Monday, 3 April 2023

जिंदगी

 *बर चाललंय आयुष्यात, हे आपण कोणालाही सांगू शकतो. पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात, हे सांगायला जवळचाच माणूस लागतो.*   

 ________❤️_______

         *शुभ सकाळ*🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆        

          *"देवाने प्रत्येकाच आयुष्य*

            *कसं छान पणे रंगवलय.*

          *आभारी आहे मी देवाचा*

            *कारण माझं आयुष्य*

                *रंगवताना देवाने ..*

         *तुमच्यासारख्या माणसांचा*

       *रंग माझ्या आयुष्यात भरलाय"*

         ❤ 💖 😍 💖 

*माणसाच्या मुखात गोडवा...*


       *मनात प्रेम...*

   *वागण्यात नम्रता...*

         *आणि*


*हृदयात गरीबीची जाण असली की...*


*बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!*


 🌻🌹🌻

: 🕉️🕉️🕉️

*तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका.*

*कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि*

*गरज संपली की वाईट.*

                *शुभ दिन*

चिवळिचि भाजि...घोळ..*

 *चिवळिचि भाजि...घोळ..*


.... उन्हाळ्यात शरिरातील उष्णता वाढते अशा वेळी आपण आहारात बदल करून हा त्रास कमी करू शकतो.. अशीच एक उपयोगी भाजि आहे.. चिवळि👇


.. चिवळिचे औषधि गुणधर्म... या वनस्पतीच्या बिया मुत्रपिंडावर सूज आल्यास, किंवा युरिन साफ होत नसेल तर वाटून मग पाण्यात मिसळून , गाळून घ्यावे. त्रास दूर होतो.


. तसेच रक्तपित्त झाले असेल तर. जसे नाकाचा घोळणा फुटणे, कफातून रक्त येणे, दातातून रक्त येणे, असा त्रास होत असेल तर, चिवळि भाजिचा ताजा रस काढून घ्यावा. याने आराम मिळतो

.. कुठेही मार लागला किंवा ठेच लागली तर, सूज कमी होण्यासाठी चिवळिचि भाजिवाटून याचा लेप तिथे लावल्यास वेदना व सूज कमी होते.

...हि भाजी अतिशय थंड असल्याने मूळव्याधीवर उपयुक्त आहे याच्या रूग्णांनी नियमितपणे चिवळिचि भाजि खाल्ल्यास मूळव्याध बरि होते.


.चिवळिचि भाजि हि शीतल, ग्राहि,. शोथहारक, व रक्तशुद्ध करते, तळपायाची आग होणे, डोळे जळजळ करणे, हे त्रास बरे होतात.उन्हाळ्यात लहान बाळांना उष्णतेमुळे त्रास होतो, अशा वेळी यांना

 चिवळिच्या भाजित गुंडाळून ठेवले तर त्यांना बरं वाटतं. आणि अंगावर घामोळे येत नाही

.....

... एकूण च . उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास न होण्यासाठी हि भाजी नियमितपणे आहारात ठेवावि..


 सुनिता सहस्रबुद्धे.....


*⭕️

येथील बुर्ज खलिफा टॉवरवर, रामनवमीच्या दिवशी श्रीरामाचे चित्र

 🌹🌹जगातील सर्वात उंच टॉवर, दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवरवर, रामनवमीच्या दिवशी श्रीरामाचे चित्र झळकविण्यात आले, किती अभिमानाची गोष्ट आहे आम्हा हिंदूंसाठी,एका मुस्लिम राष्ट्रात हे घडते, साऱ्या जगाचं लक्ष असते 🌹🌹


