Saturday, 9 December 2023

एमआयडीसीतील इंडियाबुल्सला दिलेली जमिन परत घेण्याची कार्यवाही सुरू

 एमआयडीसीतील इंडियाबुल्सला दिलेली

जमिन परत घेण्याची कार्यवाही सुरू

- उद्योगमंत्री उदय सामंत

            नागपूरदि. 8 नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त सिन्नर औद्योगिक क्षेत्र (सेझ) टप्पा क्र. १ येथे इंडिया बुल्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीच्या प्रकल्पास दिलेली सर्व जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील विकसित न केलेल्या जमिनी परत घेण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

            विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. या वेळी झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटीलसचिन अहिरप्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.

            उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले कीअतिरिक्त सिन्नर औद्योगिक वसाहतींमध्ये इंडिया बुल्स कंपनीला जमिन वाटप करण्यात आली होती. मात्रकंपनीने वाटप केलेल्या क्षेत्रामध्ये विकास करण्याची कार्यवाही केली नसल्याने जमिन परत देण्यासंदर्भात त्यांना नोटिसा देण्या आल्या आहेत. तसेच यासंदर्भात न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एमआयडीसी कायदे व न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू आहे. तसेच या प्रकल्पामुळे प्रकल्पबाधित झालेल्यांना वाटप करण्यात येणाऱ्या एकूण ४८२ भूखंडापैकी आतापर्यंत २८२ भूखंडाचे वाटप करण्यात आले असून २०० भूखंड वाटपाची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

            महाड येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहत निर्माण करण्यास बहुसंख्यांचा विरोध असल्यास ही एमआयडीसी रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचा विचारही करण्यात येईलअसेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

 

०००००


महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक

 महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक

-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्र

 

            नागपूरदि. :  महाराष्ट्र विधान परिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊ याअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

          विधान परिषद सभागृहात महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलविधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारराजेंद्र गवई यांच्यासह विधान परिषद सदस्यज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीपरिषद सभागृहामध्ये विचार मांडण्याची मुभा असते. जनतेला न्याय देणेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात येतो. महाराष्ट्र सर्व क्षेत्रासोबतच  संसदीय कार्यप्रणालीमध्येही अग्रेसर आहे. ऐतिहासिक वास्तूमध्ये होत असलेला आजचा हा शतक महोत्सवी कार्यक्रम ऐतिहासिक आहे. राज्याची संसदीय परंपरा ही वैभवशाली असून जगाने गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे संसदीय परंपरा समृद्ध करणारे असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

           या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचेत्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करु या. विदर्भातील जनतेला या अधिवेशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करू या. सर्वांनीच हे अधिवेशन गांभीर्याने घ्यावे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही आमची भावना आहे. विदर्भाला जोडणारे माध्यम हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धता असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

          उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कीराज्याला महर्षी कर्वेमहात्मा जोतिराव फुलेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरराजर्षी शाहू महाराजक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची ही परंपरा जपण्याचे काम विधान परिषदेच्या माध्यमातून होत आहे. विधान परिषदेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

          विधान परिषदेचे महत्व सांगताना विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार म्हणाले कीपरिषदेमुळे शिक्षकपदवीधरलेखककवीसाहित्यिकसामाजिक कार्यकर्तेखेळाडूंना प्रतिनिधित्व मिळाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमास शुभेच्छा देताना या अधिवेशनाचे सर्वांनाच कुतुहल असल्याचे सांगितले.

          चर्चासत्रामध्ये नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसेच विधान परिषद सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व सदस्यांना मुख्यमंत्री श्री शिंदे व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

0000


 

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 

       मुंबईदि. ०८ : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोहिणी पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    आज मंत्रालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन

 मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यातील विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील समित्यांचे गठन करण्यात येत आहे. या संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींनी आपले नाव आठ दिवसांच्या आत कळविण्याचे आवाहन म.वा.मंडळातर्फे करण्यात आले आहे.


