Tuesday, 30 November 2021


 

 Terms & Conditions

Fields marked with * are required.


Pls add your Mobile No. with ISD code i.e. 91 for India


Full Name *

Mobile No. (with ISD code) *

91

Mobile No

State/UT *


Select State

District *


Select District

Verification Code

Verification Code 

Undertaking :

I hereby declare that the information given in this form is true and correct to the best of my knowledge and belief. I have not resorted to plagiarism while writng the lyrics. In case any information given in this application proves to be false or incorrect, my entry may be rejected.

Helpdesk: In case of Any query in filling this form please contact our helpdesk executives in between 9am-6pm on +91 82797 68451 or +91 99992 76781

 Azadi Ka Amrit Mahotsav, Ministry of Culture, Government of India

'Lori' Contest

The entries will start on 31/10/2021 and the national level final will be held on 08/03/2022 (International Women’s Day).

Click here to participate in 'Lori' Contest

Participate Now

English

Lori Contest

Introduction

Indian diverse culture and our rich traditions make for one of the most ancient albeit advanced way of human civilisation. From chanting Mantras on important occasion to folk songs that are hummed by us – India is truly a land that never ceases to amaze and surprise.

Just like every Indian region has its own set of unique traditions, cuisines, and musical instruments - every Indian region also has its own set of lori (lullabies).

Lori (Lullabies) form the earliest memories of our childhood – the most primary forms of storytelling, primarily from a mother to her child but also by grandparents and the entire extended family. Here, sanskars are inculcated in young children through loris (lullabies) and they are introduced to the culture. Loris (Lullabies) also have their own diversity. More often than not, our loris (lullabies) are written around our local surroundings, nature, local heroes and matters of local historical importance. From Assam’s NisûkāniGēēt, to Tamil Nadu’s Thalattupaatu, and from Gujarat’s Loris (Lullabies) to the Kannada LaaliHaadu– each region has its own way of not just making babies fall asleep but simultaneously educating them about the family values, local culture and practices.

Prime Minister Narendra Modi’s love for children is often showcased through many of his personal interactions and unique outreach like Pariksha pe Charcha and the Exams Warriors book.

In a world that is swiftly becoming digital, this wonderful practice and our traditional loris (lullabies) also afford an opportunity to be told afresh – the same age-old stories but told in new formats or new stories told in tune with modern impulses. In order to revive this beautiful tradition and with it, preserve the local compositions for the generations to come, we are organising a Lori (Lullaby) competition for parents, guardians, and children across India.

Selection Criteria

Every Indian is invited to send in their entries here.

Loris (Lullabies) pertaining to patriotism, poems, songs, something or the other which can be easily recited by mothers in every home to their little children shall be eligible for the contest . In these loris (lullabies) there should be reference to modern India, the vision of 21st century India and its dreams.

Participants are encouraged to submit loris (lullabies) in their mother tongue but if the participant is conversant in more than one language then they can choose their language of choice.

The competition will be held in three stages to incentivize local stories to be told and be declared winners and also have the chance to compete at state and national level.

Stage

01 

Stage

02

Stage

03

District level

Best entries from a particular district will be selected and will be declared as District Level winners to be selected by a specially constituted jury. Each winner at the district level will advance to the state level competition.

Winning Entries

The Lori contest will feature unique loris (lullabies) from every region across our vibrant country and the lori (lullaby’s) that stand out shall be rewarded publicly and will be provided a national audience.


Proposed Timeline

Sr.No. Particular Location Date

1 District Level Website - Virtual Mode 31/10/2021 to 31/01/2022

2 State Level TBD 10/02/2022 to 28/02/2022

3 National Level TBD 08/03/2022

Sitemap | Feedback| Downloads| Login| Privacy Policy

Copyright © 2021 Azadi Ka Amrit Mahotsav, Government of India. All Rights Reserved.


