Friday, 9 June 2023

वर्तमानाचा आनंद* हात तले सोडायचे पळत्याचे पाठी फिरायचे

वर्तमानाचा आनंद*

एक भिकारी असतो. तो एका शांत दुपारी, देवळाबाहेर बसून आरामात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या भाजीभाकरीचा आस्वाद घेत असतो. त्याक्षणी त्याच्या मनात कोणतेही विचार नसतात. तो अतिशय न्युट्रल असतो. इतक्यात एक मनुष्य बाईकवरून येतो. तो भिकाऱ्याला बघून जवळ येतो आणि म्हणतो, “बरं झालं तुम्ही दिसलात. आज माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं. मला अन्नदान करायचं होतं. गावात कोणी दिसतंय का ते आधी बघावं म्हणलं. तासभर झाला कोणीच दिसलं नाही. बरं झालं तुम्ही सापडलात. आलोच दहा मिनिटांत. श्रीखंड पुरी घेऊन आलो” इतकं बोलून निघून जातो. भिकाऱ्याचं समोर असलेलं जेवण आपोआपच मंदावतं. बाईकस्वार गेलाय त्या दिशेकडे नजर ठेवून तो बसतो. भाजीभाकरी बाजूला ठेवून वाट बघू लागतो. 


दहा मिनिटे, पंधरा मिनिटे. तासभर झाला तरी तो बाईकस्वार काही येत नाही. श्रीखंडपुरी खायला मिळेल ही आशा तीव्र असते. भिकारी वाट बघतो. पोटात कावळे ओरडत असतात. तो पक्वान्नाच्या आशेने क्षुब्ध होतो. 


मघाशीची शांत अवस्था संपते, डोकं फिरतं. तो गेलेला मनुष्य काही परत येत नाही. आता भिकारी कंटाळून समोरची भाजीभाकरी खाऊ लागतो. पण आता त्याची चव आवडेनाशी होते. भाजी बेचव तर भाकरी कडक वाटते. मनुष्य काही येत नाही, श्रीखंडपुरी मिळत नाही.


आपलंही असंच होतं बरेचदा. आपल्या हाती काहीतरी असतं. त्यापेक्षा भव्यदिव्य काही मिळावं अशी आशा असते (आशा, महत्वाकांक्षा नक्की असायला हवीच) पण ती आशा जेव्हा हतबलतेचं रुप घेते आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही तेव्हा त्याक्षणी आपल्याकडे जे हाती आहे तेही नकोसं वाटू लागतं. त्याचीही किंमत क्षुल्लक होते. त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही ही फॅक्ट आहे. माझ्या मते आशेचा किरण दिसला तरी आनंद मानावा आणि विझला तर जे याक्षणी आपल्या नशिबी आहे त्या वर्तमानाचा आनंद घ्यावा...!


🌷🙏🌷

जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे*

 *जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे*


*१- पचन सुधारते*


जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.


*२-वजन घटवण्यास मदत होते* 


जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.


*३-लवचिकता वाढवत*े 


पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.


*४-मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते*


जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. 


*५-कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते*


दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा.दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.


*६-शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते* 


शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे.शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.


*७-दीर्घायुषी बनवते* 


ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.


*८-गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात*


Yoga for Healing या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.


*९-चंचलता कमी होत*े 


मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.


*१०-हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो* 


काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ? हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.



महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश

 महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश


- राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर


 


            नवी दिल्ली, 8 जून : महाराष्ट्रातील लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे या आणि इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.


            महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. अहीर यांनी ही माहिती दिली. त्यांनी मागील सहा महिन्यांत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केलेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये राज्यातील काही ओबीसीमध्ये असणाऱ्या जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याबाबतची प्रक्रिया सूरू असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रात इतर मागासवर्ग आयोगाचे काम चांगले सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आयोगाचे सचिव राजीव रंजन उपस्थित होते.