Sunday, 2 April 2023

स्वछ सर्वेक्षणच्या नावाखाली नवी मुंबई मनपाचा करोडोंचा घोटाळा

 स्वछ सर्वेक्षणच्या नावाखाली नवी मुंबई मनपाचा करोडोंचा घोटाळा  

झालेल्या कामांच्या चौकशीसाठी ई डी (ED) विभागाला देणार निवेदन 


अधिक माहितीसाठी :- 9321804481 / 8689861548 श्री.योगेश महाजन 


नवी मुंबई :- ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणाऱ्या रंगरंगोटीच्या झालेल्या कामांचे टेंडर काढून त्या द्वारे लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन यांनी मनपा आयुक्त व शहर अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली. तर अश्या प्रकारे टेंडर काढण्यात येऊ नये अशी निवेदनाद्वारे मागणीही केली होती.त्या मागणीनंतरही तीन ठिकाणी झालेल्या कामांचे टेंडर काढण्यात आले.सदर बाब महाजन यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.तरीही झालेल्या कामांचे टेंडर काढण्याचे कामे सुरूच असल्याने आता पर्यंत झालेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ई डी (ED) विभागाकडे करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन यांनी दिली.

                  गत वर्षी झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करोडोंचा घोटाळा झाला असल्याची बाब निदर्शनास आली होती.त्यानंतर त्यात सुधारणा होणे गरजेचे असतांना पुन्हा या वर्षी होणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याची बाब समोर आली आहे.यावर मनपा आयुक्त राजेश नार्वेकर सह संबंधित अधिकारीही गप्प असल्याने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ई डी (ED) विभागाकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन यांनी दिली. ठाणे - बेलापूर रोड (टी बी आर) विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर येत असून जी कामे अगोदरच झाली आहेत त्याचे टेंडर मात्र आता काढण्यात येत आहे.(टी बी आर) विभागाअंतर्गत येणाऱ्या तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली अश्या पाच रेल्वे स्टेशनवर काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटीची कामे करण्यात आली आहेत.तरीही काही दिवसांपूर्वी ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२/- रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.सदरील टेंडर हे रद्द करून इतर टेंडर काढू नये असे लेखी निवेदन १६ मार्च २०२३ रोजी मनपा आयुक्त व शहर अभियंता यांना देण्यात आले.यावर झालेल्या टेंडर ची चौकशी करण्याऐवजी पुन्हा २०/०३/२०२३ रोजी तुर्भे रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी २९,१४,९७२ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले,घणसोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी २५,९७,९७६ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले तर कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.अत्यंत घाईघाईत हे टेंडर काढण्यात आले असून ते भरण्यासाठी आणि उघडण्यासाठी फक्त सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.सूचना देऊनही (TBR) विभागात मोठ्या प्रमाणात करोडोंचे टेंडर काढण्यात येत असल्याने अधिकारी व ठेकेदार हे कोणालाच जुमानत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे.सामान्य नागरिकांचा कररूपी मिळणारा पैसा जर अधिकारी व ठेकेदार लुटून खात असतील तर कश्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण हवे असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे. यामुळेच (टी बी आर) विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांना तत्काळ निलंबित करून झालेल्या कामाची चौकशी करून करोडोंचे बिनकामी टेंडर तत्काळ रद्द करावे अशी मागणी योगेश महाजन यांनी केली आहे.त्याचबरोबर ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणारा करोडोंचा भ्रष्टाचार पाहता आतापर्यंत झालेल्या सर्व ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत झालेल्या कामांची ई डी (ED) विभागाकडून कारवाई होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया यावेळी महाजन यांनी व्यक्त केली आहे.


क्या तूमने कभी

 


सैंधव मिठ-

 *सैंधव मिठ-*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv


 आज आपण सैधव मीठाची जन्मकहाणी पहाणार आहोत व याचे काय फायदे आहेत ते पाहणार आहोत.

