Thursday, 2 September 2021

 [9/2, 1:13 PM] Vaishali Bhagat: *WEDDING IN RUSSIA:* 


By Sudha  Narayan Murthy,

Wife of Mr Narayan 

Murthy,  Infosys )


She writes:


"Recently I was in Moscow, Russia. 


The Day I Went to the Park, it was a Sunday. 


It was Drizzling and Cold, though it was Summer. 

I was Standing under an Umbrella and Enjoying the Beauty of the Place... when Suddenly, My Eyes Fell on a Young Couple. 


It Was Apparent that They Had Just Got Married. 


The Girl was in Her Mid-Twenties, Slim and with Blonde Hair and Sparkling Blue Eyes. She Was Very Beautiful Indeed. 


The Boy Was almost the Same Age and Very Handsome. He Was in a Military Uniform. 


The Bride was Wearing a Pretty White Satin Dress, Decorated with Pearls and Pretty Laces. 


Two Young Bridesmaids were Standing Behind Her Holding up the Hem of the Wedding Gown, so as not to let it get Dirtied. 


One Young Boy was Holding an Umbrella Over Their Heads, so that They Should Not Get Drenched. 


The Girl was Holding a Bouquet and the Two Were Standing with Their Arms Linked. 


It Was a Beautiful Sight. 

I  Wondered why They Had Come to the Park in This Rain Soon After Getting Married. 


They Could Surely Have Gone to a Merrier Place.


I Watched as They Walked Together to the Raised Platform Near the Memorial, placed the Bouquet, Bowed their Heads in Silence and Slowly Walked Back.


By Now I was  Curious to Know as to What Was Going On...


There was an Old Man Standing With Them. 


He Looked at Me, My Saree, and asked- 

‘Are you an Indian ?’


I replied-

‘Yes, I am an Indian.’ 


And We Began Chatting Amicably. 


I Decided to use the Opportunity to ask some Questions.


 ‘How Do You Come to Know English ?’


 ‘ Oh, I Worked Abroad.'


 ‘ Please Tell Me Why that Young Couple Visited the War Memorial on Their Wedding Day ?’


 ‘ Oh, that is the Custom in Russia. 


'The Wedding takes Place Normally on a Saturday or a Sunday. 


'Irrespective of the Season, after Signing the Register at the Marriage Office, Married Couples Must visit the Important National Monuments Nearby. 


'Every Boy in this Country Has to Serve in the Military for a Couple of Years at Least. 


'Regardless of His Position, He Must Wear His Service Uniform for the Wedding.’


 ‘Why is That ?’


'This is a Mark of Gratitude. 


'Our Forefathers Have Given their Lives in Various Wars That Russia Has Fought. 


'Some of Them We Won, and Some We Lost, But Their Sacrifice Was Always for the Country. 


'The Newly Married Couple Needs to Remember That They are Living in a Peaceful, Independent Russia Because of Their Ancestors’ Sacrifices. 


'They Must Ask for Their Blessings. 


'Love for the Country is More Important Than Wedding Celebrations.


'We Elders Insist on Continuing with this Tradition Whether it be in Moscow, St. Petersburg or any other Part of Russia.


'On the Wedding Day They Have to Visit the Nearest War Memorial.’


This Set Me Wondering about What We Teach Our Children Here. 


Do We Indians Have the Courtesy to Remember Our Martyrs on the Most Important Day of our Lives ? 


We are Busy in Shopping for Sarees, Buying Jewellery and Planning & Preparing Elaborate Menus and Partying in Discos etc..


My Eyes filled with Tears at the Thought.. and I Wished that We Indians Could Learn a Lesson From the Russians in This Noble Thought and Custom..


And *We Too Could  Respect Our Martyrs Who Sacrificed Their Lives For Our Nation and For Our Today and Tomorrow Too...!*


And From the Heart...! 

