Friday, 7 April 2023

Sarada Peeth

 *After 70 years, Sarada Peet temple in Kashmir was opened for public.*


It is very close to the LOC.

From here you can see Pakistan.


This is an unimaginable achievement for 70 ye


ars..

काळ्या पाण्याची शिक्षा झालेले भोगलेले किती स्वातंत्यवीर आहेत.*

 *पहा काळ्या पाण्याची शिक्षा झालेले भोगलेले किती स्वातंत्यवीर आहेत.* 


*मित्रांनो,आपण यांना ओळखता का..?*


*१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,* 

*२. स्वातंत्र्यवीर भिमाजी* 

*३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील* 

*४. स्वातंत्र्यवीर भीमराव* 

*५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले* 

*६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले* 

*७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले* 

*८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले* 

*९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले* 

*१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले* 

*११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी* 

*१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु* 

*१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण* 

*१४. स्वातंत्र्यवीर बारकू* 

*१५. स्वातंत्र्यवीर भीमा* 

*१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण* 

*१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण* 

*१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण* 

*१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी*

*२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु* 

*२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर* 

*२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई* 

*२३. स्वातंत्र्यवीर पांचाली गोविंद देसाई* 

*२४. स्वातंत्र्यवीर राघोबा देसाई* 

*२५. स्वातंत्र्यवीर देवाजी शिरसाठ* 

*२६. स्वातंत्र्यवीर देवजी गायकवाड* 

*२७. स्वातंत्र्यवीर गानू सावंत* 

*२८. स्वातंत्र्यवीर गणेश महाराज =*

*२९. स्वातंत्र्यवीर गणू सखाराम.* 

*३०. स्वातंत्र्यवीर हरिभाऊ गरबेद* 

*३१. स्वातंत्र्यवीर विठू गवळी* 

*३२. स्वातंत्र्यवीर हनुमंत घाटगे* 

*३३. स्वातंत्र्यवीर संत साली गोपाल* 

*३४. स्वातंत्र्यवीर गोविंद* 

*३५. स्वातंत्र्यवीर गोवर्धन* 

*३६. स्वातंत्र्यवीर गोविंद महार* 

*३७. स्वातंत्र्यवीर गोविंद विठू* 

*३८. स्वातंत्र्यवीर गोविंद गोविंद* 

*३९. स्वातंत्र्यवीर हरी* 

*४०.स्वातंत्र्यवीर देवजी हिंदालकर* 

*४१. स्वातंत्र्यवीर होनाजी* 

*४२. स्वातंत्र्यवीर रघु जाधव* 

*४३. स्वातंत्र्यवीर सुभाना बापू जाधव* 

*४४. स्वातंत्र्यवीर जयराम राजे* 

*४५. स्वातंत्र्यवीर शिवाजी अभिमन्यु* 

*४६. स्वातंत्र्यवीर बाजी जोरेकर* 

*४७. स्वातंत्र्यवीर अन्न नथु* 

*४८. स्वातंत्र्यवीर गणाजी कबरे* 

*४९. स्वातंत्र्यवीर अन्न बापू कदम* 

*५०. स्वातंत्र्यवीर राम कदम* 

*५१. स्वातंत्र्यवीर रावजी काळजी कदम* 

*५२. स्वातंत्र्यवीर गोपाल कार्सोवकर* 

*५३. स्वातंत्र्यवीर जिल्लू कोचारकर* 

*५४. स्वातंत्र्यवीर गोपाल कोकामकर* 

*५५. स्वातंत्र्यवीर मान्या कोळी* 

*५६. स्वातंत्र्यवीर बोंबी कोकमकर* 

*५७. स्वातंत्र्यवीर विठू सातवजी कुंभार* 

*५८. स्वातंत्र्यवीर गिरवार कुणबी* 

*५९. स्वातंत्र्यवीर जवाहर कुणबी* 

*६०. स्वातंत्र्यवीर हैबतराव आप्पा महाडिक* 

*६१. स्वातंत्र्यवीर विठू बहिरू महल्ले* 

*६२. स्वातंत्र्यवीर अप्पा मालवणकर* 

*६३. स्वातंत्र्यवीर नरसिह माने* 

*६४. स्वातंत्र्यवीर मावजी* 

*६५. स्वातंत्र्यवीर मावजी धुमाळ* 

*६६. स्वातंत्र्यवीर म्हसकर रावजी लीन्गोजी नाईक* 

*६७. स्वातंत्र्यवीर तात्या मोहिते* 

*६८. स्वातंत्र्यवीर लिंब भवानी मोरे* 

*६९. स्वातंत्र्यवीर मोहन* 