हिमालयन मीठ (सैंधव) हे मिठाच्या खाणींमधून मिळवले जाते. हे मीठ ज्याप्रकारे पृथ्वीवर निर्माण झाले, ती अतिशय रोचक भौगोलिक घटना आहे. पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्र आटल्यानं प्रचंड मिठागरं तयार झाली. पृथ्वीवर जी प्रचंड उलथापालथ त्या काळात झाली, त्यात या मिठागरांच्या आजूबाजूचे मोठाले दगड त्यावर येऊन मिठागरं त्या पर्वताखाली दाबली गेली. त्यातूनच आजच्या मिठाच्या खाणी तयार झाल्या. या खाणींचा शोध पाकिस्तानातील एका प्रांतात अलेक्झांडरच्या सैनिकांना लागला. या सैनिकांना काही घोडे मिठाचा अंश असलेले दगड चाटत असताना दिसले. त्यावरून तिथल्या मिठाच्या खाणींचा अंदाज आला. अकबराच्या काळात त्यानं मिठाचं प्रमाणीकरण केलं. खेवरा त्याचं नाव. त्यानंतर मिठाची खरेदी-विक्रीही सुरू झाली. नंतरच्या काळात ब्रिटिशांनीदेखील खाणींमधून मीठ बाहेर काढायच्या पद्धती विकसित केल्या. 1827 साली ‘रूम आणि पिलर’ या पद्धतीनं मिठाचं उत्पादन आणि काढणी सुरू केली. अकबर आणि ब्रिटिशांच्या काळात मीठ काढण्याची जी कौशल्यं रुजली त्यानुसार आजही मीठ काढलं जातं. आता उत्तर पाकिस्तानात असलेल्या झेलम ते सिंधू नदीच्या 186 मैल परिसरात या मिठाच्या खाणी सापडतात. हिमालयाच्या या रांगांत या भागात सहा मुख्य खाणी आहेत, त्यातलं मीठ हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, वेगळं आणि शुद्ध असतं. मीठ काढण्याच्या या अनेकविध पारंपरिक ज्ञानावर आधारित पद्धतीनं मिठाची शुद्धता अबाधित राहिली. आजही त्याच प्रकारे या खाणींचं उत्खनन होऊन सैंधव मीठ मिळवलं जातं. या संपूर्ण हिमालयन भागात प्रचंड मोठय़ा प्रमाणात मिठाचे साठे आहेत. या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजं असल्यामुळे हे आरोग्याला अतिशय हितकारक मानलं जातं. अर्थात या मिठात आयोडिनचं प्रमाण कमी आहे, मात्र त्यात अनेकविध खनिजं भरपूर प्रमाणात सापडतात.जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.

सर्व प्रकारच्या मीठांमुळे शरीराचा पीएच संतुलित राहणे,गॅस व जळजळ कमी करणे,पचनाला चालना देणे हे फायदे होतात.पण हिमालय मीठामुळे अन्नाला अधिक चांगली चव येते.याचे कारण असे की फक्त याच मीठात ११८ मिनरल्सपैकी ८४ ते ९२ मिनरल्सचे घटक आढळतात.तसेच ते १०० टक्के नैसर्गिक असते.ते अनरिफाईंड असल्यामुळे त्यात प्रदुषित व सोडीयम घटक कमी असतात.हे मीठ मेडीकल थेरपी साठी देखील वापरण्यात येते.यात जवळपास सर्वच प्रकारची मायक्रोन्युट्रीयन्टस आहेत बाजारातून हीच जर विकत आणायची ठरवली तर हजारो रुपये लागतील.या मिठाला पहाडी मीठ असे ही म्हटले जाते. या मिठामुळे असलेल्या इतर तत्वांमुळे या मिठाचा रंग शुभ्र दिसत नाही.पूर्वीच्या तुलनेत आता लोकांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यायामासोबतच आहाराकडेही जरा बारकाईनं पाहिलं जात आहे. स्वयंपाकात मीठ हे लागतंच. पण मिठाच्या कमी जास्त प्रमाणाचा आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होतो. म्हणूनच आता मीठ घेतानाही लोक जास्तच जागरूक झाले आहेत. आणि म्हणूनच मिठामध्ये अनेक प्रकार असले तरी आरोग्याचा विचार आला की सैंधव मिठाला प्राधान्य दिलं जातं. या मिठाच्या अन्न पदार्थांमधील वापरामुळे शरीरातील रक्तदाब स्थिर ठेवून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन साधलं जातं. यात पोटॅशिअमची मात्रा जास्त असते, तर सोडिअमची मात्रा त्यामानानं कमी असते. म्हणूनच सैंधव मीठ दोषशामक मीठ असल्याचं मानलं जातं.पण दिवसाला सहा ग्रॅमपेक्षा जास्त मात्रेत हे मीठ खाऊ नये. कोणत्याही मिठाचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास ते शरीराला अपायकारक ठरतं. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हे मीठ वापरताना अतिशय काळजीपूर्वक वापरावं. सैंधव मीठ हे मात्रेनुसारच वापरतो आहोत ना याकडे लक्ष ठेवावं.


