Wednesday, 31 July 2024

राज्यातील जुन्या जलविद्युत प्रकल्पांचे होणार आधुनिकीकरण

 राज्यातील जुन्या जलविद्युत प्रकल्पांचे होणार आधुनिकीकरण

           

            राज्यातील आयुर्मान पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या धोरणानुसार जलविद्युत प्रकल्पांचे Lease, Renovate, Operate and Transfer (LROT) तत्वावर नूतनीकरणआधुनिकीकरणक्षमतावाढ व आयुर्मान वृध्दी करण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीकरिता प्रकल्पाच्या पाणी वापरानुसार जलविद्युत प्रकल्पांच्या दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. श्रेणी एक मध्ये विद्युत निर्मिती हा मुख्य उद्देश असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश राहणार आहे. अशा प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण महानिर्मिती कंपनीद्वारे  करण्यात येईल.  तर श्रेणी दोन प्रकल्पांमध्ये सिंचनासहीत विद्युत निर्मिती असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश राहील. या प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी निविदा पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.

            शासनामार्फत कोणतीही भांडवली गुंतवणूक केली जाणार नाही. तर या प्रकल्पांमधून Threshold Premium, Upfront premium,  13% मोफत वीजभाडेपट्टी व Intake maintenance शुल्क इत्यादी स्वरूपात शासनास दरवर्षी 507 कोटी रुपये महसूल प्राप्त होईल.

-----०-----

नव- तेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प सात वर्षांसाठी राबवणार

 नव- तेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प सात वर्षांसाठी राबवणार

            नव तेजस्विनी - महाराष्‍ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या मुदतीत एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आता सहा ऐवजी सात वर्षांच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम (Gender Transformative Mechanism- GTM) राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

या नव्या निर्णयांनुसार आता नव तेजस्विनीच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी जिल्हयांचे जिल्हाधिकारी राहतील. तसेच तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत आता महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील मंजूर कर्मचाऱ्यांमधून नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.

            या प्रकल्पासाठी  आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) कडून ३२५ कोटी रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यास व ९ कोटी १० लाख रुपयांचा निधी अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासप्रशासकीय खर्चासाठी १८८ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाचा हिस्सा असा एकूण ५२३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी कृतीसंगम (Convergence) म्हणून ४३५ कोटी ५० लाखलोकसहभागाचे ३२ कोटी १७ लाखवित्तीय संस्थांच्या सहभागाचे १६३० कोटी ४६ लाखखासगी संस्थाच्या सहभागाचे ६४ कोटी ६५ लाख याप्रमाणे प्रकल्पाच्या एकूण किंमतीत २ हजार ६८५ कोटी ४६ लाख रुपये अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. 

या शिवाय आयफॅड मार्फत जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रमाकरिता ४२ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार हा उपक्रम आता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यास मान्यता देण्यात आली.

             तसेच नव तेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रमाच्या अंमलबजावणी बाबत आवश्यकतेनुसार बदल/ सुधारणा करण्याचे अधिकार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शक्तीप्रदान समितीला देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

-----०-----

 Ok

महाराष्ट्रातील कारागृहे होणार अद्ययावत; सुधारणांसाठी अध्यादेश काढणार

 महाराष्ट्रातील कारागृहे होणार अद्ययावत; सुधारणांसाठी अध्यादेश काढणार

 

            महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            केंद्र सरकारने कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाचा विचार करून मॉडेल प्रिझन्स ॲक्ट 2023 तयार केला आहे.  तसेच सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशानी देखील या संदर्भात आवश्यक वाटतील त्या सुधारणा करण्याचे म्हटले आहे.  या अनुषंगाने कारागृह विभागाच्या प्रमुखाचे नामाभिधान महासंचालककारागृह व सुधारसेवा असे नमूद करणेविशेष कारागृहमहिलांसाठी खुले कारागृहतात्पुरते कारागृहखुली वसाहततरुण गुन्हेगारांसाठी संस्था असे कारागृहाचे वर्गीकरण करणे तसेच कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कल्याण निधीबंद्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणा अशा काही सुधारणांचा यात समावेश आहे.  संपूर्ण कारागृह प्रशासनाचे संगणकीकरण तसेच आयसीजेएस प्रणालीशी तुरुंगाचा डाटाबेस जोडणेसुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक बाबींचा देखील यात विचार करण्यात आला आहे

नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल

 नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल

            नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            हे रुग्णालय नंदीग्राम वैद्यकीय सहकारी संस्थेमार्फत सहकार तत्त्वावर चालविले जाते.  संस्थेने एक कोटी भाग भांडवल जमा करून तसेच 6 कोटी कर्ज घेऊन रुग्णालय सुरु केले आहे.  मात्र कर्जाच्या बोजामुळे रुग्णालय तोट्यात गेले असून जवळपास 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. रुग्णसेवा आणि सामाजिक संवेदनशीलतेमुळे रुग्णालय चालविणे आवश्यक असल्यामुळे संस्थेला 1 : 9 याप्रमाणे 9 कोटी भाग भांडवल स्वरुपात 10 वर्षात शासकीय भाग भांडवल अंशदान स्वरुपात अर्थसहाय देण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.  शासकीय भाग भांडवलाची परतफेड पुढील 8 वर्षात समान हप्त्यात करावी.  ही भाग भांडवलाची रक्कम बिनव्याजी राहील. तथापिपरतफेडीचा हप्ता न भरल्यास थकीत रकमेवर 12 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.

-----०---

आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज

 आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज

 

            आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धर्तीवर दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            आजपर्यंत आदिवासी सहकारी सूत गिरण्या या लाभापासून वंचित होत्या.  सध्या या सूत गिरण्यांना 1 : 9 या प्रमाणात शासकीय भागभांडवल देण्यात येते.  आता दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी मुदत कर्ज देणाऱ्या वित्तीय बँका व वित्तीय संस्था यांच्या व्यतिरिक्त मिटकॉनॲग्रीकल्चर फायनान्स कार्पोरेशन मुंबईदत्ताजीराव टेक्निकल इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्यापैकी एका संस्थेकडून प्रस्ताव तपासून शासनास सादर करावा लागेल.  प्रकल्प किंमतीच्या 5 टक्के आणि 80 लाखापर्यंत सभासद भागभांडवल गोळा करणाऱ्या गिरण्या कर्जासाठी पात्र असतील.  या शिवाय सूत गिरणीला वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या कर्ज भाग भांडवलाच्या अटी व शर्ती लागू राहतील.

            प्रकल्प सुरु झाल्यानंतर 2 वर्षांनी कर्जाची परतफेड सुरु होईल.

वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले

 वसतीगृहेआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले

 

            विविध विभागांच्या वसतीगृहेआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            सामाजिक न्यायदिव्यांग कल्याणइतर मागास बहुजन कल्याणआदिवासी विकासमहिला व बालविकास या विभागांमार्फत सुरु असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानीत संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दरडोई परिपोषण अनुदान आता प्रती विद्यार्थी प्रती महिना 1500 रुपयांवरुन 2200 रुपये करण्यात येईलतर एड्सग्रस्त व मतीमंद निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान 1650 रुपयांवरून 2450 इतके वाढविण्यात येईल. 

            यासाठी येणाऱ्या 346 कोटी 27 लाख इतक्या निधीला मान्यता देण्यात आली.  या सर्व संस्थांमधून एकूण 4 लाख 94 हजार 707 विद्यार्थी असून सुमारे 5 हजार संस्था आहेत. वाढत्या महागाईमुळे हे अनुदान देखील वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. 

Khushiya बहुत सस्ती हैं, लेकिन दुंडते हैं मेहेंगी दुकानोमे

 💕✍️ *कोणी लिहीले माहीत नाही पण छान पटण्यासारखे आहे.......*


        *सहजच मनातलं शब्दात*


      *"बस, तुम कभी रुकना मत!"* 


••••• आज आजी उदास आहेत.

