Thursday, 1 December 2022

जगणं 🌸*आमचा नका विचारू

 एक सुरेख कविता...


              *🌸जगणं 🌸*

           

        येईल *साठी,* येईल *सत्तरी*

        करायची नाही कुणीच *चिंता,*

        प्रत्येक दिवस *मजेत* जगायचा

        वाढवायचा नाही अपेक्षांचा *गुंता.* 


       वय झालं *म्हातारपण* आलं,

       उगाच *कोकलत* बसायचं नाही.

       विनाकारण *बाम* लावून,

       चादरीत *तोंड* खुपसायचं नाही.


       तुम्हीच सांगा *छंद* जोपासायला,

       *वयाचा संबंध* असतो कां ?

        रिकामटेकडं *घरात* बसून

        माणूस *आनंदी* दिसतो कां ?


        पोटा-पाण्यासाठी *पोरं-सुना*

        *घर* सोडून जाणारच, 

         प्रत्येकाच्या *आयुष्या* मध्ये

         असे *रितेपण* येणारच. 


         *करमत* नाही *करमत* नाही

         सारखे-सारखे *म्हणायचे* नाही,

         आवडत्या कामात *दिवस* घालवायचा

         उगाचच *कुढत* बसायचं नाही.


         घरातल्या *घरात* वा *बागेत*

         *हिंडाय-फिरायला* जायचं,

         वय जरी *वाढलं* असलं तरी

         मनपसंत *गाणं* मनमोकळं गायचं.


          *गुडघे* गेले, *कंबर* गेली

          नेहमी नेहमी *कण्हायचं* नाही,

          आता आपलं *काय राहिलं?*

          हे फालतू वाक्य कधीच *म्हणायचं* नाही.


         पिढी दर पिढी *चालीरीतीत*

         थोडे फार *बदल* होणारच, 

         पोरं-पोरी त्यांच्या *संसारात* 

         कळत नकळत *गुंतणारच.* 


         तू-तू, मै-मै, जास्त *अपेक्षा*

         कुणाकडूनही *करायची* नाही,

         मस्तपैकी *जगायचं* सोडून

         रोज थोडं थोडं *मरायचं* नाही.


          स्वत:च स्वत:ला *समजवायचं* असतं

          पुढे पुढे *चालत* राहायचं असतं,

          वास्तू *तथास्तू* म्हणत असते

          हे उमजून निरामय *जगायचं* असतं.


  पन्नाशी-साठी आणि सत्तरी तील सर्व मित्र मैत्रिणींना समर्पित.

*संकलन:-*

www.sakalmarathasoyrik.com

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर

 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत

नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

                                                     - राज्य निवडणूक आयुक्त


          मुंबईदि. 1 (रानिआ) : विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहेतसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहेअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली.

          श्री. मदान यांनी सांगितले कीराज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

००००

लोकराज्य चा “चला जाणूया नदीला” विशेषांक प्रकाशित

 लोकराज्य चा “चला जाणूया नदीला” विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या नोव्हेंबर २०२२ च्या “चला जाणूया नदीला” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.


'लोकराज्य' च्या या विशेषांकामध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या 'चला जाणूया नदीला' या उपक्रमासंदर्भात विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम राज्य शासनाने लोकसहभागातून हाती घेतला आहे. या अनुषंगाने राज्यात ७५ नद्यांचे संवर्धन करणे, नद्या समजून घेणे, नद्यांची जपणूक कशी करावी, पावसाच्या पाण्याचे नियोजन, तसेच भूशास्त्रीय रचना, वर्षा चक्र, पीकचक्र, नद्यांशी संवाद इत्यादी विषयांचा या अंकात सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत.


हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १०४३४ पशुपालकांच्या खात्यांवर२६ कोटी रुपये जमा

 लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १०४३४ पशुपालकांच्या खात्यांवर२६ कोटी रुपये जमा

- सचिंद्र प्रताप सिंह

            मुंबई, दि. 30 : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.


            श्री.सिंह म्हणाले की, राज्यामध्ये 30 नोव्हेंबर २०२२ अखेर 35 जिल्ह्यांमधील एकूण 3857 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 327246 बाधित पशुधनापैकी एकूण 247202 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.03 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 99.79 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.


            रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे आयुक्त पशुसंवर्धन यांनी या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना श्री सिंह यांनी दिल्या.


            महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने 23 नोव्हेंबर रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या सुधारीत उपचार मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना विशेष आवाहन करण्यात येते की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.


             28 ऑक्टोबर रोजीच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या उक्त नमूद वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.

