Friday, 10 November 2023

दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातडॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत

 दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातडॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत


            मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्पना अभियान- 2023’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.


            भारतीय संस्कृतीत उत्सवांना महत्व असून दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. नागरिकांनी सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने राज्यभरात जनजागृतीवर विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानासारख्या मोहिमेतून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले जात आहे. या याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. मोटघरे 'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून देणार आहेत.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. मोटघरे यांची ही मुलाखत शनिवार दि. 11 आणि सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे. 


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक


एक्स - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


                                                                        ००००


 


 

९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर

 ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर

-मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

नैसर्गिक आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

 

            मुंबईदि. ९ : राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.  या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदतपुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले.

            मंत्रालयातील वॉर रुम येथे मदतपुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटीलमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळग्रामविकास मंत्री गिरीश महाजनकृषी मंत्री धनंजय मुंडेरोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरेमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठीपशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडेकृषी  विभागाचे सचिव सुनील चव्हाणवित्त विभागाचे सहसचिव वि.र.दहिफळेपाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख,मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकरजलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.

                 मंत्री श्री.पाटील म्हणाले कीकेंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील उर्वरीत तालुक्यातील  काही मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घटपीक कर्जाचे पुनर्गठनशेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीकृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूटशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफीरोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापरटंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती ९५९ महसुली मंडळामध्ये देण्यात येतील, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

            राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता १ लाख लाभार्थ्यी शेतक-यांना ५ लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणा-या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली. जेणेकरून राज्यातील पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच जून २०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगावरावेरभुसावळचोपडायावलजळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेत पिकांच्या नुकसानीकरिता  मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने अस्तित्वात आलेली महसुली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाहीत, तसेच बिघडलेली पर्जन्यमापके असलेली महसुली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

१७८ तालुक्यातील ९५९ सर्कलमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर

        अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळअमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ७३ मंडळबुलढाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील  ७० मंडळवाशीम जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१ मंडळयवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील ९ मंडळछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळबीड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५२ मंडळहिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १३ मंडळजालना जिल्ह्यातील ३ तालुक्यामधील १७ मंडळलातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४५ मंडळनांदेड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३ मंडळधाराशीव जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २८ मंडळपरभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ३८ मंडळनागपूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५ मंडळवर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ मंडळअहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९६ मंडळधुळे जिल्ह्यातील ३ तालुक्यातील २८ मंडळजळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ मंडळनंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुक्यातील १३ मंडळनाशिक जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४६ मंडळकोल्हापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २० मंडळपुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१ मंडळसांगली जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३७ मंडळसातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील ६५ मंडळसोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ४६ मंडळ असे एकूण १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.   

००००

यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांचा

 यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांचा


मंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा


            मुंबई दि. 9 : यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा येथे नवीन पोलिस ठाणे बांधणे, राज्य परिवहन विभागाच्या यवतमाळ विभागातील दारव्हा, दिग्रस आणि नेर येथील बसस्थानक बांधण्यायासह विविध विकास कामांचा आढावा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज मंत्रालयात येथे घेतला. यावेळी गृह, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मंत्री श्री. राठोड म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांचे नियोजित सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावीत. दारव्हा, दिग्रस आणि नेर येथे बसस्थानक बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. एसटी महामंडळाला जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एसटी महामंडळातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत, इतर प्रश्नांबाबत मंत्री श्री. राठोड यांनी आढावा घेतला.


००००००

संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रंगीत तालिम महत्वाची

 संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रंगीत तालिम महत्वाची

- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. : सध्या हवामान बदलामुळे आपत्तींचे स्वरूप बदलत आहे. हे लक्षात घेता चक्रीवादळाच्या वेळी काळजी घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये कोणत्या बाबींची प्रशासनाला तातडीने आवश्यकता आहे. आपत्ती कालावधीत अत्याधुनिक यंत्रणा कोणकोणत्या वापरता येतील याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तातडीने कळवावी, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज केल्या.