            सन 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली असून सन 2018 मध्ये या आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. आयोगाच्या सक्रियतेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बळ मिळत आहे. शैक्षणिक सत्र वर्ष 2021-22 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात घेतलेली झेप उल्लेखनीय असल्याचा उल्लेख करीत श्री. अहीर यांनी माहिती दिली, देशभरात अनुक्रमे 1500 आणि 2500 विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस व एम.डी. अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला आहे.


            यासह केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळेत सन 2020-21 पासून 27 टक्के आरक्षण सुरू करण्यात आले. यामुळे केंद्रीय विद्यालयात सन 2020-ते 2023 पर्यंत 1,29,414 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला आहे, तर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2021-23 मध्ये 59,243 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. देशभरातील एकूण 33 सैनिकी शाळेत वर्ष 2021-22 मध्ये जवळपास 32.91 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला आहे. आता सैनिकी शाळेत मुलींनाही प्रवेश देण्यात येत असल्याचा उपक्रम केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आल्यामुळे त्याचा लाभ ओबीसी विद्यार्थीनीनाही होत असल्याचे श्री. अहीर यांनी सांगितले. 


            विद्यापीठांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे श्री. अहीर यांनी नमूद करून सांगितले की, वर्ष 2014-15 च्या तुलनेत 2020-21 मध्ये 32.6 टक्क्यांनी विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तसेच वर्ष 2014-15 च्या तुलनेत वर्ष 2020-21 मध्ये 40.4 टक्के विद्यार्थींनींची वाढ झाली आहे.


महत्वाच्या राष्ट्रीय संस्थांमध्ये वर्ष 2014-15 च्या तुलनेत 2020-21 मध्ये जवळपास 71 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे श्री. अहीर यांनी नोंदविले.


            राष्ट्रीय मागासवर्ग वित्त महामंडळद्वारे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,94,810 लाभार्थ्यांना 678.05 कोटी रूपयांच्या वार्षिक कार्य योजनेला कार्य मंजुरी प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय मागास वर्ग वित्त आणि विकास महामंडळ, प्रधानमंत्री दक्षता आणि कुशल संपन्न हितकारी योजनाच्या अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत आहे.


            बँकांच्या माध्यमातून विविध योजनातंर्गत ओबीसींना पुरेपूर लाभ दिला जात असल्याचे श्री. अहीर यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय बँकांमध्ये ओबीसींचे खाते मोठ्या प्रमाणात उघडण्यात आले असून त्यांना विविध योजनांचा लाभ दिला जात असल्याची माहिती श्री. अहीर यांनी दिली. यासह पेट्रोल पंप आणि गॅस एजेन्सी वाटपातही 27 टक्के आरक्षण दिले जात असल्यामुळे आता ओबीसी लोकांच्या जीवनस्तरात चांगला बदल होत असल्याचे चित्र दिसत असल्याचे श्री. अहीर यांनी सांगितले.


00000

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ


केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय


            नवी दिल्ली 8 : सन 2023-24 या आर्थिक वर्षातील खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींत वाढ करुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या महत्त्वाच्या निर्णयाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) मंगळवारी मंजुरी दिली आहे.


            केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्याबाबत मंजुरी दिल्याच्या निर्णयानुसार तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. धान, मका आणि भुईमूगाच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे.


            विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ ही केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय अधिभारीत सरासरी उत्पादन खर्चापेक्षा किमान 1.5 पट पातळीवर किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली होती. बाजरी (82 टक्के) आणि त्यानंतर तूर (58 टक्के), सोयाबीन (52 टक्के) आणि उडीद (51 टक्के) यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा अपेक्षित लाभ सर्वात जास्त असण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान 50 टक्के लाभ असा अंदाज आहे.


            अलिकडच्या वर्षांत, सरकार या पिकांसाठी उच्च किमान आधारभूत किंमत देऊन,कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक-तृणधान्ये/श्री अन्न व्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय, सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीआय ), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम ) यासारख्या विविध योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत.


