Monday, 6 January 2025

आनंददायी शिक्षणाद्वारे राज्याचा लौकिक वाढवावा

 आनंददायी शिक्षणाद्वारे

राज्याचा लौकिक वाढवावा

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. 6 :- शिक्षणसंस्थेचे यश व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची भूमिका अत्यंत मोलाची राहणार आहे. यासाठी संस्था चालकांनी या शिक्षण पद्धतीत सक्रिय सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यास पुढे यावेअसे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर नामांकित शिक्षण संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधींचे चर्चासत्र यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले कीसर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे आहे. देशाची आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षणसंस्था शिक्षण प्रसाराचे काम अविरतपणे करत आहेत. यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. संस्थेत शैक्षणिक वातावरण अधिक पोषक ठेवण्यात संस्थाचालकांची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे शिक्षण संस्थांनी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा कृतिवर अधिक भर असल्याने  शिक्षण संस्थेच्या चांगल्या कामासउपक्रमास सहकार्य केले जाईल. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञसंस्थाचालक यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन शिक्षण विभागाचे काम समन्वयाने पुढे नेऊया. शिक्षण संस्थांच्या  मागण्याबाबत शालेय शिक्षण विभाग नेहमीच सकारात्मक आहे.  

चर्चासत्रात संस्थाचालक व संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या शिक्षक भरतीसंच मान्यतापवित्र पोर्टल११ वी प्रवेश प्रक्रियारोस्टर तपासणीजुनी पेन्शनसेवा ज्येष्ठताअशैक्षणिक कामे यासंदर्भातील मुद्यांचा प्राधान्याने विचार केला जाईलअसे शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

चर्चासत्रास आमदार  ज्ञानेश्वर म्हात्रेशालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावारप्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावीमाध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशीमहेश पालकरबालभारतीचे के.बी. पाटील आणि शिक्षण संस्था चालक व शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.

एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरण व्यवसाय वृद्धीसाठी सल्लागार नियुक्त करावा

 सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुबंईदि. 6 : एन डी स्टुडिओचे अद्ययावतीकरण करुन तेथे चित्रपट निर्मिती व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावे. व्यावसायिक कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडिओची आर्थिक सक्षमता वाढविण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मंत्रालयात एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदीसांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह फिल्मसिटी  तसेच एनडी स्टुडिओचे  संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.शेलार म्हणाले कीमराठी निर्मातेकलाकारतंत्रज्ञ  यांना  सहाय्यक  ठरतील अशा पूरक सुविधा उपलब्ध करुन देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाची आहे. त्यादृष्टीने एनडी स्टुडिओचे अद्ययावतीकरण हे भविष्यातील मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन करण्यात यावे. याचा परिपूर्ण आराखडा निर्मितीसाठी तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करण्यावर भर देताना त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे. तसेच या स्टुडीओत उपलब्ध रिकाम्या जागेचा अधिक योग्य वापर करण्याच्या  दृ्ष्टीनेही  नियोजन करावे. या ठिकाणी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रामुख्याने मराठी सिरियल्ससिनेमावेब सिरीज ओटीटी माध्यमात काम करणाऱ्या निर्मातेकलाकारांसाठी आवश्यक सुविधा  उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी दिल्या.

००००

लोकायुक्तांकडून राज्यपालांना अहवाल सादर

 लोकायुक्तांकडून राज्यपालांना अहवाल सादर

 

मुंबई, दि. 6 : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. 6) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवनमुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा 51 वा वार्षिक एकत्रित अहवाल  सादर केला.

लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२3 या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे हजार 790 नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला 4 हजार 583 प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२3 मध्ये 9 हजार 373 प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध झाली.

नोंदणी केलेली 4 हजार 555 प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२3 च्या वर्षअखेरीस 4 हजार 818 प्रकरणे प्रलंबित राहिलीअसे लोकायुक्त कार्यालयाकडून यावेळी कळविण्यात आले.

महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गा- हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात 

राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

 राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

       मुंबईदि. 6 : गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी  योजना राबविण्यात येतात. प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

   गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली.

                गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणालेसर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे (महा हाऊसिंग)म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होत आहे. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणीही वाढत आहे. राज्यातील प्रगतीपथावरील गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी.

                 ज्येष्ठ नागरिक धोरण २०२४प्रधानमंत्री आवास योजनागिरणी कामगारांना घरेसर्वसमावेशक गृहनिर्माण योजनाधोकादायक इमारतींचा पुनर्विकास या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

   या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह,धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवासम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकरमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकरमुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

****

अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू

 अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू

स्थानिक आमदार यांनी शिरोळ तालुक्यातील पूर नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री म्हणालेअलमट्टीबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार

 नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ’ दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांना सकल जैन समाज आणि नांदणी मठाच्यावतीने प्रजागर्क’ पदवी

 

कोल्हापूरदि. 6 : नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला लवकरच तीर्थक्षेत्र ’ दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात श्री. फडणवीस बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असताना मला आनंद होत असून जैन समाजातील ऐतिहासिक व सर्वात मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले. नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगळे स्वरूप पाहता आले. आज पुन्हा याच समाजाचे आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळाले. जैन समाजातील व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक नागपूर येथे भेटले आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटलेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरआमदार सर्वश्री डॉ.राजेंद्र पाटील - यड्रावकरराहुल आवाडेअमल महाडिकअशोक मानेशिवाजी पाटीलमाजी मंत्री सुरेश खाडेमाजी खासदार निवेदिता मानेमाजी खासदार राजू शेट्टीमाजी आमदार प्रकाश आवाडेजैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराजमठाधिपती, 10 आचार्य महाराज, 7 मुनी महाराज उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वस्तुत्व महाकाव्य ग्रंथाच्या प्रतिकृतीचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने प्रजागर्क’ पदवी देण्यात आली.

नांदणी मठात एक वेगळं जीन शासन पाहायला मिळत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीआचार्यांचे आशीर्वाद आणि सर्व भाविकांच्या दर्शनाचा लाभ यासाठी कार्यक्रमाला येण्याचे ठरवले. जैन तत्त्व जगा आणि जगू द्या’ अशी आहेत. जगामध्ये बरेच विचार आले आणि नष्ट झाले. परंतु जैन विचार अजूनही शाश्वत आहेत. जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल’ असा विचार जैन समाजाचा आहे. सर्वाधिक समाजसेवा करणारा जैन समाज असून समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. संपूर्ण जीवसृष्टी वाचविण्याचे विचार जैन विचारात आढळून येतात. समाजाला सशक्त आणि सन्मार्गावर ठेवणे हे मोठे काम आचार्य करतात. जैन समाजातील आचार्य, तीर्थंकार यांनी परंपरा आणि विचार आजही जीवित ठेवले आहेत. हेच संस्कार काल आणि स्थान यांचा विचार करीत नव्या स्वरूपात नव्या रूपाने समाजापर्यंत पोहचवले जातात.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीधर्मशास्त्र कधीच राजशक्तीवर अवलंबून राहिले नाही. परंतु धर्मसत्तेच्या विकासाच्या यात्रेमध्ये राजसत्ता निश्चितच प्रयत्न करेल. देशातील पहिले जैन महामंडळ राज्यात स्थापन केले आहे. महामंडळाच्या सुधारणांबाबत आलेल्या सूचनांचा विचार करून युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महामंडळ अधिक बळकट करू. नांदणी मठात मिळालेल्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न करूअसे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले

-li.आनंदी°पहाट.il-

 ⚜🚩⚜🚩🕉🚩⚜🚩⚜


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                          

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

             *संतकवी, महिपती*

             *दासगणू महाराज*

            *यांच्या जन्मदिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜🚩⚜🚩⚜️🚩⚜🚩⚜    


    *जे जे तुम्ही वदवाल कांही ।*

    *तेंच लिहीन कागदीं पाहीं ।*

    *स्वतंत्रता मजला नाही ।*     

    *मी पोषणा तुमचना असें ॥*          

        *.... संत दासगणु*.


