Tuesday, 31 October 2023

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

-  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि. 31 : अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच खरेदीसाठी ११ हजार ८०० रुपयेअंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून अंगणवाडी सेविकांच्या अन्य मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            मंत्रालयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीची बैठक आज झाली. त्यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारीमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम.ए.पाटीलशुभा शमीमभगवान देशमुखसुवर्णा तळेकरसरिता मांडवकर उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीकेंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने झालेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी विविध घोषणा केल्या आहेत केंद्राच्या सूचना प्राप्त होताच त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच घेण्यासाठी ११ हजार ८०० रुपयेअंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून३००० अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नतीही मिळणार आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक लाभ ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय सादर करण्यात येईल. अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे आणि इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मंत्री कु. तटकरे यांनी कृती समितीला दिली.

******

मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया सुलभरित्या राबवावी

 मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची

प्रक्रिया सुलभरित्या राबवावी

- महसूल विभाग अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा

 

            मुंबईदि. 31 : मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांनी सुलभरित्या राबविण्याच्या सूचना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिल्या.

            मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील प्रक्रिया राबविण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगेमहसूल विभागाचे उपसचिव संतोष गावडेछत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी श्री.देवरा म्हणाले कीमराठवाड्यातील निजामकालिन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला आहे. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून 13 हजार 498 जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा कराव्यात. या कागदपत्रांचे भाषांतर करुन जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन करुन पब्लिक डोमेनवर उपलब्ध करुन द्यावी. जात प्रमाणपत्र सुलभरित्या उपलब्ध करुन देण्यासाठीच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध कागदपत्रे हे मोडी व ऊर्दू लिपी मध्ये असल्याने त्याचे भाषांतर करताना काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही श्री. देवरा यांनी यावेळी दिल्या.

            सचिव श्री. भांगे म्हणाले कीमराठा -कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला असून  जात प्रमाणपत्र वितरणाबाबतची कार्यवाही नियमावली तातडीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र वितरण कार्यवाही नियमाच्या आधारे मिशन मोडवर राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

००००

Monday, 30 October 2023

शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली’ - राज्यपाल रमेश बैस

 शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली’

- राज्यपाल रमेश बैस

            बिहारझारखंडआंध्रप्रदेश व तेलंगणा नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवकांनी घेतली राज्यपालांची भेट

           

            मुंबईदि. 30 : शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण व कौशल्याच्या माध्यमातूनच आदिवासी - जनजाती समाज उन्नती साधू शकेल व राष्ट्र विकासात योगदान देऊ शकेल. यास्तव आदिवासी युवक - युवतींनी शिक्षणाची कास धरावी. तसेच नक्षलवाद्यांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात देशाला साथ द्यावीअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

            बिहारझारखंडतेलंगणा व आंध्रप्रदेश या चार राज्यांमधील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील  २०० युवक- युवतींनी सोमवारी (दि. ३०) राज्यपाल श्री. बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते.

            केंद्रीय युवा मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्र संघटनेने गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील आदिवासी युवकांसाठी १५ व्या आदिवासी युवक आदान - प्रदान कार्यक्रमांचे आयोजन केले असूनया कार्यक्रमांतर्गत चार राज्यातील युवक महाराष्ट्र भेटीवर आले आहेत. 

            यावेळी विधानमंडळाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदानेनेहरु युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र व गोवा संचालक प्रकाशकुमार मनुरेकेंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कमांडंट इंद्राणी यादव व नेहरु युवा केंद्राचे उपनगर जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला उपस्थित होते.

            बिहार व झारखंड येथील आदिवासी युवक युवती प्रथमच मुंबई येथे आले असून रेल्वेत देखील प्रथमच चढले या गोष्टीची नोंद घेऊन आदिवासी युवकांची महाराष्ट्र भेट ही त्यांचे अनुभव विश्व समृद्ध करेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

            केंद्र शासनाने बिरसा मुंडा यांच्या जयंतीला 'आदिवासी गौरव दिवससाजरा करण्याचा निर्णय घेतला आहेअसे सांगून आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान फार मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            आदिवासी बांधवांनी कौशल्ये आत्मसात करावी, असे सांगताना आदिवासी युवक शेती करीत असतील, तर त्यांनी त्यातील नवनवी कौशल्ये शिकावीत व प्रगतिशील शेतकरी बनावेअसे राज्यपालांनी सांगितले.

            आदिवासी युवकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती करुन घ्यावी व उद्योजक होण्याचा प्रयत्न करावाअसे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी नेहरू युवा केंद्राचे संचालक श्री. मनुरे यांनी आदिवासी युवा आदान - प्रदान कार्यक्रमाची माहिती दिली. आदिवासी युवक आदान प्रदान कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती व अशासकीय संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

**


 

Maharashtra Governor tells tribal youths to educate and stay away from Left Wing Extremists

      Mentioning that education is the master key to success, Maharashtra Governor Ramesh Bais today called upon tribal youths from Naxal affected districts to educate themselves, acquire new skills, become entrepreneurs and help the government in its fight against the Left Wing Extremism.