••••• हे आजोबांच्या लक्षात आल.

••••• काय झालं ग? आजोबांनी विचारल.

••••• आजी म्हणाल्या,

••••• अहो, आता थकवा येतो.

••••• आधी सारखं राहिलं नाही.

••••• आता गडबड, सहन होत नाही.

••••• कुठे जायचं तर, जास्त चालवत नाही 

••••• आॕटो मधे चढताना त्रास होतो.

••••• कधी भाजीत मीठ टाकायला 

      विसरते, तर कधी जास्त पडतं. 

••••• कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने

      दिलं आहे. 

••••• माहित नाही.

••••• आजोबा म्हणाले,

••••• देवाचा हिशोब मला माहित नाही.

••••• आणि त्याच्या निर्णयात आपण

      ढवळाढवळ करू शकत नाही. 

••••• त्याच्या Planning मधे एक क्षणाचाही

      बदल करणे. आपल्या हातात नाही.


••••• जे आपल्या हातात नाही, त्याचा 

     विचार करण्यापेक्षा आपल्या 

     हातात काय आहे?

     त्याचा विचार करावा.


••••• अग, वयानुसार हे सर्व होणारच.

••••• आधीचे दिवस आठव ना,

••••• किती काम करायची. 

     पूर्ण घर तू खूप छान सांभाळले,

••••• मला कशाची काळजी 

     नव्हतीच कधी.

••••• आता वयामाना  प्रमाणे हे 

      सर्व होणारच, पण त्यातुनच मार्ग 

      काढायचा असतो.

••••• आलेला दिवस आनंदात काढणे, 

••••• आपल्या हातात आहे.

••••• जीवनाच्या प्रत्येक फेज मधे 

      थोडे शारिरीक बदल होतातच.

••••• थोडे आपल्या ला करायचे असतात. 

••••• आपली *Lifestyle Reorganize* 

      करायची,

••••• म्हणजे, आयुष्याची घडी, 

      परिस्थिती प्रमाणे बदलायची असते, 

••••• कळलं का? आजोबा पूढे म्हणाले. 


••••• चल, आज सायंकाळी 

      बाहेर जाऊ या आपण. 

      छान ती नारंगी साडी नेस. 

••••• बाहेरच जेवू. 

••••• आजोबा संध्याकाळी आजींना 

      घेऊन बाहेर पडले. 

••••• व जवळच असलेल्या 

      बसस्टाॕप वर जाऊन बसले.

••••• दोघे बराच वेळ तेथेच 

      गप्पा मारत बसले.

 

••••• आजोबा आजी ना म्हणाले,

••••• अगं, पाय दुखत असतील 

      तर, मांडी घालून बस छान.

 

••••• नंतर,*गणेश भेळ* खाऊनच 

      घरी परतले. अगदी वयाला 

      व तब्येतीला शोभेसे  

      Outing आज होते दोघांचे.


••••• आजींची उदासी मात्र कुठे पळाली?

      हे त्यांना कळलेच नाही.

••••• अगदी Refresh झाल्या. 


••••• आज आजोबांनी आजी साठी 

      *On line Mobile stand* 

      मागवला. मोबाईल पकडून 

      आजींचा खांदा दुखतो ना म्हणून.

        

••••• आज आजींनी तर आजोबांना 

      सकाळीच सांगुन टाकलं, 

      की मी आज सायंकाळी 

      स्वयंपाक करणार नाही.

••••• काही तरी चमचमीत 

      खायला घेऊन या.

••••• आजोबांनी आनंदाने समोसे, 

      ढोकळा, खरवस, दोन 

      पुरण पोळ्या आणून आजींची 

      इच्छा पूर्ण केली. 


••••• ते बघून आजी म्हणाल्याचं 

      अहो, एवढं आणलंत? 

••••• अग आज आणि उद्या 

      मिळुन संपेल की....


••••• आज आजीं आजोबांची 

      पार्टी छान  झाली. 

