Saturday, 7 September 2024

श्रीगुरूचरित्राध्याय एकोणतिसावा कथासार ॥ ब्रह्मराक्षसाचा उद्धार, भस्ममहात्म्य ॥

 श्रीगुरूचरित्राध्याय एकोणतिसावा कथासार

॥ ब्रह्मराक्षसाचा उद्धार, भस्ममहात्म्य ॥


श्रीगणेशाय नमः ॥ 


श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्रिविक्रमभारतीस म्हणाले, वत्सा, कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करीत असे. एकदा तो क्रौंचारण्यातून जात होता. तेथे एक नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत असे. याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली. तेव्हा त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे जळून गेली. त्याची क्षुधा, तृष्णा, उद्विग्नता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला, “हे मुनीश्वर, तू ईश्वर आहेस, तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो माझा उद्धार कर.” वामदेवाने विचारले, “तू कोण आहेस?” ब्रह्मराक्षस म्हणाला, “हे तपोनिधी, या क्षणी मला पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहेत. प्रथम जन्मात मी यवन राजा होतो. उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेतयोनीत जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरीण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभु! आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले, मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले?”


वामदेव म्हणाला, “अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठायी ज्ञान प्रकट झाले. मी तुला एक कथा सांगतो. यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एका कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचे शुद्र स्त्रीशी संबंध होते. त्याच्या कुटुंबीयांनी व ज्ञातिबांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला. एकदा चोरी करत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी टाकले. तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला, तेंव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकी जात होते. शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले आणि यमदूतांना गाठले. ब्राह्मणाचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले. हे वृत्त कळताच यम संतापाने शिवदूतांपाशी आला व म्हणाला, “तुम्ही माझ्या दूतांना का मारलेत? हा ब्राह्मण पापी आहे. याला तुम्ही शिवलोकी कसे नेता?” शिवदूत म्हणाले, “या ब्राह्मणाच्या सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झाला आहे. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलासलोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे.” ते ऐकून यमाचा राग शांत झाला, त्याने आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड्र व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले, म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो.”


वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, “मी राजा असताना पांथस्थांची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते, चरितार्थ चालण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या. त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारणविधी समजावून सांगा.” वामदेव म्हणाला, “पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनत्कुमारांनी शंकराला विनंती केली “प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा.” शिव म्हणाले, “सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तेच भस्म होय. ‘सद्योजात’ मंत्राने ते तळहातावर घ्यावे. ‘अग्निरीति’ मंत्राने अभिमंत्रित करावे. ‘मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे. ‘त्र्यंबक’ मंत्राने भाळी लावावे. ‘त्र्यायूषे’ मंत्राने कपाळास, भुजांस व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या तीन बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांना समांतर तीन आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक म्हणतात. सर्व आश्रमधर्माच्या व वर्णांच्या लोकांनी भस्मत्रिपुंड्र लावावा. त्यायोगे पूर्वपापांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्नानांचे, यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते, आयुरारोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते, कुळांचा उद्धार होतो, त्याला चारी पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठलोकी दीर्घकाळ वास्तव्य करून शिवसायुज्यता प्राप्त करतो. ज्याला मंत्रोच्चार येत नाहीत त्याने ‘ॐ नमः शिवाय’ असे म्हणून भस्म भक्तिभावाने धारण करावे. त्यालाही तेच पुण्यफल मिळते.” ते ऐकून सनत्कुमार, देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले.”


भस्ममहात्म्य श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवाला उद्धार करण्याची काकुळतीने प्रार्थना केली. वामदेवाने त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्याने त्या भस्माने स्वतःच्या भाळी त्रिपुंड्रक लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली. त्रिविक्रमा, वामदेव हे शिवावतार होते, योगियांचे ईश्वर होते, जगत्कल्याणासाठी संचार करायचे, त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. गुरुसेवेची आवड हेच सर्व साधनामागचे सार आहे.” ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्रीगुरुंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परतला.


इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे भस्ममहिमावर्णन नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥


॥ श्रीगुरुदेव दत्त ॥


॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम के लिए आवेदन करने की अपील

 मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम के लिए आवेदन करने की अपील

 

 

मुंबई दि. ६ : सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी आम लोगों तक पहुँचाने के लिए ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम शुरू किया गया है. इस उपक्रम में शामिल होनेवाले उम्मीद्वारों से आवेदन आमंत्रित किये जाते है. उम्मीद्वारों से  www.mahayojanadoot.org  इस वेबसाईट पर पंजीयन करने की अपील की गई  है.

 

महाराष्ट्र सरकार के सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के जरिये ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम चलाया जा रहा है. प्रत्येक ग्रामपंचायत स्तर पर एक, वहीँ शहरी क्षेत्र में प्रत्येक पांच हजार जनसंख्या के पीछे एक, इस तरह से राज्य में कुल 50 हजार योजनादूतों का छह महीने के लिए चयन किया जाएगा. इन योजनादूतों को प्रतिमाह 10 हजार रूपये मानधन दिया जाएगा. यह योजनादूत सरकार के जनकल्याणकारी योजनाओं की जानकारी जनता तक पहुंचाएंगे.

 

इस योजना में शामिल होने के लिए इच्छुक उम्मीदवार 18 से 35 आयुगुट का हों, उम्मीद्वार किसी भी शाखा का स्नातक होना आवश्यक है. उम्मीद्वार के पास महाराष्ट्र का अधिवास प्रमाणपत्र होना आवश्यक है. उम्मीदवार को संगणक का ज्ञान होना चाहिए. साथ ही उसके पास अद्ययावत मोबाइल (स्मार्ट फोन) और आधार संलग्न बैंक खाता होना आवश्यक है.

 

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम के लिए किया गया ऑनलाइन आवेदन, आधार कार्ड, स्नातक उत्तीर्ण प्रमाण हेतु दस्तावेज,  प्रमाणपत्र इ., अधिवास का प्रमाण. (सक्षम प्राधिकारी द्वारा जारी), उम्मीदवारों  के पास आधार संलग्न बैंक खाते का प्रमाण, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र (ऑनलाईन आवेदन के साथ संलग्न प्रपत्र में) नियुक्ति के समय प्रस्तुत करना आवश्यक है. इच्छुक उम्मीद्वार १३ सितंबर २०२४ तक www.mahayojanadoot.org  इस वेबसाईट पर पंजीकरण कर सकते है

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा चढता आलेख

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

 वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा चढता आलेख

 

मुंबई, दि. 6 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने  रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या आयुष्यात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.  गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. यानुसार कक्षाने सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 8 महिन्यात एकूण 12 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

माहे, जानेवारी, 2024 पासून ते माहे, ऑगस्ट 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 323 रुग्णांना मदत झाली आहे. हृदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफ्फुसाचे आजार, अस्थिरोग अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रीया (Replacement Surgeries), यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रियेंचा समावेश आहे. गोर-गरीब रुग्णांनी धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मदत ‍कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी योजना तयार केली आहे. त्यानुसार, प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व  10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या धर्मादाय रूग्णालयांना बंधनकारक आहे.  या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबाजावणी होत नसल्याने गोर-गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधि व न्याय विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबजावणी करण्याबाबत पाऊले उचलली. त्याचाच भाग म्हणून मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12 हजार बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरिता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, मुंबई, एच. एन रिलायन्स, मुंबई, सह्याद्री हॉस्पीटल, पुणे, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे इत्यादी नामांकीत रुग्णालयांचा समावेश असून सर्व धर्मादाय योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी कक्षामार्फत मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर येथे विभागीय कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी उत्साहाने सहभाग घेतला.

            निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना या सवलतीच्या खाटा पारदर्शकपणे उपलब्ध होण्याकरिता राज्यस्तरीय विशेष मदत कक्षासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच सदर प्रणाली सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत होणार आहे. त्यामुळे रुग्णांना अर्ज करणे आणखी सोपे होणार असून योजनेची पारदर्शी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपण अशा महागड्या शस्त्रक्रिया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात. त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरिता ही योजना वरदान ठरली आहे.   

