अनेकदा दुसऱ्यांच आयुष्य किंवा जगणं बघून आपण आपल्या आयुष्याच मोजमाप करायला लागतो. जगण्याचे निकष दुसऱ्यांच्या आनंदावर ठरवायला लागतो. दुसऱ्याला मिळणारा प्रत्येक आनंद बघून आपण स्वतःच्या दुःखाची मोजदाद करायला लागतो, आणि इथूनच तुमची तुमच्या आयुष्यावरची पकड सुटायला सुरवात होते.
सतत तुलनात्मक जगताना कोणताच आनंद निखळ, निर्मळ राहात नाही, अपूर्णतेच असमाधान टोचत बोचत राहातं.
खर तर अपूर्ण असणही समाधानी असत कारण पूर्णतेला वाव असतो पण आपण फक्त फोकस अपूर्णत्त्वावरच करतो, पूर्ण झालेल्या गोष्टी नजरेआड होतात.
ह्या असमाधानाला बेसिकली सतत इतरांशी तुलना ही जबाबदार असते.
खर तर आपल्या आयुष्याची पकड आपल्याच हातात असली पाहीजे, त्यासाठी स्वतःच्या क्षमतांचा,मर्यादांचा विचार हवा.
एकदा का मर्यादा आणि क्षमतांचा विचार आपण करू शकलो की आयुष्याकडून नक्की काय हवय ह्याची समज येते आणि मग फोकस होऊन जगता येतं.
स्वतःचे गोल ठरवता येतात आणि त्या प्रमाणे तिथे पोचायचा कालावधीही स्वतःचा क्षमतेनुसार ठरवता येतो. ह्यामध्ये फक्त स्वतःवर फोकस राहिल्याने पुढे जाणं सोप आणि समाधानी होतं.
समाधानी दिसणारं,आनंदी दिसणारं प्रत्येक आयुष्य तसच असत असं नाही, प्रत्येकाला आपली अशी एक लढाई असतेच, आणि जो तो आपल्या परीने ती लढाई पार पाडतच असतो. त्यामुळे बाहेरून दुसऱ्याचा अंदाज लावण्यापेक्षा स्वतःच्या जगण्याचं प्लांनिंग करावं हे उत्तम.
आपल्या आनंदाची गुरूकिल्ली आपल्याच मनात. बस इतकच........ जगण्याचे निकष दुसऱ्यांच्या आनंदावर ठरवायला लागतो. दुसऱ्याला मिळणारा प्रत्येक आनंद बघून आपण स्वतःच्या दुःखाची मोजदाद करायला लागतो, आणि इथूनच तुमची तुमच्या आयुष्यावरची पकड सुटायला सुरवात होते.
सतत तुलनात्मक जगताना कोणताच आनंद निखळ, निर्मळ राहात नाही, अपूर्णतेच असमाधान टोचत बोचत राहातं.
खर तर अपूर्ण असणही समाधानी असत कारण पूर्णतेला वाव असतो पण आपण फक्त फोकस अपूर्णत्त्वावरच करतो, पूर्ण झालेल्या गोष्टी नजरेआड होतात.
ह्या असमाधानाला बेसिकली सतत इतरांशी तुलना ही जबाबदार असते.
खर तर आपल्या आयुष्याची पकड आपल्याच हातात असली पाहीजे, त्यासाठी स्वतःच्या क्षमतांचा,मर्यादांचा विचार हवा.
एकदा का मर्यादा आणि क्षमतांचा विचार आपण करू शकलो की आयुष्याकडून नक्की काय हवय ह्याची समज येते आणि मग फोकस होऊन जगता येतं.
स्वतःचे गोल ठरवता येतात आणि त्या प्रमाणे तिथे पोचायचा कालावधीही स्वतःचा क्षमतेनुसार ठरवता येतो. ह्यामध्ये फक्त स्वतःवर फोकस राहिल्याने पुढे जाणं सोप आणि समाधानी होतं.
समाधानी दिसणारं,आनंदी दिसणारं प्रत्येक आयुष्य तसच असत असं नाही, प्रत्येकाला आपली अशी एक लढाई असतेच, आणि जो तो आपल्या परीने ती लढाई पार पाडतच असतो. त्यामुळे बाहेरून दुसऱ्याचा अंदाज लावण्यापेक्षा स्वतःच्या जगण्याचं प्लांनिंग करावं हे उत्तम.
आपल्या आनंदाची गुरूकिल्ली आपल्याच मनात. बस इतकच.......x
No comments:
Post a Comment