Thursday, 8 June 2023

आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 आगरी कोळी वारकरी भवनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


वारकरी भवनसाठी अतिरिक्त 15 कोटी देणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            ठाणे, दि. 7 (जिमाका) :- वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त 15 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा शहरातील बेतवडे येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, वारकरी संप्रदायाचे जितेंद्र महाराज, चेतन महाराज घागरे, बाळकृष्ण महाजन पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे, विनायक महाराज, जयेश महाराज भाग्यवंत यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, बेतवडे गावाचे नागरिक उपस्थित होते. वारकरी भवनसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. महानगरपालिकेमार्फत हे भवन उभारण्यात येणार असून यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनाचे काम करत आहे. नागरिकांच्या प्रेमामुळे गेल्या वर्षी मला आषाढी वारीची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. वारकऱ्यांची पंढरी असलेल्या पंढरपूर देवस्थानच्या सुशोभीकरण व इतर कामांसाठी व वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष विकास आराखडा बनविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 83 कोटींचा निधी वर्गही केला आहे. पंढरपूर वारी मार्गावर आरोग्य तपासणी व इतर आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. यावर्षीची आषाढी वारी ही मंगलमय, आनंददायी व सुखकारक होईल.


            संत सावळाराम महाराज स्मारकासाठी जागा आणि निधी देण्यात येईल. तसेच आगरी कोळी वारकरी भवनला सावळाराम महाराजांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            पुरातन देवस्थानांचे जतन, संवर्धन व विकास करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य शासनामार्फत घेत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परदेशी गुंवतणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.


            खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाणे, दिवा, कल्याण परिसरात आगरी, कोळी व वारकरी मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्यासाठी हे भवन उभारण्यात येत असून आगरी कोळी वारकरी भवन हे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाईल. येत्या वर्षभरात हे भव्यदिव्य वारकरी भवन उभे राहिल. या वास्तूत आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडेल. कल्याण येथे संत सावळाराम स्मारकासाठी जागा अंतिम झाली असून लवकरच त्याचे भूमीपूजन होईल.


            यावेळी बेतवडे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्का

र करण्यात आला.


ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार

 ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दिवा परिसरातील 610 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण


            ठाणे, दि. 7 (जिमाका) : दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


            ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा येथे पार पडला. यावेळी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.


            “दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार असून त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल. तसेच दिव्यात 150 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठीची जागा राज्य सरकारकडून मिळाली असून त्याच्या भूसंपादनासाठी 68 कोटी निधी मंजूर झाला आहे. दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे येथेही क्लस्टर योजना राबवावी, अशी मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.


            यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दिवा वासियांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.


खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरण कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन


            दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्यकारभार करत आहोत. राज्यातील प्राचीन देवस्थानांचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गडकोट, किल्ले यांचेही संवर्धन करण्यात येणार आहे. खिडकाळेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी जेवढा निधी लागे

ल तो देण्यात येईल.


०००००

*फँटी लिव्हर*

 *फँटी लिव्हर*



आज आपण फँटी लिव्हर म्हणजे काय ही समस्या का निर्माण होते त्याची कारणे,लक्षणे,प्रकार, काय काळजी घेता येईल,आयुर्वेदिक उपचार, घरगुती उपचार या बदल जाणून घेणार असून या द्वारे या आजारावर परिपूर्ण माहिती घेऊ या.चला तर मंडळी सुरु करुया.