             मंत्रालयातील आपत्ती विभागाच्या नियंत्रण कक्षात आयोजित सागर तटीय क्षेत्रातील रंगीत तालीमच्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवादप्रणालीव्दारे मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासो धुळाजराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे वरिष्ठ सल्लागार निवृत्त कमांडर आदित्यकुमारएनडीआरएफच्या फाइव्ह बटालियनचे कमांडर एस. बी. सिंगरवी सिंगमत्स्य उपायुक्त महेश देवरेरेल्वेचे उपअभियंता श्री.कुलकर्णीमुंबईठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई येथील  अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

        मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले कीचक्रीवादळ या नैसर्गिक आपत्ती दरम्यान प्रतिसाद देण्याबाबत स्थानिक नागरिक तसेच प्रतिसाद यंत्रणाशासकीय विभागांना सतर्क करण्याची प्रात्यक्षिके घेण्याची रंगीत तालीम आवश्यक आहे. अशा तालिमीमध्ये कोणकोणत्या बाबी आपत्तीवेळी आवश्यक आहेत याची माहिती प्रशासनाला कळू शकते. या रंगीत तालिमीमध्ये सैन्यदलनौसेनावायु दलरेल्वेतटरक्षक दलमुंबई पोर्ट ट्रस्टमेरीटाइम बोर्डमत्स आयुक्तालयमहावितरणजिल्हाधिकारी कार्यालय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका इत्यादी अशा विविध केंद्रराज्य व खासगी संस्थाप्राधिकरणांनी काटेकारेपणे काम केले ही स्तूत्य गोष्ट आहे.

        राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. धुळाज म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन विभागाकडून राज्यात चार टप्यामध्ये आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतर घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. या रंगीत तालिमीमध्ये विविध केंद्रराज्य व खासगी संस्थाप्राधिकरणे सामील आहेत. या निरनिराळ्या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून आपत्ती कालावधीत सर्वांच्या क्षमतांची पडताळणी करणे व आपत्तीच्या परिस्थितीत या संस्थांमार्फत प्रभावीपणे व समन्वयाने प्रतिसाद देणे हा मुख्य उद्देश आहे.

                        मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते राज्य मंत्रालय नियंत्रण कक्षातील राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री.धुळाजअवर सचिव हिंतेंद्र दुफारेकक्षाधिकारी संदीप कांबळेनितीन मसळेयूएनडीपीचे वरिष्ठ सल्लागारश्रीदत्त कामतप्रशासकीय सहायक संकेत घाणेकर यांचा उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आला.

                                                        ००००

कालबाह्यतेचा सापळा...* एक कटू सत्य

 *कालबाह्यतेचा सापळा...*


जानेवारी १९२५...

स्वित्झर्लॅंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एक खास उद्योगसमूहाने एक गुप्त सभा आयोजित केली गेली होती.


विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीचे उत्पादक त्या मिटींगमध्ये सहभागी झाले होते.

बल्बचा शोध लागून एव्हाना नव्वद वर्ष झाली होती.

सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते पण त्यात प्रचंड सुधारणा होत गेल्या.


१९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्य असणारे दर्जेदार आणि दिर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते.

जनता बल्बवर खुश होती पण कोणालातरी बल्बचे इतके दिर्घजीवी असणे खटकत होते.

ते कोण होते?


साक्षात बल्ब उत्पादक...

कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृतीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे.

जिनिव्हाच्या त्या मिटींगमध्ये इंटरनॅशनल जनरल इलेक्ट्रील, ओसराम, फिलिप, टंगस्राम, असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्टिज या सर्व जागतिक आघाडीच्या बल्बनिर्मात्यांनी एक गुप्त करार केला.

आपल्या दिर्घकालीन हितासाठी आणि येणाऱ्या काळात भरघोस नफा मिळवण्यासाठी ते सर्वजण मिळून निकृष्ट दर्जाच्या अल्पायुषी बल्बचीच निर्मिती करतील.

त्या सर्वांनी या कराराचे इमानेइतबारे पालनही केले.

पुर्वी अडीच हजार तास चालणारे बल्ब बाजारातून नामशेष झाले.

१९२५ नंतर बाजारात येणारे बल्ब फक्त एक हजार तास चालू लागले.