            2022-23 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात एकूण अन्नधान्य उत्पादन 330.5 दशलक्ष टन इतके विक्रमी होईल, असा अंदाज आहे, हे उत्पादन मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 14.9 दशलक्ष टनांनी जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारकडून प्राप्त झाली आहे.


पिकनिहाय हमीभावातील वाढ (रुपये प्रति क्विंटल)


• कापूस मध्यम धागा- जुने दर - 6080, नवे दर - 6620, वाढ- 540


• कापूस लांब धागा- जुने दर - 6380, नवे दर- 7020, वाढ 640


• सोयाबीन- जुने दर- 4300, नवे दर - 4600, वाढ 300


• तूर- जुने दर - 6600, नवे दर- 7000, वाढ 400


• मका- जुने दर - 1962, नवे दर - 2090, वाढ 128


• मूग- जुने दर - 7755, नवे दर - 8558, वाढ 803


• उडीद - जुने दर- 6600, नवे दर- 6950, वाढ 350


• भुईमूग- जुने दर -5850, नवे दर- 6377, वाढ 527


• ज्वारी हायब्रीड- जुने दर - 2970, नवे दर - 3180, वाढ 210


• ज्वारी मालदांडी- जुने दर - 2990, नवे दर - 3225,वाढ 235


• भात सामान्य ग्रेड- जुने दर - 2040, नवे दर - 2183, वाढ 143


• भात ए ग्रेड -2060, नवे दर - 2203, वाढ 143


00000


अमरज्योत कौर अरोरा/वृत्त क्र.102 /8.6.2023



 

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराने गाठला 250 चा टप्पा

 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराने गाठला 250 चा टप्पा


            मुंबई, दि. 8 : विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या विविध संधी संदर्भात कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा 250 वा टप्पा मुंबईत पार पडला. मुलुंड येथील शासकीय आयटीआयच्या माध्यमातून आज महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


             या शिबिराला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य संजय गोरे, उपप्राचार्य संदीप परदेशी तसेच प्रदीप दुर्गे आदी उपस्थित होते.


            कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या करिअर संदर्भात अनेकदा संभ्रम असतो. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आयोजित करत असून आत्तापर्यंत 250 शिबिरे पूर्ण झाले आहेत. या शिबिरांमध्ये तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून तब्बल १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी क्यूआरकोडच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. या शिबिराचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत असून त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.


             आम्हाला कौशल्य युक्त महाराष्ट्र आणि रोजगार युक्त महाराष्ट्र ही संकल्पना राज्यात पूर्णत्वास आणायची असून त्या दिशेने पावले पडत आहेत यामुळेच आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन, तसेच इंटर्नशिप करताना 5 हजार रूपये दिले जात आहेत. त्यामुळे कौशल्ययुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत असल्याचेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.


            आयटीआयमध्ये एरोनेटिक स्ट्रक्चरल फिटर, ड्रोन टेक्निशियन, असे नव्याने ट्रेड यावर्षी सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी अशा ट्रेडमुळे कौशल्याच्या क्षेत्रात भरारी घेत आहेत, तर दुसरीकडे आयटीआयचे अद्ययावतीकरण होत असल्याने खूप बदल होत आहेत.

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी


 राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी

गुणात्मक सुधारणा करावी

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


 


            मुंबई, दि. 8 : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती.


            या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, ‘रुसा’चे संचालक निपुण विनायक, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.उज्ज्वला चक्रदेव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल जाहीर झाला आहे. शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना, नवीन संशोधन या मापदंडांवर संस्थांचे मानांकन ठरत असते. यात महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि संस्थांचा क्रमांक यादीत वरचा असावा. त्यासाठी विद्यापीठांनी गुणात्मक सुधारणा करावी. अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.


            शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा, महाराष्ट्रातील विद्यापीठ महाविद्यालयांची स्थिती आणि सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना, महाराष्ट्र राज्य अध्यापन प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा), एसएनडीटी विद्यापीठ, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, प्रवेश नियामक प्राधिकरण, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, उच्च शिक्षण संचालनालय व तंत्रशिक्षण कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, नियामक परिषद इत्यादी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

मूत्रसंस्थेचे आजार* 😣

 मूत्रसंस्थेचे आजार* 😣



लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, उन्हाळी, लघवीतून पू येणे, लघवीत रक्तयेणे, पोटात दुखणे, चेहरा सुजणे ही मूत्रसंस्थेच्या आजाराची वेगवेगळी लक्षणे आहेत.


💁🏻‍♀️ *लघवी अडकणे आणि बंद होणे या दोन लक्षणांमध्ये महत्त्वाचा फरक आहे.*

लघवी बंद होणे (किंवा कमी होणे) म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे किंवा कमी होणे, यामुळे लघवी कमी तयार होते किंवा बंद होते.

▶️ *लघवी अडकणे:* ◀️




'लघवी अडकणे' म्हणजे लघवी नेहमीप्रमाणे तयार होते पण मूत्रनलिकेच्या अडथळयांमुळे ती मूत्राशयात अडकून पडते. लघवी अडकली असेल तर बेंबीखालच्या ओटीपोटात तडस लागते. लघवी अडकली आहे असे वाटते. यामुळे ओटीपोटाच्या भागात फुगार वाटतो. लघवी अडकण्यामागचे आजार अनेक प्रकारचे असतात. 


▶️ *लघवी अडकणे:* ◀️


लघवी अडकणे ही गंभीर तक्रार आहे. बहुतेक वेळा त्यावर उपचारासाठी डॉक्टरकडेच जावे लागते. लघवी अडकण्याच्या कारणाचे निदानही आवश्यक असते. रोगनिदानासाठी काही बाबतीत क्ष-किरण चित्राची किंवा सोनोग्राफीची गरज पडते.


🌿 आयुर्वेद लघवी अडकली असेल, तर ती मोकळी करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून बेंबीखालच्या भागावर (म्हणजे फुगलेल्या मूत्राशयावर) गरम पाण्याने किंवा कपडयाने शेक द्यावा. शेक देण्यासाठी पळसाची फुले गरम करून वापरली जातात. याचाही उपयोग होतो. पळसफुलांचा रस (500मि.ली.) + हिरडापावडर (5 ग्रॅ) + गूळ (300 ग्रॅ) + धायटीची फुले (35 ग्रॅ.) यांचे एकत्रित आसव करून ठेवावे. हे आसव पोटातून दिल्यास लघवी मोकळी होण्यास मदत होते. हे आसव दीड ते दोन चमचे द्यावे व ओल्या फडक्याने मूत्राशयावर शेक द्यावा. लघवी बाहेर पडत नसल्यास वेळीच तज्ज्ञाकडे पाठवावे.


▶️ *लघवी बंद होणे:* 


तरुण-प्रौढ वयात दररोज सुमारे एक ते दीड लिटर लघवी तयार होते. हवामानाप्रमाणे व पाणी पिण्याच्या प्रमाणानुसार लघवीचे प्रमाणही बदलते. हिवाळयात लघवीचे प्रमाण जास्तअसते कारण घामाचे प्रमाण कमी असते. याउलट उन्हाळयात लघवी कमी होते.र् साधारणपणे तरुण- प्रौढ व्यक्तींमध्ये रोज एक लिटर हे लघवीचे किमान प्रमाण धरले जाते. टाकाऊ पदार्थ, युरिया, इत्यादी योग्य प्रमाणात शरीराबाहेर पडण्यासाठी एवढी लघवी तयार व्हावीच लागते. मूत्रपिंडाच्या निरनिराळया आजारांत हे प्रमाण कमी होत जाते व बंदही पडू शकते. हे अचानक घडू शकते किंवा हळूहळू (काही दिवस, महिने) होऊ शकते. हळूहळू आपली लघवी बंद होत आहे, हे बऱ्याच रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाही.