फायदे

१. सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.


२. तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते शांतपणे झोप येते.


३. पित्त झाल्यावर आलं लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडं थोडं खाल्यास पित्त मुळे आणि इतर कारणांमुळे होणारी उलटी थांबते


४. अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर होतो.


५. सायनसचा त्रास असलेल्यांनी सैंधव मीठाचे सेवन करणे गरजेचे असते. मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.


६. अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे.


७. कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.


८. आयरनचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यास उपयुक्त असते.

९सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायद्याचं आहे. मृत त्वचा या मिठानं निघून जाते. त्वचा पेशी मजबूत होऊन त्वचा तजेलदारदेखील दिसते. 

१० काही आजारपणामुळे, विकारांमुळे नखांच्या खाली जे पिवळसर डाग पडलेले असतात, ते काढण्यासाठीदेखील सैंधव मिठाचा उपयोग होतो. 

११ केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर शाम्पू सोबत करता येतो. केस गळती, केसांचं तुटणं कमी होतं.

 १२सैंधव मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं टॉन्सिल्सवर आराम पडतो. 

१३ श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, डोकेदुखी, खोकला वगैरे लहान-मोठय़ा शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे.

 १४ हे मीठ रेचक म्हणून पोटाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या लहान-मोठय़ा कुरबुरींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. 

 १५ सैंधव मीठ संधिवातावर, काही कीटक चावल्यावर जखम बरी करण्यासाठीदेखील वापरलं जातं.

१६ स्ट्रेस अर्थात ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. कारण अगदी क्षुल्लक असतं मात्र त्यातून अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोकं वर काढतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सेंधा मिठाचं सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते.

१७साध्या पाण्यात घालून या मिठाचं सेवन करता येतं. ते रोज खाल्लं तर अस्वस्थता आणि ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकते. गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवानं वाटतं.

१८ वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. गाड्या, बसेसच्या धुराने होणारे वातावरणातले प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. निसर्गाचा तोल सांभाळण्याचं कामही मीठ करतं.

 १९ या मिठाच्या सेवनानं चरबी कमी होते. या मिठातल्या खनिज तत्त्व इन्शुलिनला रिअँक्टिव्ह असल्यानं साखर खाण्याची किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होते. हे मीठ वजन वाढीवर नियंत्रण ठेवायलाही मदत होते.

२० रक्तदाब स्थिर ठेवणं, चयापचय क्रिया नियंत्रित करणं, वायुसरणावर नियंत्रण आणि भूक वाढ यासाठीही या मिठाचा उत्तम उपयोग होऊ शकतो.