आयुष्य घटले आणि साहजिकच बल्बची मागणी वाढली.

खप वाढला.

निकृष्ट दर्जाचे बल्ब आधीच्या किंमतीत विकून कंपन्यांनी ग्राहकांना मनसोक्त लूटले होतेच.

आता आयूष्यमान कमी झाल्यामूळे विक्रीही दुप्पट तिप्पट झाली. बल्ब विक्रेत्यांची चांदीच चांदी झाली.

उत्पादनाचा दर्जा घसरवुनही पैसे कमवता येतात हे नवेच गुपित उद्योगजगताला माहीत झाले. बल्ब कंपन्यांच्या त्या एकत्र येऊन सापळा रचणाऱ्या कंपन्यांना *फिबस कार्टेल* या नावाने ओळखले जाऊ लागले.

वस्तूंचा दर्जा घसरावून पैसे कमवण्याच्या त्यांच्या क्लृप्तीला म्हणतात *प्लॅन्ड ओबसोलेसेंस*.


खरंतर हा सापळा आहे.

मराठीत याला *नियोजित अप्रचलन* असे म्हणता येईल.

सोप्या शब्दात एखादी वस्तू लवकर कालबाह्य करुन ग्राहकाला पुन्हा एक नवी खरेदी करायला भाग पाडणे असे याचे वर्णक करता येईल.


दहा पंधरा वर्षापुर्वीचे मोबाईल फोन चांगले पाच पाच वर्ष चालायचे.

हल्ली मात्र कितीही भारीचा घेतला तरी एक स्मार्टफोन दोन तीन वर्षापेक्षा जास्त टिकूच शकत नाही.

कारण तेच.

*नियोजित अप्रचलन.*

जाणून बुजून फोनची रचनाच अशी केली जाते की तीन चार वर्षात फोन निकामी व्हावा.

जुन्या उत्पादन टिकाऊ असेल तर कंपनीने निर्माण केलेले नवे उत्पादन कोण घेईल?


लाखो कोटी रुपयांचा बिजनेस हवा असेल तर पुर्वीच्याच ग्राहकांना पुन्हा खरेदी करायला भाग पाडले पाहिजे.

आजची बहूतांश उत्पादने याच धर्तीवर बनवली जातात.

पुर्वीचे टीव्ही वीस वीस वर्ष चांगले चालायचे.

आताच्या एल ई डी मधे पाच सात वर्षात पट्ट्यापट्ट्या दिसायला लागतात.


१००० वेळा पुन्हा पुन्हा दाढी करता येईल आणि स्वच्छ करुन पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा टिकाऊ ब्लेड बनवण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे पण कोणतीही नामांकित कंपनी तशा प्रकारच्या ब्लेड बनवण्यात पुढाकार घेत नाही.

कारण मग सोन्याची अंडी देणारा बिजनेस कायमचा बसेल.


लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती.

आता पेन कचऱ्यात फेकून नविन पेन घ्यायची प्रथा रुजली आहे.

आजही जेव्हा पेनच्या रिफिलचा शोध घेतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत.

कारण तेच.

मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल?


या नियोजित अप्रचलन नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच 'वापरा आणि फेका' नावाचा भस्मासुर जन्माला आला.

सुंदर निसर्गाचे एका विशाल कचराकुंडीत रुपांतर व्हायला लागले.

कपडे विटले, फेकून द्या. शुज उसवले, फेकून द्या.

लॅपटॉप खराब झाला, दुरुस्तीऐवजी नवाच घ्या. इस्त्री चालेना झाली, नवीन घ्या.

मिक्सर बिघडला, नवीन घ्या.

वॉशिंग मशीन खराब झाली, नवे मॉडेल घ्या.


पंधरावीस वर्षांखालच्या गाड्यांचे स्पेअरपार्ट मिळत नाहीत आणि उपभोक्ता कंटाळून गाडी कवडीमोल भावात विकून नवी गाडी घेण्याच्या तयारीला लागतो.

एकदा माऊस किबोर्ड खराब झाला की फेकून द्यावा लागतो.