दररोज 24 तासांत ⏳ मिळून अर्धा लिटरपेक्षा कमी लघवी तयार होत असेल तर 'लघवी बंद' होत आहे असे धरावे. याची कारणे ही अनेक आहेत. लवकर इलाज झाला तर पुढचे नुकसान टळू शकते. सोबतच्या तक्त्याप्रमाणे कारणांचे तीन मुख्य गट पडतात. कारण काही असले तरी लघवी बंद किंवा कमी होणे ही अत्यंत गंभीर बाब असते. त्यासाठी ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. पहिल्या गटातील शुष्कतेचे कारण असल्यास जीवनजल त्वरित चालू करावे. लगेच सलाईन देण्याची सोय असल्यास आणखी चांगले


🍃 *आयुर्वेद:* 


लघवी बंद होणे (म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे) ही अगदी गंभीर गोष्ट आहे.

*याबरोबरच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काही उपाय करण्यासारखे आहेत.* 

यासाठी आधी पचनसंस्थेचे कार्य सुधारणे आवश्यक समजले जाते. सुंठ, मिरी, पिंपळी, आले यांपैकी एखादा पदार्थ वापरून पचन सुधारता येते.

💁🏻‍♀️ *आपले आरोग्य आणि आयुर्वेद यांच्या माहिती साठी आमचा व्हॉटस्अप ग्रुप नक्की जॉइन करा.*




👇🏻


💁🏻‍♀️ *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.* 


▶️ *लघवी बंद होणे - कमी होणे, जास्त लघवी होणे.

*जास्त लघवी होणे* याचा अर्थ नेहमीपेक्षा जास्त होणे. उदा. मोसमाप्रमाणे नेहमी 24 तासांत मिळून दीड ते दोन लिटर लघवी होते. मात्र आता ती 2 ते 3 लिटर किंवा जास्त होत असेल तर ती 'जास्त' आहे, असे म्हणता येईल. हिवाळा, जास्त पाणी किंवा द्रवपदार्थ पिणे ही जास्त लघवी होण्याची सामान्य कारणे आहेत


💁🏻‍♀️ *ही सामान्य कारणे सोडून 'मधुमेह' हे जास्त लघवी होण्याचे प्रमुख कारण आहे.*

एकूण लघवी जास्त होत असेल तर नेहमीपेक्षा 'जास्त वेळा' म्हणजे परत परत लघवी होण्याची प्रवृत्ती होते


▶️ *वारंवार लघवी होणे.*

'वारंवार' थोडी थोडी लघवी होत राहणे आणि 'जास्त' लघवी होणे यात फरक आहे. सर्वसाधारणपणे मूत्राशय, मूत्रनलिका यांत जंतुदोष असेल तर वारंवार लघवी लागते. मूत्राशय किंवा मूत्रनलिकेतील आवरणाचा चरचरीत लघवीमुळे दाह होत असेल तर लघवीस वारंवार लागते. मात्र यात एका वेळी लघवी 10-20 मिली. होते; जास्त होत नाही.

गरोदरपणात गर्भाशयाच्या वाढीमुळे मूत्राशयावर दाब येतो. पहिल्या तिमाहीत यामुळे वारंवार लघवी होते.

लघवी वारंवार होत असेल तर तज्ज्ञाकडून तपासणी होणे आवश्यक असते. मधुमेह किंवा इतर गंभीर कारण नसल्यास यावर साधा उपाय असा..

गूळ आणि एक-दोन चमचे हळदपूड एकत्र करून पाण्याबरोबर पोटात घ्यायला सांगावे. बऱ्याच जणांना याचा उपयोग होतो.