Competitions

Jan Bhagidari

History Corner

Blog

Gallery

Contact


 Azadi Ka Amrit Mahotsav, Ministry of Culture, Government of India

'Deshbhakti Geet' Competition

The entries will start on 31/10/2021 and the national level final will be held on 13/04/2022 (Baisakhi).

Click here to participate in 'Deshbhakti Geet' Competition

Participate Now

English

Deshbhakti Geet Competition

Introduction

Life desires continuous progress, desires development, desires to surpass heights. However much science may advance, however much the pace of progress may be, however grand the buildings may be, life feels incomplete. But when song-music, art, drama-dance, literature is added to these, their aura , their liveliness increases many times. In a way if life has to be meaningful, all these too are as necessary….that is why it is said that all these forms act as a catalyst in our lives, act to enhance our energy. The role of songs – music and other art forms is major in developing the inner self of humans, in creating the path of journey of our inner self. And another strength of these is that neither time nor boundaries can limit them…not even beliefs or discordance can limit these.

At the time when our nation gained Independence, several songs, ballads, and hymns written in the many dialects and languages of our vibrant nation and punctuated by the music and sound of unique instruments from different regions of the country, brought every Indian together!

Patriotic songs have always played an important role in boosting our morale and fostering a spirit of love towards the nation. This, is a tradition that has been our strength whenever we have been called upon to come together for the national cause.

Under the leadership of Prime Minister Narendra Modi, a New India is on the rise – one that takes pride in our nation’s many achievements and its boundless diversity. Not only are we becoming more aware, but are also increasingly taking pride in our historical landmarks as also our present-day achievements.

Be it the mighty Himalayas, the great expanse of the Rann of Kutch or the beautiful Ghats that make up our coastline – the diverse geography, rich history and vibrant demography of India gives each of us a different reason for our affection and admiration towards Maa Bharati.

As the nation marks its 75th year of Independence, let’s rekindle the sense of pride in our collective identity. In this period of Amrit Kaal, let us write new patriotic songs which will reverberate with the spirit of New India. The colours of one’s art, culture, song, music must certainly be filled in Amrit Mahotsav too.

Participate in the ‘Deshbhakti Geet’ contest open for people across India.

Selection Criteria

Be it adolescents or adults, love and devotion towards our motherland has always found a special corner in all our hearts. In an effort to give voice to India’s patriotic soul, every Indian with ages of 10+ is invited to send in their entries here.

These patriotic songs can be in the mother tongue, can be in national language, and can be written in English too. But it is essential that these creations reflect the thought of new India; inspired by the current success of the country, it should be such that fuels the country’s resolve for the future.

The competition will be held in four stages to incentivize local flavours to emerge and be declared winners and also have the chance to compete at district, state and national level.

Stage

01

Stage

02

Stage

03

Stage

04

Tehsil / Taluka Level

Each district will organise these competitions at the Tehsil / Taluka levels. The competition at the Tehsil / Taluka levels will be conducted digitally by uploading the composition along with a few other details.

Winning Entries

'Deshbhakti Geet' thus selected as National Winners will be provided a national platform. The winning compositions will be taken up by some of India’s most accomplished artists at a star-studded event hosted by the renowned lyricists and famous singers.

Proposed Timeline

Sr.No. Particular Location Date

1 Launch New Delhi 31/10/2021

2 Tehsil / Taluka Level Digital Participation Website - Virtual Mode 31/10/2021 to 31/01/2022

3 District Level TBD 15/02/ 2022 to 28/02/2022

4 State Level TBD 10/03/2022 to 31/03/2022

5 National Level TBD 13/04/2022

Sitemap | Feedback| Downloads| Login| Privacy Policy

Copyright © 2021 Azadi Ka Amrit Mahotsav, Government of India. All Rights Reserved.