      The Governor was speaking to a group of 200 tribal youths from the States of Bihar, Jharkhand, Andhra Pradesh and Telangana during an interaction at Raj Bhavan Mumbai on Mon (30 Oct).

      The tribal youths from the Naxal affected districts of the 4 States met the Governor as part of the 15th Tribal Youth Exchange Programme organised by the Nehru Yuva Kendra Sanghatan under the aegis of Ministry of Home Affairs, Government of India.

      The Governor said tribals were in the forefront of the Indian freedom movement. He said the nation is proud to have the first woman from the tribal community as the President. He said the Government of India has started the practice of celebrating 'Janajati Gaurav Diwas' on the birth anniversary  of Birsa Munda.

      Director of Nehru Yuva Kendra Sanghatan Maharashtra and Goa Branch Prakash Kumar Manure, Director of V S Page Parliamentary Training Centre of Maharashtra Vidhan Bhavan Nilesh Madane, Commandant of CRPF Indrani Yadav and District Youth Officer of Nehru Yuva Kendra Nishant Rautela were present. The Governor felicitated individuals and organisations supporting the Tribal Youth Exchange programme on the occasion.

0000


 

उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत

 उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत

– विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळण्यासाठी नागपूर येथे उद्योग प्रदर्शनाचे आयोजन

            मुंबईदि. 30 - महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेतस्टार्ट अप आणि नवोपक्रम सुरु करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावेगुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ उपक्रम अधिक व्यापकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवावाअसे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्योग विभागाला दिले. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नागपूर येथे महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे आणि त्यात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात करत असलेल्या प्रगतीचा आढावा प्रदर्शनाच्या माध्यमातून घ्यावाअशा सूचनाही त्यांनी आज केल्या.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवनात भारत आणि विविध देशांतील व्यापार-उद्योगास चालना देण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्माग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशीमहाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजपुणे चे सदस्य डॉ. विजय मालापुरेश्री. सागर नागरे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योग विकास आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            या बैठकीत उद्योगाशी निगडित असणाऱ्या उद्योजकांच्या विविध संस्था व उद्योग विभागांमध्ये समन्वय साधून व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावाया अनुषंगाने चर्चा झाली. यापूर्वी महाराष्ट्र आणि विविध देश यांच्यात झालेले सामंजस्य करारसद्यस्थिती याबाबतही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आढावा घेतला. आफ्रिकेत व्यवसायसंबंधी काय काम करता येईल. महिला उद्योजकांना उद्योग सुरु करण्याच्या अनुषंगाने अधिक सुलभता देणेत्याअनुषंगाने धोरण राबविणेपरदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुविधाविविध विद्यापीठे आणि शासकीय विभाग यांच्यामध्ये आदानप्रदान वाढवून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशीप प्रोग्राम राबविणे आवश्यक असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

            राज्यातील पर्यटनवाढीच्या संधी लक्षात घेऊनही काम व्हायला हवे. उद्योजकांच्या संघटना आणि राज्य शासन यांनी यासंदर्भातील कार्यक्रम हाती घेऊन त्यासंदर्भातील  कामाला गती द्यावी. महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये शासनाच्या विभागामार्फत कार्यशाळा आयोजित केली जावी. महिला उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नागपूर येथे अधिवेशन काळात परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

            प्रधान सचिव डॉ. कांबळे म्हणाले कीराज्याचे स्वत:चे उद्योग धोरण आहे. अधिकाधिक गुंतवणूक राज्यात यावी यासाठी विविध माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. या प्रक्रियेत येथील उद्योजक संघटनांचे तसेच जगभरातील महाराष्ट्र मंडळ आणि तेथील स्थानिक महाराष्ट्रीयन मंडळींचे सहकार्य निश्चितपणे महत्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

            तैवानजपान यांसह दक्षिण आशियाई देशांसोबत दर 15 दिवसांनी आढावा बैठक होत असतात. व्यवसाय संबंधित विविध परिषदांमध्ये उद्योग विभाग नेहमीच सहभाग घेत आलेला आहे. राज्याच्या विभागनिहाय उद्योगाची रणनीती ठरविण्यात आली आहे. लवकरच मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी डॉ. जोशी यांनी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ. विजय मालापुरे यांनी राज्यातील उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी आणि उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य असेलअसे सांगितले. 

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

"कुप्लर रोस मॉडेल"* या तत्वज्ञान सिद्धांतानुसार

 . *"कुप्लर रोस मॉडेल"* या तत्वज्ञान सिद्धांतानुसार, जेव्हा माणूस कुठल्याही दुःखात, नैसर्गिक आपत्ती, अपघात या गोष्टींना सामोरे जातात तेव्हा ते ५ टप्प्यामधून जातात आणि हे ५ टप्पे म्हणजे


(१) नकार

(२) राग

(३) वाटाघाटी

(४)नैराश्य

(५) स्विकार


(१) *नकार* - ही गोष्ट होऊ शकते यावर विश्वास ठेवण्यास संपूर्ण नकार. 

