Tuesday, 11 July 2023

धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणारसुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही

 धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणारसुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार


             धुळे, दि. 10 जुलै 2023 (जिमाका) - जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम जलदगतीने सुरू असून हा रेल्वे मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


            येथील एसआरपीएफ मैदानावर 'शासन आपल्या दारी' अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पवार, आमदार किशोर दराडे, जयकुमार रावल, काशीराम पावरा, मंजुळाताई गावित, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते.


            'शासन आपल्या दारी' अभियानात धुळे जिल्ह्यात 3 लाख 21 हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी या लोकाभिमुख कार्यक्रमास राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना मिळत आहे. सरकारी कार्यालयांच्या चकरा सर्वसामान्यांना माराव्या लागू नये यासाठी शासनाला काम करावयाचे आहे. आदिवासी समाज संघटनेच्या मागण्यांवर बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. 


            गेल्या वर्षभरात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकार 50 टक्के व राज्याचा 50 टक्के निधी देणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.


धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार


            सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनच जनतेपर्यंत जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाचा झपाट्याने विकास होत आहे. तापी नदीमधील बॅरेजच्या पाण्याचा वापर वाढला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक शिस्त ठेवत शासन सर्वसामान्यांसाठी सर्वांगीण काम करत आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खर्च करण्याचे शासनाचे धोरण आहे. पाऊस नसल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे, असे नमूद करून धरण पाणीसाठ्याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केली.


            धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. धुळे जिल्ह्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव-वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासावरही शासनाचा भर राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, धुळे जिल्ह्यात काही भाग आदिवासी बहूल आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आता कुठे जाण्याची गरज नाही. तुमच्या कामासाठी शासनच आता तुमच्या दारी आले आहे. प्रत्येकाला घर, प्रत्येक घरी शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते, प्रत्येकाला अन्नसुरक्षा मिळाली पाहिजे. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात आले आहेत. एक रुपयात पीक विमा योजना, महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, अशा सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. राज्य व देशात पायाभूत सुविधांचे जाळे तयार होत आहे. अक्कलपाडा धरण व सुलवाडे बॅरेज प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. केंद्रीय योजनेत या प्रकल्पांचा समावेश केल्याने कामांना गती येणार आहे. धुळे महानगरपालिकेला सुध्दा विकासकामांसाठी मुबलक निधी देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ लोक कलावंत नथ्थू ईशी, जितेंद्र भोईटे, संतोष ताडे, अरविंद भामरे, मांगू मगरे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृध्द कलावंत पेन्शन योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळालेले दिनेश पाटील, चेतन गवळी, अमोल जाधव या तरूणांना यावेळी नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.


            यावेळी धुळे जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे टोपी, उपरणे, महिला बचतगटांनी तयार केलेल्या खानदेशी पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्यम गांधी आदी उपस्थित होते.


            प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानात केलेल्या कामांची माहिती विशद केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार, आदिवासी विभागाच्या लाभार्थ्यांना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप केले. तसेच निवडक सरपंचाशी संवादही साधला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, धुळे जिल्ह्यातील आदिवासी समुदायातील विविध कलाकारांच्या कलापथकांनी स्थानिक आदिवासी नृत्य सादर केले.


एका छताखाली शासकीय विभागांच्या माहितीचे स्टॉल


            'शासन आपल्या दारी' अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे 34 स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलला भेट देऊन लाभार्थ्यांना लाभाचे वितरण केले. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोजगार मेळाव्यात एकूण 1800 युवकांनी नोंदणी केली. यापैकी 1250 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 215 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात 15 विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या.


            यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. गावित, आमदार मंगेश चव्हाण, आमदार जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.


000000



 

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने१३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

 शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने१३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

            पुणे, दि. १० : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.


            वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.


            जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक : सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.


            वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. 


            सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हवीतील वाहतूक: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.


            वाहतुकीस लावलेले निर्बंध १३ जुलै रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


00

Monday, 10 July 2023

खानदानी ठेवा(Hereditary diseases).....*

 *खानदानी ठेवा(Hereditary diseases).....*


आई वडील आजी आजोबा यांच्याकडून जसे आपल्याला पैसा,घर, दाग दागिने हे इस्टेट या स्वरूपात मिळतात त्याचप्रमाणे दमा, डोकेदुखी, Constipation पासून ते Obesity, BP, Diabetes, Thyroid ते टक्कल असा आनुवंशिक रोगांचा अमूल्य ठेवा सुद्धा मिळत असतो.


आमच्या कुटुंबात पिढ्यानुपिढ्या हे आजार आहेत असे सांगणारे खूप भेटतात परंतु हा आनुवंशिक रोगांचा शाप नष्ट करण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही.


हे प्रयत्न खूप च अवघड आहेत असच सर्वांना वाटते किंवा घरी सगळ्यांना आहे म्हणून मला सुद्धा हा आजार झालाय किंवा होईल अशीच धारणा असते सगळ्यांची.