🙏🙏

*If You Agree With The Sentiment please do Share ...*

[9/2, 1:13 PM] Vaishali Bhagat: जगातले सगळे रेकॉर्ड 

तुटले ,

जेंव्हा होमीओपॅथी

डॉक्टरच्या बायकोने 

" फोन "

करुन मिस्टरांना सांगीतले की


"घरातला साबुदाणा संपलाय

येताना क्लिनीक मधला 

थोडासा घेऊन या"

😃😃😃😃😃😃😃

 [9/2, 12:28 PM] Vaishali Bhagat: ***** कोर्लईतील शिवमंदिर आणि तेथील सतीशिळा! *****  


          अलिबागपासून २४ किलोमीटर आणि रेवदंड्याच्या थोडे पुढे ६ किलोमीटर अंतरावर कोर्लई नावाचे खूप सुंदर गाव आणि तितकाच सुंदर किल्ला आहे. पोर्तुगीज, मुघल, मराठे व ब्रिटिशांनी केलेल्या अनेक लढायांमुळे या भागाला इतिहासात फार महत्वाचे स्थान आहे. शिवाय कोर्लई हे या भागातील एकच पोर्तुगीज गाव होते ज्याची सुरुवात ५०० वर्षांपूर्वी वर्णीझ, मार्व्हिस, व्हेगास, गोम्स आणि क्लेमेंट्स अशा पाच कुटुंबांनी केली. 


          कोर्लईचा किल्ला ज्या लहानशा टेकडीवर आहे त्या टेकडीच्या पूर्वेकडे पायथ्याशी हे लहानसे शंकर मंदिर आहे. वर कौलारू उतरते छप्पर, विटा मातीच्या भिंती, लाकडी जुन्या बनावटीचे दरवाजे आणि खिडक्यांची लाकडी जाळी हे सर्व अजूनही जुन्या काळापासून जतन केले आहे. मंदिरात जाण्यासाठी ४ पायऱ्या आहेत. मंदिराच्या आत समोरच एका दगडी चौथऱ्यावर लहानसा घडीव नंदी पहायला मिळतो. गाभाऱ्याच्या दरवाज्याजवळ डावीकडे खाली एका कोष्टकामध्ये शेंदूर फासलेली गणपतीची दगडी मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या उजवीकडे लावलेल्या शिळेवर दगडुजीच्या कामाचा काळ शके १८६४ (म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार सन १९४२) लिहिलेले आहे. मंदिराचे बांधकाम हे त्याही खूप आधीचे वाटते. गाभाऱ्याच्या वरील टाईल चे काम आधुनिक बनावटीचे आहे. यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि महाभारतातील काही दृश्य चित्रित केले आहेत. गाभार्यामध्ये शिवलिंग आहे. या मंदिराच्या बाहेर समोरील बाजूस एक साधारण १२ फूट उंच दगडी दीपमाळ दिसते. जवळच एक लहानसे तुळशी वृंदावन आहे. 


          या मंदिराची सर्वात रोचक बाब म्हणजे येथील सतीशीळा! या शिळांना सतीचा दगड असेही संबोधतात. जुन्या काळात पतीच्या निधनानंतर पत्नीने पतीसोबतच सती जाण्याची प्रथा रूढ होती. यात पत्नी पतीच्या जळत्या चितेमध्ये बसून जिवंतपणीच अग्निदाह करवून प्राण त्याग करत असे. अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीला देवपदाला पोहचता येते अशी समजूत होती. मध्ययुगीन काळात एखादा वीर युद्धात अथवा जनतेच्या अथवा गुरांच्या संरक्षणार्थ मरण पावल्यास आणि त्या वीरांची पत्नी सती गेल्यास त्या सतीच्या समरणार्थ असे दगड कोरून ठेवले जात. हे दगड म्हणजे तिच्या त्यागाची ग्वाही देत. पुढे १८३९ साली बऱ्याच भारतीय समाजसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे इंग्रज सरकारने ही प्रथा कायद्याने कालबाह्य ठरवली. त्यानंतर अशा शिळा बनणेही बंद झाले. या शिळा त्या काळातील सतीच्या प्रथेच्या मूक साक्षीदार म्हणून आजही तो इतिहास सांगत आहेत. 


