Thursday, 6 July 2023

कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गातील सर्व तांत्रिक अडचणी दूर मध्य रेल्वे प्रकल्प पूर्ण करणार

 कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गातील सर्व तांत्रिक अडचणी दूर.मध्य रेल्वे प्रकल्प पूर्ण करणार

लवकरच संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय


कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मधील साठीच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाले असून लवकरच या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होण्याचा विश्वास कोकण रेल्वेच्या आज संपन्न झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या मार्गाच्या उभारणीची जबाबदारी मध्य रेल्वेवर सोपवण्यात आली असून या संदर्भात मध्ये रेल्वे कोकण रेल्वे यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेण्याचे आजच्या बैठकीत मान्य केले.

कोकण रेल्वेच्या मुख्य सल्लागार समितीच्या गोवा येथे पार पडलेल्या बैठकीत कोकण रेल्वेच्या 800 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावरील एकूण 72 स्टेशन्स व या संपूर्ण मार्गावरील सुविधांची सुधारणा प्रवाशासाठीच्या सुविधा नवीन मार्गावरील रेल्वे वाहतूक व मालवाहतुकीच्या सुविधा वाढवणे अशा विविध 41 विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. खासदार धनंजय महाडिक व महाराष्ट्र चेंबूर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गा संबंधी प्रश्न उपस्थित केले व या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठीचा आग्रह धरला खासदार धनंजय महाडिक यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडून द्यावयाच्या खर्चाचा वाटा लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. या बैठकीत ललित गांधी यांनी कोकण विभागातून आंबा व अन्य फळांच्या वाहतुकीसाठी रो रो सेवा सुरू करण्याची मागणी केली ती मान्य करण्यात आली. व येत्या हंगामापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्टेशन वरून रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या मार्गामुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे सांगितले, तसेच या मार्गामुळे कोल्हापूर दक्षिण भारताशि थेट जोडले जाईल व त्याचा व्यापार उद्योग व पर्यटनाच्या विकासासाठी उपयोग होईल असेही सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे सुधारणा संदर्भातल्या विविध सूचना दिल्या.


मुख्य सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित खासदार फ्रान्सिस सारडीन्हा, खासदार धनंजय महाडिक, खासदार उमेश जाधव, खासदार इराप्पा काडादी, खासदार एन. के. प्रेमाचंद्रन, आमदार गणेश गावकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ट्रस्टी आशिष पेडणेकर, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक चंद्रकांत गवस, प्रवासी संघटनेचे सचिन वाहाळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. या बैठकीला कोकण रेल्वेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.


कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मधील साठीच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाले असून लवकरच या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होण्याचा विश्वास कोकण रेल्वेच्या आज संपन्न झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या मार्गाच्या उभारणीची जबाबदारी मध्य रेल्वेवर सोपवण्यात आली असून या संदर्भात मध्ये रेल्वे कोकण रेल्वे यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेण्याचे आजच्या बैठकीत मान्य केले.

कोकण रेल्वेच्या मुख्य सल्लागार समितीच्या गोवा येथे पार पडलेल्या बैठकीत कोकण रेल्वेच्या 800 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावरील एकूण 72 स्टेशन्स व या संपूर्ण मार्गावरील सुविधांची सुधारणा प्रवाशासाठीच्या सुविधा नवीन मार्गावरील रेल्वे वाहतूक व मालवाहतुकीच्या सुविधा वाढवणे अशा विविध 41 विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. खासदार धनंजय महाडिक व महाराष्ट्र चेंबूर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गा संबंधी प्रश्न उपस्थित केले व या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठीचा आग्रह धरला खासदार धनंजय महाडिक यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडून द्यावयाच्या खर्चाचा वाटा लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. या बैठकीत ललित गांधी यांनी कोकण विभागातून आंबा व अन्य फळांच्या वाहतुकीसाठी रो रो सेवा सुरू करण्याची मागणी केली ती मान्य करण्यात आली. व येत्या हंगामापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्टेशन वरून रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या मार्गामुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे सांगितले, तसेच या मार्गामुळे कोल्हापूर दक्षिण भारताशि थेट जोडले जाईल व त्याचा व्यापार उद्योग व पर्यटनाच्या विकासासाठी उपयोग होईल असेही सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे सुधारणा संदर्भातल्या विविध सूचना दिल्या.


मुख्य सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित खासदार फ्रान्सिस सारडीन्हा, खासदार धनंजय महाडिक, खासदार उमेश जाधव, खासदार इराप्पा काडादी, खासदार एन. के. प्रेमाचंद्रन, आमदार गणेश गावकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ट्रस्टी आशिष पेडणेकर, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक चंद्रकांत गवस, प्रवासी संघटनेचे सचिन वाहाळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. या बैठकीला कोकण रेल्वेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते

काय पण

 


देवभक्ती तून देशभक्ती


Wednesday, 5 July 2023

कैंसर का सबसे सस्ता इलाज*

 *कैंसर का सबसे सस्ता इलाज*


*वैज्ञानिकों ने ढूंढ निकाला कैंसर का सबसे सस्ता इलाज, 2 रुपए की ये चीज जड़ से खत्म कर सकती है कैंसर*


*”खानें वाला सोडा ....”*


*कैंसर के मरीजों के लिए एक बड़ी राहत वाली खबर आई है। दुनियाभर के वैज्ञानिक जिस बीमारी के लिए सालों से इलाज ढूंढ रहे थे उसका आखिरकार तोड़ मिल चुका है।*

*अब तक दुनिया भर में कैंसर के इलाज के लिए अरबों रुपए पानी की तरह बहा दिए गए हैं, लेकिन कोई भी दवा पूरी तरह से कैंसर को जड़ से खत्म करने में नाकाम साबित हुई है। अब तक बाजार में जो दवाएं मौजूद हैं, वो सिर्फ कैंसर को बढ़ने से रोक देती हैं।*

*अमेरिका के लडविंग इंस्टीट्यूट फॉर कैंसर रिसर्च में अमेरिकी वैज्ञानिकों के दल ने हाल ही में कुछ नए शोध किए। इस टीम की अगुवाई मशहूर कैंसर वैज्ञानिक और जॉन हॉप्किंग यूनिवर्सिटी के ऑनकोलॉजिस्ट (कैंसर विशेषज्ञ) डॉ. ची वान डैंग ने की। उन्होंने कहा कि हम सालों तक रिसर्च कर चुके हैं और अब तक कैंसर के जो भी इलाज मौजूद हैं वो काफी महंगे हैं। हमने जो शोध किया उसमें चौंकाने वाले नतीजे सामने आए हैं। आपके किचन में रखा बेकिंग सोड़ा कैंसर के लिए रामबाण औषधि है।*

*डॉ. डैंग के मुताबिक, हमने बेकिंग सोडा पर लंबी रिसर्च की और जो परिणाम हमने अब तक सिर्फ सुने थे वो प्रमाणित हो गए। उन्होंने बताया कि यदि कैंसर का मरीज बेकिंग सोडा पानी के साथ मिलाकर पी ले तो कुछ ही दिनों में इसका असर दिखने लगेगा। उन्होंने बताया कि कीमोथेरेपी और महंगी दवाओं से भी तेजी से बेकिंग सोडा ट्यूमर सेल्स को न सिर्फ बढ़ने से रोकता है, बल्कि उसे खत्म भी कर देता है।*

*डॉ. डैंग ने पूरी जानकारी देते हुए बताया कि हमारे शरीर में हर सेकेंड लाखों सेल्स खत्म होते हैं और नए सेल्स उनकी जगह ले लेते हैं। लेकिन कई बार नए सेल्स के अंदर खून का संचार रुक जाता है और ऐसे ही सेल्स एकसाथ इकट्ठा हो जाते हैं, जो धीरे-धीरे बढ़ता है। इसी को ट्यूमर कहा जाता है। उन्होंने बताया कि हमने ब्रेस्ट और कोलोन कैंसर के ट्यूमर सेल्स पर बेकिंग सोडा के प्रभाव की जांच की और हमने पाया कि बेकिंग सोडा वाला पानी पीने के बाद जिस तेजी से ट्यूमर सेल्स बढ़ रहे तो वो काफी हद तक रुक गए।*

*उन्होंने बताया, ट्यूमर सेल्स में आक्सिजन पूरी तरह खत्म हो जाती है, तो उसे मेडिकल भाषा में हिपोक्सिया कहते हैं। हिपोक्सिया की वजह से तेजी से उस हिस्से का पीएच लेवल गिरने लगता है और ट्यूमर के ये सेल एसिड बनाने लगते हैं। इस एसिड की वजह से पूरे शरीर में भयंकर दर्द शुरू हो जाता है। अगर इन सेल्स का तुरंत इलाज न किया जाए तो ये कैंसर सेल्स में तब्दील हो जाते हैं। डॉ. डैंग के मुताबिक, बेकिंग सोडा मिला पानी पीने से शरीर का पीएच लेवल भी मेंटेन रहता है और एसिड वाली समस्या न के बराबर होती है। डॉ. डैंग ने बताया कि कई बार कीमोथेरेपी के बावजूद भी ऐसे कैंसर सेल्स शरीर में रह जाते हैं, जो बाद में दोबारा से शरीर में कैंसर सेल्स बनाने लगते हैं। इन्हें T सेल्स कहते हैं। इन टी सेल्स को नाकाम सिर्फ बेकिंग सोडा से ही किया जा सकता है।*