अमळनेर येथे संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी विविध समित्यांची घोषणा नुकतीच केली आहे. यात, निधी संकलन समिती, ग्रंथ प्रदर्शन समिती (गाळे व्यवस्थापन), विविध शासकीय परवानगी समिती, शाळा महाविद्यालय समन्वय समिती, कार्यालय समिती, हिशोब लेखन व लेखापरीक्षण समिती, कवी कट्टा समिती, सांस्कृतिक समिती, बालमेळावा व नाटय समिती, प्रसिध्दी व माध्यम समिती, प्रतिनिधी नोंदणी समिती, विविध कार्यशाळा समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष समिती, समन्वय समिती, ग्रंथ दिंडी समिती, स्वच्छता समिती, स्मरणिका समिती या समित्यांमधील काही सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


दुसऱ्या टप्प्यात अन्य सदस्यांचा या समित्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे तसेच अन्य काही समित्यांचे देखील गठन करण्यात येणार आहे. यासाठी समित्यांमध्ये काम करु इच्छिणाऱ्यांकडून नावे मागविण्यात येत आहेत. या संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींनी आपले पूर्ण नांव, गांव, पत्ता आठवडाभरात अध्यक्ष, मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर या नावाने आठ दिवसांच्या आत लेखी कळवावे अथवा प्रा.डॉ. सुरेश माहेश्वरी यांच्या ८८०६७१११९९ किंवा भैय्यासाहेब मगर ९४२३९०४४८३ या व्हॉटस्अॅपवर क्रमांकावर कळवावे. तसेच प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणी, बालमेळावा नोंदणी, कवीकट्टा नोंदणी, गझलकट्टा नोंदणी, टेंडर प्रक्रिया आदी माहितीसाठी www.marathisahityasammelan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन म.वा.मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अब माला जपना भी हुआ डिजिटल 😃

 अब माला जपना भी हुआ डिजिटल 😃


मुंबई की स्वच्छता के 'असली हीरो स्वच्छता कर्मचारी'

 मुंबई की स्वच्छता के 'असली हीरो स्वच्छता कर्मचारी'


    मुख्यमंत्री के हाथों आज दुसरे चरण में मुंबई के


पूर्व और पश्चिम उपनगर में संपूर्ण स्वच्छता अभियान चलाया


जुहू बीच पर समुद्र किनारा स्वच्छ करनेवाली मशीन चलाकर मुख्यमंत्री ने किया स्वच्छता का निरिक्षण


 


            मुंबई, दि 9:- मुंबई के लोगों की स्वास्थ के लिए, मुंबई की स्वच्छता के लिए, सुंदरता के लिए जारी स्वच्छता अभियान यह महापालिका कर्मचारी, अधिकारी तक ही सीमित न रखते हुए यह जन अभियान होने के लिए मुंबई के प्रत्येक व्यक्ति की इसमें सहभागिता आवश्यक है. मुंबई को स्वच्छ, सुंदर और निरोगी रखने के लिए, मुंबई पालिका के सफाईकर्मी दिन-रात काम करते हैं, उनकी वजह से ही मुंबई, स्वच्छ और सुंदर है और स्वच्छता कर्मचारी ही ‘असली हीरो है’ यह सराहनास्पद शब्द कहते हुए सफाईकर्मियों को सभी सहयोग ने करने का आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया.   


            प्रदूषणमुक्त और स्वच्छ, सुंदर मुंबई के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश के अनुसार संपूर्ण स्वच्छता अभियान (डीप क्लिन ड्राईव्ह) चलाया जा रहा है. दि. 3 दिसंबर को मुख्यमंत्री के हाथों इस अभियान का धारावी से शुभारंभ होने के बाद आज दुसरे चरण में मुंबई के पूर्व और पश्चिम उपनगर में मुख्यमंत्री श्री. शिंदे की प्रमुख उपस्थिति में संपूर्ण स्वच्छता अभियान चलाया गया.   


