Saturday, 1 April 2023

गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे

 कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान लिहिले आहे


*समाजाला वेळ द्यायचा कधी*


*वय 20* वर्षे - आता शिक्षण चालू आहे .

*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे.

*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.

*35 वर्षे* -- मुलं लहान आहेत

*40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.

*45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.

*50 वर्षे* -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.

*55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. 

*60 वर्षे* -- मुलामुलींचे लग्न करायची.

*65-75 वर्षे* -- इच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.

*80 वर्ष*-- मेला.


17 दिवसाच्या आत सर्व प्रॉपर्टीवरून तुमचे नाव कमी


अरेच्चा 

*समाजाला वेळ द्यायचं राहूनच गेले … !*

  


आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात


बाकी 

सर्व 

इथेच 

राहणार 

आहे .

झाडू,

जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,तोपर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो *स्वतः"कचरा" होवून जातो.*

*त्यामुळे समाजात एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*

मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .

मी विचारले *"काय भाव आहे ?*

त्यांनी सांगितले : *"60 रूपये किलो ."*

त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. मी विचारले: *" याचा काय भाव आहे "*

तो बोलला : *"20 रूपये किलो"*

मी विचारले :"इतका कमी भाव .? 

तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! 

पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे 

तेव्हा मला कळाले

जो व्यक्ती *संगठन...समाज* आणि *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...

कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटन* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा...

समाजाला वेळ द्या.

काकडीचा रस - बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर !*

 *काकडीचा रस - बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर !* 


काकडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. काकडीचा वापर कोशिंबीर आणि सलादमध्ये केला जातो. त्याचप्रकारे काकडीचा रस पिऊन तुम्ही आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळवू शकता.


काकडीमध्ये भरपूर न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीचा रस प्यायल्याने शरीरात दिवभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. त्यासोबतच काकडी शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्याचे महत्वाचे काम करते.


आता हवामानातील बदल दिसून येत असल्याने सकाळी आणि रात्री थंडीचा अनुभव तर दुपारच्या वेळी उष्णतेचा त्रास होत असल्याने, अशा वेळेस स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा रस पिणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.


जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा (Blood Pressure) त्रास खूप जास्त होत असले तर काकडीचा रस बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच काकडीचा रस पचनासाठीदेखील फायदेशीर आहे.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



सेपक टेकरा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार

 सेपक टेकरा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार


                                                            - उपमुख्यमंत्री


 


33 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा नागपूरात थाटात शुभारंभ


 


 


        नागपूर, दि.1 :- देशात सेपक-टेकरा या खेळाची पाळेमुळे प्रथम नागपूरात रुजली आहेत. नागपूरमध्ये रुजलेला खेळ देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देत असेल तर या खेळाचे पालकत्व घ्यायला निश्चित आनंद होईल. या खेळाचे प्रशिक्षण, त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            33 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ विभागीय क्रीडासंकुल, मानकापूर येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. पोलीस आणि सीमासुरक्षा दलाचे दोन संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहे. 1 ते 5 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. पायाने चेंडू टोलवत खेळला जाणारा हा खेळ शारीरिक तंदुरुस्तीची परीक्षा घेणारा आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने हा खेळ खेळला जातो. भारतामध्ये नागपूर शहरात हा खेळ रुजला आहे. नागपूरने या खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले आहे.


            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर या खेळाची भारतातील जननी आहे. त्यामुळे निश्चितच या खेळाच्या लोकप्रियतेसाठी आणि प्रशिक्षणासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय स्तरावरील आयोजक व स्थानिक स्तरावरील आयोजक यांनी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी सुचविले. यावेळी स्पर्धक खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. “ या स्पर्धेत प्रत्येकाने आपले राज्य जिंकावे यासाठी प्रयत्न करा आणि जेव्हा देशासाठी खेळाल त्यावेळी तिरंग्याचा सन्मान राखा,” असे आवाहन त्यांनी केले.


            यावेळी त्यांनी सेपक-टेकरा खेळाला नागपूरमध्ये पालकत्व देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सेपक टेकरा फेडरेशनचे राष्ट्र्रीय उपाध्यक्ष डॉ. योगेंद्र सिंह दाहिया, सचिव श्री विरेगोडा, महाराष्ट्राचे प्रमुख विपीन कामदार, सचिव डॉ. योगेंद्र पांडे, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आयोजक डॉ. अमृता पांडे यांच्यासह या खेळातील मान्यवर खेळाडू उपस्थित होते.