*फँटी लिव्हर म्हणजे काय?*

आपल्या यकृताच्या शमते पेक्षा जास्त कार्बोहैड्रेट्स किंवा फॅट्स किंवा दोन्ही प्रमाणाबाहेर खाल्ल्यास फॅटी लिव्हर (fatty liver) हा आजार होतो. जास्तीचे फॅट्स नॉर्मली पेशीं मध्ये साठवले जातात परंतु एका बिंदू पलीकडे त्या यकृताच्या आत आणि स्वभोवताली जमा होऊ लागतात व ही समस्या उद्भवते आणखी सोप्या भाषेत सांगायचे तर सध्याच्या व्यग्र जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे फॅटी लिव्हर. यकृत पेशींमध्ये अनावश्यक चरबी साचल्याने ही परिस्थिती उद्भवते.हे सोप्या भाषेत म्हणता येईल.पूर्वी फॅटी लिव्हरची समस्या वयाच्या पन्नाशी-साठीत दिसत असे. आता बदललेली आहारशैली, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पिझ्झा-बर्गरचा आहारात समावेश यामुळे तरुणांमध्येही हा आजार बळावल्याचे दिसते.

*फँटी लिव्हर ची कारणे.*

१)लठ्ठपणा, मधुमेह किंवा उच्च २)ट्रायग्लिसरायड्ससारख्या समस्या 

३)आहारात जास्त साखर किंवा स्निग्ध पदार्थ 

४)व्यायामाचा अभाव कमी शारीरिक हलचाली 

५) अंत:स्रावाची कमतरता,

६)आहारात अती तेलकट पदार्थ, जंकफूड, मसालेदार खाणे. 

 विशिष्ट परिस्थिती अथवा कारणे असल्यास फॅटी लिव्हर विकसित होतात.यामुळे यकृताला धोका संभवतो. योग्य वेळी आपल्या यकृतातील वाढत्या चरबीकडे लक्ष दिले नाही, तर गंभीर परिणाम होतात. शक्य तितक्या लवकर उपचार केल्यास निरोगी आयुष्य जगता येते.

*फँटी लिव्हर ची लक्षणे*

१)पोटाचा घेर वाढणे

२) वजन सतत वाढणे

३) यकृताचा आकार वाढणे व सूज येणे

४) मळमळणे

५) भूक न लागणे

६) कामात उत्साह न राहणे. ७)पायांना सूज येणे.

८)सतत थकवा ,निरुत्साह उत्साह नसणे.

९) पोटात उजव्या बाजूला दुखणे.

*हा आजार होऊ नये म्हणून काय कराल.*

१)वजन नियंत्रीत करणे 

२)रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे

३) मद्यपान-धूम्रपान ताबडतोब बंद करणे.

४) कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण.

५)पौष्टिक-संतुलित आहार

६) नियमित व्यायाम रोज ७)४५मिनिटे किमान चालणे.प्राणायाम, योगा करणे.

 ८)आहारात फळे, भाज्या, बीन्स, कोंडायुक्त धान्याचा समावेश. ९)तळलेले पदार्थ आणि जंकफूड वर्ज्य करणे.

१० )आहारतज्ज्ञज्च्या सल्ल्याने आहार 

११)डॉक्टरांच्या/ आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध मनानं घेऊ नये निश्चित काळानुसार फाँलाँप देणे.

         [12/9, 7:52 PM] वैद्य गजानन: 

११)रोजच्या आहारात भरपूर फायबर (चोथा) असलेले अन्न उदा. पालेभाज्या, कोंडा न काढलेली भाकर यांचा आवर्जून समावेश करावा.आहार समतोल असावा. फळभाज्या, पालेभाज्या, कच्च्या कोशिंबिरींचा समावेश असावा. जेवताना शांत, आनंदी मनाने आहार घेतल्यास खाल्लेले अन्न योग्यरित्या पचते.सकाळचा नाश्ता टाळू नये.

 दिवसातून किमान एक-दोन फळे खावीत.

*फँटी लिव्हरचे प्रकार.*

१)स्टेटोसिस- यामध्ये यकृतात चरबी जमा झालेली असते, पण त्यामुळे सूज येत नाही.

२)स्टेरिएपेटायटिस - यामध्ये यकृताला जखम आणि सूज आढळते.

३)लिव्हर सिरोसिस - हा प्रकार अतिशय गंभीर असतो त्यामध्ये यकृताला इजा होण्याची शक्यता अधिक असते व पुढे अनेक जटील आजार कँन्सर वगैरे निर्माण होऊन रूग्ण दगावतो.

