकर रुग्णालयडी.वाय.पाटील हॉस्पीटलके.ई.एम. हॉस्पीटलसह्याद्री हॉस्पीटलसंचेती हॉस्पीटलजहांगीर हॉस्पीटल इत्यादी मोठ्या रुग्णालयाचा समावेश आहे.

००००

 

 

 


बडोदे येथील सुरसागर तलावातील सर्वेश्वर महादेवाच्या सोन्याने मढविलेल्या जगातील पहिल्याच मूर्तीचे


 *बडोदे येथील सुरसागर तलावातील सर्वेश्वर महादेवाच्या सोन्याने मढविलेल्या जगातील पहिल्याच मूर्तीचे आज रोजी उदघाटन होणार आहे, त्या महादेवाच्या मूर्तीचे आपल्याला दर्शन करविण्याच्या हेतूने पाठविलेला हा विडीयो जरुर पहा.*

*🙏🌹🌹🌹🙏*

Featured post

Lakshvedhi