*७०. स्वातंत्र्यवीर भीमा नाईक* 

*७१. स्वातंत्र्यवीर बी.वाय नाईक* 

*७२. स्वातंत्र्यवीर गंगा एक्का नाईक* 

*७३. स्वातंत्र्यवीर नारोजी लीन्गाजी नाईक* 

*७४. स्वातंत्र्यवीर सोमिया जत्रा नाईक* 

*७५. स्वातंत्र्यवीर नालाजी वारादिकीर* 

*७६. स्वातंत्र्यवीर नाना चीलोजी* 

*७७. स्वातंत्र्यवीर व्यंका पवार* 

*७८. स्वातंत्र्यवीर बापू पाइप्कर* 

*७९. स्वातंत्र्यवीर पांडू सिंगीकर* 

*८०. स्वातंत्र्यवीर भाऊ कान्जोरा पाटील* 

*८१. स्वातंत्र्यवीर भाऊ हरजी पाटील* 

*८२. स्वातंत्र्यवीर भिल्ल अत्त्या पाटील* 

*८३. स्वातंत्र्यवीर गरिब्दास पाटील.* 

*८४. स्वातंत्र्यवीर इत्तु पाटील* 

*८५. स्वातंत्र्यवीर खुशाल गोविंद पाटील* 

*८६. स्वातंत्र्यवीर मावजी अर्जुन पाटील* 

*८७. स्वातंत्र्यवीर पांडू धोंडी पाटील* 

*८८. स्वातंत्र्यवीर त्र्यंबक हरी पाटील.* 

*८९. स्वातंत्र्यवीर जीवासा भीरु पाटील* 

*९०. स्वातंत्र्यवीर रामजी जगताप* 

*९१. स्वातंत्र्यवीर राम परब* 

*९२. स्वातंत्र्यवीर रामराव*

*९३. स्वातंत्र्यवीर भिकाजी रावनेकर* 

*९४. स्वातंत्र्यवीर गोपाल साळवी* 

*९५. स्वातंत्र्यवीर साधू* 

*९६. स्वातंत्र्यवीर सन्तु चंदू* 

*९७. स्वातंत्र्यवीर बाबाजी सावंत* 

*९८. स्वातंत्र्यवीर गणू सावंत* 

*९९. स्वातंत्र्यवीर मनु अप्पा सावंत* 

*१००. स्वातंत्र्यवीर पुताजी बाबुराव सावंत* 

*१०१.स्वातंत्र्यवीर त्र्यंबक सावंत* 

*१०२. स्वातंत्र्यवीर विश्राम सावंत* 

*१०३. स्वातंत्र्यवीर नारायण पिराजी शिंदे* 

*१०४. स्वातंत्र्यवीर दोन्द सावंत* 

*१०५. स्वातंत्र्यवीर राम रघु शिंदे* 

*१०६. स्वातंत्र्यवीर बापू नारोजी थोरात* 

*१०७. स्वातंत्र्यवीर तुकाराम कृष्णाजी* 

*१०८. स्वातंत्र्यवीर रघु त्र्यंबक* 

*१०९. स्वातंत्र्यवीर बालाजी विलोबा* 

*११०. स्वातंत्र्यवीर बाबाजी विठा* 

*१११. स्वातंत्र्यवीर विठोबा* 

*११२. स्वातंत्र्यवीर विठोबा जुनकर*

*११३. स्वातंत्र्यवीर वित्ठू* 

*११४. स्वातंत्र्यवीर वित्तू बाबा* आणि 

*११५. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर* 

*हे सर्वजण आहेत,*

*अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी*


*बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती!* 


*लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.*


*काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.* 

*मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार. नाही का ?*


*त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली ...


*अशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन.......!*


*एक निवेदन : आपण ही पोस्ट सर्वत्र वितरित करा कारण  तुम्ही पणswantryveer आहात.

🙏🙏

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये

 कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

.

            मुंबई, दि. ६ : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च, २०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व १२ हजार ७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. १५ हजार रुपये इतके मानधन दि. ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.

महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही

 महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही


- विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर


 


            मुंबई, दि. ६ : महाराष्ट्रात वकिलांना मारहाण होण्याच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात "महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा" आणण्याच्या दृष्टीने सरकारने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम, १९८१ हा कायदा बदलून सुधारित प्रभावी कायदा आणण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न व्हावेत, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.


            विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांच्या दालनात आज बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा संस्थेचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ वकिलांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि यासंदर्भातील मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी वकिलांनी आपल्या मागण्या विधानसभा अध्यक्षांना सादर केल्या. यासंदर्भात आपण स्वत: पुढाकार घेऊन राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे सूचित करु, असे ॲङ नार्वेकर यांनी सांगितले.


            वकील हे जनता व न्यायालय यातील महत्वाचा दुवा असतात. जनसामान्यांना न्याय मिळावा यादृष्टीने वकील वर्ग सातत्याने कार्यरत असतो. त्यांच्यावरील हल्याच्या घटना या अप्रत्यक्षपणे जनतेच्या न्याय्य हक्‍कांवर होणारा हल्ला आहे. अशा घटनांना पायबंद बसून निकोप वातावरण कायम राहण्याच्या दृष्टीने नवीन कायदा उपयुक्त ठरेल, असेही यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲङ नार्वेकर यांनी सांगितले. या शिष्टमंडळात ॲड. जयंत जायभावे, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. संग्राम देसाई, ॲड. विठ्ठल कोंडे-देशमुख, ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. सतीश देशमुख, ॲड. विवेक घाडगे, ॲड. अहमद खान पठाण, ॲड. गजानन चव्हाण, ॲड. संदीप केकाणे यांचा समावेश होता.



००००



 


दैनंदिन आरोग्य समस्या उपचार

  *डँन्ड्रफ ची समस्या*


१)केसांना खायचा सोडा लावत जा केस ओले करुन.नंतर शांपू लावू नका.

२)अँपलव्हेनिगर लावत जा यानं स्काल्पवरील पीएच बँलन्स साधला जाऊन नियमीत वापरानं डेंन्ड्रफ ची समस्या कमी होईल.

३)वेळच्या वेळी लिंबू रस लावत जा .समस्या कमी होईल.

४)लसूण पेस्ट व मध एकत्रितपणे केसांना लावा स्कँल्पवरचे फंगस जाईल. पीएच बँलन्स साधला जाऊन फंगस कोंडा होणार नाही.

५)हिवाळ्यात केसात भरपूर कोंडा होतो चार चमचे मेथीच्या बियांची दाणे रात्री भिजत ठेऊन सकाळी वाटून स्काल्पवर लावा डँड्रफ,केस कोरडे होण्याची समस्या जाईल. उष्णतेचा त्रास असलेल्या मंडळी नी मेथीचा प्रयोग टाळावा.

 वरील उपायाने तुम्हाला अँन्टी डँड्रफ शाँपूचे महागडे केमिकल फासायची गरज च तुम्हाला पडणार नाही .



_*पायात गोळेयेणे..... उपाय...*


.... बरेच वेळा अचानक रात्री पायात गोळे येतात, असह्य वेदनां येतात. आणि काहि केल्या बरं वाटतं नाही. तेव्हा आपण खालील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच....


      १) एका वाटीत लिंबू रस काढून घ्यावा. हा रस पायाला चोळा. ,मग त्यांवर साधे मीठ चोळावे. आणि एका रुमालात खडे मीठ घालून तव्यावर गरम करून , याचि पुरचूंडी बांधून हळूहळू पाय शेका. या तिन गोष्टी एकत्र केल्यास पायात आलेले गोळे जातात. व आराम मिळतो...

     २) एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात भिमसेन कापूर पावडर टाका आणि मिक्सिंग करून हे तेल पायांना लावून चोळावे. पंधरा मिनिटे करा हळूहळू गोळा निघून जाईल..

     ३) थोडा मवू गूळ घ्या . यात सुंठ पावडर मिसळून घ्यावि. आणि यांच्या बोराईतक्या सात गोळ्या करून घ्या. आणि दररोज उपाशी पोटी सकाळी एक गोळि घ्या. असे सात दिवस केल्यास कधिच पायात गोळे येणार नाही.

    ४)  चार बदाम, एक चमचा कच्चे तिळ, आणि एक चमचा खडिसाखर, एकत्र करून रोज सकाळी उपाशीपोटी एक महिना खावे. आयुष्य भर पायात गोळे येणार नाही..

   ५) एक पेला भर दूधामध्ये एक चमचा भरून नाचणीचे सत्त्व टाकून उकळून घ्यावे, आणि यात पाच भिजवलेल्या काळ्या मनुका टाका. व सकाळी उपाशीपोटी खा. असे दहा दिवस करा.. शरिरात भरपूर कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही..

 ६) शेवग्याच्या शेंगांची भाजी, आठवड्यातून दोन वेळा खा. किंवा शेवग्याच्या शेंगांचे चूर्ण रोज जेवणानंतर घ्या. याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम तयार झाल्यामुळे पायात गोळे येणार नाही.

