Tuesday, 4 July 2023

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण

 राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती

हरित हायड्रोजन धोरण जाहीर, 8 हजार 500 कोटीस मान्यता


            नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.


            प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर केले असून, २०२३ पर्यंत देशात ५ मिलीयन टन हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मित करण्याचे उद्द‍िष्ट आहे. राज्यामध्ये देखील हरित हायड्रोजन आणि संबंधित उत्पादनांची क्षमता ओळखून, हे धोरण तयार करण्यात आले आहे. राज्याची सध्याची हायड्रोजनची मागणी दरवर्षी ०.५२ मिलीयन टन इतकी आहे. ही मागणी २०३० पर्यंत १.५ मिलीयन टनांपर्यंत पोहचू शकते.


            आज जाहीर करण्यात आलेल्या हायड्रोजन धोरणामध्ये ओपन अँक्सेसद्वारे, स्वयंवापरासाठी राज्यातून किंवा राज्याबाहेरून, राज्यातील वीज वितरण कंपन्यांकडून, पॉवर एक्स्जेंजकडून नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणाऱ्या प्रकल्पांना लाभ सवलती दिल्या जातील. महाऊर्जा कार्यालयाकडे हरित हायड्रोजन आणि संबंधित उत्पादन प्रकल्पांची नोंदणी करण्यात येईल. या प्रकल्पांना २५ हजार प्रति मेगावॅट इलेक्ट्रोलायझर क्षमतेनुसार प्रकल्प सुविधा महाऊर्जाकडे जमा करावी लागेल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पुढील दहा वर्षांसाठी पारेषण शुल्क, व्हिलिंग चार्जेसमधून अनुक्रमे ५० टक्के व ६० टक्के सवलत देण्यात येईल. स्टॅंडअलोन व हायब्रीड ऊर्जा प्रकल्पांना अनुक्रमे पुढील १० वर्षांसाठी आणि १५ वर्षांसाठी विद्युत शुल्कातून १०० टक्के सवलत देण्यात येईल तसेच क्रॉस सबसिडी व अधिभारातून देखील माफी देण्यात येईल.


            याशिवाय पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटीव्ह्ज् २०१९ नुसार लाभ मिळतील, ५ वर्षांकरिता हरित हायड्रोजनच्या गॅसमध्ये मिश्रणासाठी प्रत्येक किलोकरिता ५० रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच पहिल्या २० हरित हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशनला कमाल ४.५० कोटी रुपये या मर्यादेत ३० टक्के भांडवली खर्च अनुदान देण्यात येईल. पहिल्या ५०० हरित हायड्रोजन आधारित फ्युएल सेल प्रवासी वाहनांना कमाल ६० लाख रुपये प्रति वाहन, एवढ्या मर्यादेत ३० टक्के भांडवली खर्च अनुदान देण्यात येईल.


            हरित हायड्रोजन प्रकल्पांसाठी असलेल्या जमिनीला स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर, अकृषिक कर व मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत देण्यात येईल. हरित हायड्रोजन कक्षासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ घेणे, त्यांचे प्रशिक्षण, कौशल्य विकास, एक खिडकी सुविधा इत्यांदी बाबींकरिता वार्षिक ४ कोटी याप्रमाणे १० वर्षांसाठी ४० कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.



-----०-----


रक्त पातळ करण्याचे काही घरगुती उपाय

 रक्त पातळ करण्याचे काही घरगुती उपाय.

गुळ आणि लसूण हे रक्त पातळ करण्यासाठी चांगले उपाय आहेत. गुळ हृदयासाठी आरोग्यदायी असतो आणि लसणात अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. तुम्ही हे दोन पदार्थ मिक्स करून एक चटणी बनवू शकता आणि ही चचटणी शरीरातील तुमचे रक्त पातळ करण्यास मदत करेल.भरपूर पाणी प्यायल्याने रक्ताच्या गुठळ्या विरघळण्यास मदत होते कारण ते रक्त पातळ आणि सुरळीत वाहण्यास मदत करते. रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिण्याची शिफारस केली जाते.हळद


लोक हळदीचा वापर औषधी म्हणून फार पूर्वीपासून करत आहेत. हळदीतील कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि रक्त पातळ करणारे किंवा अँटीकोएगुलंट गुणधर्म असतात. जे शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्याचे काम करतात.


रक्त घट्ट होण्यापासून आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टींचाही वापर केला जाऊ शकतो.


हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी काही वैद्यकीय स्थिती तसेच रक्त पातळ करणाऱ्या औषधांची आवश्यकता असू शकते. रक्त पातळ करणारे अँटीप्लेटलेट्स रक्त पेशींना एकत्र चिकटून राहण्यापासून रोखतात ज्यामुळे त्यांना गोठण्यापासून प्रतिबंध होतो. जेव्हा शरीरात रक्त घट्ट होऊ लागते, तेव्हा तुमचे शरीर अनेक प्रकारे त्याचे संकेत देऊ लागते. 


यामध्ये चक्कर येणे, मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह वाढणे, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, त्वचेला खाज सुटणे, अंधुक दृष्टी, संधिवात यांचा समावेश होतो. शरीरात रक्त घट्ट होण्यापासून आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टींचाही वापर केला जाऊ शकतो. या पदार्थांचा वापर करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

लसूण

लसूण, फ्लेवर फूडमध्ये जोडले जाते, त्यात नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात.फूड सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी मधील 2018 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की लसूण पावडरमुळे उंदरांमध्ये अँटीथ्रोम्बोटिक क्रिया झाल्याचे दिसून आले आहे. अँटीथ्रोम्बोटिक एजंट हा एक पदार्थ आहे जो रक्त गोठण्यास प्रतिबंध करतो.


व्हिटामीन ई


व्हिटॅमिन ई रक्तातील गोठण्याची क्रिया कमी करते. हे परिणाम एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या व्हिटॅमिन ईच्या प्रमाणावर देखील अवलंबून असतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऑफिस ऑफ डायटरी सप्लिमेंट्सने शिफारस केली आहे की जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी व्हिटॅमिन ई ओव्हरडोज घेणे टाळावे.


हळद


लोक हळदीचा वापर औषधी म्हणून फार पूर्वीपासून करत आहेत. हळदीतील कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी आणि रक्त पातळ करणारे किंवा अँटीकोएगुलंट गुणधर्म असतात. जे शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्याचे काम करतात. हळद रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. परंतु रक्त पातळ करणाऱ्यांसाठी हळद थेट घेण्याची शिफारस केलेली नाही. तुम्ही स्वयंपाकात, सूपमध्ये आणि गरम पाण्यात मिसळून हळद खाऊ शकता.


आलं खाल्ल्यानं रक्त पातळ होतं का?


आले हा एक दाहक-विरोधी मसाला आहे जो रक्तातील गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करतो. त्यात सॅलिसिलेट नावाचे नैसर्गिक आम्ल असते. ऍस्पिरिन सॅलिसिलेट, ज्याला एसिटिलसॅलिसिलिक ऍसिड म्हणूनही ओळखले जाते, हे सिंथेटिक गुणधर्मांसह शक्तिशाली रक्त पातळ करणारे आहे. नैसर्गिक सॅलिसिलेट्सचे प्रभाव मिळविण्यासाठी, लोक नियमितपणे ताजे किंवा वाळवलेले आले स्वयंपाक करताना वापरू शकतात.

प्रमोद पाठक.



शेंगदाणे गुळ खा, तंदुरस्त राहा

 


खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश* 👌👌

 *खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश* 👌👌                                                                                                       


*'Healthy WOMEN'.......*


वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबिन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अशा असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.


या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा? हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.


या सगळ्या *fire fighting lifestyle* मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या *अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त* मिळून *Super woman* होता येईल!


*Energy boosting:*


पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी *cerelac* तयार करता येईल.


दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही *energy level maintain* ठेवता येईल.


बस्स पांच मिनिटवाला नाश्ता with देशी अंदाज:


नाश्ता *compulsory* प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तुपसाखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दुध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.


*ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी* यांना ठामपणे *"NO"* म्हणायचे.


किचन क्लिनिक:


फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून *हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास* दूर सरतील.


एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे *combination* आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे *anaemia ला bye bye*

ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की *पचनाच्या तक्रारी चक्क गायब.*


कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून *हाडांना strong* ठेवता येईल.


*Fitness मंत्र :


सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून *टाचदुखी ला कायमचा निरोप* देऊया.


==============

सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मित्र-मैत्रिणी शोधून खूप हसूया.


आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूया. स्वतःची ओळख घडवून आणत, निरामयतेच्या वाटेने जाता जाता *"फिरुनी नवे जन्मेन मी"* हे promise स्वतःशीच करूया !


