Tuesday, 2 May 2023

मान्सूनच्या स्वागताला, चला केरळला !

 मान्सूनच्या स्वागताला, चला केरळला !

- Welcoming Monsoon @Kerala


भारताची ओळख मान्सून

अन् त्याचं प्रवेशद्वार केरळ,

तो तिथं अनुभवाइतकं

रोमांचक दुसरं काय असू शकतं?


मान्सून अनुभवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी...


विशेष आकर्षण:

• केरळमधील चिंब मान्सूनचा अनुभव

• १८५ वर्षे जुनी वेधशाळा पाहणे

• मान्सून-मॉडेल बनवणाऱ्या वैज्ञानिकाशी गप्पा

• थिरूअनंतपूरम, कोच्ची परिसराला भेटी

• कोवालम, वरकला समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव

• गर्भश्रीमंत पद्मनाभस्वामी मंदिराला भेट

• कडमकुडी बेट व बॅकवॉटर्सचा अनुभव

• कोच्ची फोर्ट, एलिफंड ट्रेनिंग कॅम्प भेट

• आणि बरेच काही...


३ जून ते ९ जून २०२३

(सहा दिवस, सहा मुक्काम)


शुल्क:

रु. ४१,५०० / प्रति व्यक्ती

(विमानप्रवास, मुक्काम, नाश्ता-जेवण, स्थळ भेटी यांसह सर्वसमावेशक)


तपशील व नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Kerala



संपर्क:

९५४५३५०८६२

९४२०६९६४२३

तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे

 *तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे !!* 


लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात. तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.


या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लसणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, तर तुपात जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात. ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात.


*हृदयासाठी चांगले आहे* 


लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते. तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.


*श्वसनासंबंधित रोग चांगले होतात* 


लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते. दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे.


*पचनासाठी चांगले* 


लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.


*प्रतिकारशक्ती वाढते* 


तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.


*हाडे मजबूत होतात* 


लसणात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻

राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्तीकरिअर शिबीरांचे आयोजन

 राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्तीकरिअर शिबीरांचे आयोजन


- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा


 


            मुंबई, दि. 2 : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक विविध संधींसंदर्भात समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे व बदलत्या काळास अनुसुरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले.


            राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबीरांचे उद्घाटन जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या करिअर शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. करियर शिबीराच्या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची तसेच इतर माहिती देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन ( पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या शिबिरांमधून सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीही मार्गदर्शन देण्यात येणार आहे.


            या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी (आयटीआय) संपर्क साधावा, तसेच सोबत जोडलेल्या क्यूआर कोड ( QR CODE ) च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी नोंदणी करून शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी यांनी केले आहे.

चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी* *पाणी का प्यावे?*

 *चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी* *पाणी का प्यावे?* 


*सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता?*


*कपभर चहा किंवा कॉफी घेता.... ?*


अनेकांना ही सवय आहे. असे आपल्यापैकी अनेकजण करतात. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच विपरीत परिणाम होतो, हे खूप लोकांना माहीत नाही.


कॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा किंवा कॉफी घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या. ही सवय आरोग्यदायी आहे.


*चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?*


चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्यामागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील ॲसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे ॲसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे ॲसिडिक रेंज थोडीसी कमी आहे. म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा ॲसिडिटी वाढते. तसंच काहीशी अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची शक्यता असते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील ॲसिडची पातळी काहीशी सौम्य होते व पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक ॲसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.

          खरं जर चहा किंवा कॉफी आपले भारतीय पेय नाहीच. त्यामुळे ते पिणे टाळणे उत्तमच. पण अगदीच प्यायचा झाला तर वरीलप्रमाणे काळजी अवश्य घ्या.


 *


सहजपणे करू शकत असाल 'या' गोष्टी तर समजून घ्या तुम्ही पूर्णपणे फिट आहात....

 *सहजपणे करू शकत असाल 'या' गोष्टी तर समजून घ्या तुम्ही पूर्णपणे फिट आहात.....!*


सगळ्यांनाच जास्त आणि निरोगी जीवन जगण्याची इच्छा असते. पण आपण आतून किती फिटी किंवा निरोगी आहोत हे माहीत करून घेणं जरा अवघड असतं. अशात एक्सपर्ट्सनी अशा काही फिजिकल एक्टिविटीबाबत सांगितलं आहे ज्याद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्ही आतून किती फिट आहात. चला जाणून घेऊ त्या एक्टिविटीबाबत....


*एका पायावर बॅलन्स करणे...*

हे तुम्हाला फारच बालिश वाटू शकतं, पण जर तुम्ही तुमचं शरीर एका पायावर उभं राहून व्यवस्थित बॅलन्स करू शकत असाल तर हा इशारा आहे की, तुमचा ब्रेन फार हेल्दी आहे. अशात हे बघणं फार गरजेचं असतं की, तुम्ही 60 सेकंदासाठ केवळ एका पायावर उभे राहून शरीराचं वजन उचलू शकता किंवा नाही. जर तुम्ही असं 20 सेकंदासाठीही करू शकत नसाल तर समजा की, तुम्हाला पुढे जाऊन मेंदुसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, एका पायावर उभे राहण्याच्या 10 सेकंदाच्या बॅलन्स टेस्टमध्ये अयशस्वी ठरणाऱ्या वृद्ध वयस्कांना पुढील 10 वर्षात मृत्यूचा धोका अधिक असतो.