            जुहू चौपाटी स्थित महात्मा गांधी की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर स्वच्छता अभियान का प्रारंभ हुआ. इस दौरान मुख्यमंत्री ने समुद्र किनारा स्वच्छ करनेवाला यंत्र स्वयं चलाकर स्वच्छता का निरिक्षण किया. इस दौरान शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिले के पालकमंत्री दीपक केसरकर, विधायक अमित साटम, पूर्व मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिका के आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित थे. 


           इस अवसर मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि स्वच्छ्ता अभियान के लिए बड़े पैमाने पर मानव संसाधन और विभिन्न प्रकार के अत्याधुनिक प्रोद्योगिकी पर आधारित संयंत्र और वाहन का उपयोग किये जाने से परिसर कम समय में अधिक अच्छे से स्वच्छ हो रहा है. इससे लोगों को भी परिसर स्वच्छ रखने की आदत लगेगी. स्वच्छता अभियान यह अब एक लोकसहभगिता का लोकप्रिय अभियान हुआ है. लोकप्रतिनिधियों की भी इसमें सक्रिय सहभाग है, जो की, निश्चित ही प्रेरणादायी है.


मुख्यमंत्री श्री शिंदे ने आगे कहा कि संपूर्ण मुंबई शहर में चरणबद्ध तरीके से डीप क्लीनिंग अभियान चलाया जाएगा. इस स्वच्छता अभियान के द्वारा बढ़ते प्रदुषण पर भी प्रतिबन्ध लग सकेगा. धारावी जैसे झोपडपट्टी के परिसर में स्वच्छता का काम प्रभावी रूप से हो रहा है. इसमें सड़क, नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह की स्वच्छता प्राथमिकता से की जा रही है. निर्माणकार्य क्षेत्र के जगह (राडारोडा) की भी सफाई की जा रही है. डीप क्लीनिंग अभियान के द्वारा स्वच्छ, सुंदर और निरोगी मुंबई की ओर बढ़ रहे है. 


इस्कॉन मंदिर में मुख्यमंत्री ने भाविकों से साधा संवाद


            इस्कॉन मंदिर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भाविकों से संवाद साधा. इस दौरान मंदिर समिति की ओर से मुख्यमंत्री को सम्मानित किया गया.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि महाराष्ट्र में इस्कॉन के 39, वहीँ मुंबई में करीबन चार सेंटर है और 897 मंदिरों का व्यवस्थापन और सामाजिक उपक्रम इस्कॉन के द्वारा चलाएं जाते हैं. शाला और अस्पतालों में जरुरतमंद छात्र और मरीजों को मदद करने के साथ-साथ पर्यावरण की रक्षा के लिए विभिन्न उपाययोजना, समाज के सभी वर्गों के सामाजिक सेवा की प्रेरणादायी ऊर्जा देने का काम इस्कॉन कर रहा है. साथ ही मुंबई महापालिका के 160 शालाओं में 27 हजार विद्यार्थियों को और नवी मुंबई महापालिका के 23 हजार विद्यार्थियों को पौष्टिक आहार देने के काम भी किया जाता है. 


           मुख्यमंत्री श्री. शिंदे ने बताया कि इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस देश को एक ऊंचाई पर ले जाने का काम किया है. महासत्ता की ओर ले जाने का काम किया है. सही मायने में देश का सम्मान समूचे विश्व में बढाया है. इसलिए इस देश की, राज्य की और इस विश्व की सेवा करने में आपका योगदान अपेक्षित है. 


            स्वच्छता के लिए मुंबई महापालिका कर्मचारी तथा अधिकारी तक ही यह अभियान सीमित न रखते हुए स्वच्छता का अभियान जन अभियान होना चाहिये, इस तरह का काम हमें ध्यान देते हुए करने की बात मुख्यमंत्री

 श्री.शिंदे ने कही.  