 

अजमोदादि चूर्ण.....*vatvikaravar प्रभावी

 *अजमोदादि चूर्ण.....*


.... आयुर्वेदात. वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या प्रकारची चूर्णे तयार केलि जातात.. त्यापैकी एक महत्वाचे चूर्ण..अजमोदादि चूर्ण आहे.. अनेक प्रकारच्या. वनस्पतीची मुळे, पाने, फूले वापरून हे केलं जातं..

......           अजमोदा विडंगानि सैंधवं देवदारूच..चित्रक पिप्पलिमूलं शतपुष्पा च पिप्पली...

                  मरिचं चेति कर्षांशं प्रत्येकं कारयेद्बुध...कर्षास्तु पंच पथ्याया दंश स्युव्रुध्ददारुकात्...

               ( शारंगधर संहिता)...

वातावरणातील बदल झाला कि,. कफ वाढतो, अशा वेळी अजमोदादि चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो. गॅस झाल्यामुळे पोटाला फुगीर पणा येतो, जडत्व येतं, तेव्हा हे चूर्ण घेतल्यास आराम मिळतो,.. संधिवात आमवात गुडघेदुखी कंबरदुखी, हे सर्व वाताचे विकार आहे. आणि. चाळिशीच्या आसपास हे त्रास उद्भवतात,. रूग्णांना उठणे बसणे कठीण होऊन बसते, अजमोदादि चूर्ण  या सर्व त्रासांवर अगदी.. रामबाण उपाय.. आहे. सायटिका, गाउट. हे वातविकार हे चूर्ण पाण्यासोबत

... घेतल्यास आराम मिळतो...


.. यातील घटक...अजमोद.फळे, वावडिंग, सैंधव मीठ, देवदारू, चित्रक, पींपळी, , मूळ..शतपुष्पा, मरिच  व्रुद्धदारूक,नागर सुंठि.शतपुष्पा, हिरडे,..

....... मुख्यत्वे हे चूर्ण.. वातविकारावर.. उत्तम कार्य करते...


 सुनिता सहस्रबुद्धे....


*

World Shitoryu Karate-Do Federation

 World Shitoryu Karate-Do Federation

Kata, Technical Seminar & Dan Grading at NGV Builders Club on 1st April 2023.

Conducted by

 *Kaicho Genzo Iwata* 

President

World Shitoryu Karate-Do Federation & 

Shitokai of Japan Karate-Do Federation.

Assisted by:

 *Kyoshi Ramalingam* 

President Dubai Karate Federation,

 *Shihan Sasidharan* 

Technical Chairman

 *Shihan Rahul S.Tawde* 

General Secretary

All India Shitoryu Karate-Do Union & 

Japan Shitoryu K


arate-Do, India

नव्या ई-ग्रंथालयाचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा

नव्या ई-ग्रंथालयाचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा

                                                                 - उपमुख्यमंत्री


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे ई-ग्रंथालयाचे लोकार्पण



            नागपूर, दि.1 :- नागपूर महानगरपालिकेमार्फत महाल येथील चिटणवीसपुरा ग्रंथालयाचे थाटात लोकार्पण होत असतांना ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी येथून मिळावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.


             नागपूर महानगरपालिकेमार्फत चिटणवीसपुरा येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाचे केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री बोलत होते. छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाची सुरुवात 1998 मध्ये तत्कालीन महापौर सुधाकर निंबाळकर यांनी केली होती. आमदार प्रवीण दटके यांनी पुढाकार घेत आता या ग्रंथालयाचे नूतनीकरण केले असून, पाच मजली इमारतीत मुले व मुलींसाठी वेगवेगळया अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व आधुनिक सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेमार्फत अद्ययावत करण्यात आलेले हे तिसरे ग्रंथालय आहे. अभ्यासासोबतच याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. महाल परिसरातील गुणवान विद्यार्थ्यांना इंटरनेटसह सर्व सुविधांचा निश्चितच लाभ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


            केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संबोधनात नागपूरच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घटकांखाली एक हजार कोटी उपलब्ध करुन दिले आहेत, केंद्र शासनासोबतच राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी नागपूर शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.