७) रोज सकाळी दोन डोंगरि आवळे अनशा पोटि खावे., आणि दिवसातून एकदा केळं खावे.

८) जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळा येतो तेव्हा आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात गोळे येतात तर, आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरं वाटेल..

९) EVION. 400 या कॅप्सुल्स घेतल्यास आलेला गोळा चटकन जातो. व काही दिवस नियमित पणे गोळ्या घेतल्यास पुढे बरेच दिवस येतं नाही..


      तेव्हा तुम्हाला जेव्हा पायात गोळे येथिल, तेव्हा वरील उपाय केल्यास आराम पडेल नक्कीच..


     आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे......



**भूक मंदावणे / भूक न लागणे


✅️खरा श्रीमंत कोण तर ज्याला व्यवस्थित भूक लागते व ज्याचे पोट नीट साफ होते तो आयुर्वेदानुसार सर्व प्रकारच्या आजारांची सुरूवात ही 'भूक कमी होणे' यामुळे होते. वरकरणी ही गोष्ट छोटी जरी वाटत असली तरी अनेक गंभीर आजारांना जन्म देत असते.


✅ बऱ्याचदा आपली भूक व्यवस्थित आहे की नाही हे कळायला मार्ग नसतो ! वेळ झाली म्हणून जेवायला बसतो. भूक लागलेली नसताना जेवण करतो. त्यातून पुढे अपचन होतं आणि रोजचं हे दुष्टचक्र असच सुरु राहतं.


✅️सामान्यात: माणसाला दोन वेळचं जेवण पुरेसे असते. सकाळ जेव्हा भूक लागेल तेव्हा पोटभर जेवण करणे व सायंकाळी सूर्य मावळायच्या आत जेवण! ही खरी आदर्श जेवणाची पद्धत म्हणता येईल. या व्यतिरिक्त मध्ये मध्ये सारखं काहीतरी खाण्याची लागेलेली 'चुकीची सवय' ही भूक कमी करायला कारणीभूत ठरत असते.


 

 इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान


सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा दौरा


 


            नवी दिल्ली, 06 : मुंबईतील इंदू मिल या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे या पुतळ्याच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला.


           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला.


            यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच, काही किरकोळ बदल सुचविले. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असा राज्य शासनाचा मानस आहे. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यास राज्य शासन कटिबद्ध असून बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट्य आहे.


          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्याकडून गाझियाबाद येथे या पुतळ्याची 25 फुटांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी श्री.सुतार यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दलचे सादरीकरण केले.


         सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित दौऱ्यामध्ये भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, विधानसभा सदस्य संजय बनसोडे, यामिनी जाधव, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. राजेंद्र गवई, जयदीप कवाडे, भदंत राहुल बोधी यांसह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, सर ज.जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी येथे आयोजित बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीविषयी समाधान व्यक्त केले.


            देश-विदेशातील डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळ्यापासून प्रेरणा घेतील, अशी भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केल्या.


००००

म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित

 म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित


म्हाडाच्या सन २०२३-२४ साठी सादर १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मान्यता


मुंबईत २१५२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित




            मुंबई, दि. ०६ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२३-२०२४ च्या १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन २०२२-२०२३ च्या सुधारित ६९३३.८२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात शून्य तूट, तर सन २०२२-२०२३ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११३६.४७ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.


        सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोंकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १२७२४ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५८००.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


        मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात २१५२ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३६६४.१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी २२८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ॲण्टॉप हिल, वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी २४ कोटी रुपये, बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी ३० कोटी रुपये, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपये, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील योजनेसाठी २१३.२३ कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी ५० कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी १८ कोटी रुपये, पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. गोरेगांव-सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा १ ब साठी ५९ कोटी रुपये, गोरेगांव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी १० कोटी रुपये, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


        कोंकण मंडळाअंतर्गत ५६१४ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात त्यासाठी ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंडळांतर्गतच्या विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपये, बाळकूम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी ३३ कोटी रुपये, माजिवाडे, ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी ३५ कोटी रुपये, मीरा रोड टर्न की प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.


        पुणे मंडळाअंतर्गत ८६२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५४०.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


        नागपूर मंडळाअंतर्गत १४१७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४१७.५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


        छत्रपती संभाजी नगर मंडळाअंतर्गत १४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २१२.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


        नाशिक मंडळाअंतर्गत ७४९ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ७७.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


        अमरावती मंडळाअंतर्गत ४३३ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १४६.२४ कोटी रुपयांची तरतूद 

करण्यात आली आहे.


००००


Featured post

Lakshvedhi