सद्यस्थितीत कक्षाचे कामकाज ऑफलाईन पध्दतीने सरु असून निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मदत मिळण्यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo @maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर मेल करु शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देवू शकतात.

धर्मादाय रूग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णास त्याचा, नातेवाईकांचा अर्ज, लोकप्रतिनिधींचे पत्र, आधार कार्ड  / ओळखपत्र,  रेशनकार्ड / तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला,   डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आवश्यक आहे.

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष योजनेचा निर्धन व दुर्बल रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

००००

शासनाच्या जनकल्याणकारी योजना माध्यमांनी नागरिकांपर्यंत पोचवाव्यात

 वृत्त क्र. 1555

शासनाच्या जनकल्याणकारी योजना

माध्यमांनी नागरिकांपर्यंत पोचवाव्यात

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई, दि. 6 : राज्य शासन हे लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. याबरोबरच शेतकरी, तरुण व ज्येष्ठांसाठीही योजना राबविण्यात येत आहेत. लोकांच्या हिताच्या या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचविण्याचे काम माध्यमांनी करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज बीकेसीतील आयएनएस टॉवर येथील साम टीव्हीच्या कार्यालयात झाला. यावेळी सकाळचे मुख्य संपादक निलेश खरे, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार,  मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले, सुरेंद्र पाटसकर यांच्यासह विविध आवृत्यांचे संपादक उपस्थित आहेत.

यावेळी साम टीव्हीच्या वतीने मुख्य संपादक श्री. खरे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मुलाखत घेतली.

सकाळ माध्यम समूहाच्या नव्या सरकारनामा या साप्ताहिकाच्या शुभारंभास शुभेच्छा देऊन  मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासन अनेक लोकोपयोगी व कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, त्यासाठी माध्यमांनीही सहकार्य करावे. तसेच बातम्या देताना माध्यमांनी दोन्ही बाजू जाणून घेऊन वस्तुनिष्ठ माहिती लोकांपुढे मांडावी.

गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली तर अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. वॉर रूमच्या माध्यमातून या प्रकल्पांवर सनियंत्रण ठेवले.

समृद्धी महामार्ग, अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, मेट्रो अशा प्रकल्पामुळे वाहतूक जलद झाली असून वेळ व इंधन वाचण्यास मदत होत आहे. लवकरच मेट्रो 3 सुरू होणार असून यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून लाखो लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.शिंदे म्हणाले की, विकास प्रकल्पांना चालना देतानाच दुसरीकडे आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी व लखपती दिदी अशा योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार करून या योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण व ज्येष्ठ अशा सर्व घटकांचा विचार हे शासन करत आहे. या सर्व योजनांसाठी निधीची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या वर्षी 33 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या लाभाच्या रकमेत पुढील काळात वाढ करण्यात येईल. ही योजना बंद होणार नाही असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी

मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

 वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

 

मुंबई, दि. 7 : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचं दर्शन घडतं. सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत  उत्साह-जोश दिसतो.

हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी  सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत केली जाईल.

माझं आपणास आवाहन आहे की, श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकची जाणीव ठेवूया. गरजू लोकांपर्यंत पोहचा. त्यांना मदतीचा हात द्या. त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहचवण्याचा प्रयत्न करूया. आपण पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचं जतन-संवर्धन होईल ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावेत असेही आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्य शासनाने अनेक चांगल्या लोककल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचं कौतुक होत आहे. शेतकरी, युवक, महिला या सर्वचस्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत. परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे.