🥵 *उन्हाळी:* 🥵

वारंवार लघवी होत असेल तर त्याबरोबर बहुधा उन्हाळी (लघवीस जळजळ) होते. अशा वेळी लघवी गढूळ दिसते. कधीकधी रक्तामुळे लघवी थोडी लाल- तपकिरी दिसते.l

उन्हाळी म्हणजे गरमपणा. उन्हाळीची मुख्य कारणे म्हणजे एकतर लघवी तीव्र अथवा चरचरीत असणे. मूत्रनलिकेतील आवरणाचा (अस्तराचा) दाह होत असल्यास साध्या लघवीमुळेही जळजळ होते. मात्र पाणी पिण्याचे प्रमाण गरजेच्या मानाने कमी असल्यास लघवी कडक किंवा जळजळीत होते. त्यामुळे आवरणाचा दाह होतो. अशी लघवी गडद पिवळी किंवा कधी लालसर दिसते

ताप असेल तर मूळ जंतुदोषावर जंतुविरोधी औषध द्यावे लागते. एरवी उन्हाळीचा उपचार म्हणजे भरपूर पाणी पिऊन लघवी सौम्य-पातळ करणे.

जास्त पाणी पिऊन लघवी सौम्य केल्यास हा त्रास लगेच थांबतो. याबरोबरच खाण्याचा सोडा लिंबू-पाण्यात मिसळून द्यावा किंवा सोडामिंटच्या गोळया द्याव्यात. असल्यास फेनॅडिनच्या गोळया- (पूर्ण नाव फेनॅझोपायरिडिन) घ्याव्यात. या औषधाने लघवीची आग हमखास कमी होते.

▶️ *लघवीतून ‘पू’ येणे:*


लघवीतून धातू म्हणजे *वीर्य* जाणे हा शब्दप्रयोग लोकांमध्ये प्रचलित आहे. लघवीतून *'धातू जाणे'* हा शब्दप्रयोग 'पू जाणे' यासाठीच वापरला जातो. 'वीर्य' व 'पू' दिसायला सारखेच असल्याने हा गैरसमज तयार झाला असावा. लघवीतून वीर्य जाऊ शकत नाही. कारण वीर्य फक्त लैंगिक क्रियेनंतर जाते. इतर वेळी नाही. झोपेत वीर्यस्खलन (स्वप्नदोष) होणे, ही एक स्वतंत्र बाब आहे आणि याचा लघवीशी संबंध नाही. हा शब्दप्रयोग अर्थातच पुरुषांबाबतच वापरला जातो.

*लघवीवाटे 'पू'येण्याची कारणे म्हणजे*

L

(अ) मूत्राशयाचा जंतुदोष होऊन 'पू' तयार होणे व तो लघवीवाटे बाहेर पडणे. हे कारण असेल तेव्हा सर्वच लघवी गढूळ दिसते. 

(ब) दुसरे कारण म्हणजे मूत्रनलिकेचा जंतुदोष होणे. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मूत्रनलिकादाहाची काही कारणे समान तर काही वेगवेगळी असतात. लिंगसांसर्गिक जंतुदोष, संभोगानंतर काही वेळा येणारा जंतुदोष, इत्यादी कारणे समान आहेत. स्त्रियांमध्ये मासिक पाळीत स्वच्छता न पाळणे, योनिदाहातून येणारा जंतुदोष, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. 

(क) पुरुषांमध्ये वीर्यकोशाचा किंवा प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष असेल तर पू येत राहतो.

▶️ *लघवीतून रक्त येणे:*

मूत्रसंस्थेत मूत्रपिंडापासून मूत्रनलिकेपर्यंत कोठेही जखमेने रक्तस्राव झाला तर लघवीत रक्त उतरते. दुसरे म्हणजे रक्तातच रक्तस्रावाची प्रवृत्ती तयार झाली (उदा. सर्पदंश, चुकीचे रक्तशरीरात दिले जाणे, इ.) तर लघवीत रक्त दिसते

लघवीत उतरणाऱ्या रक्ताचे प्रमाण आणि रक्तस्राव झाल्यानंतर गेलेला वेळ यावर लघवीचा रंग अवलंबून असतो.