उदाहरणं म्हणजे आपल्याला वाटले होते की कोरोना आपल्याकडे येणारचं नाही.


(२) *राग* - संताप आणि चिडचिड, गोष्टी मनाविरुद्ध झाल्याने 


रोजनिशी, पगार, नोकरी कपात गेल्यावर राग अनावर


(३) *वाटाघाटी* - स्वतःच्या मनाला सतत सांगत राहणे की जर असे झाले नसते तर सगळं ठीक झालं असतं. 


(४) *नैराश्य* - संताप, चिडचिड याचे परिणामतः नैराश्यात रूपांतर होते. 


(५) *स्विकार* - सगळ्यात शेवटचा टप्पा, आता काहीच समोर दिसत नसल्याने जे आहे ते जसेच्या तसे स्वीकार करणे 

आयुष्यातील सर्व प्रसंग याप्रकारे येतात पण जो कोणी शेवटचा आणि महत्वाचा 'स्वीकार' टप्पा घेत नाही तो मानसिक संतुलन बिघडवून घेतो हे अढळ सत्य!

Sunday, 29 October 2023

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संमेलनाचे निमंत्रक म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर प्रमुख संरक्षक व सल्लागार म्हणून पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावाची घोषणा मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केली आहे.


मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर द्वारा आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळेनर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलन अध्यक्षपदी प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. आता संमेलनाच्या तयारीसाठी वेग आला आहे. दरम्यान संमेलन स्वागताध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन, संरक्षक व सल्लागार म्हणून गुलाबराव पाटील व निमंत्रक म्हणून अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या बाबत म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, मुंबईच्या अध्यक्षा उषाताई तांबे यांना पत्र पाठविले आहे. जिल्ह्यातील तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. यानुसार स्वागताध्यक्ष, संरक्षक व निमंत्रक यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. अशी माहिती म. वा. मंडळाचे उपाध्यक्ष रमेश पवार यांनी दिली.


संमेलनाचे इतर पदाधिकारी आणि विविध समित्यांची निवड आठवडाभरात करण्यात येणार आहे. त्यांच्यावर जबाबदारी देखील सोपवण्यात येणार असल्याची माहिती म. वा. मंडळाने दिली. यासंदर्भात २ नोव्हेंबर रोजी साने गुरुजी हायस्कूल अमळनेर येथे साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची हितगुज सभा दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे.


संमेलन अध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांनी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे नुकतीच भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन समित्या, सुख सुविधा, सुशोभीकरण, लागणाऱ्या गरजा आदींबाबत चर्चा केली होती. आता साहित्य संमेलनाच्या प्रमुख पदांवर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची निवड झाल्याने संमेलन यशस्वी करण्यासाठी गती मिळेल, असा विश्वास म.वा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, हेमंत बाळापूरे यांनी व्यक्त केला आहे.


भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई

 भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर होणार कारवाई

- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

 

            मुंबई दि. 26 : सणासुदीच्या दिवसात खवामावामिठाईखाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे. ही मोहिम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येईल. ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा उत्पादकांकडे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल, त्यांच्यावर  कडक  कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

            सणासुदीच्या काळात उत्सवादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात खवादूधखाद्यतेलतूप यापासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. मागणी जास्त आणि आवक कमी, अशी परिस्थिती असल्यामुळे या काळात भेसळीचे प्रकार केले जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात होणारे भेसळीचे प्रकार टाळण्यासाठी मिठाई  विक्रेत्यांना  काही मार्गदर्शन सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेतअसे मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

            मिठाई ट्रेवर दर्शनी भागात वापरण्या योग्य दिनांक टाकावाअन्नपदार्थ तयार करताना उत्पादकाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावीअन्न पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा  व त्यांची खरेदी बिले जतन करावीतभांडी स्वच्छ व  आरोग्यदायी झाकण असलेली असावीत, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावाअन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेतत्वचा संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबत कामगारांची वैद्यकीय तपासणी करावीमिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्य रंगाचा १०० पी.पी.एम च्या मर्यादित वापर करावाप्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेतअन्न पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळेस तळण्यासाठी वापरण्यात यावे. त्यानंतर वापरलेले तेल रुको अंतर्गत नेमण्यात आलेल्या एग्रीकेटर यांना देण्यात यावेत आदी सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.

            स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना  पर्याय म्हणून  करु नये. विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री बिलावर एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद करावाविक्रेत्यांनी दूधदुग्धजन्य पदार्थखवा, मावा या नाशवंत पदार्थांची वाहतूक ही योग्य तापमानास व सुरक्षितरित्या करण्यात यावी.