परंतु योग्य lifestyle follow केली, चुकीच्या गोष्टी टाळल्या की आनुवंशिक आजार सहज दूर करता येतात पण एकवेळ आम्ही चार गोळ्या जास्त घेऊ पण पथ्य सांगू नका, खाण्यावर बंधन घालू नका असाच ट्रेण्ड दिसतो हल्ली.


रोग होऊ च नये म्हणून प्रयत्न करणे हे खूप कमी खर्चाचे आणि सोपे आहे. जीभेवर थोडासा संयम ठेवला की 50% लढाई जिंकली च म्हणून समजा. कारण महागडे उपचार घेऊन सुद्धा त्रास कमी होत नाहीत असे आजार खूप बळावले आहेत हल्ली नवनवीन tests आणि investigation ची भर पडत आहे. या सगळ्यापासून लांब रहायचे असेल तर आज पासून च Healthy lifestyle चा अवलंब करा.


वेळच्या वेळी जेवण, अती तिखट, खारट आंबट पदार्थ कमी खाणे, सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे, चौरस आहार, नियमित व्यायाम, दोन्ही जेवणानंतर शत पावली, त्या त्या ऋतू मध्ये उपलब्ध असलेली फळे, भाज्या खाणे, Junk food न खाणेह्याच तर गोष्टी healthy lifestyle मध्ये येतात.


खरंच खूप अवघड आहे का हे follow करणं?

एकदा करून तर पहा. आपसूक तुमच्या लक्षात येईल की छोट्या छोट्या तब्येतीच्या तक्रारी कोणतेही औषध न घेता कमी करता येतात.


*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


तंबाखू मुक्त करण्याबाबत

 


भात झोडपणी स्वस्तात मस्त पहा तर खर,शेअर करा

 


पित्ताशयातील खडे

 पित्ताशयातील खडे


 आयुर्वेदानुसार, तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


पित्त दोष: त्याच्या अत्याधिक वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात दगड तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे.

कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते जे संपूर्णपणे पित्ताशयामध्ये जास्त चिकट पदार्थ तयार करतात.

वात दोष: पित्त आणि कफ दोषांच्या मिश्रणात कोरडेपणा वाढतो ज्यामुळे दगड तयार होतात.


 ◆पंचकर्म चिकित्सा◆

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सेला खूप महत्त्व आहे एका ठिकाणी म्हंटल आहे चुकीचा आहार आणि चुकीच्या दिनचर्येमुळे पित्त प्रधानआम दोष आपल्या शरीरात वाढतो आणि ऋतूनुसार पंचकर्म न केल्यामुळे हा आजार दिवसेंदिवस वाढू लागला आहे या आजारावर पंचकर्मातील वमन विरेचन तसेच औषधीय स्नान चिकित्सा, तसेच आवाहन स्वेद या क्रीया केल्यास रूग्णाचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते.


आयुर्वेदाने यावर काही रामबाण उपाय व औषधी सुचवल्या आहेत ज्याचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास रुग्णाचे खडे विरघळण्यास निश्चितच मदत होते.

◆आयुर्वेदिक उपचार व घरगुती उपचार◆


*कडुनिंब आणि मोठी वेलची यांचे चूर्ण मिसळून खाल्ल्याने पित्तदुखी दूर होते.


*मक्याचे तंतू किंवा केस पाण्यात उकळून त्याचे पाणी प्या. यामुळे काही दिवसात पित्ताचे खडे बरे होतात


*रोज आल्याचा चमचाभर रस घेणे देखील फायदेशीर आहे

 

*कुळीथ मुठभर पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी उठून प्यावे

आहारात कुळीथाचा त्याच्या डाळीचा समावेश करा


*ग्लासभर सफरचंदाच्या रसामध्ये चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.


**रोज एक चमचा हळद कोमट पाण्यासोबत घेतल्यास खडे विरघळण्यास मदत होते.


https://chat.whatsapp.com/HOiEuQyiTqxLY1sb5eVRd1


*गाजर,काकडी रस प्रत्येकी100 मिली एकत्र करुन दिवसातून दोनदा प्यायल्यास फायदा होतो.


*सकाळी रिकाम्या पोटी एक मध्यम लिंबाचा रस आठवडाभर प्यायल्याने फायदा होतो.


*नाशपाती मध्ये आढळणाऱ्या रासायनिक घटकांमुळे खडे विरघळण्यास मदत होते.


*गोमूत्र:तुमच्या आयुर्वेद तज्ञाच्या निर्देशानुसार 30 मिली ते 40 मिली ताजे गोमूत्र फिल्टर करून सकाळी रिकाम्या पोटी घेतले जाऊ शकते. हे पित्त प्रवाह नियंत्रित करते, अतिरिक्त कोलेस्टेरॉलशी लढा देते, यकृत शुद्ध करते, कफ पचवते आणि विकृत वात व्यवस्थापित करते.