*आयुर्वेदिक उपाययोजना.*

१)लिव्ह५२टँब्लेटस दोन दोन सकाळी संध्याकाळी घेणे.

२)आरोग्यवर्धिनी दोन दोन गोळ्या गरमपाण्यात ठेवणे.

३)हेपजाँन फायटो फार्मा दोन गोळ्या जेवणापूर्वी घेत जाणे.

४)सर्वकल्प काँथ रोज घेणे.याने हेपेटायटिसa,b,c,d,e सह लिव्हर सोरायसिस प्रारंभीक स्टेज बरा होतो.

*घरगुती औषध रचना.*

 १)काळीमिरी पावडर,सुंठ,गिलोय,सैधव, चिमूटभर लिंबू पाण्यात घेत जा ग्लासभर घेत जा. रोज सकाळी. रात्री भिजवून सकाळी घेतल्यास पोटाची चरबी, घेर,वजन कमी होते.यात लिंबू अर्धा कपभर पाणी व इतर वस्तू चिमूटभर पावडर स्वरूपात.

२)दररोज सकाळी चिमूटभर ब्राऊन राईस पाण्या सोबत खाणे.

३)चार हिरडे ठेचून दोन कप पाण्यात उकळणे ते पाव कप झाल्यावर ते पाणी पिणे चार पाच जुलाब लागून लिव्हर वरील व प्लीहे वरील सूज झटक्यात उतरते.प्रयोग आठवड्यात करुन एकदा करावा महीन्याने रिपोर्ट चेक करा फरक दिसतो.

४)कार्ल्याचा रस आठ दिवस अर्धा कप घ्या. मी पुर्वी सांगितलेल्या या प्रयोगाने अनेकांचे रिपोर्ट बदललेत हे आपण गृपवर वाचले ही असेल.

५) लसूण: ऍडव्हान्स बायोमेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, लसूण फॅटी लिव्हर रोग असलेल्या शरीरातील वजन व चरबी कमी करण्यास मदत करते.

६) ब्रोकोली: जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, ब्रोकोलीच्या दीर्घकालीन वापरामुळे उंदरांच्या यकृतामध्ये चरबी तयार करणे थांबवण्यास मदत झाली.

७)अक्रोड्स: ओमेगा – 3 फॅटी ऍसिडमध्ये समृध्द असलेले अन्न यकृत आरोग्यासाठी चांगले असतात. एनएएफएलडी (NAFLD – नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हर डिसीज ) असलेल्या लोकांमध्ये अक्रोड खाण्याने लिव्हर फंक्शन टेस्ट सुधारल्याचा अभ्यास केला गेला.

७)रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे.त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते.

 ८)आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण या आवळय़ामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात.

 ९)जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रान्सएमानेज एन्झाइम्सचे प्रमाण वाढते. ज्येष्ठमधातील तत्त्व या एन्झाइमचे प्रमाण लिव्हरमधून कमी करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे ज्येष्ठमध लिव्हरसाठी लाभकारी ठरते रोज चमचाभर सत्व चमचाभर मधात डायबेटीस असलेल्या मंडळींनी करु नये.

१०)गुळवेलीची ४-५ पाने दररोज चावून चावून खात जा.

११)लसूण पाकळ्या व व्हिटमिन सी १०० मि. ग्रँम रोज घ्या. दोन वेळा लिव्हर व रक्तातील कोलँस्टेराँल सह चरबी कमी करेल.

१२) तीन चमचे इसबगोल रोज रात्री पाण्यात घेतल्यास कोलेस्ट्रोल व एल. डी. एल. कोलेस्ट्रोल दोन महिन्यात साधारण पाच ते आठ टक्के घटते.

१३)प्रोबायोटिक्स शरीरात जमा होणाऱ्या विषाक्त तत्वांना बाहेर काढण्यात मोठी भूमिका निभावतात म्हणून मध, दही, योगर्ट खा बाजारात प्रोबायोटिक युक्त ब्रेडस, दूध व दही सप्लिमेंट्स पण मिळतात. 