रक्ताचे प्रमाण अगदी थोडे असेल तर लघवीचा रंग बदलत नाही. पण सूक्ष्मदर्शी यंत्राने तपासणी केल्यास तांबडया पेशी आढळून येतात. रक्तस्राव ताजा असेल तर लघवीचा रंग कमी अधिक लालसर असतो. मात्र ठेवल्यावर थोडया वेळाने त्याचा रंग तपकिरी होतो

लघवीतून रक्त येण्याची कारणे अनेक आहेत. मूत्रपिंडास मार लागून रक्तस्राव होणे, मूत्रपिंडाचा जंतुदोष, मुतखडे, मूत्रसंस्थेचा कर्करोग, मूत्राशयाला अपघातात मार लागणे, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. याचे निदान रुग्णालयातच होणे आवश्यक आहे

▶️ *मूत्रसंस्थेच्या आजारामुळे पोटात दुखणे*


मूत्रसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये पोटात दुखते. प्रत्येक आजाराप्रमाणे पोटात दुखण्याची जागा व स्वरूप वेगवेगळे असते.


मूत्रपिंडात आजार असेल तर 'पोटात दुखते. पचनसंस्थेचे आजारात बेंबीच्या बाजूला दोन-तीन इंचावर दुखणे असते. पाठीकडून तपासल्यास शेवटची बरगडी संपते तेथे हे दुखणे आढळते. आजाराच्या तीव्रतेप्रमाणे हे दुखणे मंद किंवा तीव्र असू शकते. मूत्रवाहिन्यांमध्ये खडा असल्यास त्याच्या जागेप्रमाणे दुखणे असते. मूत्रवाहिनीत खडा असेल तर कळ पोटातून जांघेकडे किंवा लघवीच्या जागेकडे जाते. याबरोबर उलटी, घाम, अस्वस्थता, लघवीत रक्त उतरणे यांपैकी तक्रारी आढळतात.


मूत्राशयाचा आजार असेल तर बेंबीच्या खालच्या भागात दुखते. जंतुदोष असेल तर जळजळ किंवा कळ असते. लघवीस अडथळा असेल तर कळ येते. ही कळ मूत्रनलिकेत आल्यासारखे वाटते. मूत्रनलिकेतील जळजळ किंवा कळ प्रत्यक्ष मूत्रनलिकेतच जाणवते. पोटात दुखण्याची जागा, स्वरूप व इतर तक्रारी यांवरून आजाराचे निदान होऊ शकते. यासाठी पचनसंस्थेच्या प्रकरणात 'पोटात दुखणे' हा तक्ता पाहा


*मुतखड्यासारखा अडथळा...*


मूत्रप्रवाहामध्ये मुतखड्यासारखे अडथळा निर्माण होऊन तो Nephrons ना हानिकारक ठरतो. त्यामुळे हळुहळू पण शेवटी त्याचा परिणाम जुनाट मूत्रपिंडदोष निर्माण होण्यात होतो.


बरीच औषधे मूत्रपिंडाला हानी पोहचवितात. Aspirin, lbuprofen ही औषधे आणि Sulpha drugs आणि जेन्टामायसिन ही रोगप्रतिबंधक औषधे सगळ्यात घातक आहेत.


जर माझ्या मूत्रपिंडात जुनाट दोषाचे निदान झाले तर मी डॉक्टरांकडे केव्हा-केव्हा जायला पाहिजे...?


मूत्रपिंडाचा जुनाट दोष असणार्‍यांनी मूत्रपिंड तज्ञांकडून तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. या रूग्णांना कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तपासले पाहिजे. माझ्या डॉक्टरांनी मला २४ तासातील लघवी द्यायला सांगितले. 

सर्व प्रकारच्या मुत्रविकारात गोपियुष प्रभावीपणे ऊपयुक्त आहे.




*संकलन:* आर्या देव




💁🏻‍♀️ *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.* 🤗




🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺




*(

Featured post

Lakshvedhi