*किती मीठ खावे.*


वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनाजेशनच्या सल्लानूसार आपण योग्य प्रमाणातच मीठ सेवन केले पाहीजे.त्यांनी सांगितलेले योग्य प्रमाण म्हणजे दिवसभरात २ ग्रॅम मीठ सेवन करणे कारण मानवी शरीराला दिवसभर फक्त ५०० मि. ग्रॅम सोडियमची गरज असते जी यातून भागविली जाऊ शकते.एक चमचा हिमालय मीठामध्ये ४०० मिग्रॅ सोडियमचे घटक असतात

एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या संशोधनानूसार भारतीय ब्लूएचओ ने दिलेल्या प्रमाणापेक्षा ११९ टक्के अधिक मीठ सेवन करतात.असे आढळले आहे की भारतीय लोक दिवसभरात १०.९८ ग्रॅम मीठाचे सेवन करतात जे दिलेल्या योग्य प्रमाणाच्या पाचपट अधिक अाहे.एक चमचा मीठ म्हणजे ६ ग्रॅम मीठाचे प्रमाण ज्यामध्ये २३०० मिग्रॅ सोडियम घटक असतात.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात अर्धा चमचा मीठाचे सेवन करणे योग्य असू शकते हे मात्र लक्षात ठेवा.

पोस्ट आवडल्यास नांवासह शेअर करा. पोस्ट लिहण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.

वैद्य. गजानन


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


कार्गो आणि प्रवाशी जलवाहतूकीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची उल्लेखनीय कामगिरी

 कार्गो आणि प्रवाशी जलवाहतूकीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची उल्लेखनीय कामगिरी


: मंत्री दादाजी भुसे


 


            मुंबई, दि.01: कार्गो हाताळणीमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 37 टक्के इतकी लक्षणीय वाढ करीत उल्लेखनीय आणि विक्रमी कामगिरी केली आहे. सन 2022-23 मध्ये 71 दशलक्ष टनांहून अधिक मालाची हाताळणी केली असून मागील वर्षी 52 दशलक्ष टन मालाची हाताळणी झाली होती. याशिवाय प्रवासी जलवाहतूकीत बोर्डाने प्रभावी कामगिरी केली आहे. सागरी उद्योगातील उत्कृष्टतेसाठी बोर्डाची वचनबद्धताच यातून दिसून येते,अशा शब्दात बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे.


            राज्याच्या बिगर-प्रमुख बंदरांचा विकास आणि नियमन करण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आपली कार्यक्षमता सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. त्याचे प्रत्यंतर यावर्षी दिसून आले आहे. नवीन व्यवसायांना आकर्षित करण्यात आणि त्याचा विद्यमान ग्राहकआधार वाढविण्यात बोर्डाला यश आले आहे. उद्योगातील प्रमुख भागधारक आणि संबंधित घटकांशी धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमुळेही कार्गो हाताळणीत लक्षणीय वाढ होण्यास हातभार लागल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी म्हटले आहे.


            कार्गो हाताळणीतील उल्लेखनीय कामगिरी बरोबरच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने प्रवासी जलवाहतूक क्षेत्रातही लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. बोर्डाने आपल्या सेवा वापरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली आहे, सन 2020-21 मधील 0.82 कोटी प्रवाशांवरून सन 2021-22 मध्ये 1 कोटी 36 लाख प्रवासी आणि सन 2022-23 मध्ये 1 कोटी 87 लाखापर्यंत प्रवाशांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने वाढीव फेऱ्यासह नवीन मार्ग खुले केले आहेत आणि एकूण प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी सर्व सुविधा आणि पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केल्या आहेत. कोविड-19 महामारीमुळे सागरी उद्योगासाठी आव्हानात्मक कालावधीनंतर माल हाताळणी आणि प्रवासी वाहतुकीमध्ये महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची प्रभावी कामगिरी दिसून येत असून, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.


            महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे यश हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहे, कारण सागरी उद्योग व्यापार आणि वाणिज्य सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कार्गो हाताळणीतील वाढीमुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, ज्यामुळे राज्याच्या वाढीला हातभार लागेल. उद्योगाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सुविधा आणि सेवा वाढवण्याच्या योजनांसह, येत्या काही वर्षांत आणखी विस्तार आणि वाढीचा विचार सुरू आहे. उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेसह, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सागरी क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी योग्य स्थितीत असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले.


000


 



Featured post

Lakshvedhi