            ग्राहकांनी देखील जागरूक राहून अन्न पदार्थाच्या गुणवत्ता दर्जाबाबत किंवा अन्न आस्थापनाबाबत  कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावीअसे आवाहन मंत्री श्री. आत्राम यांनी केले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

 


मेरी माटी मेरा देश’ अभियान के अंतर्गत अमृत कलश यात्रा

 मेरी माटी मेरा देश’ अभियान के अंतर्गत अमृत कलश यात्रा राज्यस्तरीय समारोह

मातृभूमि के प्रति प्रेम और संस्कृति के प्रति आदर जरुरी

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. 27 :  आम आदमी को केंद्र स्थान पर रखकर केंद्र और राज्य सरकार काम कर रही है. इसके पीछे छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा है. ढांचागत सुविधाएंइमारतेंबड़ी परियोजनाएंभौतिक सुविधाओं के साथ-साथ हमारे मातृभूमि के प्रति प्रेमसंस्कृति के प्रति आदर भी उतना ही महत्वपूर्ण है. मेरी माटी मेरा देश’ अभियान यह देश के लिए शहीद होनेवाले वीरों के त्याग एवं उनके बलिदान को नमन करने के लिए अवसर प्रदान करनेवाला कार्यक्रम हैयह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया.

            राज्य सरकार के सांस्कृतिक कार्य विभागसांस्कृतिक कार्य संचालनालय और बृहन्मुंबई महानगरपालिका की ओर से आजादी के अमृत महोत्सव के समापन समारोह के अवसर मेरी माटी मेरा देश’ अभियान चलाया जा रहा है. अगस्त क्रांति मैदान में इस अभियान के अंतर्गत अमृत कलश यात्रा’ राज्यस्तरीय समारोह आयोजित किया गया थाइस कार्यक्रम में मुख्यमंत्री श्री. शिंदे बोल रहे थे.

            इस कार्यक्रम में सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारग्रामविकास मंत्री गिरीश महाजनकौशल विकासरोजगारउद्यमितानवाचार मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढाविधायक कालिदास कोळंबकरविधायक रमेश पाटीलमुख्यमंत्री के प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभाग के प्रधान सचिव विकास खारगेनगरविकास विभाग के प्रधान सचिव के. गोविंदराजग्रामविकास विभाग के प्रधान सचिव एकनाथ डवलेबृहन्मुंबई महानगरपालिका के आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहलमुंबई शहर के जिलाधिकारी राजेंद्र क्षीरसागरमुंबई उपनगर जिले के जिलाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेनेहरू युवा केंद्र के राज्य समन्वयक राजेंद्र मालुरे आदि उपस्थित थे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि अगस्त क्रांति मैदान यह ऐतिहासिक मैदान है. भारत छोडो’ का नारा यहीं से समूचे देश में पहुंचा.  9 अगस्त को मेरी माटी मेरा देश’ उपक्रम की शुरुआत भी इसी मैदान से की गई.  राष्ट्रभक्तिदेशभक्ति को बढ़ानेवाला मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रम है.

            छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा लेकर राज्य सरकार काम कर रही है. विदेशी निवेशढांचागत सुविधाओं में महाराष्ट्र अग्रसर है. देश की अर्थव्यवस्था विश्व स्तर पर तीसरे स्थान की उडान भरते समय इसमें महाराष्ट्र की महत्वपूर्ण भूमिका साबित होगी. हमारा राज्य यह देश का ग्रोथ इंजिन होने की बात मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान कही.   

            उन्होंने कहा कि गाँव-गाँव एकत्रित की हुई माटी इस अमृतकलशों के माध्यम से आज मुंबई में लाई गई. इस अमृत कलशों का स्वागत कर सभी ने इसमें बड़े उत्साह से भाग लिया. अमृत कलश नई दिल्ली में अमृत वाटिका में ले जाया जाएगा. देशभर से लाई गई माटी यहाँ पर एकत्रित की जाएगी. सही मायने में एकात्मता का दर्शन यहाँ पर होगा. सांस्कृतिक कार्य विभाग ने उत्तम नियोजन किया है और इस विभाग के मंत्री सुधीर मुनगंटीवार और उनके सभी सहयोगियों की निश्चित ही सराहना करनी होगी. इसके अलावा नागरी क्षेत्र में मुंबई महानगरपालिका और अन्य नागरी संस्थाओं की सहभागिता भी उतनी ही महत्वपूर्ण होने की बात मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान कही.

          मुख्यमंत्री श्री. शिंदे ने बताया कि हमने शिवराज्याभिषेक दिन का 350 वां वर्ष मनाया है.  जल्द ही शिवकालीन वाघनखे’ हम राज्य में ला रहें है.  यह हमारे संस्कृतिपरंपरा के संवर्धन का प्रयास है.

            कार्यक्रम में मंत्री श्री. मुनगंटीवार ने कहा कि आजादी का अमृत कलश शहीदों कोशूर वीरों ने हमारे हाथों में दिया है. यह  कलश सुराज्य का करना हैहमारे राज्य के प्रतिदेश के प्रति प्रत्येक ने योगदान देने का भी यहीं समय है. आम जनता के हित को ध्यान में रखते हुए काम करनेवाले प्रधानमंत्री और मुख्यमंत्री हमें मिले है.

            इस दौरान बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल ने अपना  मनोगत व्यक्त किया और  इस अभियान के अंतर्गत महानगरपालिका क्षेत्र में चलाएं जा रहें उपक्रमों की जानकारी दी.