१४)भ्रुंगराज व हळद एकत्रित समप्रमाणात चुर्ण घेतल्यास दारु मुळे साचलेले घातक रसायन बाहेर टाकण्यास मदत होते.परिणामस्वरूप लिव्हर मधील दोष कमी होतात.

१५)काळी मिरी व लवंग शरीरातून अँसिडीटीचा प्रभाव कमी करतात नियमित एक चघळून खावी.याने लिव्हर गतीमान होते.

१६)दुधीचा ज्युस नियमितपणे घ्या.

आशा आहे एवढ्या महीनतीने लिहलेली पोस्ट आपणास आवडली असेल.यातील प्रयोग बिनधास्त करा शंभरटक्के चांगले रिझल्ट येतीलच. आवडल्यास नांवासह शेअर करा.या व अधिक माहितीसाठी आयुर्वेद प्रचार या माझ्या पेजला लाईक करा.शेअर करा.व निरामय आयुर्वेद या गृपचे सदस्य व्हा.

वैद्य. गजानन



_

त्वचा रोग शिबे,सुरमा*

 *शिबे,सुरमा*



छोटे छोटे पांढरे डाग छातीवर, मानेवर पाठीवर,गळ्यावर

कारण अशुध्द रक्त. त्वचेवरील मेलांजीन या द्रवाची कमतरता.

उपाययोजना

१)साबण लावू नये शिकेकाई चा वापर करा.तसेच कडुलिंबाच्या पानांना गरमपाण्यात उकळून ते लावावे.

२)रक्त दोषांतक घ्यावे.

३)बावचा तेल डागावर लावावे व कोवळ्या सुर्यकिरणात बसावे.

४)लिंबाचा रस अंगावर चोळावा.

५)सारिवाद्यासव व दोन दोन चमचे समभाग पाण्यात घ्या.



 वैद्य.गजानन



*

मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत

 मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ'

मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत


मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 7 : नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन'चा (8169681697) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            दरम्यान, मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास बंदरे विकास व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण


            मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महानगरपालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महानगरपालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.


अशी आहे 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' सुविधा


            बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाइन' कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.


            भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी, अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण/ जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाइनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी/कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.


            घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.


००००


मुख्यमंत्री के करकमलों द्वारा 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हाट्सएप हेल्पलाइन' का शुभारंभ'


मुंबई की सड़कों को साफ और कचरा मुक्त बनाए


मुंबई की पुनर्विकास परियोजनाओं को बढ़ावा देने के लिए व्यापक नीति


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


             मुंबई, दिनांक 7 जून: नाले सफाई के बाद मुंबईकरों को कचरा और डेब्रिज (मलबे) की शिकायत करने के लिए एक विशेष क्रमांक की सुविधा दी गई है। इस बाबत 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हाट्सएप हेल्पलाइन' (8169681697) का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करकमलों द्वारा शुभांरभ किया गया है। मुंबईकरों की शिकायत के तुरंत बाद कचरा और मलबा हटाया जाना चाहिए। उसके लिए मुंबई महानगर पालिका (मनपा) को यंत्रणा (सिस्टम) को सतर्क (अलर्ट) रखना चाहिए। इस अवसर पर मुख्यमंत्री ने निर्देश दिया कि इस यंत्रणा (सिस्टम) का प्रभावी ढंग से इस्तेमाल करते हुए मुंबई की सड़कों को स्वच्छ और कचरा मुक्त बनाए।


            इस दौरान, मुख्यमंत्री श्री. शिंदे ने यह भी कहा कि मुंबई की पुनर्विकास परियोजनाओं को बढ़ावा देने के लिए व्यापक नीति तैयार की जाएगी।


            मुख्यमंत्री के सरकारी आवास वर्षा पर आयोजित किए गए इस कार्यक्रम में इस अवसर पर बंदरगाह विकास एवं खनन मंत्री दादाजी भुसे, सांसद राहुल शेवाले, मुंबई महानगर पालिका के आयुक्त आई. एस.चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदि उपस्थित थे।