          मंदिराच्या समोर जो मोठा वृक्ष दिसतो त्याच्या पायाशी दोन शेंदूर लावलेल्या सतीशीळा दिसतात. वृक्षाच्या उजवीकडील सतीशीळा २ फूट उंच आणि १ फूट रुंद आहे. यामध्ये आकाशाकडे पाच बोटे असलेला सतीचा हात व तिच्या हातातील चुडा स्पष्टपणे दिसतात. हा हात काटकोनात वळलेला आहे. हाताच्या बाजूला चन्द्र (डावीकडे) व सूर्य (उजवीकडे) यांची प्रतिमा दिसते. चंद्र व सूर्य अमरत्वाचे प्रतीक आहेत. जोपर्यंत आकाशात चन्द्र व सूर्य आहेत तोवर त्या सतीची महती पसरत राहील असा त्याचा अर्थ होतो. वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याफार फरकाने अशा सतीशीळा संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतात पाहायला मिळतात. काही ठिकाणी चितेवर बसलेले स्त्री पुरुष, वाघावर किंवा घोड्यावर बसलेली स्त्री, शिवाची उपासना करताना पती किंवा पत्नी, दोन स्त्रिया सती गेल्या असतील तर दोन हात इ. पाहायला मिळतात. याच वृक्षाच्या डाव्या बाजूस अजूनही एक अशीच हुबेहूब शिळा दिसते. ही शिळा पहिल्या शिळेपेक्षा थोडी जास्त झिजलेली आहे. याची रचनाही पहिल्या शिळेप्रमाणेच आहे. यातही काटकोनात वळलेला सतीचा हात, तिच्या हातातील चुडा आणि चंद्र व सूर्य पाहता येतात. या दोन शिळांवरून हे सांगता येते की येथे २ स्त्रिया सती गेल्या होत्या. 


          कोर्लई म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो येथील ऐतिहासिक किल्ला, तेथील गावातील वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज मिश्रित नोलिंग भाषा आणि येथील दीपगृह! पण हे मंदिर आणि येथील सतीशिळा हे कमी माहितीत असलेले ऐतिहासिक वैभवही कोर्लईच्या इतिहासात तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाय संध्याकाळी हे मंदिर पाहून झाले की एक फेरफटका येथील समुद्रकिनाऱ्यावर मारावा. येथील किनारा अतिशय स्वच्छ - सुंदर आहे आणि येथून सूर्यास्त पाहणे म्हणजे वेगळेच सुख आहे. 


संदर्भ:

१. भटकंती रायगड जिल्ह्याची - प्र. के. घाणेकर (२००७)

२. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कुलाबा गॅझेट (१८८३) 


©️माहिती संकलन आणि फोटो: सुश्रुत निकाळजे (www.TheTown.in)

(www.facebook.com/aitihasikalibag) 


----------------------------------------------------------------- 


ही माहिती आवडल्यास जरूर शेअर करा आणि अजूनही अशी माहिती मिळवण्यासाठी या पेजला लाईक करा! 


----------------------------------------------------------------

[9/2, 12:29 PM] Vaishali Bhagat: *गंमत*


आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम,बर्गर,तंदूरी 

इत्यादी घरी करून पाहिले जातात 


आणि 


कुरडई  पापड, लोणची 

विकत घेतात..!

😂😂🤥🤥


*दुसरी गंमत* याऊलट म्हणजे,

घरी केलेले पदार्थ हाॅटेलसारखे झाले नाहीत म्हणून बोंब मारतात आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर घरगुती खाणं/जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात 😜


*तिसरी गंमत* याहूनही कहर म्हणजे घरी गैस संपला किंवा मिक्सर बिघडला किंवा कुकरचा व्हाल्व गेला की त्रागा करुन तात्काळ कसा सुधारेल ते बघतात.