 

            कार्यक्रम का प्रास्ताविक श्री. खारगे ने किया. देश के लिए अपना बलिदान देनेवाले शहीदों का स्मरण हम कर रहें है. सभी गाँवों-शहरों में हम विभिन्न उपक्रम चला रहे है. हमारा राज्य देश में अग्रसर है. अमृत कलश यात्रा के लिए राज्य से 414 कलश और उसके साथ ही करीबन 900  स्वयंसेवक दिल्ली में जा रहे हैइसके लिए विशेष रेलवें की व्यवस्था भी किये जाने की जानकारी उन्होंने इस दौरान दी.

            कार्यक्रम की शुरुआत में भैरी भवानी परफॉर्मिग ग्रुप ने देशभक्ति पर विविध गीत-नृत्यों के कार्यक्रम प्रस्तुत किये. कार्यक्रम में उपस्थितों के प्रति नगरविकास विभाग के प्रधान सचिव के. गोविंदराज ने आभार प्रकट किये.

०००००

 


 

Under the 'My Soil My Country' campaign, the 'Amrit Kalash Yatra'

was organized as a state-level event.

Love for the motherland and respect for our culture is of utmost importance.

" Chief Minister Eknath Shinde

 

      Mumbai, Date 27: The central and state governments are working with the common man at the centre of their focus, inspired by Chhatrapati Shivaji Maharaj. Basic amenities, buildings, major projects, and physical facilities are as crucial as love for our motherland and respect for our culture. The 'My Soil My Country' campaign is an initiative to pay tribute to the martyrs who sacrificed their lives for the nation, stated Chief Minister Eknath Shinde. 

      The State Government's Department of Cultural Affairs, Directorate of Cultural Programs, and the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) are organizing the 'Meri Maati Mera Desh' or 'My Soil My Country' campaign as part of the Amrit Mahotsav celebration. A state-level event, the 'Amrit Kalash Yatra', was organized at the August Kranti Maidan.

      Chief Minister Shree Shinde spoke on the occasion. Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar, Rural Development Minister Girish Mahajan, Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship, Innovation, and Mumbai Suburban Guardian Minister Mangal Prabhat Lodha, MLAs Kalidas Kolambkar and Ramesh Patil, Principal Secretary to the Chief Minister and also the Principal Secretary of the Department of Cultural Affairs Vikas Kharge, Principal Secretary of Urban Development K. Govindraj, Principal Secretary of Rural Development Eknath Davle, Commissioner and Administrator of Brihan Mumbai Corporation Dr. Iqbal Singh Chahal, District Collector of Mumbai Rajendra Kshirsagar, District Collector of Mumbai Suburbs Dr. Rajendra Bhosale and State Coordinator of Nehru Yuva Kendra Rajendra Malure was present.

      Chief Minister shri Shinde mentioned that August Kranti Maidan is a historic ground. The 'Quit India' movement resonated from here. The 'My Soil My Country' initiative began at this ground on August 9. It is a program to instill nationalism and patriotism. Inspired by Chhatrapati Shivaji Maharaj, the state government is working efficiently. Maharashtra is leading in foreign investment and basic amenities. While India's economy is globally ranked third, Maharashtra plays a pivotal role in this achievement. Our state is the growth engine of the country, emphasized Chief Minister shri Shinde.

      Soil collected from various villages has been brought to Mumbai in the form of 'Amrit Kalash'. Everyone enthusiastically participated in welcoming these vessels. The Amrit Kalash will be placed in Amrit Vatika in New Delhi. Soil from all over the country will be gathered there, truly symbolizing unity. The Department of Cultural Affairs has planned excellently, and special praise was given to Minister Sudhir Mungantiwar and his team. Additionally, the participation of the BMC and other urban institutions are equally important, said Chief Minister shri Shinde.  

      We celebrated the 350th anniversary of Shivrajyabhishek (coronation of Shivaji Maharaj). Soon, we will be introducing medieval era cannons in the state. Efforts are being made to preserve our culture and traditions, shared by Chief Minister shri Shinde.

      Minister shri. Mungantiwar mentioned that the Amrit Kalash, given to us by martyred heroes, is a symbol of the rising sun. It's time for everyone to contribute to our state and nation. We are fortunate to have a Prime Minister and Chief Minister who prioritises the well-being of the common man.

      BMC Commissioner shri. Chahal shared his thoughts and provided information about the programs organized by the BMC under the campaign.

      The introductory speech was given by shri. Kharage. We are remembering the martyrs who sacrificed for the country. We have organized various events in every village and city. Our state is at the forefront in the country. 414 kalashes and nearly 900 volunteers from the state are going to Delhi for the Amrit Kalash Yatra. Special railway arrangements have been made for them, informed shri. Kharage.

 

 The program began with patriotic songs and dances performed by the Bhairi Bhavani Performing Group. The vote of thanks was given by the principal Secretary of Urban Development, shri. K. Govindraj.