••••• कोणी तरी खरंच  खूप छान 

      म्हंटलं आहे,

 

*"खुशीयां बहुत सस्ती है इस दुनिया में,*   

      *हम ही ढुंढतें फिरते हैं,* 

       *उसे मेहंगी दुकानों में"।"*


••••• आजोबा बऱ्याच वेळा पासुन 

      एका बाटलीचे झाकण 

      उघडायचा प्रयत्न करत होते. 


••••• ते पाहून अजय म्हणाला, 

      द्या आजोबा मी उघडून देतो. 

••••• तेंव्हा आजोबा म्हणाले

••••• अरे, नको मी उघडतो.

••••• आता आम्हाला प्रत्येक 

      कामात वेळ लागतोच. 

      हे Natural आहे.

 

••••• पण काही हरकत नाही. 

      जो पर्यंत करू शकतो 

      तोपर्यंत काम करायचे. 

      हे मी ठरवलं आहे.


••••• रोज फिरायला जाणे, 

      भाजी आणणे, भाजी चिरणे, 

      Dusting करणे, 

      Washing Machine मधे 

      धुतलेले कपडे वाळत घालणे‌, 

      कपड्यांच्या घड्या घालणे, 

      अशी बऱ्याच कामांची 

      जबाबदारी मी घेतली आहे. 

      तुझ्या आजीला पण मदत होते. 

      व माझा वेळ जातो.

 

      *Something new and different.*

          *I am enjoying it.*

          *And I feel good.*

  

तो तुमचा Actor आहे ना, अक्षय कुमार त्याने एका Advertisement मध्ये म्हंटले आहे.

 

         *" बस, तुम कभी  रुकना मत "* 


अक्षय कुमार ने म्हंटलेले हे वाक्य मला खूप आवडलं. एक छोटंसं वाक्य.


••••• मोजक्या शब्दात 

••••• पण किती अर्थपूर्ण.

••••• जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच 

     त्याचा अर्थ परत दर 

     परत उघडत जातो .

••••• एक छोटासा उपदेश जीवनाला 

     वेगळ्याच दिशेने वाटचाल 

     करायची स्फुर्ती देतो..

••••• विचारांत परिवर्तन  आणतं. 

••••• तो म्हणतो 

••••• कधीही थांबू नका,

••••• चालत रहा. 

••••• म्हणजेच *Active* रहा. 

     *मनाने आणि शरीराने.* 

      

••••• वाहतं पाणी बघताना, 

      एक वेगळीच उर्जा निर्माण होते. 

     *धारा* 

      म्हणजे पुढे पुढे जाणारी, 

      वाहणारी.

••••• तेच जमलेलं पाणी म्हणजे 

     अनेक रोगांचा ऊगम. 

••••• म्हणून आपण पाण्याला 

      जमू देत नाही.

••••• जमलेल्या पाण्यात डास, 

      किडे होतात. शेवाळे तयार होते. 

      पाण्याला वास येतो. 

      डेंग्यू पसरतो.


••••• आयुष्याचे पण तसेच आहे. 

••••• शक्य तेवढ Active राहणे 

     ही प्रत्येकाचीच आवश्यकता 

    असते

••••• जसं जमेल, जे जमेल, 

      जे आवडेल, जे झेपेल, ते 

      करत रहाणे गरजेचे आहे.

       

   *" चलती का नाम ही तो जिंदगी है "*

      

आपल्या पिढीने तरूणपणी आपण एकमेकांचे हात हातात घेतले नाही./नसतील.


••••• पण वयाच्या या टप्प्यावर, 

      एकमेकांचा हात प्रेमाने, 

      काळजीने, विश्वासाने, हातात 

      घेणे ही काळाची गरज आहे. 

      

*कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हे*

   

*इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता है।*

      

*बल्कि इसलिए, की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है"।*

      

    *"ना थके कभी पैर* 

             *ना कभी हिम्मत हारी है।*

      *जज्बा है परिवर्तन का जिंदगी में,*

            *इसलिये सफर जारी है।*

     

*प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा*

  

     बस, तुम कभी रुकना मत।

Featured post

Lakshvedhi