Wednesday, 6 March 2024

देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार

 देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या

शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद

 

            मुंबईदि. 5 : बालकांवर संस्कार करून देशाचे भविष्य घडविण्याचे काम शाळांमधून होत असते. स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मागे राहणार नाही यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी स्वत: लक्ष देत असून 2047 पर्यंत भारत महासत्ता होण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने महाराष्ट्र अग्रेसर राहावा यासाठी राज्य शासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात आलेया अभियानादरम्यान तीन उपक्रमांचे रेकॉर्ड झाले असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण यंत्रणेचे अभिनंदन केले.

            मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियान राज्यात 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले. यादरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या शाळांचा पारितोषिक देऊन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरआमदार सर्वश्री कपिल पाटीलविक्रम काळेशेखर निकमराजेश पाटीलप्रधान सचिव रणजितसिंह देओलशालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारीविजेत्या शाळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेआई जशी बाळाला लळा लावते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील शाळेचा लळा लागत असतो. या शाळेतील वातावरण आनंददायी असावे तसेच शिक्षकपालकविद्यार्थीमाजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. याद्वारे ठरविलेले उद्दिष्ट साध्य झाले असून यात एक लाखांहून अधिक शाळांमधून सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाले. त्याचप्रमाणे अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या वाचन सवय प्रतिज्ञा’, एका दिवसात शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय अपलोड करणे तसेच वाचनाचे महत्त्व सांगणारा युट्युब वरील व्हिडीओ विद्यार्थी आणि पालकांनी बघणे या तीनही उपक्रमांची दखल घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद घेतली गेली ही राज्याच्या दृष्टीने अतिशय गौरवास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

            शासनाने नुकताच अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक जनहितार्थ निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वसामान्यकष्टकरीशेतकरीतरुणतसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नुकतीच सुधारित पेन्शन योजना लागू केली आहेत्यामध्ये शिक्षकांचाही समावेश असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. उद्योगपरकीय थेट गुंतवणूक आदींसह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजची पिढी ही उद्याचे भविष्य असल्याने शाळांच्या विकासासाठी विविध निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. शाळांना नवीन मान्यता देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. शाळांमधील पायाभूत सुविधा उत्तम असाव्यात यासाठी शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आलायास अनेक उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. केसरकर यांनी अभियानाबाबत माहिती देऊन शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. शासनाच्या सर्व शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांना गणवेशबूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे 75 हजार शाळांची देखभाल दुरुस्ती करण्याकरिता शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आला. व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येऊन रोजगार निर्मितीसाठी जर्मनी सोबत करार करण्यात आला.

राज्यस्तरीय पुरस्कार

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते यावेळी राज्यस्तरावर शासकीय गटात प्रथम आलेल्या वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, साखरा (51 लाख रुपये)द्वितीय क्रमांक मिळविलेल्या रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (31 लाख रुपये) आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा ढालेवाडी (21 लाख रुपये) या शाळांचा रोखसन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर इतर आस्थापनांच्या शाळांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूलबेळगाव ढगा (51 लाख रुपये)द्वितीय क्रमांक मिळविलेल्या पुणे जिल्ह्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर (31 लाख रुपये) आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (21 लाख रुपये) या शाळांचा रोखसन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याव्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका स्तरावर सहा‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महानगरपालिका स्तरावर सहाविभागस्तरावरील 48 शाळांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कमसन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

गिनीज बुक मध्ये नोंद

            या अभियान कालावधीत 13 लाख 84 हजार 426 विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञा’ घेतली. 24 तासांच्या कालावधीत 11 लाख 20 हजार 386 विद्यार्थ्यांनी शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय आणि फोटो बेसपोक प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. तसेच वाचनाचे महत्त्व सांगणारा मंत्री श्री. केसरकर यांचा युट्युब वरील व्हिडीओ एकाच वेळी एक लाख 89 हजार 846 विद्यार्थी आणि पालकांनी लाईव्ह बघितला. या तीनही उपक्रमांची दखल घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद घेतली गेल्याची माहिती गिनीज बुक चे प्रवीण पटेल यांनी जाहीर करून संबंधित प्रमाणपत्रे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली.