रेशीम उद्योगासाठी राज्यस्तरीय योजना तयार करावी

 रेशीम उद्योगासाठी राज्यस्तरीय योजना तयार करावी

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

       मुंबई, दि. 30 : शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोड उद्योगासाठी रेशीम शेती पूरक ठरत आहे. रेशीम उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर रहावा यासाठी राज्यस्तरीय योजनेचा विस्तृत आराखडा तयार करावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


          मंत्री श्री. पाटील यांचे शासकीय निवासस्थान, सिंहगड (ब-2), मुंबई येथे रेशीम संचालनालयाचे कामकाज आणि उपाययोजना, रिक्त पदे तसेच राज्यातील सहकारी सूत गिरण्यांच्या अडचणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्रसिंग, आयुक्त पी.शिवशंकर, रेशीम संचालक प्रदीप चंद्रेन, संचालनालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


         मंत्री श्री. पाटील म्हणाले, शेतीबरोबरच शेतकऱ्यांना जोड उद्योगासाठी रेशीम शेती पुरक ठरत आहे. त्यासाठी रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देणारी राज्य रेशीम योजना सिल्क समग्र 2 या योजनेच्या धर्तीवर तयार करावी. या योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


          सध्या राज्यात १३ हजार ५८१ एकर तुती लागवड आहे पुढील एका वर्षात 5 हजार तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवावे त्या दृष्टीने महा रेशीम अभियान राबवावे आणि महाराष्ट्राचा रेशीम उद्योगामध्ये ब्रँड तयार करवा, असे सांगून वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांनी रेशीम संचालनालयातील कामकाजाचा आढावा घेऊन रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या.


          देशात रेशीम उद्योगात अग्रेसर असलेल्या राज्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करावी. या समितीने राज्यांचा अभ्यास करुन अहवाल सादर करावा. त्यामुळे राज्यातील रेशीम उद्योगाला चालना मिळेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगित

मनापासून पोटधरून

 🤣😀🤣


*गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती.*


*मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा....*


*मग काय ! गाडी सुसाट !!*


🚗


*आणि -*


*अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.*


*गीतानी कर्ररररकचू्.न ब्रेक दाबला.*


*वाटलं आता जाऊन धडकतेकी काय ..!!*


*गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले..*


*आणि....*


*हुश्श.....!!*

:

:

:

:

:....

*गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. अपघात होता होता गीता वाचली व अशाप्रकारे....*


*"गाढवा पुढे वाचली गीता....."*


*ही म्हण प्रसिद्ध झाली....*


    

           😃


*नंतर घाबरलेली गीता घरी आली आणि घडलेली सारी कथा आपला नवरा हरीला सांगितली....*


*तिने नवर्‍याकडे हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला पाहुणचारासाठी घरी घेऊनच या.*


*मग बिचारा हरी गाढवाकडे गेला.*


*पण गाढवही हट्टी. ते काही तयार होईना....*


     *शेवटी...*


*अडलेल्या हरीने गाढवाचे पाय धरले.....*


       *आणि*


*अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी.....*


*ही म्हण तेव्हापासून प्रसिद्ध झाली.*


         😃


*शेवटी कसाबसा हरी गाढवाला घरी घेऊन आला....*


*उन्हातून आल्यामुळे गीताने गाढवास बसायला खुर्ची दिली आणि पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला....*


*गाढव पाणी गटागटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला.*


*पण अचानक काय झाले कळलेच नाही. गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले....* 


*हरीला आणि गीताला हे कोडे आजपर्यंत सुटले....नाही.....*


..

..

*"गाढवाला गुळाची चव काय..?"* 


*ही म्हण यामुळे सगळीकडे व्हायरल झाली.....*



😜 *मंडळी हसत रहा आनंदी रहा....*


😀😀🤣🤣😀😀

क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन होणार

 क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन होणार

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन.

            मुंबई, दि. 30 : राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणी आता ऑनलाईन होणार असून यासाठी क्रीडा विभागाने विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.


             क्रीडामंत्री श्री. महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी या प्रणालीचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, उपसचिव सुनिल हंजे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व कुस्ती खेळांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त राज्यातील खेळाडूंना क्रीडा विभागामार्फत शासकीय व निमशासकीय सेवेत 5 टक्के आरक्षण देण्यात आले आहे, यासाठी खेळांडूची क्रीडा विषयक प्रमाणपत्रे पडताळणी करण्याचे काम क्रीडा विभागामार्फत करण्यात येते. हे पडताळणीसाठी खेळाडूंचा अर्ज, त्यांचे क्रीडा विषयक प्रमाणपत्र, संघटनांमार्फत त्या-त्या क्रीडा स्पर्धांची विविध आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्यात येत होती. तथापि, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळविणे, तसेच संघटना सचिव यांची बनावट स्वाक्षरी व कागदपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याद्वारे पात्र खेळाडूंच्या बाबतीत अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे क्रीडा विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Featured post

Lakshvedhi