            इस बैठक में मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि सड़क से सटे कचरा और डेब्रिज (मलबा) उठाने के लिए मुंबईकरों को संपर्क क्रमांक देने का निर्देश महानगरपालिका के आयुक्त को दिया गया था। इसके अनुसार, आज से 8169681697 इस व्हाट्सएप नंबर 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हाट्सएप हेल्पलाइन' पर मुंबईकर अपनी शिकायत दर्ज करा सकेंगे। इस क्रमांक पर नागरिकों को कचरा, डेब्रिज को लेकर शिकायत दर्ज कराने के बाद आठ घंटों के भीतर इन शिकायतों पर कार्रवाई करना अपेक्षित है, ऐसा भी मुख्यमंत्री ने कहा।           


            इस व्यवस्था (यंत्रणा) के लिए महानगरपालिका ने 350 कनिष्ठ अवेक्षक (जूनियर ओवरसीटर) का नियुक्त किए गए हैं। इस अवसर पर मुख्यमंत्री ने कहा कि इस व्यवस्था (यंत्रणा) के माध्यम से महानगरपालिका प्रशासन मुंबईकरों को राहत देने का प्रयास करें। हाल ही में भारत में जापान के राजदूत ने मुझसे मुलाकात की। उन्होंने भी बदले हुए मुंबई की सराहना की, ऐसी जानकारी मुख्यमंत्री ने इस अवसर पर दी।


             मुंबई की सड़कों का कांक्रीटीकरण किया जा रहा है और इसके माध्यम से मुंबई की गड्ढा मुक्त संकल्पना को साकार किया जा रहा है। मुंबई में 1,150 सौंदर्यीकरण परियोजनाएं चल रही हैं और इसका दृश्य स्वरूप बदल रहा है। रोशनी की गई है और समुद्र तट की सफाई का अभियान चलाया जा रहा है। मुंबई में 170 जगहों पर बालासाहेब ठाकरे आपला दवाखाना शुरू किया गया है। मुख्यमंत्री ने कहा कि कोलीवाडों के विकास, प्रदूषण मुक्त मुंबई के विकास को बढ़ावा दिया जा रहा है।


पुनर्विकास परियोजनाओं को बढ़ावा देने के लिए व्यापक नीति


            मुंबई में शुरु पुनर्विकास परियोजनाओं को बढ़ावा देने के लिए व्यापक नीति तैयार की जाएगी, ऐसा कहते हुए पुनर्विकास प्रक्रिया में तेजी लाने के लिए उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ चर्चा की गई है। म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महानगरपालिका, महाप्रित जैसे सरकारी संस्थाओं के माध्यम से बंद पड़ गई पुनर्विकास परियोजनाओं को बढ़ावा दिया जाएगा, ऐसा भी मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा।



0000


Chief minister launched ‘Chief Minister Swachha Mumbai Whats App Helpline’


Make Mumbai roads clean and free from garbage


Comprehensive policy to boost redevelopment projects in Mumbai


– Chief Minister Eknath Shinde


 


            Mumbai, June 7 – After Nalla cleaning, the Mumbaikars would have special helpline number for garbage and debris with Chief Minister Clean Mumbai Swachha Mumbai Whats App helpline (8169681697) which was launched by chief minister Eknath Shinde. Shinde directed to make Mumbai roads clean and free from garbage by effectively using and keeping this mechanism alert by removing the garbage and debris after the grievance registered by the Mumbaikars.


            Meanwhile, chief minister Shinde said that a comprehensive policy would be prepared for giving a boost to redevelopment projects.


            The program held at Varsha bungalow was attended by minister for ports development and mines Dadaji Bhuse, MP Rahul Shewale, BMC Commissioner I S Chahal, additional commissioner Shravan Hardikar.