  

Page last updated on: 30-11-2021


Visitors: 18171657


 TOP

About

Events & Activities

Competitions

Jan Bhagidari

History Corner

Blog

Gallery

Contact


 *"३६ आकडा आणि ६३ आकडा"* 


*३६* आकड्याचा *विचार* केला तर, *तीन* आणि *सहा* दोन्ही आकडे *एकमेकांकडे पहात* नाहीत. दोघेही टाईट पणाने *पाठीला पाठ* लावून उभी आहेत. एकमेकांचं *तोंडही* पहात नाहीत.

त्याप्रमाणे *माणसांच* असतं. छत्तीसचा आकडा हा *चाळिशीच्या* आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा *अहंकाराने*, *ताकदीने*, *पैशाने*, *परिपक्व* असल्यामुळे तो नेहमीच *अहंकारी* असतो. *कमीपणा* घेत नाही. मला *गरज* नाही, मी त्याचं *तोंड* पाहणार नाही, असे *शब्द* त्याच्या *तोंडात* असतात. सख्ये भाऊ *पक्के वैरी* होतात. आणि *हातात हात* न घेता *पाठीला पाठ* लावतात.      

आता *६३* आकडा पहा.

या आकड्याने *साठी* ओलांडल्या मुळे आता हे दोघेही *नम्र* झालेत. दोन्ही आकडे *एकमेकांकडे* पाहतात. हातात *हात* घेतात. एकमेकाला *आलिंगन* देतात. माणसाचं *असंच* असतं, एकदा साठी *ओलांडली* की, *नम्र* होतो. कारण ना *ताकद*, ना *तारुण्य*, ना *पैसा*, ना *सत्ता*, काहीच *राहत* नाही. म्हणून हा *नम्र* होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी *बालपण* विसरतो, *लग्न* झाल्यावर *आई वडिलांना* विसरतो, *मुलं* झाल्यावर *भावांना* विसरतो, *पैसा* आला की आपले *नातेवाईक* विसरतो, आणि *म्हातारपणी*, जेवढ्यांना *विसरला* होता त्यांची *आठवण* काढत बसतो. 

*६३ च्या* या आकड्या प्रमाणेच *संयम* राखणे हा *आयुष्यातला* फार मोठा *गुण* आहे. कारण एक चांगला *विचार* अनेक *वाईट* विचारांना *नाहीसा* करतो.    

 *वयाने* कोणी कितीही *लहान मोठा* असु देत. *वास्तवात* तोच मोठा असतो, ज्याच्या *मनात* सर्वासाठी *प्रेम*, *स्नेह* व *आदर* असतो. आयुष्यात तुमच्या *सगळ्या अडचणी* सोडवू शकेल अशी व्यक्ती *शोधू* नका. तर,, तुम्हाला *कोणत्याही अडचणीत* एकटे *सोडणार* नाही अशी *व्यक्ती* शोधा...!!


🌹🌹🌹🌹🌹🌹

🙏🙏🙏🙏🙏🙏

 स्पेनच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट;

शैक्षणिक, सांस्कृतिक सहकार्य, पर्यटन वाढविण्याबाबत चर्चा

            मुंबई, दि. 29 : स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डॉमिन्गेझ यांनी सोमवारी (दि. २९) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.

            स्पेन आणि भारतामध्ये व्यापारासह शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबद्दल आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

            जगभरात स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या ५०० दशलक्ष इतकी असून भारतात देखील स्पॅनिश भाषा शिकण्याकडे युवकांचा कल वाढत असल्याचे जोस मारिया यांनी सांगितले. 

            स्पेनमध्ये मोठा भारतीय समुदाय असून भारतातून स्पेनमध्ये अधिक पर्यटक यावे तसेच स्पेनमधून देखील भारतात अधिक पर्यटक यावे यासाठी आपण प्रयत्न करू असे राजदूतांनी सांगितले.

            महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी यांसह अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असून स्पॅनिश पर्यटकांना महाराष्ट्रात येऊन खचितच आनंद होईल असे राज्यपालांनी सांगितले. मात्र त्या दृष्टीने मुंबई - माद्रिद थेट विमानसेवा सुरु झाल्यास पर्यटनाला अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

            यावेळी स्पेनचे मुंबईतील वाणिज्यदूत फर्नांडो हेरेडिया उपस्थित होते.


