Thursday, 8 December 2022

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मृद व जलसंधारण विभागाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी पाठबळ मुंबई, दि. ७ :- ' मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाला पुन्हा गतीमान करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नाले- ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, या बैठकीत ते बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मृद व जलसंधारण विभाग शेतकऱ्यांशी निगडित असा आहे. पाण्याची उपलब्धता, नियोजन आणि सिंचन सुविधा हा मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेण्यात यावीत. यातून स्थानिक रित्या खात्रीशीर अशी आणि मोठ्या क्षेत्रासाठी सिंचन क्षमता निर्माण होते. जलयुक्त शिवार अभियानातूनही मोठा फायदा झाल्याचे आढळून आले आहे. या अभियानाला गती देण्याचे नियोजन करता येईल. विभागाने उपलब्ध आर्थिक तरतूद वेळेत आणि दर्जेदार कामांसाठी खर्च होईल यासाठी नियोजन करावे, त्यासाठी आपल्या क्षेत्रीय यंत्रणा, अभियंते आदींशी समन्वय साधण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी विभागाकडून सादर करण्यात प्रस्तावांना जलदगतीने प्रशासकीय मान्यता प्रदान व्हाव्यात, विभागाच्या बळकटीकरणासाठी रिक्त पदांची भरती प्रक्रिया गतीमान करणे आदी बाबींवरही चर्चा झाली. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ३ हजार ८३४ संरचनाच्या योजनांमुळे अप्रत्यक्षरीत्या सुमारे १७ लाख २४ हजार ९३३ हेक्टर सिंचन क्षमता स्थापित झाल्याची माहितीही बैठकीत सादरीकरणाद्वारे देण्यात आली. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांच्याविषयी माहिती देण्यात आली. 0000

 पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मृद व जलसंधारण विभागाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी पाठबळ

            मुंबई, दि. ७ :- ' मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.


जलयुक्त शिवार अभियानाला पुन्हा गतीमान करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नाले- ओढ्यातील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली.


मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, या बैठकीत ते बोलत होते.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मृद व जलसंधारण विभाग शेतकऱ्यांशी निगडित असा आहे. पाण्याची उपलब्धता, नियोजन आणि सिंचन सुविधा हा मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेण्यात यावीत. यातून स्थानिक रित्या खात्रीशीर अशी आणि मोठ्या क्षेत्रासाठी सिंचन क्षमता निर्माण होते. जलयुक्त शिवार अभियानातूनही मोठा फायदा झाल्याचे आढळून आले आहे. या अभियानाला गती देण्याचे नियोजन करता येईल. विभागाने उपलब्ध आर्थिक तरतूद वेळेत आणि दर्जेदार कामांसाठी खर्च होईल यासाठी नियोजन करावे, त्यासाठी आपल्या क्षेत्रीय यंत्रणा, अभियंते आदींशी समन्वय साधण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            यावेळी विभागाकडून सादर करण्यात प्रस्तावांना जलदगतीने प्रशासकीय मान्यता प्रदान व्हाव्यात, विभागाच्या बळकटीकरणासाठी रिक्त पदांची भरती प्रक्रिया गतीमान करणे आदी बाबींवरही चर्चा झाली.


जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ३ हजार ८३४ संरचनाच्या योजनांमुळे अप्रत्यक्षरीत्या सुमारे १७ लाख २४ हजार ९३३ हेक्टर सिंचन क्षमता स्थापित झाल्याची माहितीही बैठकीत सादरीकरणाद्वारे देण्यात आली. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यांच्याविषयी माहिती देण्यात आली.


0000



परवडणारी घरे बांधण्यासाठी ‘महाप्रित

 परवडणारी घरे बांधण्यासाठी ‘महाप्रित’ आणि

यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सामंजस्य करार


            मुंबई, दि. 7 : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व यवतमाळ नगरपरिषदेमध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नुकताच सामंजस्य करार झाला. याप्रसंगी महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी (भा.प्र.से.), संचालक (संचल

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत

 नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी

स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत


-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 7 : स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी काळाच्या गरजेनुसार अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशासह विषयांची मांडणी करून, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमक्रम सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार करणे महत्वाचे असून, संबंधित अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदीत सुधारणा करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


            स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदी बदलाबाबत, अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संघटनेच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री श्री.पाटील बोलत होते. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना काळानंतर वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्येनुसार वैद्यकीय यंत्रणा असणे गरजेचे असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या नवीन शिक्षणक्रमासह नवीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव संघटनेने सादर करावा. या प्रस्तावाबाबत उच्चस्तरीय बैठकीत शासनस्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल. याचबरोबर कृषी व अभियांत्रिकी या क्षेत्रातही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदीत योग्य तो बदल करण्याचा विचार करण्यात येईल असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


            अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापिठांच्या कायद्यातील तरतुदीत योग्य तो बदल करण्याचा विचार करण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.


००००

सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर.

 सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर.

            मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

            यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार, होळी (दुसरा दिवस) ७ मार्च मंगळवार ,गुढीपाडवा २२ मार्च बुधवार, रामनवमी ३० मार्च गुरुवार, महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे ७ एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार, महाराष्ट्र दिन १ मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा ५ मे शुक्रवार, बकरी ईद (ईद उल झुआ) २८ जून बुधवार, मोहरम २९ जुलै शनिवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार, दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार, ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज्य शासनाने आता भाऊबीज, बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.

            बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल २०२३ , शनिवार सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे. ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत.

            या सार्वजनिक सुट्ट्यांबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मयपुरस्कार जाहीर

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मयपुरस्कार जाहीर

       मुंबईदि. ७ : सन २०२१ या वर्षातील स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परिक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक / साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

            महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या अंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे, अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०२१ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.

             स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कमस्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्काराच्या यादीमध्ये वाङ्मय प्रकार आणि पुरस्काराची माहिती देण्यात आली आहे. यात वाङ्मयाचे प्रकार, पुरस्काराचे नावलेखकाचेपुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आली असूनपात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक/ साहित्यिकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

वाङ्मयाचे प्रकारपुरस्काराचे नावलेखकाचे नाव (पुस्तकाचे नाव)पुरस्काराची रक्कम

 

१. प्रौढ वाङ्मय- काव्य प्रकारासाठी कवी केशवसुत पुरस्कार : हबीब भंडारे (जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता) - रुपये १ लाख

 २. प्रथम प्रकाशन- काव्य प्रकारासाठी बहिणाबाई चौधरी पुरस्कार : रमजान मुल्ला (अस्वस्थ                काळरात्रीचे दृष्टान्त) - रुपये ५० हजार

३. प्रौढ वाङ्मय- नाटक/एकांकिका प्रकारासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार : नारायण जाधव येळगावकर (यशोधरा) - रुपये १ लाख

४. प्रौढ प्रकाशन- नाटक/एकांकिका प्रकारासाठी विजय तेंडुलकर पुरस्कार :  शिफारस नाही

५. प्रौढ वाङ्मय - कादंबरी प्रकारासाठी हरी नारायण आपटे पुरस्कार : प्रशान्त बागड (नवल) - रुपये १ लाख.

६. प्रथम प्रकाशन- कादंबरी  प्रकारासाठी श्री.ना.पेंडसे पुरस्कार : स्वेता सीमा विनोद (आपल्याला काय त्याचं) - रुपये ५० हजार           

७. प्रौढ वाङ्मय- लघुकथा प्रकारासाठी दिवाकर कृष्ण पुरस्कार : अनिल साबळे (पिवळा पिवळा पाचोळा)-  रुपये १ लाख

८. प्रथम प्रकाशन- लघुकथा प्रकारासाठी ग.ल.ठोकळ पुरस्कार : विश्वास जयदेव ठाकूर (नात्यांचे सर्व्हिसिंग) - रुपये ५० हजार

९. प्रौढ वाङ्मय-ललितगद्य (ललित विज्ञानासह) प्रकारासाठी अनंत काणेकर पुरस्कार : डॉ.नीलिमा गुंडी  (आठवा सूर) - रुपये १ लाख

१०. प्रथम प्रकाशन- ललितगद्य प्रकारासाठी ताराबाई शिंदे पुरस्कार: वीणा सामंत (साठा उत्तरासाठी कहाणी) - रुपये ५० हजार

११.प्रौढ वाङ्मय - विनोद प्रकारासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : राजा गायकवाड (गढीवरून) - रुपये १ लाख

.प्रौढ वाङ्मय- चरित्र प्रकारासाठी न.चि.केळकर पुरस्कार : वंदना बोकील-कुलकर्णी (रोहिणी निरंजनी) - रुपये १ लाख

१३.प्रौढ वाङ्मय- आत्मचरित्र प्रकारासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : शरद बाविस्कर (भुरा) - रुपये १ लाख.

१४. प्रौढ वाङ्मय- समीक्षा/ वाङ्मयीन/ संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखनासाठी श्री.के.क्षीरसागर पुरस्कार : दीपा देशमुख (जग बदलणारे ग्रंथ) - रुपये १ लाख

१५. प्रथम प्रकाशन- समीक्षा सौंदर्यशास्त्र प्रकारासाठी रा.भा.पाटणकर पुरस्कार : प्रा.डॉ.प्रकाश शेवाळे (अनुष्टुभ नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान) -- रुपये ५० हजार

१६. प्रौढ वाङ्मय-राज्यशास्त्र /समाजशास्त्र प्रकारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : सुरेश भटेवरा  (शोध..नेहरू-गांधी पर्वाचा!) - रुपये १ लाख.

१७. प्रौढ वाङ्मय- इतिहास प्रकारासाठी शाहू महाराज पुरस्कार : शशिकांत गिरिधर पित्रे (जयतु शिवाजीजयतु शिवाजी) - रुपये १ लाख.