            Stating that he had given directions to BMC commissioner to provide helpline number for garbage and debris cleaning, the chief minister said that accordingly, from today this whats app number 8169681697 can be used to register complaint on Chief Minister Swachha Mumbai Whats App helpline after which the action would be taken in a matter of eight hours.


            The chief minister said that the BMC has appointed 300 junior overseers for this system and asked the BMC administration to provide a relief to Mumbaikars through this system. He recalled that during his meeting with Japanese ambassador last week, the Japanese ambassador had lauded the city of Mumbai for its recent transformation.


            Stating that roads are being concretized in Mumbai and pot-hole free roads concept is being brought in to reality, he said that there are 1150 beautification projects going on in Mumbai which are showing visible changes in the city. He said that while lighting is done at some places beaches are being cleaned up through clean beaches campaign and 170 Balasaheb Thackeray Aapla Davakhana dispensaries have been started in Mumbai. The chief minister said that a fillip is being given to development of fishermen colonies and pollution-free Mumbai.


Comprehensive policy for giving boost to redevelopment projects


            Stating that a comprehensive policy is being prepared to give a boost to ongoing redevelopment projects in Mumbai and the same is discussed with deputy chief minister Devendra Fadnavis. Chief minister Shinde informed that through government agencies like MHADA, MMRDA, CIDCO, BMC and 

MahaPreet the shelved redevelopment projects would be activated and started.



0000


जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात

 जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात


- डॉ. संजीव कुमार


महापारेषणचा 18 वा वर्धापन दिन


 


            मुंबई, दि. 7 : महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे, असे प्रतिपादन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले. 


            महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


            डॉ. संजीव कुमार म्हणाले, देशात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी संधी आहे व आव्हाने आहेत. पाच हजार मेगावॉटपेक्षा जास्त ऊर्जा तयार करण्यासाठी एक हजार सर्किट किलोमीटर अति उच्च दाब पारेषण वाहिनी सुरू करण्याचे धोरण आहे. महापारेषण ही देशात सर्वोत्तम पारेषण कंपनी आहे. महापारेषणने ड्रोनचा वापर सुरू केला आहे. हा ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी चांगला निर्णय ठरला आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभाग स्तरापासून सांघिक कार्यालय स्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू केली आहे. भविष्यातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना चालू राहील, असे त्यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महापारेषणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा संदेश दिला.


               ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.


            महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक, महापारेषणचे संचालक (संचलन) संदीप कलंत्री, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, संचालक (वित्त) अशोक फळणीकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते.


            नसीर कादरी, विश्वास पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुगत गमरे यांनी तर सूत्रसंचालन विनायक शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?*

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?*


मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७




Email id:- aao.cmrf-mh@gov.in




राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.




*जास्तीतजास्त शेअर करा, गरजू रुग्णांपर्यंत पर्यंत पोहोचवा!*




■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे


१. अर्ज ( विहीत नमुन्यात)


२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)


३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.


(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.) 


४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक


५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)


६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. 


७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.


८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.


९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.




● अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.




Email id:- aao.cmrf-mh@gov.in




● व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.




■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.




१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),


२. हृदय प्रत्यारोपण


३. यकृत प्रत्यारोपण


४. किडणी प्रत्यारोपण


६. बोन मॅरो प्रत्यारोपण


५. फुफ्फुस प्रत्यारोपण


७. हाताचे प्रत्यारोपण


८. हिप रिप्लेसमेंट


९. कर्करोग शस्त्रक्रिया


१०. अपघात शस्त्रक्रिया


११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया


१२. मेंदूचे आजार


१३. हृदयरोग


१४. डायलिसिस 


१५. अपघात


१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)


१७. नवजात शिशुंचे आजार


१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण 


१९. बर्न रुग्ण


२०. विद्युत अपघात रुग्ण




या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.




मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७




संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे.




आपले नम्र,


मंगेश नरसिंह चिवटे,


कक्ष प्रमुख,


मुख्यमं

त्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.


फोन - ९६१९९५१५१५


संपर्क - ०२२ - २२०२५५४०


Featured post

Lakshvedhi