लाईटच्या माळा, चार्जर, हेडफोन इत्यादी  इलेक्ट्रीक उपकरणांना दुरुस्त करणे ही संकल्पनाच आता मोडकळीला आलेली आहे.


फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक संघामध्ये नव्या प्रकारच्या जर्सीची ब्रॅंड न्यु डिझाईन लॉंच केली जाते.

संघ तोच.

खेळाडू तेच.

प्रत्येक मौसमात अवतार मात्र नवा असतो.

कारण प्रेक्षकांना शर्टपॅंटचे नवे जोड विकायचे आहेत.

चाहत्यांना सामन्याला जाताना मागच्या वेळीचा शर्ट घालताना लाज वाटते.

सर्वजण त्यांच्याकडे गरीब आहे असा दृष्टिकोन टाकतील म्हणून तो आपल्या आवडत्या संघासाठी नवी जर्सी आनंदाने खरेदी करतो.


भारतात कमी असले तरी विदेशांमध्ये ही क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसते.


नियोजित अप्रचलनाचा आणखी एक छोटा भाऊ आहे.

तो म्हणजे *समंजस अप्रचलन* (पर्सिव्हड ऑबसोलेसेंस).

यामध्ये तुमची कार आता जुनी झाली आहे, पर्यायाने तुम्ही आऊटडेटेड झाले आहात असे तुमच्या मनावर बिंबवण्यात येते.

जाणूनबुजुन आणि प्रयत्नपुर्वक तुमच्या वापरात असलेल्या जुन्या वस्तूंविषयी तुमच्या मनात उदासीनता आणि न्युनगंड निर्माण केला जातो.


एखादी वस्तू विकत घेतली नाही तर तुमचे व्यक्तिमत्व अधुरे अपुर्ण आहे असे जाहिरातींच्या माध्यमातून सुप्त मनावर पुन्हा पुन्हा ठसवले जाते.

साधे भोळे आणि खोट्या प्रतिष्ठेपायी या चतुर लोकांनी रचलेल्या जाळ्यात अलगद अडकतात.

स्वतःला उच्चशिक्षित मानणारा सुजाण श्रीमंत वर्ग या कंपन्यांच्या तावडीत सापडतो आणी आवश्यकता नसताना कधी मजबुरीने नवी खरेदी करतो.

त्यांना वारंवार सांगितल्या गेलेल्या उत्पादनांची ते आज्ञा पाळल्यासारखी निमूटपणे खरेदी करतात.


कधी दिखावा करण्यासाठी, कधी छाप पाडण्याच्या नावाखाली, कधी स्वतःचा अहं पोसण्यासाठी, कधी स्टेटस मेंटेन करण्याच्या नावाखाली अव्याहत खरेदी सुरुच असते.


कोणतीही नवी खरेदी करण्याआधी मला या वस्तूची खरंच तीव्र गरज आहे का याचा समग्र विचार करण्याची त्यांची आकलनशक्तीच त्यांनी हळूहळू गमावलेली असते.

लठ्ठ पगार कधीही एकटा येत नाही.

येताना तो चंगळवादालाही सोबत घेऊन येतो.

नवश्रीमंतांच्या बाबतीत तर हे हमखास घडते.

महागड्या ठिकाणी पार्ट्यांना जाणे.

आधी भरपुर वाढून घेणे आणि नंतर जात नाही म्हणून ताटात तसेच अन्न टाकून देणे ही याचीच लक्षणे असतात.

आर्थिक सुबत्ता असूनही ज्याने संयम गमवला नाही आणि जो सत्व पाळू शकला तोच खरा भाग्यवान. 


वस्तूंना रुपयां-पैशात तोलणारी माणसं खरी कर्मदरिद्री.


ती बनवण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती, त्याच्या निर्मितीसाठी घेतले गेलेले कष्ट या सर्वांचे मोल ज्याला समजले तो खरा सुजाण...


बिजनेस माईंडच्या चतुर पण मुठभर लोकांनी पर्यावरणाचा बट्ट्याबोळ केला आहे.


स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उभ्या जनतेला आणि त्यासोबत निसर्गाला त्यांनी स्वतःच्या दावणीला बांधले आहे.

श्रीमंत लोकांच बरं आहे.

