Thursday, 28 November 2024

वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी

 वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार

हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी

 

मुंबईदि. २७ : हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.  राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन मालकाचा वाहन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे. तसेच वाहन नोंदणी शुल्क व वाहन कराचा भरणा करून नोंदणी करता येणार आहे.

                सद्यस्थितीत खाजगी वाहनांच्या नोंदणीप्रमाणेच हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी या सुविधेमुळे वाहन वितरकांकडे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता हलकी मालवाहू वाहनेयापुढे परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी आणण्याची आवश्यकता राहणार नाही व नोंदणीची प्रक्रिया विनासायास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांस काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

   तरीसर्व नागरिकांनी व संबंधित वाहन वितरकांनी याची नोंद घेऊनत्याप्रमाणे कार्यवाही करावी व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार  यांनी केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन* देशभर हा समता दिन व हाच खरा शिक्षक दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने त्यांच्या* *कार्याची ओळख व्हावी म्हणून हंटर कमिशन संदर्भात* 👇

 *महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन* 

 *देशभर हा समता दिन व हाच खरा शिक्षक दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने त्यांच्या* *कार्याची ओळख व्हावी म्हणून हंटर कमिशन संदर्भात* 👇


🧐 *महात्मा फुले आणि "हंटर कमिशन"*


💁‍♂️ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचे काम करणारे आणि बहुजनांत क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन. 


🔍 स्त्री-शोषित-पीडित-अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी म.फुले यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष नोंदवली होती. याबद्दल थोडक्यात जाणून घ्या हंटर कमिशनचा इतिहास...


❓ *काय होते हंटर कमिशन?*


भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दीत १८८२ साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.


🚫 *बहुजनांच्या शिक्षणाला सनातन्यांचा विरोध :* सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले. मुलींना, अस्पृश्यांना शिक्षण देणे म्हणजे देव, धर्म, समाज यांच्या विरोधात वर्तन होय. हा तर हिंदू धर्मावर आघात आहे, अशी आवई सनातन्यांनी उठवली तरीही महात्मा फुले यांनी हार मानली नाही.


🗣️ *हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबांनी नोंदवलेल्या साक्षेत ते नेमके काय म्हणाले?*


➤ १२ वय वर्षे असलेल्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे.

➤ बहुजन समाजातील शिक्षक शाळेत नेमले पाहिजेत.

➤ चढाओढीच्या तत्वावर शिष्यवृत्ती न देता, जी मुले शिक्षणात मागे आहेत त्यांना उत्तेजन दिले गेले पाहिजे. 

➤ सरकारने शूद्रांसाठी खेड्यापाड्यात खास शाळा स्थापन कराव्यात. 

➤ स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून सरकारने उपाययोजना करावी.

➤ आदिवासी जाती-जमातींना शिक्षणात प्राधान्य देण्यात यावे.

➤ लोकल सेस फंडापैकी जास्त भाग प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा.

➤ प्राथमिक शाळांना प्रांतिक सरकारने भरपूर अनुदान द्यावे.

➤ प्राथमिक शाळांवर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरपालिकांनी घ्यावी.

➤ तसेच शाळेच्या अभ्यासक्रमात व्यवहारोपयोगी शिक्षण म्हणजे शेती, आरोग्य, इतिहास, भूगोल, यांत्रिकी ज्ञान द्यावे असा आग्रह महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर धरला.


🧤 यासोबतच, महात्मा फुले पुढे हंटर कमिशनसमोर म्हणतात की ब्रिटिशांचे शैक्षणिक धोरण त्यांना मान्य नाही. उच्चवर्णियांसाठी पुष्कळ खर्च होतो पण खेड्यातील लोकांच्या शिक्षणासाठी खास प्रयत्न होत नाहीत. तसेच शिक्षण असे असावे की, तरुणांमध्ये स्वत:चा व्यवसाय करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे.


🗾 मुंबई इलाख्यात एक सुद्धा महार अथवा मांग मुलगा किंवा मुलगी महाविद्यालयात काय पण माध्यमिक शाळेतही नव्हती. १८८२ मध्ये हंटर आयोगापुढे मुंबईच्या खालोखाल पुण्यातून आठ निवेदन सादर झाली होती. यापैकी महात्मा फुलेंचे निवेदन बहुजन समाजाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे मानावे लागते. 


👌 महात्मा फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. जोतीराव फुले यांनी एका क्रांतीला सुरुवात केली. आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. या मध्ये महात्मा जोतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी केलेल्या कार्याला कोटी-कोटी वंदन.