...🙏🙏🙏


_*(

सतेचा सारीपाट

 सतेच्या सारीपाट साठी सगळेच खेळत असतात, कंसा मामा,नारायण, अताचे काका पुतणे घरोघरी आहेत.विजयी कोण होते हे नियती चे फासे ठरवते.


जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी स्थानिक सुट्टया केल्या जाहीर*

 वृत्त क्र.517 दि.03 जुलै 2023


*जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी स्थानिक सुट्टया केल्या जाहीर*

 

अलिबाग,दि.03(जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व कार्यालयांकरिता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि.1 मार्च 2023 च्या अधिसूचनेद्वारे 3 स्थानिक सुट्टयापैकी 1 स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने या अधिसूचनेद्वारे सन-2023 या वर्षाकरिता बुधवार, दि.30 ऑगस्ट 2023, नारळी पोर्णिमा/रक्षाबंधन व गुरुवार, दि.7 सप्टेंबर 2023 रोजी गोपाळकाला या 2 स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जाहीर केल्या आहेत.

००००००००

Monday, 3 July 2023

राज्यात 80 फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित

 राज्यात 80 फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित


विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री


राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या हस्ते शुभारंभ


 


            मुंबई, दि. 3 : राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागांमध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे; अशा तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज विधानभवनाच्या प्रांगणात प्रातिनिधिक स्वरुपात पाच फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


            श्री.विखे पाटील म्हणाले की, हे फिरत्या पशुवैद्यकीय पथक जीपीएस ॲक्टिव्हेटेड असून राज्यातील दीड कोटी पशुधन जपण्यासाठी हे महत्वाचे पाऊल राज्य शासनामार्फत उचलण्यात आले आहे. एका फिरते पशुवैद्यकीय पथकासाठी साधारणपणे १४ लाख ३५ हजार खर्च येत असून एकूण ८० फिरते पशुवैद्यकीय पथके राज्यात कार्यान्वित होत आहेत. पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १९६२ टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या राज्यस्तरावर स्थापीत कॉल सेंटरद्वारे पशुपालकांच्या फोन कॉल प्रमाणे सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत.


            राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व व गर्भधारणा तपासणी इत्यादी प्रकारच्या पशु आरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थामार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुधन आजारी पडल्यास या पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेवून जावे लागते, पशुरुग्ण जर चालण्यास सक्षम नसेल तर पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते. बहुतांश पशुपालकांना हा अधिक भार परवडणारा नसल्यामुळे या अभावी मृत्यु होवून पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. राज्यातील पशुधनाची क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे व त्याकरीता उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे असून हे पथक महत्वाची भूमिका बजावणार आहे.


            फिरते पशुवैद्यकीय पथक चालविणेसाठी राज्यस्तरीय कॉल सेंटर, बाह्यस्रोताद्वारे मनुष्यबळ निर्मिती, वाहनासाठी इंधन व दुरुस्ती तसेच औषधे व शल्य चिकित्सेसाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करणे यासाठी केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के अर्थसहाय्य वाटा निश्चित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत इंडसइंड बँकेची उपकंपनी भारत फायनांशियल इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालय मध्यवर्ती कॉल सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. १९६२ हा टोल फ्री क्रमांक असून मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेमधून आवश्यक पशुवैद्यकीय सेवा मिळणार आहे. केंद्र शासनाच्या पशुस्वास्थ व रोग नियंत्रण या योजनेच्या मार्गदर्शक सूचना नुसार राज्यातील प्रत्येकी एक लक्ष पशुधनास एक फिरते पशुवैद्यकीय पथक या प्रमाणे एकूण ३२९ फिरत्या पशुवैद्यकीय पथकांची निर्मिती करावयाची असून प्रथम टप्यामध्ये केंद्र शासनाकडून ८० फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यासाठी रक्कम रु. १२८० लक्ष १००% केंद्र निधी अनावर्ती खर्चासाठी (चारचाकी वाहन व अनुषंगिक साधनसामग्री व यंत्रसामग्री) प्राप्त झालेला आहे. यामध्ये प्रामुख्याने रोग निदान, औषधोपचार, लसीकरण, शल्यचिकित्सा तसेच दृकश्राव्य माध्यमांद्वारे विस्तार विषयक सेवा पशुपालकांपर्यंत पुरविणे या बाबींचा समावेश होतो.


००००

Featured post

Lakshvedhi