मुंबईच्या स्वच्छतेचा 'खरा हिरो स्वच्छता कर्मचारी' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम जुहू बीचवर समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र चालवून

 मुंबईच्या स्वच्छतेचा 'खरा हिरो स्वच्छता कर्मचारी'

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम

जुहू बीचवर समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र चालवून मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी

 

            मुंबईदि 9:-  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी,मुंबई च्या स्वच्छतेसाठीसुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी,  अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छसुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठीमुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतातत्यांच्यामुळेच मुंबईस्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे खरे हिरो’ असल्याची  कौतुकाची थाप सफाई कर्मचा-यांना देत  त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

            प्रदूषणमुक्त आणि स्वच्छसुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि.3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

            जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरआमदार अमित साटम, माजी मंत्री दिपक सावंतबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते. 

            यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणालेस्वच्छ्ता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे  परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते. स्वच्छता अभियान ही आता एक लोकसहभाग लाभलेली लोकप्रिय चळवळ झाली आहे. लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहेही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. धारावी सारख्या  झोपडपट्टीतील भागातही ही स्वच्छतेची कामे प्रभावीपणे होत आहेत. यामध्ये रस्ते,नालेफूटपाथसार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे.बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छसुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

इस्कॉन मंदिरात मुख्यमंत्र्यांचा भाविकांशी संवाद

            इस्कॉन मंदीर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांची ग्रंथतुला करुन सत्कार करण्यात आला. 

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले महाराष्ट्रात इस्कॉनचे 39 तर मुंबईमध्ये जवळपास चार सेंटर असून 897 मंदिराचे व्यवस्थापन तसेच सामाजिक उपक्रम इस्कॉनद्वारे राबवले जातात. शाळा व रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थी व रुग्णांना मदत करण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाय योजना,  समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवेची  प्रेरणादायी ऊर्जा देण्याचे काम इस्कॉन करीत आहे. मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27 हजार  विद्यार्थ्यांना तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23 हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याचं कामही केले जाते असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

            या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशाला एका उंचीवर नेण्याचे काम केले. महासत्तेकडे नेण्याचं काम केले. ख-या अर्थाने देशाचा मान जगभरामध्ये वाढवला. म्हणूनच  या देशाची,राज्याची  आणि या जगाची सेवा करण्यात आपले योगदान अपेक्षित आहे.

            स्वच्छतेसाठी मुंबई महापालिका कर्मचारी किंवा अधिकारी एवढ्यापुरती ही चळवळ आपण मर्यादित ठेवायची नाही. स्वच्छतेची चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजेअशा प्रकारचे काम आपल्याला लक्ष देऊन करायचे आहेअसेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.  

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रमाई नगरात लोटला जनसागर 

            संपूर्ण स्वच्छता मोहीमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरमधील रमाई नगर येथे स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केल्यानंतर परिसरातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्ता क्र. 1 ची स्वच्छता करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतातत्यांच्यामुळेच मुंबईस्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे खरे हिरो’ असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.  मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्तेअंतर्गत रस्तेअंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाहीतर  रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते,  गटार,  नाल्या सार्वजनिक शौचालये  स्वच्छ होत आहेत. झोपडपट्टी सुधार योजनेचा  देखील यात समावेश केला असल्याचे श्री शिंदे यावेळी म्हणाले.  

 शहाजी राजे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे कौतुक 

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत विलेपार्ले (पूर्व) येथील नेहरू मार्गाच्या स्वच्छतेची पाहणी करुन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन  शहाजी राजे विद्यालयातील  विद्यार्थ्याँशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. 

            कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल सोसायटीमध्ये आयोजित स्वच्छता जनजागृती रॅलीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. पालकमंत्री दीपक केसरकरखासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूलाची पाहणी

            अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पाहणी केली.  या पूलाचा पहिला गर्डर नुकताच टाकण्यात आला आहे. या पुलाची पहिली मार्गिका सुरु करण्याच्या दृष्टीने ठरलेल्या वेळेत सगळी कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिले.


Featured post

Lakshvedhi