       आणि बाहेर जाऊन चुलिवरच अमकं, पाट्यावरच्या मसाल्याचं टमकं, मडक्यात मंद आचेवर शिजवलेले ढमकं किती छान चव देतं ते कौतुक करुन जास्तचे चार पैसे मोजतात.


आहे की नाही गंमत 😜 😜 🤪🤐😷

 बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना

पीक विमा योजनेचा लाभ द्यावा

कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना

 

            मुंबईदि. 1 : नैसर्गिक आपत्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ द्यावाअशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या.

            कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले कीपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ द्यावा. त्यासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ द्यावा.

            पालकमंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले, आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आवश्यकता आहे. ही भरपाई लवकरात लवकर द्यावी.

            बैठकीत झालेल्या चर्चेत खासदार प्रतापराव जाधवआमदार संजय कुटेसंजय गायकवाडआकाश फुंडकरश्वेता महाले यांनीही सहभाग घेतला. पीक विमा योजनेतून भरपाई मिळावीअशी मागणी करण्यात आली. बैठकीस राजेश एकडे, संजय रायमूलकरकृषी सचिव एकनाथ डवलेकिसान सभेचे अजित नवलेअजय बुरांडे, उपसचिव सुग्रीव धपाटेमुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदी उपस्थित होते.

 कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी

टास्क फोर्सची माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकिय परिषद

·       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार उद्घाटन

·       राज्यातील सर्व डॉक्टर्स होणार सहभागी

·       समाज माध्यमातून प्रसारणचर्चा सर्वांना पाहता येणार

 

            मुंबईदि. 1 :- कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणारअसून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपेवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख  उपस्थित राहणार आहेत.

            रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाजमाध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्सवैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.

            या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे.

            या परिषदेसाठी www.facebook.com/onemdhealth यावर प्रश्न पाठवता येतील.

            परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओकसदस्य डॉ राहूल पंडितडॉ शशांक जोशीडॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभूतसेच अमेरिकेतील डॉ मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेसार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत.

            ही परिषद cmomaharashtra यांच्या ट्विटरफेसबुक व युट्युब https://youtube.com/c/CMOMaharashtra वरुन देखील पाहता येईल.

००००

 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात 24 लाख लाभार्थ्यांची नोंद;

सुमारे एक हजार कोटीपेक्षा अधिक निधीचे लाभार्थ्यांना वितरण

 

 

 

            मुंबईदि. 1 : माता व बालमृत्यूदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे २३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून सुमारे १ हजार कोटीपेक्षा जास्त निधीचे वितरण करण्यात आले आहेअसे सार्वजनिक आरोग्य विभागाने कळविले आहे.

            प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात सुमारे २३ लाख ९२ हजार ५५२ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून सन २०२१-२२ या वर्षातील नोंदणी उद्दिष्टाचे हे प्रमाण ९२ टक्के आहे. सर्वाधिक १०१ टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पुणे जिल्ह्यात झालेली असून तिथे २ लाख ८ हजार १६६ लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.  राज्यातील सर्व नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांसाठी सुमारे १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला आहे.

            प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस पहिल्या जिवीत अपत्यापर्यंत लाभ दिला जात असून ५ हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.  पात्र गर्भवती महिलेस ३ टप्प्यात डीबीटीद्वारे संबंधित गर्भवती लाभार्थी महिलेच्या थेट संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यामध्ये लाभाची रक्कम थेट जमा केली जाते.

            मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये दिले जातात. किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा केला जातो तर प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजीओपीव्हीडिपीटी आणि हिपॅटॅटीस व तसेच पेन्टाव्हॅलेन्ट च्या ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो.