        *लिहण्याची प्रतिभा लाभणे ही परमेश्वर कृपाच. पण त्याला अपेक्षितच लिहतात ते संतच. यामुळेच त्यांचे लिखाण भक्तांना अमृत ठरतय. शंभर वर्षे कोट्यावधी भक्तांना त्यांच्या भक्तीरसपुर्ण शब्दानी संजीवन दिलेय. आज शिर्डी असो वा शेगाव जगभर भक्त दासगणुंचे ऋणी आहेत.*

        *आधुनिक महिपती.. संत दासगणू म्हणजेच नारायण दत्तात्रय सहस्रबुद्धे (१८६८-१९६२). जन्म आकोळनेर. गणपतीसारखे त्यांचे पोट म्हणून घरच्यांनी  नाव ठेवले गणेश. हे सहस्रबुद्धे घराणे हे मूळचे कोतवडे जि. रत्नागिरी येथील पण कामानिमित्त अहमदनगर येथे स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण चौथी पर्यत. सुखी परिवारात जन्म.*

        *त्यांच्या जीवनातील घटना बघता त्यांच्याकडून मोठे कार्य घडावे हीच परमेश्वर इच्छा होती. त्यांना बालपणापासून काव्याची आवड. पण शिक्षणात लक्ष नव्हते. तेव्हा तमाशात त्यांच्या काव्याला मागणी होती. पण "तुझे कर्तुत्व काही नाही, गावात जो मान आहे तो आमच्यामुळे", असे घरच्यांचे बोल ऐकताच स्वाभिमानाने घर सोडले. लावणीकार ते संत प्रवास सुरू झाला.*   

        *देहयष्टी उत्तम होतीच. एका इंग्रजी पोलीस अधिकाऱ्याने बघताच त्यांना पोलीस म्हणून नोकरी दिली. दहा वर्षे नोकरी आणि तमाशासाठी काव्यलेखन सुरू होते. अनेक गावात दरोडे टाकून दहशत पसरवणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी नेमणूक झाली. त्यासाठी हे गणेश एका मंदिरात रामदासी वस्त्र घालून मुक्कामाला असतांना त्या डाकूला सुगावा लागला. त्याने गणेशांच्या दोन साथीदारांना मारले पण गणेशांना सोडले. त्या मंदिरात केलेल्या सेवेचे फळ म्हणून जीव वाचला असे वाटले. त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी नोकरी सोडली.* 

        *त्यांना वामनशास्त्री इस्लामपूरकर हे गुरु लाभले. त्यांनी शिवमंत्र दिला तरीही पंढरपूर वारी करायला सांगितले. त्यांनी त्यांचे दास म्हणून दासगणू नाव स्विकारले. तमाशा सोडून महाराजांची प्रतिभा भक्तीरसात चिंब होवू लागली. त्यांचा अध्यात्माचा गाढा अभ्यास होता. ते सहजतेने तत्त्वज्ञान मांडायचे. कीर्तनकार दासगणूंच्या रसाळ वाणीने राज्यभर भक्तीचा महिमा वाढला. शिर्डीच्या साईबाबांची भेट झाली. बाबांच्या उपस्थितीतच संस्थान उभे राहीले अन् त्या संस्थानचे अध्यक्ष म्हणून ३९ वर्षे भक्तीभावाने पद सांभाळले. तिथे बाबांच्या समोरच रामनवमी उत्सव प्रारंभ केला. स्वतः दरवर्षी कीर्तन केले.*