१८. प्रौढ वाङ्मय- भाषाशास्त्र /व्याकरण प्रकारासाठी नरहर कुरुंदकर पुरस्कार : सदानंद कदम (मराठी भाषेच्या जडणघडणीची कहाणी वाक्प्रचारांची) - रुपये १ लाख.

१९. प्रौढ वाङ्मय- विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) प्रकारासाठी महात्मा जोतीराव फुले पुरस्कार : अरुण गद्रे (उत्क्रांती:एक वैज्ञानिक अंधश्रद्धा? ) रुपये १ लाख.

२०. प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन प्रकारासाठी  वसंतराव नाईक पुरस्कार : सचिन आत्माराम होळकर (शेती शोध आणि बोध)रुपये १ लाख.

२१. प्रौढ वाङ्मय- उपेक्षितांचे साहित्य  प्रकारासाठी  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार : सुखदेव थोरात (वंचितांचे वर्तमान)रुपये १ लाख.

२२. प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्र विषयक लेखनासाठी सी.डी.देशमुख पुरस्कार : शिफारस नाही,

२३. प्रौढ वाङ्मय - तत्वज्ञान व मानसशास्त्र प्रकारासाठी ना.गो.नांदापुरकर पुरस्कार : डॉ.आर.के.अडसूळ (सुखाचे मानसशास्त्र) - रुपये १ लाख.

२४. प्रौढ वाङ्मय-शिक्षणशास्त्र प्रकारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार : डॉ.साहेबराव भुकण (विनोबा आणि शिक्षण)-  रुपये १ लाख.

२५. प्रौढ वाङ्मय - पर्यावरण प्रकारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार :विद्यानंद रानडे (पाण्या तुझा रंग कसा ?) - रुपये १ लाख.

२६. प्रौढ वाङ्मय -संपादित/ आधारित प्रकारासाठी रा.ना.चव्हाण पुरस्कार : संपादक किशोर मेढे (दलित -भारत मधील अग्रलेख) - रुपये १ लाख.

२७. प्रौढ वाङ्मय -अनुवादित प्रकारासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार : अनुवादक अनघा लेले (फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन) - रुपये १ लाख.

२८ प्रौढ वाङ्मय - संर्कीण प्रकारासाठी भाई माधवराव बागल पुरस्कार : आनंद करंदीकर (वैचारिक घुसळण) - रुपये १ लाख.

२९. बाल वाङ्मय - कविता प्रकारासाठी बाल कवी पुरस्कार : विवेक उगलमुगले (ओन्ली फॉर चिल्ड्रन) - रुपये ५० हजार

३०. बाल वाङ्मय - नाटक व एकांकिका प्रकारासाठी भा.रा.भागवत पुरस्कार : डॉ.सोमनाथ मुटकुळे (खेळ मांडियेला). - रुपये ५० हजार

३१. बाल वाङ्मय - कादंबरी प्रकारासाठी साने गुरुजी पुरस्कार सौ.वृषाली पाटील (पक्षी गेले कुठे? ) - रुपये ५० हजार

३२. बाल वाङ्मय - कथा प्रकारासाठी राजा मंगळवेढेकर पुरस्कार : सुहासिनी देशपांडे (किमयागार) - रुपये ५० हजार

३३. बाल वाङ्मय -सर्वसामान्य ज्ञान प्रकारासाठी यदुनाथ थत्ते पुरस्कार : प्रा.सुधाकर चव्हाण, (चला शिकूया वारली चित्रकला) - रुपये ५० हजार

३४. बाल वाङ्मय- संकीर्ण प्रकारासाठी  ना.धो ताम्हणकर पुरस्कार: प्रा.विद्या सुर्वे बोरसे (कोरा कागद निळी शाई) - रुपये ५० हजार

३५. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारासाठी  सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार : परेश वासुदेव प्रभू (गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य) - रुपये १ लाख.

०००

 

 

सुप्रभात




 

हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबिर कार्यालयात

 हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबिर कार्यालयात


            मुंबई, दि. ७ : विधीमंडळाचे सन २०२२ चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या अधिवेशन कालावधीकरीता १५ डिसेंबर पासून मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर येथील शिबिर कार्यालयत सुरू करण्यात येत आहे.


      सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई यांचे मुख्य सचिवांच्या कार्यालयात स्विकारण्यात येणारे धारिका, टपाल, निवेदन १४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून स्विकारण्याचे बंद करण्यात येईल. मुख्य सचिव कार्यालयाला सादर करावयाची कागदपत्रे, धारीका, टपाल इत्यादी १५ डिसेंबर पासून ते अधिवेशन संस्थगित होईपर्यंतच्या कालावधीमध्ये मुख्य सचिवांचे शिबीर कार्यालय, हैदराबाद हाऊस, नागपूर येथील कार्यालयात स्विकारण्यात येतील.



Featured post

Lakshvedhi