श्रीगणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातल्या गोरगरीब, दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले

भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे. सावधान रहा सतर्क रहा

 *भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे. असे ९ मार्च २०१६ ला भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे*


*झी न्यूजमध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे ४४% मानवी शस्त्रक्रिया बोगस, फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात. याचा अर्थ, हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळ जवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात. याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की, भारतात केल्या जाणाऱ्या ५५ % हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात. ४८% हिस्टेरोक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), ४७% कॅन्सर सर्जरी, ४८% गुढघे प्रत्यारोपण, ४५% सिझेरियन (कृत्रिम प्रसूती), खांदेरोपण, स्पाईन सर्जरी ई*


*महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनिअर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते. याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसतांना अधिक तपासण्या, उपचार, एडमिट करणे आणि शस्त्रकीया करायला भाग पडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते. (BMJ GLOBAL HEALTH )*


*मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणित प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे*


*एका नामांकित हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना Vhentilator वर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले. तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले. हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबीयांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय?*


*अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो. त्यासाठी मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते. नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करतांना मरण पावल्याचे जाहीर केले जाते. भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते. (DISENTING DIAGNOSIS- DR. GADRE& SHUKLA)*


*इंश्युरंस म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे*

*भारतात सुमारे ६८% लोकांनी मेडिक्लेम इंश्युरंस घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्त्या करून रुग्णांना इन्स्यूरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते. बाकी सर्व खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागतो*


*इंश्युरंसचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इंश्युरंस कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इंश्युरंस कंपन्यांना चुना लावल्याचे असंख्य प्रकार उघडकीस आले होते*


*मानवी अंगांची तस्करी हा एक अतिशय घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. इंडियन एक्सप्रेसने २०१९ मध्ये या संबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आणली आहे. हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा. संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते. कंपनीमध्ये नोकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित फोर्टिस हॉस्पिटलला जाण्याची सूचना केली. सांगिताला रितसर रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे DONAR वगैरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तीने तिथून पळ काढला. ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेले होते त्याला हा प्रकार  सांगितल्यावर उलट त्याने सांगिताला धमकाविले आणि ५० हजार रुपये मागू लागला. तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासणी अंती एका मोठ्या हजारो कोटी रुपयांच्या अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास झाला. पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या प्रकरणात पोलीस, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामिल होते*


*'हॉस्पिटल रेफरल स्कॅम' हा तर सर्वांना माहित असलेला आणि सर्रास चालणार प्रकार आहे. आपला परिचित किंवा इतर कोणताही डॉक्टर रुग्णाला गंभीर आजार आहे असे सांगून मोठ्या नामांकित हॉस्पिटलला एडमिट होण्यास सांगतात. अपोलो, फोर्टिस, अपेक्स इ. अनेक हॉस्पिटलचे रेफरल मेंबर असतात. असे हॉस्पिटल्स डॉक्टर साठी रेफरल ट्रेनिंग प्रोग्राम घेतात. मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन हॉस्पिटलने तर वार्षिक ४० रुग्ण पाठविण्यासाठी एक लाख रुपये, ५० रुग्णासाठी दीड लाख रुपये, ७५ रुग्णासाठी अडीच लाख रु. देण्याचे लिखित स्वरुपात जाहीर केले होते. रुग्णाला काही झालेले असो अगर नसो फक्त रुग्ण पाठविण्याची रक्कम डॉक्टरच्या बँक खात्यात जमा केली जाते*


*'डायग्नोसिस स्कॅम' हा अत्यंत सरळ आणि सोपा कोट्यावधी रुपयांच्या लुटीचा प्रकार आहे. बंगुलुरू येथील काही नामांकित पेथोलॉजी LABS वर इन्कम TAX विभागाच्या धाडीमध्ये अनेक LABS कडे १०० कोटीच्या वर रुपये कॅश आणि साडेतीन किलो सोने आढळून आले होते. पुढे असे आढळून आले की, डॉक्टरांना देण्यासाठी ते ठेवण्यात आले होते. रुग्णाला काही झाले असो किंवा नसो डॉक्टर्स रुग्णांना चेकअप साठी पाठवितात. तिथून त्यांना ४०–५०% कमिशन मिळते. जबरदस्ती केलेल्या या चेकअप मधील १ ते २ तपासण्या करून बाकी सर्व रिपोर्ट हेराफेरी करून दिले जातात. हा धंदा तर फारच नफेखोरीचा आहे. त्यामुळेच देशात सुमारे दोन लाखाच्या वर LABS कार्यरत आहेत. परंतु यातील फक्त एक हजारावर LABS प्रमाणित आहेत*