**

Spanish Ambassador to India calls on Governor Koshyari; calls for enhancing educational, cultural and tourism cooperation

       The newly appointed Ambassador of Spain to India Jose Maria Ridao Dominguez called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday (29th Nov).

      The Ambassador told the Governor that Spain is keen to enhance business and economic cooperation with India while promoting more cultural, educational and tourism exchanges. The Ambassador said there are 500 Spanish speakers worldwide and that a large number of Indian youths are learning Spanish.

      The Governor told the Ambassador that Maharashtra has many sites of world heritage such as Ajanta and Ellora Caves that might interest Spanish travelers. He called for starting direct air connectivity between Mumbai and Madrid to facilitate tourism and people to people exchanges.


      The Consul General of Spain in Mumbai Fernando Heredia was also present.


0000




 जलसंवर्धन योजनेतून 7 हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती

•      1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार

 

       मुंबईदि. 29 : मृद व जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7 हजार 916 जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

            मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील 0 ते 100 हेक्टर101 ते 250 हेक्टर आणि 251 ते 600 हेक्टर या सिंचन क्षमतेच्या एकूण 90 हजार योजनांपैकी अतिधोकादायकधोकादायक व दुरुस्तीयोग्य असलेल्या सुमारे 16 हजार जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे प्रकल्पांची दुरुस्ती करून मूळ पाणी साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे असे आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतील 7 हजार 916 प्रकल्पांच्या दुरुस्तीकरिता 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे. यानुसार सर्व प्रकल्पांच्या दुरुस्तीची विशेष मोहीम सन 2020-212021-22 आणि 2022-23 अशा तीन वर्षात करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामाला गती देऊन आतापर्यंत या विभागाने गेल्या दोन वर्षात 306 कोटी रुपयांच्या 1 हजार 405 योजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

            जलसंधारण विभागजलसंपदापाणीपुरवठा व स्वच्छता विभाग कृषी विभाग आणि सर्व जिल्हा परिषद यांच्याकडील 16 हजार नादुरुस्त प्रकल्पांची दुरुस्ती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून राज्यांत ० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेचे अनेक प्रकल्प निर्माण केले गेले परंतु किरकोळ देखभाल दुरुस्तीअभावी यांची दुरावस्था झालेली आहे. या सर्व प्रकल्पांच्या दुरुस्तीमुळे 8 लाखांहून अधिक टी.सी.एम पाणीसाठा पुनर्स्थापित होणार आहे.

0000




 

Kokan aplech aasa

 *मेरे कणकण में कोकण समाया मितवा*


माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी रत्नागिरी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही... मी रत्नागिरी शिवाय राहू शकत नाही... कारण, कारणं तर खूप आहेत..


कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला खुश ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत...

इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही... त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो...


इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे...


इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीची 20 भर आंबोळ्या टाकून घर जेवू घालते इथली बाई..


फणसाच्या अठीळा शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..

इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!

आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!


पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती... पण, आरडाओरडा न करता, एकमेकांना श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली...


एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली... 


मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प... मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2.50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!

त्यांचं म्हणणं एकच,"माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील..."


इथं मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे... मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही...


आपलीच पोरं म्हणून आईवडील पोसतात...

बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत...


कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा... नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील...


जीव लावणे, घासातला घास देणे कोकणात शिकावे..

इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही.. 


इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो.. 

मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जण गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!

आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!

सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते... त्यात गरिबांचे प्रेम असते..

भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..


मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे... पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही...


माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही...

मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे... सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं आपुलकीने करतात...

इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे..

खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..

धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..

हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार...

अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं...

फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..

रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..

करवंद, जांभळे, तुरट गोड...