*भृंगराज:यकृतावर भृंगराजची मुख्य क्रिया पित्तप्रवाह सुधारते. हे एक उत्कृष्ट तहान,भूक वाढवणारे औषध आहे आणि पचनाला चालना देते आणि यकृत उत्तेजक म्हणून कार्य करते. त्यामुळे वात कमी होतो.


*सैधव /रॉक मीठ:हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय असू शकतो जो तुम्हाला पित्तचा प्रवाह वाढवण्यास मदत करू शकतो. तुम्हाला फक्त रिकाम्या पोटी नाश्ता करण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा रॉक सॉल्ट किंवा सैधव . हे पेय घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला सुमारे ४५ मिनिटे झोपावे लागेल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्याने परिणामकारक परिणाम दिसून येतील.


*पिक्रोराइजा कुरोआ (किटनी) :

हे लिव्हर ला उत्तेजन देऊन पित्ताचे कार्य सुरळीत करत

 *गोखरू काढा किंवा पावडर घेणे लाभप्रद


*इसबगोल हे उत्तम असे विरघळणारे फायबर आहे. याच्या सेवनामुळे पोटात फायबरचे प्रमाण योग्य राहते आणि पित्ताशयातील खड्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.


*बर्बेरिस अरिस्टाटा:याला दारुहरिद्र असेही म्हणतात. हे पित्त प्रवाह अवरोधित करण्यात मदत करते आणि अशा प्रकारे अडथळ्यामुळे होणारी तीक्ष्ण वेदना कमी करते. सतत वापर केल्याने, आपण नैसर्गिकरित्या पित्त खडे विरघळू शकता.


* मिल्क थिस्ल नावाच्या गोळ्या बाजारात मिळतात.ज्यांच्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळतात


* एक कप पाण्यात सिंहपर्णीच्या पानाचे एक चमचा चुर्ण टाकून अर्धा तास भिजवून ठेवा नंतर मध घालून ते पाणी प्या.

*गुळवेलीचा काढा घेणे ही फायदेशीर


*जास्वंदीच्या फुलांची पावडर चमचाभर एक चमचा मधात हा यावरती सगळ्यात बेस्ट उपाय आहे


*वासागुलुच्यादी कषायम,अविपित्तीकर चुर्ण,द्राक्षादी कषाय,वरूणादी कषाय,पटोलकतुरोहीन्यादी कषायम,त्रिविल लेहम,आरोग्यवर्धीनी, भुनिंबादी काढा,रोहितकारिष्ट इ. औषध रचना तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करता येते. अजूनही असंख्य औषधी आयुर्वेदात आहेत ज्याचा वापर निष्णात वैद्य रूग्ण बरा होण्यासाठी करत असतात.

ताम्र सिंदूर, हजरुल यहूद भस्म, मेदोहरविडंगदी लौह, फलत्रिकादी क्वाथ अश्मरीहर रस,श्वेत पर्पटी,गोखरू क्वाथ इ.यासारख्या औषधींचा उपयोग आयुर्वेदिक वैद्याच्या सल्याने व मार्गदर्शनाखाली करावा.


. आपल्याला ही यातील काही लक्षण जाणवायला लागल्यास आपण आपल्या विभागातील आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन लवकरच व्याधीमुक्त व्हावे हीच सदिच्छा.

आशा आहे आपणास लेख आवडला असेल


वैद्य. गजानन



महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या

 महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या


75 परिसंवाद मालिकेतील पहिला परिसंवाद संपन्न

       मुंबई, दि. 10 : पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र आणि क. जे. सोमैया इंस्टिट्यूट ऑफ धर्म स्टडिज यांच्या वतीने नुकतेच 6 ते 8 जुलै, 2023 या कालावधीत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाः पुरातत्त्व व संग्रहालयशास्त्राचे पुनरावलोकन व भविष्यातील दिशा ” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास, समृद्ध वारसा आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयास अनुसरून ७५ परिसंवाद आयोजित करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यातील पहिला हा परिसंवाद होता.


            छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सव्यसाची मुखर्जी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्धाटन झाले. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या परिसंवादात इतिहासपूर्वकालीन, प्रागैतिहासिक, ऐतिहासिक आणि मध्ययुगीन महाराष्ट्रासह मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि नाणकशास्त्र, महाराष्ट्रातील संग्रहालये, राज्याशी संबंधित जागतिक वारसा विषय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. तरुण विद्वानांसाठी समर्पित एक स्वतंत्र विभाग देखील आयोजित करण्यात आला होता.


            परिसंवादानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन, फ्लिंटनॅपिंग आणि प्राचीन खेळांच्या डेमोसही छान प्रतिसाद लाभला. माजी संचालक डॉ. ए.पी.जामखेडकर यांच्या हस्ते समारो

प झाला.


Featured post

Lakshvedhi