*डॉ. वॉन डैंग ने कहा कि पहले भी ये बात आप सुन चुके होंगे कि बेकिंग सोडा कैंसर समेत कई बीमारियों का इलाज है। लेकिन अब हम प्रमाणिक तौर पर कह सकते हैं कि कैंसर का सबसे सस्ता और अच्छा इलाज बेकिंग सोडा से मिला पानी है। उन्होंने बताया कि जिन लोगों पर हमने प्रयोग किए उन्हें दो हफ्तों पर पानी में बेकिंग सोडा मिलाकर दिया और सिर्फ 2 हफ्ते में उन लोगों के ट्यूमर सेल्स लगभग खत्म हो गई !* 

*TATA मेमोरियल हॉस्पिटल के डॉ. राजेन्द्र ए. बडवे ने जोर देकर कहा कि यदि हर कोई इस समाचार को प्रसारित करता है, तो निश्चित रूप से समाज की बड़ी सेवा होगी।*

              🌹🌹🙏🏼🙏🏼🌹🌹

*NOTE* 😍👇🏻

*Forward as received.*


*आप सबसे हाथ जोड़कर नम्र निवेदन है,

कि 

कृपया इस महत्वपूर्ण सन्देश को सभी को भेजें 

जिससे सभी लाभान्वित हो॥ 🙏🏼🙏🏼

जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरजागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन

 जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरजागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन


             मुंबई, दि. ४ : जागतिक कौशल्य स्पर्धा- २०२४ मध्ये फ्रान्स (लिऑन) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर स्पर्धा होणार आहे. निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर भेट देवून त्यांची नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे, यांनी केले आहे.


            जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे. यापूर्वी ४६ जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ विभागामधून ५० देशांतील १० हजार उमेदवार समाविष्ट असून ही स्पर्धा १५ देशांत १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती.


                 जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही थ्री डी डिजिटल गेम आर्ट (3d Digital Game Art), ऑटोबॉडी रिपेअर (Autobody Repair), ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी (Automobile Technology), बेकरी (Bakery), ब्युटी थेरपी (Beauty Therapy), ब्रिक्लींग (Bricklaying), कॅबिनेट मेकिंग (Cabinetmaking), कार पेंटिग (Car Painting), कारपेन्ट्री (Carpentry), सीएनसी मिलिंग (CNC Milling), सीएनसी टर्निंग (CNC Turning), काँक्रिट कन्स्ट्रक्शन वर्क (Concrete Construction Work), कुकिंग (Cooking), इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन (Electrical Installations), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), मेकॅनिक्ल इंजिनिअरिंग कॅड (Mechanical Engineering CAD), मोबाईल ॲप्ल‍िकेशन डेव्हल्पमेंट (Mobile Applications Development), मोबाईल रोबोटीक्स (Mobile Robotics), पेंटिग आणि डेकोरेटिंग (Painting and Decorating), पॅटसरी अँण्ड कॉन्फेक्शनरी (Patisserie and Confectionery), प्लॅस्टरींग अँण्ड ड्रायवॉल सिस्ट‍िमस् (Plastering and Drywall Systems), प्लंबिंग अँण्ड हिटींग (Plumbing and Heating), प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी (Print Media Technology), प्रोटोटाईप मॉडलिंग (Prototype Modelling), रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग (Refrigeration and Air Conditioning), रिन्युएबल एनर्जी (Renewable Energy) अभ्यासक्रम/क्षेत्राकरीता आयोजित केली जाणार आहे.


                 जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, एडीटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग क्लाऊड कंप्युटिंग (Additive Manufacturing Cloud Computing), सायबर सिक्युरिटी (Cyber Security), डिजिटल कन्स्ट्रक्शन (Digital Construction), इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी (Industrial Design Technology), इंडस्ट्री ४.० (Industry ४.०), इन्फर्मेशन नेटवर्क केबलिंग (Information Network Cabling), मेकस्ट्रॉनिक्स (Mechatronics), रोबोट सिस्ट‍िम इंटिग्रेशन अँण्ड वॉटर टेक्नॉलॉजी (Robot System Integration & Water Technology) या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.


         फ्रान्स (लिऑन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने वेळापत्रक नोंदणीकृत उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येईल, तसेच काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर, १७५, श्रेयस चेंबर, १ ला मजला, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


****

आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

 आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू


           


            मुंबई, दि. 4 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


            अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून १५४९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.


****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन


गडचिरोलीत पदवीदान समारंभ, तर कोराडीत सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण


नागपुरात प्रथम आगमन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत


 


            नागपूर, दि. 4 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी 4 जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले. 5 जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.


            राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदींनी स्वागत केले.   


            4 जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 10 वा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत. त्याच दिवशी दुपारी भारतीय विद्या भवनतर्फे निर्माण करण्यात आलेल्या रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.    


            6 जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील.


राष्ट्रपतींचे राजभवनात स्वागत


             आज आगमनानंतर येथील राजभवनातही त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, आशिष जायस्वाल यांनी त्यांचे स्वागत केले.


००००

Featured post

Lakshvedhi