ते फक्त पैसे देऊन किंमत चुकवतात.

गरीब लोक आपलं आयुष्य देऊन अप्रचलनात बळी जातात.


जल-प्रदुषण, भु-प्रदुषण आणी हवा-प्रदुषणाचे सर्वात गंभीर परिणाम त्या देशातील दारिद्र्यरेषेवर झगडणाऱ्या नाजुक नाशवंत लोकसंख्या घटकावरच होतो.


हे बदलायला हवे.

तुम्ही तयार आहात का?


प्रत्येक खरेदी सजगपणे करा.

वापरा आणि फेकाच्या गोंडस सापळ्यात अडकू नका.

अप्रचनलाचे नवे बळी 

बनू नका...!!

The Chief Minister rushed to control pollution in the state.

 The Chief Minister rushed to control pollution in the state.

1000 tankers for road cleaning in Mumbai

Special squads for dust cleaning of roads

Instructions from Chief Minister Eknath Shinde

          Mumbai, 9th: Chief Minister Eknath Shinde has taken steps to improve the quality of air in the state of pollution control. The action plan that has been implemented to improve the air quality index should be expedited, he instructed. All administrative machinery should work together in the direction of a pollution-free Maharashtra, he directed. To control dust on the roads in Mumbai, 1000 tankers should be brought in for water spraying. Special squads should be appointed for this. The construction sites of MMRDA should be made dust-free and clean. The use of anti-smog guns and sprinklers should be increased, the Chief Minister told the Municipal Commissioner.

            In this meeting held at "Varsha", the official residence of the Chief Minister, all regional revenue commissioners, district collectors, municipal commissioners, police superintendents, and chief executive officers participated through video conferencing. Mumbai Municipal Commissioner I.S. Chahal, Additional Chief Secretary of Public Works Department Manisha Mhaiskar, Metropolitan Commissioner of MMRDA Dr Sanjay Mukherjee, Principal Secretary of Environment Department Praveen Darade, Principal Secretary of Urban Development Department Govindraj, Chief Executive Officer of MIDC Vipin Sharma, Principal Secretary of Transport Department Parag Jain, etc. were present to the meeting.

Pollution-free campaign should be publicised

            Chief Minister Mr. Shinde said that all municipal corporations and various state government departments should work together to effectively implement the measures taken to improve air quality in cities including Mumbai. Citizens should participate in the pollution prevention campaign and create public awareness, he said.

Water spraying should be done to prevent the spread of dust

            To prevent the spread of dust due to construction works at various places in Mumbai, the roads should be cleaned by water spraying. Special squads should be appointed to clean the dust collected, the Chief Minister instructed at this time. The number of tankers for road cleaning should be increased to 1000, he also said. The Chief Minister instructed that all construction sites in Mumbai and the metropolitan area where development works are underway through MMRDA should be dust-free. While laying the sheets to prevent dust from vehicles on the roads, all these places should be made dust-free, the Chief Minister instructed. Citizens should not be inconvenienced while travelling due to the sheets laid, he told the Municipal Commissioner.

While carrying soil, and debris, it should be covered

            The Chief Minister said that all municipal corporations and cities should strictly follow the orders and guidelines given by the High Court to control the most polluted places in the city. The Chief Minister suggested that the transport department should take action against the vehicles that do not cover the soil and debris from the roads while transporting them.

Urban forests should be increased

            Municipal corporations should take the initiative to increase the urban forest area (Miyawaki) in the cities of the state. Tree planting should be done in the maidan. Use sprinklers to reduce the amount of dust. It is necessary to control the pollution in the air while planning pollution prevention. The Chief Minister instructed to use cloud seeding to reduce dust pollution in Mumbai.

The fortnightly report on pollution control measures should be submitted

            The Chief Minister also instructed to submit a fortnightly report of the pollution control measures taken in the state. At this time, experts from IIT gave information about the measures to be taken to reduce pollution. The state should take the initiative to study the effects on health due to pollution, the experts suggested at this time.