०००००


मॉडर्न कोजागिरी*🔻

 🌝✨🔺 *मॉडर्न कोजागिरी*🔻💫🌕


*पाश्चराईज्ड* दुधामध्ये🍼 *एक्स्पोर्टचा* बदाम🍲 किसला

*कार्बनच्या* काळ्या ढगांआडून चंद्र🌜 *आर्टिफिशियलपणे* हसला,


दूध🍼 आटवायच्या मिनीटाला *गॅसचं लिमिट*🔥 आठवलं

*प्रोपेन-ब्युटेनच्या*🌪 महाग कॉम्बिनेशनने *लॅक्टोजलाही*🍚 बाटवलं,


पुरणपोळीसाठी 🌮आता *मेटॅनिल यलोची* डाळ

*पिवळ्याधम्मक* कच्च्या केळ्यांचा🍌 हा *मॅग्नेशिअमयुक्त* काळ,


*ग्लुकोजवाल्यांच्या* जिभेवरती😋 *शुगर फ्री* चे स्विट

*ब्लडप्रेशरच्या*💉 नाकावर टिच्चून *अजिनोमोटोचे* मीठ,🎎


*फॅक्टरीतले प्रोडक्टस्*🏭 अन् 🌿 *नॅचरल-हर्बल*🍃 नाव

*केमिकल्सच्या* ⚗डुप्लिकेट पदार्थांना *ओरीजिनलचा*💰 भाव,


*चायनाच्या*🇹🇷 युगातसुद्धा *इंडियन*🇮🇳 सत्वाची नांदी व्हावी

*कोजागिरीच्या* 🌕सिल्व्हर डिस्प्लेने तुम्हा सर्वांची *चांदी*🍽 व्हावी.

😜😜😜😜😜😜😜 कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा नियती इंटरप्राईजेस

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे

 मुंबई शहर जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे

- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबईदि. 27 : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास 9 डिसेंबर 2023 पर्यंत त्या नोंदवाव्यातअसे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. 

            मतदान केंद्र आणि प्रारुप मतदार यादीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र राजपूततहसीलदार अर्चना मुळेविविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

            मतदार यादीबाबत माहिती देताना श्री.क्षीरसागर म्हणाले कीदि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने मुंबई शहर जिल्ह्यातीत 10 विधानसभा मतदारसंघातील एकूण 2509 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या मतदान केंद्रांची यादी तसेच प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघ कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी या मतदार यादीचे अवलोकन करून दावे व हरकती असल्यास विहीत अर्ज नमुना क्रमांक सहासात व आठ भरून दि. 9 डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये नोंदवाव्यात.

            या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या 24 लाख 50 हजार 355 एवढी आहे. यामध्ये 8920 इतकी नवीन मतदार नोंदणी आहे. तर दुबारमृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशा 6107 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या 13 लाख 27 हजार 131 तर स्त्री मतदार संख्या 11 लाख 23 हजार 18 इतकी आहे. ऑक्टोबर 2023 मधील यादीमध्ये एक हजार पुरूषांच्या मागे 846 स्त्रिया असून तृतीयपंथी समुदायाची ऑक्टोबर 2023 मधील संख्या 206 इतकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बूथ लेवल ऑफिसर (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत केली आहे. याद्वारे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.

            लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वर्षे वयोगटाच्या तरुणांचे प्रमाण सुमारे तीन टक्के आहे. तथापि, मतदार यादीतील त्यांचे प्रमाणे अर्धा टक्के आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 'उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा'चे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणान्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण वाढणे देखील आवश्यक असून यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.

            सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तथापिमतदारांनी प्रारुप यादी तपासून त्यात नाव असल्याची खात्री करून सहकार्य करावेअसे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

मुद्रित अंक 48 तासात पाठवा याचा पुनर्विचार करावा

 मुद्रित अंक 48 तासात पाठवा याचा पुनर्विचार करावा


खा. श्रीनिवास पाटील यांचे केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र

कराड  : मुद्रीत अंक प्रकाशित झालेनंतर 48 तासात अंक RNI आणि PIB कार्यालयात पाठवने बंधनकारक हा निर्णय मागे घ्यावा, पुनर्विचार करावा किंवा दुरुस्ती करावी अशा आशियाचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांना असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष गोरख तावरे, सातारा जिल्हाध्यक्ष खंडू इंगळे, सचिव संतोष शिंदे यांनी दिले.

दरम्यान खा. श्रीनिवास पाटील यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन  सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांना लेखी पत्र लिहून सदर प्रश्नाबाबत सकारात्मक विचार करून सातारा जिल्ह्यातील पत्रकार व प्रकाशकांनी केलेल्या मागणीचा विचार करून निर्णय घ्यावा असे सुचित केले आहे.