*चेअर टेस्ट...*

ही टेस्ट करण्यासाठी एक खुर्ची घ्या. या खुर्चीला हात ठेवण्याची जागा असू नये. खुर्चीवर बसा आणि नंतर हे बघा की, तुम्ही किती वेळा खुर्चीवरून उठून बसू शकता. यूकेमध्ये करण्यात आलेल्या एका स्टडीमधून समोर आलं की, जे वयस्क 20 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळात 10 वेळा असं करू शकले त्यांची जास्त आणि निरोगी जीवन जगण्याची शक्यता त्या लोकांपेक्षा जास्त होती जे असं करू शकले नाहीत. हा टास्क करण्यासाठी तुमच्या लोअर बॉडीच्या मसल्स मजबूत असणं गरजेचं असतं.


*पायाच्या बोटांना स्पर्श...*

हे करण्यासाठी जमिनीवर बसा आणि दोन्ही पाय सरळ करा. त्यानंतर हातांनी दोन्ही पायांच्या अंगठ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असं करू शकत नसाल तर हा इशारा आहे की, तुम्हाला पुढे जाऊन हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अभ्यासकांनी सांगितलं की, फ्लेक्लिबल बॉडी, फ्लेक्सिबल आर्टरीजकडे इशारा करते. तुमच्या लाइफस्टाईलमुळे तुमच्या आर्टरीज कठोर होतात. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका जास्त वाढतो.


*किती वेगाने चढता पायऱ्या...* 

गॅलिसियामध्ये यूनिवर्सिटी हॉस्पिटल कोरूनाच्या अभ्यासकांनी केलेल्या एका रिसर्चनुसार, जर तुम्ही न थांबता पायऱ्या सहजपणे चढू शकत असाल तर तुमचा वेळेआधी मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. अभ्यासकांना आढळलं की, ज्या लोकांना पायऱ्या चढण्यात समस्या होते, त्या लोकांचा मृत्यू वेळेआधी होण्याचा धोका अधिक असतो. सोबतच कॅन्सरचा धोकाही अधिक असतो.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार,


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



कण कण चे तीळ अद्भुत फायदे*

 *तिळाचे .. अद्भुत फायदे*


१) रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही..

२) तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण, कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद होते.

३) ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास करावे

  व थोडे थोडे घेतल्यास मासिक धर्म मोकळा येतो, कंबर व पोट दुखत नाहि...... 

४) डोकेदुखिः। तिळाचि पाने विनेगारमध्ये टाकुन वाटून याचा लेप मस्तकावर केल्यास डोकेदुखि थांबते.

५) संग्रहणि, आंव, आमातिसारः ६ ते १२ ग्रँम तिळ व कच्चे बेलफळाचा गर एकत्रित करून हे मिश्रण खावे आराम पडतो.

६) बद्धकोष्ठः। तिळ लोणि व खडिसाखर एकत्रित करून खाल्यास मळ नीट बांधून येतो व कडक शौचास होत नाही. किंवा ६० ग्रँम तिळ व ६० ग्रँम गूळ एकत्रित करून लाडू खावा.

७) काळ्या तिळाचे तेल एक थेंब डोळ्यात घातल्यास डोळे निरोगि राहतात, 

८) तिळाचे मूळ व पानांचा काढा करून याने छान केसांचि मालिश करावी. पांढरे केस काळे होतात.

.. तसेच तिळाचे फूल व गोखरू काटा हे वाटून मग याचा लेप डोक्यावर दिल्यास टक्कलावर केस उगवू लागतात... रोज एक चमचा तिळ खावे. केस घनदाट होतात, कोंडा दूर होतो.

९) तिळ चार चमचे घेउन एककप पाण्यात टाकुन अर्धा कप करा व ते पिल्यास सर्दि, खोकला दूर होतो.

१०) बहूमूत्रः। सारखी सारखि युरिन लागत असेल तर ४० ग्रँम तिळ व २० ग्रँम ओवा एकत्रित वाटून यात ६० ग्रँम गूळ मिसळून ५-५ ग्रँम स.सं घ्यावे.

११) लहान मूले अंथरुणात युरिन करतात. तेव्हा ४० दिवस रोज एक तिळगूळाचा लाडू खाउ घातल्यास ही समस्या दूर होते.

१२) भाजणे, चटका बसल्यासः। कधि चुकुन चटका बसला किंवा अंग भाजले असता, तिळ पाण्यात वाटून याचा लेप त्या लेप द्यावा. दाह होत नाही. व फफोला येत नाही. 

१३) तिळाचे फूलांच्या ४ मिलिलिटर रसात २ चमचे मध व २५० मिलिलिटर दूध मिसळून पिल्यास मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो.

१४) आमवात... संधिवातः। ४ ग्रँम तिळ व सुंठ एकत्रित करून हे दोन वेळा घ्यावे आराम पडतो.

१५) श्वेतप्रदरः। तिळ कुटून पावडर करावी व यात मध मिसळून घ्यावे.

१६) लठ्ठपणाः। तिळाच्या तेलाने मालिश केलि असता मेद झडतो. व शरिर सुडौल बनते.

१७) पायातला काटा जर निघत नसेल तर तिळाचे तेल व मीठ एकत्रित करून तिथे लावावे. काटा वर येतो.

१८) इसब, एक्जिमा, सोरायसिसः १ मिलिलिटर तिळाच्या तेलात कणेर झाडाचि मूळी शिजवून मग हे सिध्द तेल प्रभावित जागेवर लावल्यास हे सर्व रोग बरे होतात.

१९) स्मरणशक्ति करताः। तिळ व गूळ याचा रोज एक लाडू खावा.

२०) सायटिकाः ५० मिलिलिटर तिळाच्या तेलात १० लसणाच्या पाकळ्या शिजवून मग या तेलाने मालिश करावि.

...#*#*#*#*....... वरिल फायदे बघता तिळ हे संपूर्ण शरिर स्वास्थाकरता उपयोगि आहेत..


        आयुर्वेद अभ्यासक.... सुनिता सहस्रबुद्धे


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



काय राव तुम्ही भी, लई बाई


 

Featured post

Lakshvedhi