 

छंद देई आनंद’ कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

 छंद देई आनंद’ कविता संग्रहास बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांना पुरस्कार प्रदान

 साहित्य अकादमीचे 23 भाषांतील बाल’ साहित्य पुरस्कार प्रदान

 

            नवी दिल्ली, 9: प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी छंद देई आनंद’ या कविता संग्रहास आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाचे  कवी व बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी स्वीकारला.

            साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2023 चा प्रदान समारंभ त्रिवेणी कला संगममंडी हाऊसनवी दिल्ली येथे गुरुवारी सांयकाळी झाला. यावेळी इंग्रजी लेखक आणि अभ्यासक हरीश त्रिवेदीसाहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिकउपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते सन्माननीय साहित्यिकांना पुरस्काराने करण्यात आले.

 

            साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी 23 प्रादेशिक भाषांमधील  साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली होती. यामध्ये रविंद्रनाथ गोस्वामी (आसामी)श्यामलकांती दाश (बंगाली)प्रतिमा नंदी नार्जारी (बोडो)बलवान सिंग जमोडिया (डोगरी)सुधा मूर्ती (इंग्रजी)रक्षाबेहेन पी. दवे (गुजराती)सूर्यनाथ सिंग (हिंदी)विजयश्री हालाडी (कन्नड) तुकाराम रामा शेट (कोंकणी)अक्षय आनंद 'सनी' (मैथिली)प्रिया ए.एस. (मल्याळम)दिलीप नाडमथन (मणिपुरी)एकनाथ आव्हाड (मराठी)मधुसूदन बिष्ट (नेपाळी)जुगल किशोर षडंगी (ओडिया),गुरमित कडिआलवी (पंजाबी)किरण बादल (राजस्थानी)राधावल्लभ त्रिपाठी (संस्कृत)मानसिंग माझी (संताली)ढोलन राही (सिंधी)के. उदयशंकर (तमिळ)डी.के. चादुवुल बाबू (तेलुगु) आणि स्वर्गीय मतीन अचलपुरी (उर्दू) यांचा समावेश आहे.

पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे आहे. मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षयकुमार काळेबाबा भांड आणि प्रो (डॉ.) विलास पाटील यांचा समावेश होता.

                               छंद देई आनंद’ या काव्यसंग्रहाविषयी

 

            छंद देई आनंद’ मराठी बालकविता संग्रहात इतिहासविज्ञानपर्यावरण आणि संस्कृतीबद्दलची माहिती सोप्या भाषेत मांडली गेली आहे. हा संग्रह वाचकांना समाजवनस्पती आणि प्राण्यांबद्दल शिक्षित व जागरूक करतोमुलांचे मनोरंजन करतो आणि त्यांना जीवनातील विविध उपयुक्त गोष्टींचे महत्त्व समजण्यास आणि चांगल्या सवयी विकसित करण्यास मदत करतो. कवितांची लय मंत्रमुग्ध करणारी आहे आणि हे कार्य पालकशिक्षक आणि निसर्गाबद्दल प्रेमआपुलकी आणि आदर आकर्षित करते.

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या विषयी

 

            महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार व कथाकथनकार. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली 30 वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्षे मुलांसाठी कथाकवितानाट्यछटाचरित्रकाव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन करतात.

            सानेगुरुजींची कथाकथन परंपरा पुढे नेण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असतात. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथानिवेदक सानेगुरुजी पुरस्काराचे मानकरी आहेत. बोधाईगंमत गाणीअक्षरांची फुलेशब्दांची नवलाईछंद देई आनंदपाऊस पाणी हिरवी गाणी हे बालकवितासंग्रहआनंदाची बागएकदा काय झालं!खळाळता अवखळ झरा आणि इतर कथाप्रकाशाचा उत्सव हे बालकथासंग्रहमजेदार कोडीआलं का ध्यानात?, खेळ आला रंगात हे काव्यकोडी संग्रहमला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रहमिसाईल मॅन हे चरित्र... आदि त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत.  त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदीइंग्रजी भाषांमध्ये आणि ब्रेल लिपीमध्ये देखील अनुवाद झालेले आहेत. त्यांची जवळपास 30 पुस्तके प्रसिद्ध असूनत्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा वा.गो.मायदेव पुरस्कारबालकवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

0000

Featured post

Lakshvedhi