तसेच मुद्रित माध्यमातील अंक प्रकाशित झालेनंतर 48 तासात अंक RNI आणि PIB कार्यालयात पाठवने बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास 2000 प्रमाणे दंड आणि सातत्याने अंक प्रकाशित न केल्यास अंकाची मान्यता रद्द केली जाणार आहे. मुद्रित मीडियावर  हा अन्याय आहे. कारण दिलेल्या मुदतीत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील, महानगरातील प्रकाशकाला अंक पाठवणे शक्य होणार नाही. याचा पुनर्विचार करून ही अट (नियम) रद्द करावी. असे खा. श्रीनिवास पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

RNI कार्यालयाने 25 सप्टेंबर रोजी नवीन आदेश जारी केला आहे. सर्व प्रकाशकांसाठी RNI ने जारी केलेला निर्णय बदलावा अथवा याचा फेरविचार करावा. अशा आशयाची मागणी खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

RNI चे कार्यालय आणि PIB चे कार्यालय हे देशातील आणि राज्यातील प्रत्येक जिल्हा किंवा तालुका स्तरावर नाहीत. विशेषता मुंबईतील RNI चे कार्यालय यापूर्वीच बंद करण्यात आलेले आहे.  RNI  आणि PIB कार्यालय हे प्रकाशकांच्या पासून दूर अंतरावर आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्रकाशाकांना गैरसोयीचे व दूर अंतराचे असल्यामुळे सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करणे शक्य नाही‌.  याचा पुनर्विचार केला जावा. नियमच बदलावा, पुनर्विचार करावा किंवा शिथिल करावा. निवेदनात म्हटले आहे.

संदेशवाहकाद्वारे माध्यमातून पाठवले जाणारे मुद्रित अंकाची प्रत वेळेत मिळेलच याची शाश्वती नाही. तसेच मिळालेला अंक संदर्भात RNI आणि PIB कार्यालयाकडून त्याची कोणतीही अधिकृत माहिती लिखित स्वरूपात प्रकाशाकांना कळवली जात नाही. यामुळे अंक मिळाला किंवा नाही. हा संभ्रम कायम राहतो आहे.सदर निर्णयाचा पुनर्विचार करावा. नियम बदलावा, रद्द करावा, निर्णय मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली असता खा. श्रीनिवास पाटील यांनी तात्काळ केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील पत्रकार आणि प्रकाशकांची असणारे अडचण व यासंबंधीने घ्यावयाच्या निर्णयाबाबत पत्र लिहिले आहे.

व्यापार, उद्योगप्रश्नी लवकरच बैठक घेणार उद्योगमंत्री उदय सामंत

 व्यापार, उद्योगप्रश्नी लवकरच बैठक घेणार  उद्योगमंत्री उदय सामंत


पुणे : आमचे सरकार शंभर टक्के उद्योजक आणि व्यापारी बंधूसोबत आहे. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच त्यांची मुंबईत आवश्यक त्या सर्व खात्याचे अधिकारी, सचिवांसोबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीतून उद्योग, व्यापाराचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, कोणताही घटक नाराज होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्रातून कोणताही उद्योग बाहेर गेलेले नाही. ऊलट हजारो कोटींची परदेशी गुंतवणूक उद्योगात आणली. डायमंड ज्वेलरी पार्कसाठी मुंबईतच २५ एकर जागा दिली आहे. केवळ उद्योग क्षेत्राला बदनाम करण्याचा काहींचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचाही त्यांना टोला लगाविला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड `मायटेक्स एक्स्पो` या भव्य प्रदर्शनाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन उद्योजकांसोबत संवाद साधला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रमुख पाहुण्यांचे मायटेक्सचे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पो मुंबई २०२४ च्या माहितीपत्रिकाचे अनावरण करण्यात आले. शिवाजीनगरातील सिंचन भवन येथील मैदानावर २९ ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शन असून दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशी वेळ आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र चेंबर राज्यातील व्यापार आणि उद्योगांच्या वाढीसाठी संयुक्तपणे काम करत आहे. महाराष्ट्र चेंबर करत असलेल्या अविरत प्रयत्नामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे. महसूल वाढीचा टक्काही वाढल्याने राज्यात उदयोग, व्यवसायांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे. मात्र काही जण राजकारणापेक्षा राज्यांची बदनामी करत आहेत. आमच्या सरकारने उद्योग, व्यवसायासाठी काही तत्काळ निर्णय घेतले आहेत. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ मध्ये तत्कालीन उद्योमंत्र्याच्या काळात यवतमाळ येथील जागा मिळविण्यासाठी उद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तत्कालीन सरकारच्या कार्यपध्दतीमुळेच अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आमच्या सरकारने कधीही उद्योजकांना अँटीचेंबर आणि नेत्यासोबत बैठकीसाठी प्रवृत्त केले नाही. त्यामुळेच उद्योगांचे अनेक प्रश्न आमच्या सरकारकडून मार्गी लागले आहेत आणि उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील. कोणालाही न भेटता ७५०० हजार कोटी रुपये उद्योजकांच्या खात्यात वर्ग केला आहे. तसेच प्रकल्प उभारताना त्या गावातील स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य दिल्यास वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सेमी कंडक्टरचा प्रकल्प उभारण्यासाठी आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे चेअरमन मनोहर जगताप पुढाकार घेत आहे. त्यांच्या उद्योगालाही पाठबळ दिले जाईल.
विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी उद्योग विस्ताराला चालना देण्यासाठी त्यांची धडपड असते. उद्योग विभागाच्या समस्यांबाबत डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात यावी, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे महिला उद्योग धोरण तयार करण्यात आले आहे. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्योजक महिलांसोबत परिषद ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये उदयोग क्षेत्रातील यशस्वी महिला त्यांना आलेले अनुभव मांडतील. प्रकल्प जातो तेव्हा त्याची जेवढी प्रसिद्धी होते तेवढी तो प्रकल्प येताना झाल्याचे दिसत नाही. तसेच येत्या ३० आँक्टोबरला व्यापार आणि उद्योजकांच्या प्रश्नावर सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. आँनलाइन व्यापाराच्या आव्हांनाला तोंड देण्यासाठी सरकारकडून काय मदत करता येईल, याबाबत चर्चा करण्यात येईल.