            शिक्षण आयुक्त श्री.मांढरे यांनी प्रास्ताविकाद्वारे हे अभियान नवचेतना देणारे ठरल्याचे सांगून या अभियानात एक लाख तीन हजार म्हणजे सुमारे 95 टक्के शाळा तसेच सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती दिली. पुरस्कार प्राप्त शाळांना एकूण 66 कोटी 74 लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. या अभियानासाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

0000

Tuesday, 5 March 2024

परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी -


परिचारिका संवर्गातील रिक्त पदे

सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी

-  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. 5 : परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषाशैक्षणिक व प्रशासकीय विभागातील तसेच प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

            परिचारीका संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरउपसचिव वैशाली सुळे तसेच परिचारिका संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीमेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी.  परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी  पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये तसेचरिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघर असणे अत्यावश्यक आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असूननव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानात या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

            सहसंचालक पद निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावाकेंद्राप्रमाणे नर्सिंग भत्तेमहात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देय असलेला भत्तागणवेश भत्ता मिळण्यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

००००

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’मध्ये संयुक्त भागीदारी करार वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी ; आता एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह -

)

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’मध्ये संयुक्त भागीदारी करार

वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी ;

आता एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ५: महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत हा करार झाला. यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मान्यता दिली.

            दरम्यानमुंबई महापालिकेप्रमाणेच एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईमुख्य सचिव डॉ. नितीन करीरएम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जीइंडिपेंडंट स्टडी ग्रुपचे अध्यक्ष जॉनी जोसेफगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहनगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.

पॉड टॅक्सी

            वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे - कुर्ला संकुलामधून ‘पॉड टॅक्सी’ धावणार असून त्याची लांबी ८.८० कीमी एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहेहा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास

            मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबईठाणे महानगरपालिकामुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणसिडको व म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यात याअन्वये माता रमाबाई आंबेडकर नगरकामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्यात आहे. या प्रकल्पात पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे २००० झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून त्यामुळे हा रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत हा संयुक्त करार करण्यात आला.

झोपडपट्टी मुक्त ठाणे

            ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

            यावेळी बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड)पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगरघाटकोपर ते ठाणे पर्यंत विस्तारीकरण प्रकल्पपूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे कामकासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्पविस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extened MUIP) ऐरोली बोगदा ते कटाई नाकागायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे कामकल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ च्या (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली.

            ‘एमएमआरडीए’मार्फत विशेष प्रयोजन वाहन (SPV) कंपनीची स्थापना करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. याव्दारे सल्लागाराची कामे हाती घेण्यास व व्यवसाय विकास कक्षाची स्थापना करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

०००००

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराच्या सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी देणार

 नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराच्या

सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी देणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            रायगड, दि. ०५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचापराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे.  तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावीम्हणून ऐतिहासिक स्थळांचागावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळाचे सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

            तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 354 व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभिकरण कामाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, (ऑनलाईन)उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंतखासदार सुनिल तटकरेआमदार भरत गोगावलेजिल्हाधिकारी किशन जावळेज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परबस्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

             सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या समाधीस्थळाचे सुशोभिकरण होणार असून यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभिकरणसमाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकामबुरुजाचे बांधकामप्रसाधनगृहेअंतर्गत रस्ते काँक्रीट गटारकंपाउंड वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत.

            उमरठच्या ऐतिहासिक भूमीत नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या समवेत कोंढाणा किल्ल्यावरील लढाईत लढलेल्या शेलार मामा यांची समाधी आहे. या दोन्ही शूरवीरांना अभिवादन करुन मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं’..ही घोषणा इतिहासात अजरामर आहे. स्वामीनिष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा इतिहास कधीही विसरू शकणार नाही. राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 32 शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.  तसेच रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या  शिवसृष्टीसाठी 50 कोटी देखील मंजूर केले आहेत.  या सर्व कामांसाठी पुरेसा  निधी उपलब्ध करुन देण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्य शासनामार्फत आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. याबरोबरच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूरच्या वढू येथील समाधीस्थळी भव्य स्मारक उभारण्यात येत आहे.

            रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुका दुर्गम आणि डोंगराळ आहे. या भागातील युवकांचे रोजगारासाठीच्या स्थलांतराचे  प्रमाण अधिक आहे. हे लक्षात घेवून या भागातील पर्यटन विकासाला चालना देवून स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी  राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            पालकमंत्री उदय सामंत म्हणाले कीशिवकालीन इतिहास पुढील पिढीपर्यंत  पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने हे ऐतिहासिक पाऊल उचलेले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ आणि परिसराचे सुशोभिकरण करताना त्यांच्या वाड्याचे देखील या निधीमधनू सुशोभिकरण करण्यात येईल असे जाहीर केले.  तसेच या परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून प्राधान्याने नूतनीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी  यावेळी दिल्या.

            यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी या भागाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत प्रभावी  उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

            प्रास्ताविक आमदार भरत गोगावले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांनी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  तसेच यावेळी ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब यांना शौर्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

००००००


बाराखडी*

 🙏🏻

*बोधकथा*      

                       *बाराखडी*             


*प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात*


*तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो..*


*एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.* 


*नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे. हा दिनक्रम रोजचाच झाला होता.*


*देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्यांना वाटू लागली.*


*त्यांना वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य. तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !*


*असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्यांची बेचैनी वाढू लागली.* 


*एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर ते तिथे पोहोचले. तिचा नित्यक्रम संपण्याची त्यांनी वाट पाहिली. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,* 


*मागील १५ दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तू काय करतेस ? ती एकदम म्हणाली*


*" प्रार्थना "* 


*पुजारी यांनी जरा साशंकतेनेच  विचारले, तुला एखादी प्रार्थना येते ?* 


*" नाही " असे ती म्हणाली.*


*मग तू डोळे मिटून रोज काय करते ? असे त्यांनी हसून विचारले.* 


*अगदी निरागसपणे ती म्हणाली, मला कोणतीच प्रार्थना येत नाही "*


*अ, आ,इ, ई  पासून  ज्ञ  पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या बाराखडी च्या बाहेर असूच शकत नाही.*  


*ही बाराखडी तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना !!.* 


*ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली. ती दिसेनाशी होई पर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होवून उभे राहिले.* 


*ज्याची आपण मनोभावे पूजा करतो अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा...!!*


*अगा बावन्न वर्णा परता।*

 *कोण मंत्रु आहे पांडुसूता।।*


*c/p ज्ञानेश्वरी*

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी -

 ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी

उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

           

               मुंबईदि. ४ : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुढील एक महिना संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. मोहीम कालावधीत ग्रामीण भागात असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. महामार्गांच्या आजुबाजूला असलेला कचरा उचलून रस्ते स्वच्छ करावेअसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

               सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्वच्छता अभियान बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेजिल्हा पोलीस अधिक्षक श्री. स्वामीउपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

              ग्रामपंचायत हद्दीतील कचरा उचलून त्याचे निर्मूलन करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. देसाई म्हणालेपुढील आठ दिवसात संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट करावी. कचऱ्यातून प्लॅस्टीक वेगळे काढून अन्य कचऱ्यावर कंपोस्ट खताची प्रक्रिया करावी. महानगरपालिका व नगरपालिका यांनी त्यांच्या हद्दी लगतच्या भागातील कचरा उचलावा. पुढील एक महिना प्रभावीपणे ही मोहीम राबवावी. रस्त्यांच्या आजुबाजूला असलेला मागील कचरा जोपर्यंत उचलला जाणार नाहीतोपर्यंत रस्ते स्वच्छ होणार नाहीत.

            याबाबत सर्व गटविकास अधिकारीनगरपालिका मुख्याधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

****

वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

 वाशिमचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

             वाशिम दि. ४ : मुंबई येथे आयोजित सेंद्रिय उत्पादनांच्या विक्री स्टॅालसाठी वाशिम येथील कृषी विभागाचा सेंद्रिय रथ मुंबईला रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सेंद्रिय रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

            आत्माच्या बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान हा सेंद्रिय रथ रवाना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलखासदार भावना गवळीप्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगण येथे सेंद्रिय उत्पादनांचे विक्री स्टॉल उभारण्यात येत आहे. त्यासाठी वाशिमचा सेंद्रिय रथ रवाना करण्यात आला आहे.

०००

Featured post

Lakshvedhi