        *दासगणु महाराज निस्पृह अन् मृदू मनाचे. त्यांनी बालपणापासून अनाथ मुलाचा घरात सांभाळ केला.. संस्कार केले. यामध्ये वरदानंद भारती एक. तर दुसऱ्या छगनराव बारटक्केंना गजानन विजय ग्रंथ लिहून काढण्याचे पुण्य लाभले. ते पण पूढे कीर्तनकार झाले. दासगणुंनी प्लेगच्या साथीत अनेकांना मदत केली. नांदेड जवळ गोरटे येथे भक्त देशमुख कुटुंबाने त्यांना शेत दान दिले.. मंदिर बांधून दिले. आज गोरटे संस्थान दासगणूंचे संस्थान ओळखले जाते. वरदानंदानी दासगणुंचे साहित्य प्रकाशित केले.*

        *आज आणि.सदासर्वकाळ दासगणुंचे नाव घराघरात घेतले जाणारच. गजानन महाराज स्तोत्र असो वा विजय ग्रंथ, साईबाबांची पोथी याची लाखो पारायणे होतात. आरती नित्य म्हटली जाते. दासगणुंनी वयाच्या ७२ व्या वर्षी हा गजानन महाराज विजय ग्रंथ लिहला. याचे हक्क संस्थानला दिले. या ग्रंथाचे इंग्रजी.. हिंदी.. गुजराथी.. कानडी, तेलगू.. तमिळमध्येही अनुवादीत आहे.*   

        *दासगणू असामान्य प्रतिभेचे धनी होती. ८५ संतांची चरित्र.. अनेक आरती, संतकथामृत.. भक्तीसारामृत, सुमध्वविजय सारामृत.. आद्य शंकराचार्यचरित्र, विष्णू सहस्त्रनाम.. उपनिषदावर टीका, अमृतानुभव, शांडिल्यसुत्र टीका तसेच १२५ बोधकथा असे प्रचंड लिखाण भक्तांना अत्यंत सुलभपणे रसाळ भाषेत उपलब्ध करुन दिलेय. दासगणूंची जीवनभरातील संत वृत्तीने संत म्हणून ओळख जगात आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी १९६२ मध्ये संत ज्ञानेश्वर समाधी दिवशीच पंढरपूरला देह ठेवला हे पण त्यांच्या भक्तीचे फळ.*

        *आमच्या जीवनात भक्तीभावाची बीजे रुजविणाऱ्या संत दासगणूंना जन्मदिनी त्रिवार वंदन.*


⚜🔆⚜🔆🚩🔆⚜🔆⚜

  1️⃣

  *गण गण गणात बोते*

  *हे भजन प्रिय सद्गुरुते*

  *या श्रेष्ठ गजानन गुरुते*

  *तुम्ही आठवित रहा याते*


  *हे स्तोत्र नसे अमृत ते*

  *मंत्राची योग्यता याते*

  *हे संजीवनी आहे नुसते*

  *व्यवहारिक अर्थ न याते*


  *मंत्राची योग्यता कळते*

  *जो खराच मांत्रिक त्याते*

  *या पाठे दुःख ते हरते*

  *पाठका अती सुख होते*

  *हा खचित अनुग्रह केला*

  *श्री गजानने तुम्हांला*

  *घ्या साधुन अवघे याला*

  *मनी धरून भाव भक्तीला*


  *कल्याण निरंतर होई*

  *दुःख ते मुळी नच राही*

  *असल्यास रोग तो जाई*

  *वासना सर्व पुरतिलही*

  *आहे याचा अनुभव आला*

  *म्हणुनिया कथित तुम्हांला*

  *तुम्ही बसून क्षेत्र शेगांवी*

  *स्तोत्राची प्राचिती पहावी*

  *ही दंतकथा ना लवही*

  *या गजाननाची ग्वाही*


  *रचना : संतकवी दासगणू*  ✍️

  *स्वर : अनुराधा पौडवाल*


⚜🔆⚜🔆🌹🔆⚜🔆⚜

  2️⃣

  *संतकवी दासगणू रचित अभंग*  

  *स्वर : ह. भ. प. विक्रमबुवा*

  *नांदेडकर (दासगणू)*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-०६.०१.२०२५-*


🌻🥀🔆🌸🌻🌸🔆🥀🌻

Featured post

Lakshvedhi