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री व्यापारी आणि उद्योजकांसाठी कार्यरत आहे. मायटेक्सच्या माध्यमातून राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना देणे, प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे तत्काळ निर्णय घेणारे मंत्री असल्याने उद्योग क्षेत्राला मोठे चैतन्य आले आहे. व्यापार्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या माध्यमातूनच मायटेक्सची संकल्पना रूजली. व्यापार आणि उद्योगांच्या प्रश्नी सरकार दरबारी संयुक्त बैठक घ्यावी.
दरम्यान उद्योग क्षेत्रातील विविध संघटनांनी मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिले. मान्यवरांच्या हस्ते आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे चेअरमन मनोहर जगताप, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी,  महाराष्ट्र चेंबरचे मायटेक्सचे पुणे विभागाचे मुख्य संयोजक दिलीप गुप्ता,  महाराष्ट्र चेंबरचे सेक्रेटरी जनरल सागर नागरे, एक्स्पो इंडियाचे जावेद शेख आदींचा सत्कार झाला. डाँ. विजयकुमार मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले. डाँ. गोविंद पानसरे यांनी आभार मानले.
००
फोटो ओळी-
१) मायटेक्स एक्स्पोमध्ये थेट उद्योगमंत्र्याशी संवाद कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी उपस्थितात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, रवींद्र माणगावे, मनोहर जगताप, शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी, राजेंद्र बाठिया.
२) दुसया छायाचित्रात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पो मुंबई २०२४ च्या माहितीपत्रिकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी उपस्थितात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी रवींद्र माणगावे, मनोहर जगताप, शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी, राजेंद्र बाठिया, जावेद शेख, सागर नागरे.

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे सोमवारी मुंबईत वितरण

  विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे सोमवारी मुंबईत वितरण

            मुंबईदि २८ :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कारकामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार सन 2021-22 चे वितरण सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनसेनापती बापट मार्गप्रभादेवीमुंबई येथे सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

            राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरकामगार मंत्री सुरेश खाडेशालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाविधान परिषदेच्या उपसभापती  निलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.  

            मुंबई शहर व जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगलकामगार आयुक्त सतीश देशमुखविकास आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहतील.

            रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्काराने भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांना गौरविण्यात येणार आहे. कामगार भूषण पुरस्कार टाटा मोटर्स लि.पिंपरी पुणे येथे इलेक्ट्रीशियन पदावर कार्यरत मोहन गोपाळ गायकवाड यांना प्रदान करण्यात येईलतर 51 कामगारांचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच mahakalyan या युट्यूब चॅनलवर थेट प्रसारण पाहता येणार आहे.

कामगार मित्र पुरस्कारासाठी भारतीय मजदूर संघाची निवड

            रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार सन 2021 करिता भारतीय मजदूर संघमहाराष्ट्र प्रदेश यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी करण्यात आलेली कामे विचारात घेऊन या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचेकडून संस्थेचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

            कामगारांच्या कल्याणासाठी किमान २५ वर्ष समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना सन २००० पासून या पुरस्काराने गौरविले जात आहे. रुपये ७५ हजारस्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी टाटा इंजिनियरिंग लोकोमोटिव्ह कंपनी लि. पिंपरी पुणेराष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूरवनाज इंजिनियरिंग पुणेबजाज ऑटो लि.पुणेघरडा केमिकल्स लि. लोटे रत्नागिरीमनुग्राफ इंडिया लि.शिरोली कोल्हापूरहाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या,) मुंबई या संस्थांना देण्यात आला आहेतर व्यक्तींमध्ये डॉ.बाबा आढावराजा कुलकर्णीमनोहर कोतवालएस.आर.कुलकर्णीडॉ.शांती पटेलकॉ.यशवंत चव्हाणदादा सामंतशरद राव या व्यक्तिंना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

कामगार भूषण पुरस्कार

            गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार्थींनी पुढील आयुष्यात अधिक जोमाने कार्य सुरू ठेवावेया उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरुप रु.५० हजार स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे  आहे.

             विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा कंपनीआस्थापनेत काम करतानाच सामाजिकसांस्कृतिकसाहित्यशैक्षणिकक्रीडासंघटन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कामगारांना मंडळाकडून सन १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. सन २०२३ पासून हा पुरस्कार विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार या नावाने प्रदान करण्यात येत आहे. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांमध्ये किमान ५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कामगारास या पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. पुरस्काराचे स्वरुप रु.२५ हजार रुपयेस्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.

0000

मनिषा सावळे/विसंअ/ 


Featured post

Lakshvedhi