            प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने दि. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१ दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहादरम्यान सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्ती/एएनएम/अंगणवाडी कार्यकर्ती यांचेकडे सर्व आवश्यक कागदपत्रे देवून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल

            देशात दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारिरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. परिणामी देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यूच्या दरात वाढ होते. माता व बालमृत्यू दरावर नियंत्रण ठेवून हा दर कमी करण्यासाठी आणि माता व बालकाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने १ जानेवारी २०१७ पासून केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात सुरु केली आहे. या योजनेंतर्गत माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावीजन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 वातावरणीय बदलाच्या परिणामांवर कृती करण्यासाठी

राज्य वातावरणीय बदल परिषद

            इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सादरीकरण करून महाराष्ट्रामध्ये या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहअध्यक्षतेखाली राज्य वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचे देखील ठरले.

            सदर अहवालातील नमूद केलेल्या गंभीर परिणामांची दाहकता कमी होण्यासाठीसंयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेले ५R (Reduce, Refuse, Reuse, Recycle, Recover) नुसार राज्यामध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र हा उष्ण कटीबंध प्रदेशात येतो.  वातावरणात 2 ते 2.5 अंश डिग्री तापमान वाढ झाल्यास राज्यातील सागर किनारपट्टी पाण्याखाली बुडण्याची तसेच मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ व जंगलांमध्ये वणवे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आयपीसीसीच्या अहवालात भारतातील १२ शहरांतील सागरी किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.  याशिवाय अर्बन हिट आयलंड इफेक्टभूसख्खलन असे देखील परिणाम होऊ शकतात. आज वातावरण बदलाचा राज्याचा कालबद्ध कृती आराखडा असावा तसेच यासाठी यामध्ये वातावरणीय बदलाशी संबंधित सर्व मंत्र्यांचा समावेश करावा असे मंत्रिमंडळास सादर करण्यात आले.

मूल्यांकन अहवाल 6 (AR६) म्हणजे काय?

            दर काही वर्षांनी आयपीसीसी ही संस्था वातावरण बदलावरील घडामोडींवर अहवाल प्रकाशित करते. आत्ता पर्यंत असे ६ अहवाल प्रकाशित झाले असून या आहावालांसाठी जगभरातून अनेक वैज्ञानिक योगदान देतात.

दृष्टीक्षेपात अहवाल

            नुकताच प्रकाशित झालेल्या अहवालाप्रमाणेआपली पृथ्वीचे तापमान औद्योगिक काळापेक्षा 1.1°C  ने वाढले आहे. 

 न्हावा-शेवा योजना टप्पा 2 जलदगतीने राबवावी

पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. 1 : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पाणी पुरवठ्याच्या विविध नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र असे असले तरी जुन्या योजना प्रभावीपणे सुरु ठेवण्यात याव्यात. न्हावा-शेवा योजना टप्पा 2 जलदगतीने राबविण्यात यावी अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

            रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रस्तावित व प्रगतीपथावरील योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या पाणी पुरवठा केंद्रासंदर्भात आढावा बैठक पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चालू असलेल्या पाणी पुरवठा केंद्राकडून

जास्तीत जास्त लोकांना पाणीपुरवठा होईल असे नियोजन करावे

            श्री. बनसोडे म्हणाले कीनवी मुंबईपनवेल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शहरीकरणात वाढ होत आहे. या भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित होणे आवश्यक असून नवीन पाणी पुरवठा योजना जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. सध्या कार्यान्वित असलेल्या जुन्या पाणी पुरवठा योजना जास्तीत जास्त क्षमतेने सुरु ठेवाव्यात जेणेकरुन नागरिकांना पाणी पुरवठा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

            वाढीव न्हावा - शेवा पाणी पुरवठा योजनामाथेरान सुधार व वाढीव पाणी पुरवठा योजनावाढीव न्हावा-शेवा पाणी पुरवठा योजना टप्पा योजनांबाबतचा आढावा यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी घेतला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलव्यवस्थापन केंद्रे जास्तीत जास्त क्षमतेने चालवून शक्य तितक्या ग्राहकांना पाणी पुरवठा करावा जेणेकरुन नागरिकांनाही सुविधा उपलब्ध व्हावी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या महसुलातही वाढ व्हावी, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

००००

Featured post

Lakshvedhi