*असाच एक मोठा स्कॅम फार्मा कम्पन्या सुद्धा चालवितात. देशातील २० ते २५ मोठमोठ्या औषधी कम्पन्या डॉक्टरांवर एक-एक हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात. डोलो गोळी विकणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण कोरोना काळात जगजाहीर झाले आहे. डॉक्टरने आपल्या कंपनीचे औषध लिहावे म्हणून त्यांना लाखो रुपये कॅश, विदेश दौरा, पंचतारांकित हॉटेलमध्ये ५ ते ७ दिवसांचे वास्तव्य ई. USV LTD. कंपनी तर प्रत्येक डॉक्टरला ३ लाख रु. कॅश ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका ट्रीप देते*


*हॉस्पिटल्स आणि फार्मा कंपन्याचे एक वेगळे स्कॅम आणखी आहे. अनेक फार्मा कंपन्या मोठ्या हॉस्पिटल्सना औषधी, सर्जिकल साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देतात. त्यावर MRP मात्र प्रचंड असते. इंडिया टुडेने याचा पुरावा देत सिद्ध केले आहे. EMCURE कंपनी आपले टेमीक्युअर हे कॅन्सरचे औषध हॉस्पिटलना १९५० रुपयांना देते. हॉस्पिटल्स मात्र रुग्णाकडून या औषधाचे १८६४५ रुपये वसूल करतात. यात सर्व हॉस्पिटल्स सामील आहेत. (इंडिया टुडे हॉस्पिटल स्कॅम सर्व्हे रिपोर्ट)*


*मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) ही डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. २०१६ मध्ये केंद्र सरकारने या संस्थेच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली. या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की, MCI नवीन मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यात खूप उत्सुक असते मात्र डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण करण्यात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे*


*देशातील डॉक्टर MCI च्या नियमांची रोज पायमल्ली करतात, परंतु याची जनतेला कल्पना नसते*

*उदा*

*👉१. डॉक्टरने कोणत्याही कंपनीचे ब्रान्डेड औषध लिहायचे नसून साल्टचे जेनेरिक नाव लिहिले पाहिजे*

*👉२. क्लाॅज १.८ नुसार उपचार करण्या आधी डॉक्टरने आपली संपूर्ण फी सांगितली पाहिजे. इ. अनेक नियमांचे उल्लंघन रोज केले जाते*

*👉३. तपासण्या आणि उपचार करण्यापूर्वी रुग्णाला योग्य माहिती देऊन त्याची स्विकृती घेणे आवश्यक आहे*

*👉४. प्रत्येक रुग्णाचे मेडिकल रेकॉर्ड येणाऱ्या ३ वर्षांसाठी डॉक्टरने सुरक्षित ठेवले पाहिजे*

*👉५. व्यवसायातील भ्रष्ट, अनैतिक, अप्रामाणिक आणि अक्षम डॉक्टरांचे वर्तन कोणतीही भीती न बाळगता समाजासमोर आणले पाहिजे*

*👉६. शासकीय योजनांचा स्कॅम हा नवीन आणि अफलातून प्रकार तर हल्ली हजारो कोटींचा झाला आहे. माजी सैनिक हॉस्पिटलला गेला की, त्याला फक्त सर्दी किंवा इतर किरकोळ समस्या असेल तरीसुद्धा एडमिट केले जाते. त्याच्या कार्डवरून त्याच्या नकळत एखाद्या सरकारी योजनेत बसविले जाते. रुग्णावर नको ते उपचार करण्याचा देखावा केला जातो. ७/८ दिवसात सुटी दिली जाते. तोपर्यंत त्याचे लाखोंचे बिल सरकारी योजनेतून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपेने डॉक्टरच्या खात्यात जमा झालेले असते. अर्थातच खोट्या चेकअप आणि तपासण्याचा, उपचारांचा कागदोपत्री आधार याला द्यावा लागतो*


*हा मेसेज प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपण व आपले कुटुंब यापासून वाचायला हवे*


*जनहितअर्थ देशसेवा*


*सत्यमेव जयते*

*🚑🚑

Featured post

Lakshvedhi