गणेशोत्सव, शिमग्याची गोष्टच न्यारी... माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..

एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं...


अन मग... मी पण इथलीच झाले आहे... गावाहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..

हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं

या मातीत मिसळून जायची तयारी आहे...


मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन...

माझं घर आहे इथं...

प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन... पण कोकण नाही सोडणार.


(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे)


*©️प्रतिभा देशमुख, रत्नागिरी*

14/7/2021🌹🌹🌹

 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण आवश्यक--

पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी 

            मुंबई, दि. 29 : येत्या 1 डिसेंबर पासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

            शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.

            शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत देखील विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे. 

            उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण : 2021/प्र.क्र.178/एसडी-6, दि. 29 नोव्हेंबर 2021 पहावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Monday, 29 November 2021


 


 

 


 


 सार्वजनिक आरोग्य विभाग


कोविडच्या नव्या विषाणुसंदर्भात मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता

आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत हवाई प्रवाशांची अद्ययावत माहिती मिळाल्यास

संसर्गाला रोखणे सोपे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

       कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे सांगितले. 

            ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच 7 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे. 

            परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असे सांगितले.

 

*राज्य सरकारची नवीन नियमावली अराजकतेला आमंत्रण देणारी: ललित गांधी*


*व्यापारयांच्यावर लागू केलेली दंड आकारणी रद्द करण्याची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ची मागणी.*


कोरोना च्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची केलेली तरतूद ही राज्यात व्यापारी वर्गांमध्ये नाराजी निर्माण करणारी व अराजकाला आमंत्रण देणारी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.


सदर तरतूद ही व्यापारयांच्यावर अन्याय करणारी असून अतार्किक आहे. व्यापारी आपल्या आस्थापनांमध्ये लसीकरण पूर्ण केलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देतील. या संदर्भातले आवश्यक ते प्रबोधन ही करतील. परंतु एखाद्या ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला देणे हे कुठल्याही पद्धतीने तर्कसंगत नाही. त्यामुळे सरकारने दंडाची ही तरतूद त्या त्या व्यक्तीला लागू करावी. व्यापारी आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद तात्काळ रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदनाद्वारे केली आहे.


गेल्या दोन वर्षामध्ये कोरोना संबंधीच्या विविध निर्बंधांमुळे मुळातच व्यापारी वर्ग अडचणीत आलेला आहे. आता कुठे व्यापार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे.

दोन वर्षाचे नुकसान भरून कसे काढायचे या विवंचनेत व्यापारी असताना अशा प्रकारच्या तरतुदी करून, राज्यातल्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर वेगवेगळे अतार्किक निर्बंध लादणे हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसवणारे आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुकान सोडून अन्य ठिकाणी बिना लसीकरण आढळणाऱ्या लोकांची जबाबदारी मग नेमकी कोण घेणार आहे.. त्यासाठी दंड कोणाला आकारला जाणार आहे? सरकारी कार्यालयात एखादा नागरिक विना लसीकरण आढळला तर त्याचा दंड कोणाकडून आकारला जाणार आहे? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहेत. सरकारने या विषयात विलंब न करता हा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशाराही ललित गांधी यांनी यावेळी दिला.


 नगर विकास विभाग

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

            कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या. अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणुक लढविण्याच्या संधीपासुन वंचित रहावे लागू नये यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर काढण्यात येईल.

            मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्याकरीता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे.

            तथापि, जात पडताळणी समित्यांकडील कामाच्या भारामुळे केवळ वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे, उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी उपरोक्त सर्व अधिनियमांत यापूर्वीच सुधारणा करुन महानगरपालिका/नगरपरिषदांच्या सार्वत्रिक/ पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना संबंधित उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची 12 महिन्यांची मुदत हमीपत्रावर देणे अशी तरतूद करण्यात आली होती.


-----०-----

 ग्राम विकास विभाग


ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

            ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल.

            ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.

            महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10 च्या पोट कलम (1क) आणि 30-1क आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 12 (क), 42 (6-क), 67 (7-क) मधील तरतुदीनुसार निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर 2022 किंवा त्यापूर्वीचा असेल. मात्र, नामनिर्देशन भरण्याच्या दिनांकापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल परंतु नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकाला त्या व्यक्तीस वैधता प्रमाणपत्र मिळाले नसेल अशी व्यक्ती ती निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून 12 महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र देईल. त्यात कसूर झाल्यास त्या व्यक्तीची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावी अशी तरतूद देखील करण्यास आज मान्यता देण्यात आली.

-----०-----

ग्राम विकास विभाग

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या

वाढविण्यासंदर्भात मान्यता

            राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

            सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरुन 2248 इतकी होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होईल.

            राज्य निवडणूक आयोग, जिल्ह्यातील निर्वाचक गटांतून थेट निवडणूकीद्वारे निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करील. तथापि, एखाद्या जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणूकीव्दारे भरवण्यात येणाऱ्या अशा जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण, शक्य असेल तेथवर, राज्यभर सारखेच असेल.

            पंचावन्न निर्वाचक गटांची किमान संख्या, राज्यातील जिल्ह्यांमधील कमी लोकसंख्या असलेल्या जिल्हयांसाठी नियतवाटप करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेऊन, त्या जिल्ह्यासाठी पुढील सुत्राचा अंगीकार करुन काढलेल्या प्रत्येक लोकसंख्येसाठी अतिरिक्त निर्वाचक गट असेल :-

 “क्ष” म्हणजे राज्यातील जिल्ह्यामधील सर्वात अधिक लोकसंख्या. “वाय” म्हणजे राज्यातील जिल्ह्यामधील सर्वात कमी लोकसंख्या उपरोक्त प्रमाणे लोकसंख्यासूत्राच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त निर्वाचक गटांची संख्या निर्धारित करतेवेळी जर लोकसंख्येचा अपूर्णांक अर्धा किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर प्रत्येक अतिरिक्त निर्वाचक गटासाठी तो एक निर्वाचक गट असा हिशेब धरण्यात येईल आणि जर तो अर्ध्यापेक्षा कमी असेल तर, तो दुर्लक्षित करण्यात येईल.

कलम 9 च्या पोटकलम (1) च्या खंड (क) मध्ये निर्धारित केल्याप्रमाणे, कोणत्याही परिस्थितीत, निर्वाचक गटांची एकूण संख्या 85 निर्वाचक गटांपेक्षा अधिक असणार नाही अशी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-----

 कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा

केंद्राच्या सूचनांची वाट  पाहता तातडीने कामाला लागा

                        -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

--------------------

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा

विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश

----------------------

'कुछ नही होता यारहे अजिबात चालणार नाही

            मुंबईदि. 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहेमात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावीपरत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाहीत्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणेअनावश्यक गर्दी  करणेसुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणेविशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय  देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेयासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट  पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

            आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यारअसा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क  वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा.

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीपोलीस आयुक्तपोलीस अधीक्षकमुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतलीत्यावेळी ते बोलत होतेयावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखराज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओकडॉ शशांक जोशीडॉ राहुल पंडितडॉ अजित देसाईडॉ खुस्राव्ह बजानडॉ केदार तोरस्करडॉ झहीर अविराणी , डॉ वसंत नागवेकरडॉ नितीन कर्णिकमुख्य सचिव सीताराम कुंटेप्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास<span lang="HI" style="font-size: 12.0pt; line-height

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा

                        -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

--------------------

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा

विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश

----------------------

'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही

            मुंबई, दि. 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

            आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यार" असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा.

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ अजित देसाई, डॉ खुस्राव्ह बजान, डॉ केदार तोरस्कर, डॉ झहीर अविराणी , डॉ वसंत


Featured post

Lakshvedhi