"स्वदेशी अन्न खा स्वस्थ रहा"
(भारतीय अन्नघटक)
अनेक वर्षे *बदाम* चा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, *‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’* असे काय पोषण या बदामांतून मिळते जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही ? बदामांतून मिळणाऱ्या *रक्तवर्धक लोहाचे* प्रमाण आहे *५.०९ मि. ग्रॅ*.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या *तीळांतून* त्याहून अधिक म्हणजे *९.३ मि.ग्रॅ*. आणि *हळिवांमधून* तर तब्बल *१०० मि. ग्रॅ.* लोह मिळते.
बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले *कलिंगडाच्या बियां* मधून मिळतात. *तीळां* तून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात. *शेंगदाण्यांमधून- ३.९० मि. ग्रॅ.* आणि *तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ*.!
हाडांना पोषक असलेले *कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ.*, तर *तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ.!* महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे ? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा!’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत !
अॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे ?
प्रचारामध्ये *किवी* आणि *सफरचंदामधून* मिळणाऱ्या *‘क’ जीवनसत्त्वाच्या* अलौकिक गुणांचे वर्णन केले जाते; जे बऱ्याच अंशी खरे आहे. मात्र प्रत्यक्षात या फळांमधून ‘क’ जीवनसत्त्व (Vitamin C) किती मिळते ?? *सफरचंदामधून मिळते केवळ १ मि. ग्रॅ.!* परदेशी सफरचंदामधून जरा बरे म्हणजे * ८ ते १० मि.ग्रॅ. तर *किवीमधून मिळते ६३.९६ मि. ग्रॅ.*. त्या तुलनेत आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या *भारतीय फळांमधून* कितीतरी अधिक ‘क’ जीवनसत्त्व मिळते.
जसे- *चिंच १०८ मि. ग्रॅ.,*
*काजू फळ १८० मि. ग्रॅ.*,
*पेरू २१२ मि. ग्रॅ*. आणि
*आवळा तब्बल ६०० मि. ग्रॅ.*
रक्तवर्धक लोह, रक्तवाहिन्या व चेतातंतूंना पोषक मॅग्नेशियम, स्नायूंना (पर्यायाने हृदयस्नायूंना) पोषक पोटॅशिअम, रोगप्रतिकारक शक्तिवर्धक आणि प्रजनन क्षमता संवर्धक जस्त वगरे अनेक पोषक घटकांची एतद्देशीय फळांशी तुलना करता *किवी व परदेशी सफरचंद भारतीय फळांसमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत.*
ब्रोकोलीमधून काय मिळते ?*
ब्रोकोलीमधून आपल्या आरोग्याला उपकारक असे काय मिळते जे आपल्या भाज्यांमधून मिळत नाही ? *कोथीबीर (४८०० मायक्रो ग्रॅम),*
*अळू-पान (५९२० मायक्रो ग्रॅम)* आणि *माठ (८३४० मायक्रो ग्रॅम)* यांच्याहून पावपटीपेक्षाही कमी *(६२३ मायक्रो ग्रॅम)* *बीटा-कॅरोटिन ब्रोकोलीमधून* मिळते. रक्तनिर्मितीमध्ये आवश्यक *फॉलिक अॅसिड* ब्रोकोलीपेक्षा (६३ मायक्रो ग्रॅम)* कितीतरी अधिक पालक, माठ व टाकळ्यामधून मिळते. विविध जीवनसत्त्वे आणि लोह, जस्त आदी खनिजे, प्रथिने आदी सर्वच पोषक घटक पुरविण्यात ब्रोकोली भारतीय भाज्यांपेक्षा बरीच कमजोर आहे. *मगं लोक का खरेदी करतात ब्रोकोली ?*
५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या फूल-फळभाज्या ज्या भारतात पिकतात तिथल्या लोकांनी परकीय भूमीत उगवणारी, खुडल्यानंतर बर्फात साठवलेली आणि कोणतेही विशेष पोषणमूल्य न देणारी ब्रोकोलीसारखी भाजी का खावी ?
*भारतीयांना ओट्सची गरजच काय ?*
ओट्ससारखे अमेरिकेमध्ये *घोडे व डूकरांचा खुराक* म्हणून वापरले जाणारे धान्य कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुळात जिथे कोलेस्टेरॉलचा रक्तवाहिनी चिंचोळी होण्याशी आणि पर्यायाने हार्ट अटॅकशी संबंध शंकास्पद आहे, तिथे ओट्स का खायचे ? ज्या देशात *तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव पिकतात त्यांनी आपल्या मातीत न पिकणारे धान्य का म्हणून खायचे ?* महत्त्वाचे म्हणजे ओट्समधून आपल्याकडील या धान्यांपेक्षा फार पोषक तत्त्वे मिळतात असंही नाही. *ओट्सपेक्षा (३६१)* अधिक आरोग्यदायी उष्मांक *बाजरीतून (३८९)* मिळतात. *ओट्सहून (११)* अधिक चोथा *बाजरीमधून (११.३)* मिळतो. भारतीयांना अत्यावश्यक असणारी *कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह* आदी तत्त्वे ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात.
*तांदळामुळे नव्हे, तर रिफाइण्ड तांदळामुळे भारतीय स्थूल होत आहेत.* जे पुरवणारा अन्नपदार्थ म्हणजे आपला वरण-भात. महत्त्वाचे म्हणजे वरण-भात, दाल-रोटी, भाजी-भाकरी, डोसा-सांभार खाताना तुम्ही डाळी, भाज्या, औषधी व पाचक मसाले यांसोबत ते धान्य खाता. आणि तेही संपूर्णत:नैसर्गिक स्वरूपात.
*याउलट, ओट्समधून मिळणारे पोषण एकांगी असते.* ओट्स आपल्यासमोर येतात तेव्हा तो विविध कृत्रिम प्रक्रिया केलेला एक पदार्थ असतो; ज्यातून साखर, मीठ, प्रिझव्र्हेटिव्हज्सुद्धा आपल्या पोटात जातात. जे विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. *आपण नाचणी, बाजरी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल आणि त्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आपला थोडा हातभार लागेल.* ओट्स खाऊन अमेरिकेची भर करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच नाही का ?
*गुण सांगता.. दोषांचे काय/?*
याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे *ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी* आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. *सफरचंदाने होणारा मलावरोध* आणि मलावरोधजन्य विकृती, शरिरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फॅटी अॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार या सर्व आरोग्य संकटांकडे भारतीयांनी कानाडोळा करावा काय ?
*आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्य धोके का सांगितले जात नाहीत ?*
त्याला आर्थिक बाजु सुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.
आजमितीस *भारतीयांना एक कोटी १७लाख टन खाद्यतेल* लागते. त्यातला केवळ *०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह* तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.
सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आíथक स्थर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आíथक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.
आज जग जवळ आले आहे. त्यामुळे *वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल हे नक्की. आयुर्वेदानुसार जो आहार देशसात्म्य आहे अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.*
अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की, *याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.*
यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले.
यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत. गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.
ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते प्रत्येक वेळी बदलतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तो सुध्दा आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या आपल्या भारतीय देशवासीयांनी?
(संदर्भ: नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)