Wednesday, 27 November 2024

विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको"

 विकासाचा विचार करताना पर्यावरण 

रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको"  

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. २७ : देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजेपर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावीअसे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

'पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोनया विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथील सभागृहात झालेत्यावेळी ते बोलत होते. 

चर्चासत्राचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज संस्थेने 'कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी',  नॅशनल स्टॉक एक्स्चेंजएनआयटी वारंगलआदी संस्थेच्या सहकार्याने केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  मात्र कधी - कधी पर्यावरण विषयांवर ताठर भूमिका घेतली जाते. दक्षिण भारतातील एका मार्गावरील चार झाडांच्या रक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. या महामार्गावर पंधरा वर्षात जवळजवळ तीन हजार लोकांचे बळी गेलेअसे सांगून चार झाडे कापणे आवश्यक असेल तर त्याऐवजी २५ नवी झाडे लावण्यासारखी सकारात्मक अट घातली गेली पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

देशात जलसंवर्धन व नदीजोड प्रकल्पांचे काम झाल्यास देशातील अन्नधान्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढेल व भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेलअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीमध्ये नदीपर्वतराजी व वृक्षवल्लीची पूजा केली जाते. आपण निसर्गाचे व नैसर्गिक संपदेचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भूमिका भारतीय विचारातून अधोरेखित केली जाते. वसुंधरा आपल्या विविधतेसह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी भारतीय विचारधारेतील पाण्याचाअन्नधान्याचा व ऊर्जेचा जबाबदारीने विनियोग याबाबतचे चिंतन यावर भाष्य केले तसेच प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली.

            उद्घाटन सत्राला भारतीय नदी परिषदेचे सदस्य, 'रिव्हर मॅन ऑफ इंडियारमण कांत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी

 महाराष्ट्रासह 15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी

केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी

 

नवी दिल्ली  26 : आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देतमहाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमताबांधणीसाठी एकूण 1 हजार 115.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय  समिती नेमण्यात आली होती. या समितीने  15 राज्यांमध्ये भूस्खलन जोखीम शमन प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतचसर्व राज्यांतील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी 115.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी समितीने हिमनदी उद्रेक पूर जोखीम व्यवस्थापनासाठी 150 कोटी रुपये आणि सात शहरांमध्ये नागरी पूर व्यवस्थापनासाठी हजार 75.65 कोटी रुपये मंजूर केले होते.

आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच अनुषंगिक कामांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने या वर्षांतर्गत 21 हजार 476 कोटी रुपयांहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केला आहे. यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीराज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यांतील तरतुदींचा समावेश आहे.

Tuesday, 26 November 2024

संविधान दिनानिमित्त राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

 संविधान दिनानिमित्त राज्यपालांकडून 

राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन

 

मुंबई, दि. २६ : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारीकर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

0000

 

Maharashtra Governor reads out 

Preamble on 'Constitution Day'

 

          Mumbai, 26th Nov : The Governor of Maharashtra  C P Radhakrishnan  read out the preamble of the Constitution of India on the occasion of the Constitution Day at Raj Bhavan.

Officers and staff of Raj Bhavan and Police personnel posted in Raj Bhavan reiterated the resolve of the nation to constitute India into a Sovereign, Socialist, Secular and Democratic Republic on the occasion

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

 

 मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडारयवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे.

या सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ. श्री. एन. रामास्वामी उपस्थित होते. प्रोत्साहनपर बक्षिस रूपये दोन लाखाचे चार क्रमांकदुसरे बक्षिस रूपये पाच लाख पाच क्रमांकतिसरे बक्षिस रूपये एक लाख पाच क्रमांक व त्यापुढे रू. १०,००/- हुन कमी रकमेची १०,४२८ बक्षिसे लागली आहेत. असे एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रू. २,२०,५०,०००/- इतकी आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी असे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर



 मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर

 

मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज (दि. २६ नोव्हेंबर) राजभवनमुंबई येथे  भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा  राजीनामा सादर केला.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.

यावेळी मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकरदादाजी भुसे व इतर देखील  उपस्थित होते.

0000

 

CM, Dy CMs meet Governor; CM tenders own, cabinet resignation

 

       Mumbai, 26th Nov : Chief Minister Eknath Shinde accompanied by Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar met Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai on Tue (26 November).

The Chief Minister tendered the resignation of his post and that of his cabinet to the Governor on this occasion.

The Governor has asked the Chief Minister Eknath Shinde to continue to hold the charge of his post till alternate arrangements are made.

Ministers Deepak Kesarkar and Dadaji Bhuse were  also present.

0000

Featured post

Lakshvedhi