जलकुंभाच्या कोनशिलेचे अनावरण


            अमृत योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील गोदरेज आनंदम् जलकुंभाचा लोकार्पण सोहळा आज करण्यात आला. केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने आदी यावेळी उपस्थित होते. या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे ‘पाणीपुरवठा प्रणालीचे उन्नतीकरण’ योजनेअंतर्गत हे लोकार्पण करण्यात आले. यामुळे गोदरेज आनंदम जलकुंभ कमांड एरिया, नवी शुक्रवारी, दसरा रोड, राहातेकर वाडी, रामाजीची वाडी, राममंदिर परिसरासह मोठ्या लोकवस्तीला याचा लाभ होणार आहे. पाणीपुरवठा उन्नत प्रणाली अंतर्गत महानगरपालिकेमार्फत 32 जलकुंभ प्रस्तावित आहेत.


           

सर्वांगीण ग्रामसमृध्दीसाठी ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन’ राबविणार

 सर्वांगीण ग्रामसमृध्दीसाठी ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन’ राबविणार


- मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            मुंबई, दि. 31 : मनेरगा आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या योजनेचे अभिसरण करुन ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन’ राबविण्यात येऊन सर्वांगिण ग्रामसमृद्धी साध्य करण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            राज्यात मत्स्यसंपदा वाढवून लोकांच्या आहारात प्रथिनांची मात्रा वाढवणे व मत्स्य व्यवसायातून लोकांचे उत्पन्न वाढवून त्यांचे राहणीमान सुधारणे, सागरी तसेच गोड्या पाण्यात मत्स्य व्यवसाय विकसित करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन योजना, गोडेपाणी व निमखारेपाणी तळी बांधकाम, नुतनीकरण व निविष्ठा योजना, RAS / बायोफ्लॉक प्रकल्प आणि गोडेपाणी व सागरी मत्स्यबीज उत्पादन केंद्र योजना राबविण्यात येणार आहे.


            भविष्यात मनरेगा व विविध विभागांच्या योजनांच्या अभिसरणातून सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजना अंमलात आणणार आहेत. 


             मत्स्यपालनासाठी तलाव बांधणे, तलावांची दुरुस्ती व देखभाल, तलावांचे नूतनीकरण, मासे सुकविण्यासाठी ओट्यांचे बांधकाम करणे, मिनी पाझर तलाव बांधकाम व पाझर तलाव दुरुस्ती, तलावातील गाळ काढणे,तलावांचे प्लास्टिक लायनिंग करणे, तलावाच्या पाण्याची व मातीची परिक्षण/ चाचणी करणे, मनरेगा अंतर्गत अनेक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात येते. अशा शेततळ्यामध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून त्यामध्ये मत्स्यव्यवसाय करता येणे शक्य आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल व शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उन्नत होण्यास हातभार लागेल.


शेततळे बांधकाम करतेवेळी मत्स्यतळ्यांची सूचनानुसार कार्यवाही अवलंबण्यात येईल. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडून २० गावे निवडून मनरेगाच्या संबधित नियमानुसार चांगले पर्जन्यमान असलेल्या भागातील भूधारक कुटुंबाची निवड करण्यात येणार आहे. या गावांना नंदादीप गावे म्हणून संबोधण्यात येणार आहे.


            शेततळ्यांमध्ये कटला, रोहू,मृगळ, तिलापिया, पंगशियस इ. संवर्धक्षम प्रजातीच्या माशांचे मत्स्यजिरे / मत्स्यबीज संगोपन करून मत्स्यबोटुकली पर्यंत वाढवून विक्री करून व्यवसाय करता येईल. यामुळे राज्यास भासणारा मत्स्यबोटुकलीचा तुटवडा कमी होण्यास निश्चित हातभार लागेल. तसेच उपरोक्त नमूद माशांचे संवर्धन करून मत्स्यउत्पादन सुध्दा घेता येईल. मात्र तिलापिया माशांचे संवर्धन करण्यापुर्वी मत्स्यव्यवसाय विभागाची परवानगी घेणे गरजेचे राहिल.


            शेततळ्यांचे बांधाचे मजबुतीकरण, तळयामध्ये गाळ साचला असल्यास गाळ काढणे इ. कामांचा समावेश मनरेगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात येईल. तसेच मनरेगा कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या शेतक-यांना मत्स्यव्यवसायाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांची राहील. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Featured post

Lakshvedhi