Sunday, 3 April 2022

 गुढी वरील तांब्या उपडा का ठेवतात?

                 तांब्याची तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे ताब्यात असलेली कडुलिंबाची पाने,रेशमी वस्त्र हे शुभ लहरींनी भारित बनते.जमिनीच्या आकर्षणशक्ती मुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवरील सूक्ष्म अच्छादन बनण्यास सहाय्य होते. तांब्याची दिशा तिच्या सुलट ठेवली तर,संपूर्णत: ऊर्ध्वदिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनी लगतच्या कनिष्ठ व माध्यमिक स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठराविक अशा उर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा जमिनीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच ऊर्ध्व मंडलाला मिळण्यास साहाय्य होते.

म्हणून गुढीवरील तांब्या उपडा ठेवतात.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi