Sunday, 6 August 2023

विमानाचे दरवाजे बंद केल्यावर कोणाही प्रवाश्यासाठी परत का उघडत नाहीत? - काय

 *विमानाचे दरवाजे बंद केल्यावर कोणाही प्रवाश्यासाठी परत का उघडत नाहीत? - काय आहेत कारणे?*

उड्डाणास तयार असलेल्या विमानाचे दरवाजे एकदा लावले की एखादा प्रवासी बाहेर राहिला आहे त्याला घेण्यासाठी उघडत नाहीत. अशी गैरसोय का करतात, फक्त दार उघडून एक प्रवासी तर आत घ्यायचाय त्यात काय एवढे असे आपल्याला वाटत राहते.

गेल्या आठवड्यात कर्नाटकच्या राज्यपालांनाही ते उशिरा आले म्हणून त्यांना न घेता विमान गेले.

काय आहेत दार पुन्हा न उघडण्याची कारणे? त्यासाठी विमान उड्डाणा आधीची प्रोसिजर समजावून घेणे रंजक ठरेल.

विमान केवळ हवेच्या दाबावर उड्डाण घेते, तरंगत राहते आणि परत जमिनीवर उतरते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच विमानात किती वजन आहे, ते कसे विभागले गेले आहे, विमानाचा गुरुत्वमध्य ठराविक मर्यादेच्या आत आहे ना हे मुद्दे सर्वात महत्त्वाचे असतात.

त्यासाठी प्रोसिजर असे असते,

१. पायलट आणि को-पायलट कॉकपिटमध्ये आले की फ्लाईट डीसपॅचर त्यांना इंधनाचे वजन, इंजिन मधील ऑइलचे वजन, सामानाचे वजन आणि प्रवाशांचे वजन (हे सरासरीवर अंदाजे काढले जाते) याची माहिती देतात.

२. पायलट ही माहिती त्याच्या कॉम्पुटरला फीड करतो. या माहितीवर कॉम्प्युटर विमानाचा टेकऑफ वेग किती असावा, हवेची लिफ्ट किती लागेल, उतरताना याच गोष्टी कशा लागतील यासह सर्व प्रवासातील वेगाचे तपशील तयार करतो.

३. सर्व सामान आणि प्रवासी विमानात आल्यावर वजनाची सर्व माहिती देणारे प्रिंट पायलटकडे दिले जातात. या पेपरना 'लोड अँड ट्रिम शीट' म्हणतात. यात विमानातील स्टाफ आणि प्रवाशी यांची संख्या तर असतेच शिवाय पुरुष किती, स्त्रिया किती, लहान मुले किती असा तपशील आणि सामान ठेवण्याच्या कोणत्या भागात किती वजन आहे हे असते. गुरुत्वमध्य मर्यादेच्या आत आहे हेही नमूद केलेले असते.

४. यानंतर विमानाचे दार बंद करण्यात येते. मुख्य दार बंद करून घेतल्यावर आतील कर्मचारी विमानाची सर्व दारे 'आर्मड पोझीशन' वर आणतो, याचा अर्थ त्या स्थितीत जर कोणतेही दार उघडले तर ते विमानापासून खाली घसरगुंडी सारखे उघडते. आपत्तीकाळात विमान उतरले, अपघात झाला तर त्यासाठी ही तयारी असते.

५. केबिन स्टाफ सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले आहेत का, सीट पाठी सरळ आहेत ना हे तपासून सर्व ठीक असल्यास तसे पायलटला कळवतो.

६. पायलट ट्रॅफिक कंट्रोल, ATS, कडे उड्डाणास तयार आहे आणि किती प्रवासी आहेत ते कळवतो.

६. ATS अन्य विमानाच्या हालचाली, त्यांना उड्डाणास दिलेल्या परवानग्या, धावपट्टीवरील परिस्थिती हे सर्व तपासून विमान जागेवरून हलवण्याची परवानगी देतात आणि धावपट्टीवरील रांगेत कितवा नंबर आहे त्याची कल्पना देतात.

या स्टेजपर्यंत जर एखादा प्रवासी घेण्यासाठी दार उघडले तर केलेली सम्पूर्ण प्रक्रिया रद्द करून पहिल्यापासून सगळ्या स्टेजेस परत कराव्या लागतात. विमान सुटण्यास मोठा उशीर होऊ शकतो.

७. ATS ची परवानगी आल्यावर विमान हलवण्याची प्रक्रिया चालू होते. त्यासाठी चाकाचे ब्रेक काढताच स्वयंचलित पद्धतीने ती वेळ विमान यंत्रणेत नोंदली जाते आणि ती वेळ विमान सुटल्याची वेळ समजली जाते.

-------------------------

संकलन आणि लेखन -

प्रमोद (पी. आर.) कुलकर्णी, पुणे.

०१.०८.२०२३

(Source TOI Dt. 31.07.2023)

तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळावरअशासकीय सदस्यांची नियुक्ती दोन महिन्याच्या आत करणार

 तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळावरअशासकीय सदस्यांची नियुक्ती दोन महिन्याच्या आत करणार


- मंत्री शंभुराज देसाई


            मुंबई, दि. 3 : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर राज्यस्तरासोबतच विभागीय तसेच जिल्हास्तरीय अशासकीय सदस्यांची नियुक्ती येत्या दोन महिन्याच्या आत करण्यात येईल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावेळी मंत्री श्री.देसाई बोलत होते.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले, तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्यात येणार असून या समूहासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विविध योजना एकत्रितपणे कशा राबवता येतील याचा विचार करण्यात येणार आहे. समितीच्या तीन बैठका झाल्या असून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. या समाज घटकासाठी आरोग्य तपासणीसाठी एकदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचा ३२७५ तृतीयपंथीयांना लाभ झाला आहे. त्यांना नवीन शिधापत्रिका सुलभतेने मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. पोलिस पदासाठीच्या ऑनलाईन अर्जामध्ये पुरुष, महिला बरोबरच तृतीयपंथी उमेदवारांसाठीही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


            गृह विभागामार्फत आजच पोलिस महासंचालकांच्या माध्यमातून सर्व पोलिस स्टेशनमध्ये सूचना देण्यात येईल की पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या तृतीयपंथीयांना इतर नागरिकांप्रमाणेच चांगली वागणूक देण्यात यावी. असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य वर्षा गायकवाड, अनिल देशमुख, विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला. 


Saturday, 5 August 2023

मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कोष का रिकार्ड: एक वर्ष के भीतर 100 करोड़ रुपये के मदद का हुआ वितरण बारह हजार से ज्यादा मरीजों को मिला लाभ

 मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कोष का रिकार्ड: एक वर्ष के भीतर 100 करोड़ रुपये के मदद का हुआ वितरण

बारह हजार से ज्यादा मरीजों को मिला लाभ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सहायता कोष की टीम की सराहना


 


             मुंबई, दिनांक- 05 अगस्त: साहब, आपकी वजह से मुझे नई जिंदगी मिली है, कुछ इसी तरह के शब्दों में नासिक के धर्मा सोनवणे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से अपनी भावनाएं व्यक्त की है। श्री सोनावणे की तरह ही मुख्यमंत्री सहायता कोष कक्ष के माध्यम से चिकित्सा सहायता प्राप्त करने वाले राज्य के लगभग 12 हजार 500 मरीजों की भी ऐसी ही प्रतिक्रिया होने वाली है। मुख्यमंत्री सहायता कोष कक्ष के माध्यम से इस एक साल में 100 करोड़ रुपये की चिकित्सा सहायता दी गई है। यह एक अनोखा रिकॉर्ड है और इसके लिए कोष कक्ष की टीम की सराहना करते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि जरूरतमंद मरीजों की सहायता के लिए और ज्यादा प्रभावी ढंग से काम करें।


              विधानमंडल का मानसून सत्र कल (शुक्रवार) को समाप्त हो गया। विधान भवन में मुख्यमंत्री श्री शिंदे के कक्ष में मुख्यमंत्री के करकमलों द्वारा धर्मा सोनवणे को एक लाख रुपये का चिकित्सा सहायता का चेक सौंपा गया। ये वही धर्मा सोनवणे हैं जिन्हें मुख्यमंत्री ने मदद की थी। कुछ दिन पहले मुंबई से ठाणे लौटते वक्त मुख्यमंत्री की नजर सड़क किनारे खड़ी एक एम्बुलेंस पर पड़ी। उन्होंने अपना काफिला रोक कर मरीज से पूछताछ की..उन्हें अपने काफिला की एम्बुलेंस से ठाणे के अस्पताल में भर्ती कराया गया। उस समय मुख्यमंत्री ने श्री. सोनावणे को न केवल एम्बुलेंस दी बल्कि ठाणे के एक निजी अस्पताल में उनका इलाज भी करवाया। इस इलाज का खर्च मुख्यमंत्री सहायता कोष से दिया गया, उसी का एक लाख रुपए का चेक कल श्री सोनवणे को दिया गया। उस समय सोनवणे ने मुख्यमंत्री के प्रति अपनी भावना व्यक्त करते हुए कहा था कि आपकी वजह से मुझे नई जिंदगी मिली है।


             मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि श्री सोनवणे के चेहरे पर दिख रही कृतज्ञता का भाव यह अलौकिक संतुष्टि देने वाला था।


 कल विधानसभा में विपक्ष के अंतिम सप्ताह प्रस्ताव का उत्तर देते हुए मुख्यमंत्री श्री शिंदे ने चिकित्सा सहायता कक्ष के काम की सराहना की थी। उन्होंने यह भी भावना व्यक्त किया कि जरूरतमंदों की सहायता में सहजता से जारी रहेगी लेकिन समय पर उन्हें सहायता प्रदान की जानी चाहिए।      


 मुख्यमंत्री सहायता कोष कक्ष की मुख्यमंत्री ने की सराहना


             मुख्यमंत्री सहायता कोष कक्ष ने पिछले वर्ष 100 करोड़ रुपये वितरित करने का पड़ाव परने के लिए मुख्यमंत्री ने इस कक्ष की सराहना की। इस कक्ष द्वारा किए गए अथक परिश्रम और मरीजों की देखभाल के लिए दिखाई गई तत्परता के कारण ही यह हासिल किया गया है। मुख्यमंत्री ने भविष्य में भी जरूरतमंद मरीजों की इसी तरह मदद करने का आवाह्न किया है। मुख्यमंत्री ने इस कक्ष के विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) मंगेश चिवटे, निलेश देशमुख सहित उनकी टीम में काम करने वाले सभी चिकित्सा सहायकों, सरकारी अधिकारियों और कर्मचारियों की सराहना की। इस कक्ष का चिकित्सा सहायता ग्राफ लगातार बढ़ रहा है और पहले यह 50 था अब 100 करोड़ की चिकित्सा सहायता प्रदान करने का पड़ाव पार कर चुका है, इसलिए यह कोष कक्ष राज्य के जरूरतमंद मरीजों के लिए आशा की किरण बन गया है।


0000



 


Record of Chief Minister's Medical Relief Fund


Disbursement of Rs 100 crore in a year

More than twelve thousand patients have been benefited

Chief Minister Eknath Shinde hails CMRF's team


 

            

             Mumbai, Date- 05 August: Sir, I got a new life because of you. With these words, Dharma Sonawane, who hails from Nashik, expressed his feelings to Chief Minister Eknath Shinde. Like Mr. Sonawane, around 12 thousand 500 patients of the state, who have received medical assistance through the Chief Minister's Relief Fund (CMRF) cell are going to have similar feelings. Rs 100 crores of medical aid was given during this year through the CMRF cell. While appreciating team of the CMRF cell, the Chief Minister Eknath Shinde said that this is a unique record. He also asked the team of the CMRF cell to work more effectively to help the needy patients.

             The Monsoon Session of the Legislature concluded yesterday.Dharma Sonawane was provided a cheque of Rs one Lakh for a medical assistance by the Chief Minister Shri Shinde at the chief minister's office in the state legislature. He is the same Dharma Sonawane, who was provided help by the Chief Minister. A few days ago, while returning from Mumbai to Thane, the Chief Minister spotted an ambulance standing on the road side. The chief minister stopped the convoy and asked the patient about his well being...Mr.Sonawane was admitted to a hospital in Thane by an ambulance, which was provided from his convoy. At that time, the Chief Minister did not only provide an ambulance to Mr. Sonawane but also availed him treatment at a private hospital in Thane. The expense of this treatment was paid from the CMRF, a cheque of Rs one lakh was handed over to Mr. Sonawane yesterday. On this occasion, Mr Sonawane conveyed his feelings to the Chief Minister stating that he got a new life because of the chief minister.

        

             The Chief Minister said that the feelings of gratitude on Mr. Sonawane's face is a unique satisfaction. While replying to the last week motion in the Legislative Assembly yesterday, the Chief Minister had appreciated the work of the Chief Minister's Relief Fund cell. The Chief Minister expressed that assistance to the needy people would continue to be lenient but timely assistance should be availed to them.


CM appreciated Chief Minister's Relief Fund cell


             The Chief Minister appreciated the Chief Minister's Relief Fund (CMRF) cell for attaining the milestone of disbursing Rs 100 crore in the last one year. He also said that this milestone was achieved due to the tireless work done and the readiness shown for patient care. The Chief Minister appealed to help the needy patients in the same way in the future as well. The Chief Minister appreciated Mangesh Chivate, officer on special duty (OSD) of CMRF cell


, Nilesh Deshmukh, along with all the medical assistants, government officials and staff working in their team of the cell. The graph of medical assistance of this cell has been rising continuously. Earlier it has reached the milestone of providing 50 crores to the needy patients and now100 crores of medical assistance to the needy patients. This CMRF cell has become a ray of hope for the need

y patients of the state.


0000


 


ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित

 ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


नवी दिल्लीत ग्रंथालय महोत्सवाचे उद्घाटन


        नवी दिल्‍ली, 5 : ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचेही ते मापदंड आहेत. यासाठी ग्रंथालयांचे आधुनिकिकरण आणि डिजिटलायशनला गती देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथालय महोत्सव 2023 च्या उद्घाटनाप्रसंगी आज केले.


            राजधानीतील प्रगती मैदान येथे हॉल क्रमांक 5 येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ′′ग्रंथालय महोत्सव 2023′′ चे आयोजन करण्यात आले आहे. कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. अनामिका उपस्थित होत्या. तसेच सर्व राज्यांचे शासकीय ग्रंथालय प्रतिनिधींसमवेत महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालक डॉ. दत्तात्रय क्षीरसागर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.


            ग्रंथालये हस्तलिखितांचे जतन करतात तसेच इतिहास आणि भविष्यातील दरी ही सांधतात. ग्रंथालयांच्या विकासाला प्राधान्य देऊन ग्रंथालये हा विकासाप्रती मानवकेंद्री दृष्टिकोनाचा अत्यावश्यक भाग म्हणून तसेच ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "ग्रंथालय महोत्सव 2023" चे दोन दिवसीय आयोजन केले आहे.


            राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, ग्रंथालये ही सामाजिक संवादाची, अभ्यासाची आणि चिंतनाची केंद्रे बनली पाहिजेत. ग्रंथालये एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या सामूहिक चेतनेचे आणि बुद्धीचे प्रतीक मानले गेले आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात अनेक देशांतील लोकांनी भारतातून पुस्तके नेऊन त्यातून ज्ञान मिळवले. पुस्तके आणि ग्रंथालये हा मानवतेचा समान वारसा आहेत. एका छोट्या पुस्तकात जगाच्या इतिहासाची दिशा बदलण्याची क्षमता आहे. महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, की जॉन रस्किन यांच्या 'अन टू द लास्ट' या पुस्तकाचा गांधीजींच्या जीवनावर मोठा सकारात्मक प्रभाव पडला आहे.


            राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या की, हस्तलिखितांचे संवर्धन आणि ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशनसाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वापराने ग्रंथालयांचे स्वरूप बदलत आहे. 'वन नेशन- वन डिजिटल लायब्ररी' हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी ऑफ इंडिया विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. नॅशनल मिशन ऑन लायब्ररीच्या यशामुळे ग्रंथालयांशी जोडण्याची आणि पुस्तके वाचण्याची संस्कृती बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा महोत्सव 'आझादी का अमृत महोत्सवा'च्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग आहे. ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी आणि वाचन संस्कृती जोपासण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी सुसंगत आहे, असेही त्यांनी सांगितले.


महोत्सवात प्रदर्शने, पुस्तकांची दालने


            लेखक सत्र, मुलांसाठी कार्यशाळा, मुलांसाठी गॅलरी आणि ग्रंथालयांच्या डिजिटलायझेशनवर गटचर्चा, सत्रांचा समावेश असेल. ज्ञानाचा उत्सव साजरा करणे, इतिहास आणि भविष्यातील अंतर कमी करणे आणि वाचनाची आवड वाढवणे हा या मागचा उद्देश आहे.


            ग्रंथालय महोत्सव 2023’ या महोत्सवाच्या समारोप समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित राहतील. देशातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळखही यावेळी करून देण्यात येणार आहे.


0000



 

केंद्र सरकारने सहकारी संस्थांबाबतघेतलेल्या निर्णयांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

 केंद्र सरकारने सहकारी संस्थांबाबतघेतलेल्या निर्णयांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी


- सहकार आयुक्त अनिल कवडे


 


            पुणे, दि.४ : केंद्र सरकारने सहकारी संस्थांबाबत विविध मोठे निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये चांगल्याप्रकारे करण्यात येत आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्वावलंबी व्हाव्यात आणि कार्यक्षमपणे काम कराव्यात यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


            महाराष्ट्रामध्ये २० हजारांपेक्षा जास्त विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ग्राम पातळीवर कार्यरत आहेत. या संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट होणे व त्या माध्यमातून पतपुरवठा विविध सेवा व वस्तूंचा पुरवठा ग्रामीण भागातील जनतेला व्हावा, या दृष्टिकोनातून या संस्थांचे संगणकीकरण होत आहे. या संस्थांच्या पोटनियमामध्ये काही बदल करण्यात आले असून बाहेरील कर्ज घेण्याची मर्यादा स्वनिधीच्या १० पटऐवजी २५ पट करण्यात आली आहे. तसेच या संस्थांना १५२ प्रकारच्या वस्तू व सेवांचा व्यवसाय करता येईल, अशीही तरतूद करण्यात आली आहे. राज्यामध्ये याबाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पातळीवर कार्यवाही सुरु झालेली आहे.


            विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून संबंधित संस्थांच्या सभासदांना किफायतशीर दरामध्ये योग्य दर्जाची जेनरीक औषधे उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून या संस्थांना जेनरीक औषधी दुकानांचे परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान अशा प्रकारची ५ दुकाने उघडण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असून राज्यामध्ये आतापर्यंत ३४० संस्थांनी असा उपक्रम घेण्याची तयारी दर्शविली आहे. यातील आतापर्यंत ३२० संस्थांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे. नजीकच्या भविष्यकाळात या दुकानांच्या माध्यमातून स्वस्त दराने औषधी पुरवठा झाल्यामुळे जनतेच्या दैनंदिन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.


             विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ई-सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून कॉमन सर्व्हिस सेंटर या संस्थांमार्फत सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली असून राज्यातील आतापर्यंत २ हजार ७०० संस्थांनी कॉमन सर्व्हिस सेंटर अंतर्गत नोंदणी केलेली आहे. या माध्यमातून भविष्यकाळामध्ये ग्राम पातळीवर लागणाऱ्या ३०० पेक्षा जास्त सेवा पुरविल्या जातील.


            राज्यातील धान्य उत्पादनाचा विचार करुन साठवणूक क्षमता सहकारी संस्थांमार्फत वाढविण्याचा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील नेर पिंगळाई, जि. अमरावती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.


            विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू व सेवा पुरवठ्याबाबत उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुढील काळात या संस्था आत्मनिर्भर बनतील व संबंधित गावांसाठी खऱ्या अर्थाने विकास केंद्र म्हणून काम करतील, अशी अपेक्षा सहकार आयुक्तांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला व शेतीशी संबंधीत सर्व उपक्रम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांसाठी सहाय्यभूत ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


००००



 

सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहा

 सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहा


महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षांत संचलन संपन्न


: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


          नाशिक, दि. 5: येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


          आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सत्र क्रमांक 122 च्या दीक्षांत संचलन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, राहुल ढिकले, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर, डॉ. अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आगामी काळ हा आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी


सोबतच सायबर व आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून


चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेवून बाहेर पडणारे


पोलीस उपनिरीक्षक हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावताना नेहमीच अग्रस्थानी असतात. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून प्रतिष्ठेसोबतच समाजाप्रती निष्ठा बाळगून आपली व देशाचीप्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. लोकांच्या सेवेकरीता आपण पोलीसदलात रूजू झालो आहोत. शिस्तीत काम करीत असताना संवेदनशील राहिल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देवू शकाल. समाजात गुणवत्तापूर्ण सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या कामाने, जनतेची शाबासकी मिळविणे हेच आपल्या जीवनातील महत्वपूर्ण पदक असेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


           ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील चांगल्या प्रवृत्तीचे रक्षण करून वाईट प्रवृत्तींचा बिमोड करणे ही आपली आद्य जबाबदारी आहे. भारतीय संविधानाने


आपल्या सर्वांना समान दर्जा दिला असून कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रलोभनांना बळी


न पडता भारतीय संविधानाची घेतलेली शपथ निभावण्यासाठी कायम प्राधान्य द्यावे.


त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत


काढण्यासाठी सज्ज रहावे.


          पोलीस महासंचालक रजश्रीश सेठ आपल्या मागर्दशनात म्हणाले की, प्रशिक्षणार्थी आज आपले प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत रूजू होणार आहेत. समाजातील वंचीत व शोषित घटकास समान न्याय व संरक्षण देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे. अवैध वाळू उपसा, अंमली पदार्थ या सारख्या असामाजिक गुन्हेगारीवर आपला अंकुश असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांप्रती आपली वर्तणूक सद्भावपूर्ण असावी. गुन्ह्याचा तपास कायद्याला अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेनुसार होणे अपेक्षित आहे.


          प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. १२२ (सरळ सेवा) चे प्रशिक्षण सत्र हे १ ऑगस्ट, २०२२ पासुन सुरु झाले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून निवड झालेल्या ३४९ पुरुष व १४५ महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश असून १ प्रशिक्षणार्थी गोवा राज्याचे आहेत. एकुण ४९४ पोलीस उपनिरीक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या


प्रशिक्षणार्थी पैकी ८८ टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व १२ टक्के पदव्युत्तर आहेत, यांना सर्व


प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांनी दिली.


          या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.


दीक्षांत संचलनात उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले कॅडेट...


▪ अभिजित भरत काळे: यशवंतराव चव्हाण गोल्ड कप - ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच


▪ रेणुका देविदास परदेशी : अहिल्याबाई होळकर कप - ऑल राऊंड वुमन कॅडेट ऑफ द बॅच


▪ रुबिया ताजुद्दिन मुलाणी : बेस्ट कॅडेट इन ड्रील


▪ प्रशांत हिरामण बोरसे : एन.एम. कामठे गोल्ड कप बेस्ट कॅडेट इन राफेल अँड रिव्हॉल्वर शूटिंग


▪ अभिजित भरत काळे : रिव्हॉल्वर ऑफ हॉनर - बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच


▪ किरण सुभाष देवरे : डॉ. बी. आर. आंबेडकर कप - बेस्ट कॅडेट इन लॉ


▪ किरण सुभाष देवरे : सिल्व्हर बॅटन - बेस्ट कॅडेट इन स्टडीज


▪ किरण सुभाष देवरे : सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच


          दीक्षांत संचालन समारंभानंतर नूतन शैक्षणिक संकुल, मोटर परिवहन विभाग इमारत,


अकॅडमी मुख्य प्रवेशद्वार व संरक्षक भिंत कोनशिलेचे अनावरण आणि भूमीपूजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. भुसे, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, डॉ.राहुल आहेर, श्री. ढिकले, पोलीस महासंचालक श्री. सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर व अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार उपस्थित होते.


          असे आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे नूतन शैक्षणिक संकुल


           महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई अंतर्गत 13 हजार 846 चौरस मीटर जागेत 79 कोटी 68 लाख 61 हजार 908 रुपयांचे नवीन शैक्षणिक संकुल व इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 26 वर्ग खोल्या, 1 सायबर लॅब, 1 संगणक लॅब, 1 स्टाफ रूम, 1 कॉन्फरन्स हॉल असणार आहे. तसेच मोटर परिवहन विभाग इमारत, प्रवेशद्वार, टेहाळणी टॉवर, संरक्षक भिंत याप्रमाणे इतर पायाभूत सुविधा या शैक्ष

णिक संकुलात उपलब्ध होणार आहेत.


0000000




वृत्त क्र. 2650


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम:वर्षभरात 100 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम:वर्षभरात 100 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप

बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सहाय्यता निधीच्या टीमचे कौतुक


 


            मुंबई, दि. ५: साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं. अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली. श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या राज्यातील सुमारे १२ हजार ५०० रुग्णांची अशीच प्रतिक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत या वर्षभरात १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. हा एक अनोखा विक्रम असून त्याबद्दल निधी कक्षाच्या टीमचे कौतुक करतानाच गरजू रुग्णांच्या मदतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधानभवनातील मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या दालनात धर्मा सोनवणे यांना एक लाख रुपयांच्या वैद्यकीय मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. हे तेच धर्मा सोनवणे आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईकडून ठाण्याला परतत असताना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ताफा थांबवून रुग्णाची विचारपूस केली..त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा श्री. सोनवणे यांना केवळ रुग्णवाहिकाच दिली नव्हती तर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार देखील केले होते. या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आला त्याचाच एक लाखांचा धनादेश काल श्री. सोनवणे यांना देण्यात आला. त्यावेळी मला तुमच्यामुळे नवं आयुष्य मिळाल्याची भावना सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली.


            श्री. सोनवणे यांच्या चेहऱ्यावर दिसलेले कृतज्ञतेचे भाव हेच अलौकिक समाधान देऊन गेल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक केले होते. गरजूंना मदत देताना प्रसंगी सोपस्कार होत राहतील परंतु त्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे अशी भावना देखील व्यक्त केली होती.


मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक


            मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने गेल्या वर्षभरात १०० कोटींची मदत वितरित करण्याचा टप्पा सर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या कक्षाचे कौतुक केले. या कक्षाने केलेले अथक परिश्रम आणि रुग्णसेवेसाठी दाखवलेली तत्परता यामुळे हे साध्य झाल्याचे सांगत भविष्यातही गरजू रुग्णांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, निलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या टीम मध्ये काम करणारे सर्व वैद्यकीय सहाय्यक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या कक्षाचा वैद्यकीय मदतीचा आलेख कायम चढता राहिला असून यापूर्वी ५० तर आता १०० कोटी वैद्यकीय मदत देण्याचा टप्पा सर केल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णासाठी हा निधी कक्ष हा एक आशे

चा किरण ठरला आहे.


Featured post

Lakshvedhi